Jayant Rokade 🇮🇳 Profile picture
Aug 29, 2020 18 tweets 3 min read Read on X
@RakyaDadoos_
लेकीचा निरोप घेऊन काशीनाथ शास्त्री झपाझप पावलं टाकत घरी निघाले. शेजारच्या गावात दिलेल्या लेकीला भेटायला काशीनाथ शास्त्री वरचे वर जात असत.
सहसा शास्त्री बुवांना इतका उशीर कधीही होत नव्हता निघायला आणि समजा उशीर झालाच तर शास्त्री बुवा लेकी कडेच मुक्काम करत असत.
गोपिकाबाई निवर्तल्यानंतर परत माघारी घरी पोहोचण्याची विशेष अशी घाई देखील नव्हती राहिली काशीनाथ शास्त्रींना.

पण आज रात्री मुक्कामी घरी पोहोचणं जरुरीचं होतं. कारण देखील तसंच होतं, देऊळगाव आणि आसपासच्या पंचक्रोशीत गरीबांना अडीअडचणी च्या वेळी मदतीसाठी धावून येणारे डॉ. बर्डी यांच्या
कडे उद्या पहाटे पूजा सांगायला जायचं होतं शास्त्रीजींना. डॉक्टर बर्डी सुध्दा एक विक्षिप्त व्यक्तीमत्व होतं. वेळकाळ न पाहता गरीब गावकऱ्यांच्या मदतीला धावून जाणारे डॉक्टर बर्डी अविवाहित होते, प्रखर नास्तिक होते. पूजाअर्चा, देवधर्म या पासून फटकून लांब रहात असत. पण अचानक काय असं झालं
आणि त्यांनी काशीनाथ शास्त्रींना सत्यनारायणाची पूजा सांगण्यासाठी बोलावलं. पण त्यांच्या विक्षिप्त स्वभावाला साजेशी, पौर्णिमेला पहाटे ४ वाजताची वेळ त्यांनी काशीनाथ शास्त्रींना दिली.

शास्त्रींनी ती विचित्र वेळ डॉक्टर बर्डींकडे पाहून मान्य केली होती आणि ती वेळ गाठायची तर रात्री
मुक्कामी घरी पोहोचणं आवश्यक होतं.

वाट पायाखालची असल्याने आणि आकाशात पौर्णिमेचा चंद्र असल्याने काशीनाथ शास्त्रींना वेगाने चालण्यासाठी विशेष कष्ट घ्यावे लागत नव्हते. गाव जवळ येऊ लागलं तसे गावातले दिवे दिसू लागले. आता रेल्वेचं फाटक ओलांडलं की १० मिनिटांवर शास्त्रीजींचं घर.
घरी जाऊन झोपण्यापूर्वी उद्याच्या पुजेची तयारी करुन ठेवणं आवश्यक होतं. त्या विचारांच्या तंद्रीतंच आपण रेल्वे फाटकाजवळ कधी पोहोचलो ते काशीनाथ शास्त्रींना कळलंच नाही. तेवढ्यात पाठीमागून जोरात आवाज आला,
*"शास्त्री *बुवा, ट्रेन!!*"

काशीनाथ शास्त्रींनी जीवाच्या आकांताने जोरात
पुढे उडी मारली.वयामुळे शास्त्रींना तोल सांभाळणे जमले नाही आणि ते पडले. धडधडत ट्रेन निघून गेली.

शास्त्री बुवा उठून उभे राहिले. पाठीमागे वळून पहात त्यांची नजर त्या अनामिक आवाजाला शोधू लागली, ज्याने काही क्षणांपू्र्वी त्यांचा जीव वाचवला होता, काही अंतरावर त्यांना धडावेगळं डोकं
झालेला त्या व्यक्तीचा मृतदेह दिसला.

नखशिखांत हादरलेल्या काशीनाथ शास्त्रींना उद्याच्या पूजेच्या आठवणीने भानावर आणले. वळून शास्त्री पुन्हा वेगाने घराकडे निघाले. पण त्यांचा जीव वाचवणार्या त्या अज्ञात व्यक्तीचे विचार मात्र त्यांच्या डोक्यातून जात नव्हते.

साडेतीनच्या गजराने डॉक्टर
बर्डी जागे झाले. रात्रीच्या उशीरा पर्यंत लांबलेल्या सर्जरी मुळे उठण्याची इच्छा नसताना देखील त्यांना उठणं भाग होतं. काशीनाथ शास्त्री वेळेच्या बाबतीत पक्के आहेत , हे त्यांच्या कानावर आलेलं होतं. बेडवरुन उतरून ते झटपट तयार झाले. बरोबर ४ वाजता त्यांच्या दारावरची बेल वाजली. डॉक्टरांनी
पुढे होऊन दार उघडले. दारात त्यांच्या समोर स्वच्छ पांढरा सदरा आणि पांढरे शुभ्र धोतर नेसलेले शुचिर्भूत काशीनाथ शास्त्री उभे होते, प्रसन्न चेहरा आणि सुपरिचित हास्य घेऊन.

"या शास्त्री जी", डॉक्टरांनी काशीनाथ शास्त्रींना घरात घेतलं.

" चहा घेणार का?" या डॉक्टरांच्या प्रश्नाला
नकारार्थी उत्तर देत शास्त्रीजी नेहमीच्याच सफाई ने पूजा मांडण्याच्या कामाला लागले.
" पूजा झाल्यावर मी कपभर दूध घेईन, फक्त." लक्ष आपल्या कामाकडे ठेवत शास्त्री जी उत्तरले.
डॉ.बर्डी सुध्दा स्वच्छ पांढरे धोतर नेसून पूजेसाठी तयार झाले. स्वतः ला त्यांनी शास्त्रीजींच्या हवाली केले,शास्त्रीजी सांगतील तसं करत त्यांनी पूजाविधी ला सुरुवात केली.

दीड दोन तास चाललेली पूजा
यथासांग पार पडली. शास्त्रीजी पुटपुटत असलेले मंत्रोच्चार समजत नसले तरी डॉक्टर साहेबांना
तो संपूर्ण अनुभव अनोखा होता, भारून टाकणारा होता. आपण यापुर्वी अशा अनुभवाला मुकलो याचं नाही म्हटलं तरी थोडं वैषम्य वाटलंच.

पूजा संपल्यावर डॉक्टर परवानगी घेऊन उठले आणि सरळ किचनमध्ये गेले. केशर साखर घालून तयार केलेल्या दूधाचा भलामोठा ग्लास, त्यांनी आणून शास्त्रीजींना दिला.
सोफ्यावर बसून काशीनाथ शास्त्रींनी तो ग्लास संपवला.

सकाळचे साडेसहा वाजत आले होते.बाहेर उजाडायला लागलं होतं.
इतक्यात डॉक्टर साहेबांचा फोन खणखणला.
फोन हॉस्पिटल मधून होता. डॉक्टर साहेबांना लगेच येण्यासाठी पलिकडील व्यक्ती सांगत होता.
डॉक्टर म्हणाले " मला निघायला हवं." बोलता बोलता
डॉक्टरांनी पाकीट हातात घेतलं.
"नाही नाही, डॉक्टर साहेब, चला बसा. उत्तर पूजा उरकून टाकू". शास्त्री बुवा बोलले. "मलाही घाई आहे, आणि संध्याकाळी परत यायला मला जमणार नाही".

सुंदर पूजा सांगून खुश करणार्या काशीनाथ शास्त्रींना दुखवणं डॉक्टरांच्या जीवावर आलं.
"ठीक आहे, पण माझ्या कडे वेळ
कमी आहे". डॉक्टर बोलले.

त्याच सफाई ने शास्त्री बुवांनी उत्तर पूजा उरकली. डॉक्टर कपडे बदलून तयार होऊन येई पर्यंत काशीनाथ शास्त्री पण सगळं आवरुन तयार होऊन बसले. डॉक्टरांनी दिलेली घसघशीत दक्षिणा कनवटीला गुंडाळून काशीनाथ शास्त्री खुशीत बाहेर पडले.

डॉक्टर जेव्हा हॉस्पिटलमध्ये
पोहोचले तेव्हा दारातच उभा असलेला पोलिस इन्स्पेक्टर पुढे आला.
"डॉक्टर साहेब, पोस्ट मार्टेम आहे, रेल्वे खाली सापडून मेलाय्. बॉडी टेबल वर पोहोचवली आहे."

डॉक्टर सरळ OT मध्ये पोहोचले.
पोस्ट मार्टेम साठी आलेल्या बॉडी कडे पाहून जागीच थिजले.

तेच सुपरिचित हास्य चेहर्यावर पसरलेले काशीनाथ शास्त्री त्यांच्या कडेच पाहून हसतायत असा भास डॉक्टर साहेबांना झाला.

जमलं का?
@RakyaDadoos_

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Jayant Rokade 🇮🇳

Jayant Rokade 🇮🇳 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @jayant_rokade

Jan 28
Gandhi family appointed Shri Manmohan Singh to the post of PM on May 2004.

Deaths due to Bomb Blasts by Pissfuls in next 10 years till 2014.

15/08/04- Assam, 18 dead and 40 injured.

5/05/05- Ayodhya, 6 dead, dozens injured.

28/07/05- Shramjeevi Express train in Jaunpur,
13 dead, 50 injured.

28/10/05 Delhi's Govindpuri bus, 70 dead 250 injured.

28/12/05- IISc Bangalore 1 dead, 4 injured

7/0306- Sankatmochan Temple of Varanasi, 31 dead 101 people were injured.

11/07/06 Mumbai- in local trains, 209 dead, more than 700 injured.
8/09/06- Malegaon, 37 dead, 125 injured. Later an attempt was made to create a historically unsuccessful theory of Hindu terrorism by changing the charge sheet.

18/02/07- Samjhauta Express blast, 68 dead, 50 injured.

Blast Hyderabad, 16 dead and 100 injured.
Read 12 tweets
Jan 25
मुळात मराठा समाजाला आरक्षण का हवं आहे? काही प्रश्न आहेत.
दलितांवर शेकडो वर्ष अन्याय झालाय, त्यांना शिक्षण मिळू देण्यात अडचणी आणल्या गेल्या आणि समाजा पासून दूर ठेवून वंचिताचं जीवन जगावं लागलं. त्यांना ह्या अवहेलनेमुळे जे मागासलेपण आलंय ते दूर करण्यासाठी आरक्षण दिलं गेलं हे
समर्थनीय आहे. ते इतर पुढरलेल्या समाजाच्या बरोबरीने आले पाहिजेत.
पण
मराठ्यांना कधी आणि कोणी शिक्षणापासुन रोखलं होतं?
त्यांना जातीमुळे केव्हा अवहेलना सहन करावी लागली?
महाराष्ट्रात, राजकारण, साखर कारखानदारी, शिक्षण संस्था शेती यांमध्ये मराठ्यांची कायमच मक्तेदारी राहिली आहे.
असलेली शेती न करता, ती विकून कित्येक मराठा युवक गुंठेमंत्री झाले. फ्लेक्स बाजी करुन पुढारी होण्याच्या खटपटीत पूर्वजांनी मोठ्या कष्टाने उभारलेलं घरदार फुकून भिकेला लागले.
बाकी वाटण्या करुन करुन काही गुंठ्याचे शेतकरी होऊन राहिले. या सर्व पतनाला जबाबदार सरकार किंवा
Read 7 tweets
Oct 11, 2022
बामनांनी देवळांवर कब्जा केलाय?
---------------------------------
फोटोमध्ये दिसणाऱ्या दुर्गा देवीच्या देवळाचे पुजारी माझे आजोबा (आईचे वडील) होते. आता ते थकल्यामुळे मामा देवळात पूजा करतो. . माझे आजोबा जेव्हा पुजारी होते तेव्हा ते जानवं घालायचे आणि सोवळंही पाळायचे. आम्ही जातीने
ब्राम्हण नाही, मराठा आहोत. याच गावात यल्लम्मा देवीचं देऊळ आहे, त्याचे पुजारी कोळी समाजाचे आहेत. तिथून पुढे काही अंतरावर असलेल्या मातंगी देवीच्या देवळाचे पुजारी मातंग समाजाचे आहेत. अजूनही गावागावांमध्ये शंकराचे पुजारी हे गुरव समाजाचे असतात. भवानीच्या बऱ्याच देवळांमध्ये मराठा
समाजाचे पुजारी असतात. माझ्या गावात काळूबाईचं देऊळ आहे, त्याची पुजारीण एक वडार समाजाची बाई होती. या सगळ्या पुजाऱ्यांचे पाय ब्राम्हणांसकट अठरा पगड जातीचे लोक धरायचे, धरतात. त्यावेळी कधीच पुजाऱ्याच्या जातीचा विचार त्यांच्या मनात येत नाही.
नवीन नवीन फुरोगामी झालो होतो तेव्हा
Read 5 tweets
Dec 19, 2021
भाजप नेत्यांच्या, कार्यकर्त्याच्या मनात, छत्रपती शिवाजी महाराजांचा काय स्थान आहे, हे केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित भाई शहा यांच भाषण ऐका!

कर्नाटक मध्ये महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली. पण, त्याचे सूत्रधार महाराष्ट्रात सत्तेची चव चाखत आहेत.

कारण;
★ कर्नाटक मध्ये झालेल्या पुतळ्याची विटंबना काँग्रेस कार्यकर्त्याने केली.

★ तो कार्यकर्ता, काँग्रेसचा जिहादी आमदार जमीर अहमद याचा कट्टर समर्थक.

★ काळ फासण्याचं टायमिंग देखील अचूक निवडलं आहे. कारण, कर्नाटक सरकारने धर्मांतर विरोधी कायद्याचा ड्राफ्ट तयार केला.
★ महत्वाचा मुद्दा असा की, बेळगाव मध्ये कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन भरते.

★ याच हिवाळी अधिवेशनात धर्मांतर विरोधी कायदा कर्नाटक सरकार मांडणार आहे.

★ या कायद्याला विरोध तेथील काँग्रेस व स्थानिक कन्नड संघटना, व मिशनरी करत आहेत.

★ तो कायदा विधिमंडळ मध्ये आणू नये, यासाठी
Read 8 tweets
Nov 21, 2021
नम्रता

क्रिकेटपटू राहुल द्रविडला बंगळुरू विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले, जे राहुल द्रविडने कृपापूर्वक परत केले. पदवी तर परत दिलीच, पण अप्रतिम भाषणही केले; तो म्हणाला, "माझी पत्नी डॉक्टर आहे, तिने ही पदवी मिळवण्यासाठी अगणित, निद्रानाश रात्र आणि दिवस घालवले आहेत."
"माझी आई कला शाखेची प्राध्यापिका आहे, तिने पदवीसाठी चिकाटीने पन्नास वर्षे वाट पाहिली. मी क्रिकेट खेळण्यासाठी खूप मेहनत केली, पण माझा इतका अभ्यास झाला नाही, मग मी ही पदवी कशी स्वीकारू?"
1952 मध्ये इस्रायली सरकारने आईन्स्टाईन यांना पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती. आईनस्टाईन नम्रपणे
म्हणाले, “मी भौतिकशास्त्राचा अननुभवी विद्यार्थी आहे. मला राज्याचा कारभार आणि प्रशासन काय समजते !!!”
ग्रिगोरी पेरेलमन, रशियन जगप्रसिद्ध गणितज्ञ यांनी 2006 मध्ये फील्ड पदके आणि गणिताच्या क्षेत्रातील नोबेल पारितोषिकाच्या समतुल्य मानली जाणारी मोठी रक्कम परत केली. ते म्हणाले,
Read 6 tweets
Sep 4, 2021
मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सभासद नाही ...पण

१) RSS असे कुठले चुकीचे काम करतो?

२) जैशे मोहमद , लष्करे तोयबा , नक्षलवादी ह्या अतिरेकी संघटना जसा रक्तपात करतात तसा कुठला गुन्हा RSS ने केला आहे ?

३) इतर लोकांनी त्यांच्या धर्माप्रमाणे वागले की धार्मिक
मग RSS ने हिंदू धर्माचा अभिमान बाळगला तर ते
चुकीचे असे कसे काय ?

४) RSS ला जर देव , देश ,संस्कृती व धर्म अभिमान
असेल त्यात गैर ते काय ?

५) आपत्ती काळात उदा .पूर , आग , किंवा इतर संकट
काळात RSS स्वयंसेवक जी मदत करतात त्याचे
कौतुक का केले जात नाही ?
६) सिम्मी किंवा इतर इस्लामी संघटनांनी जसे अनेक
बॉम्बस्फोट केले तसे किती बॉम्बस्फोट RSS ने घडवले आहेत.

७) RSS मध्ये फक्त ब्राम्हणच आहेत का ? माझ्या
माहिती नुसार 20 %सुद्धा ब्राम्हण नाहीत.

८) नथुराम गोडसे हा RSS चा सभासद होता म्हणून जर RSS दहशतवादी असेल तर भाजप,
Read 10 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us!

:(