या अगोदर लोकशाही संबंधित मला तुम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची एक मुलाखत इथं दाखवायची आहे.
22 जून 1953 रोजी BBC चे जेष्ठ पत्रकार एडन क्रॉली यांनी पाचेक मिनिटं घेतलेली ही मुलाखत.
माझं आवाहन आहे..तुम्ही ही मुलाखत वाचावी आणि पुढे वाचण्यास द्यावी.🙏 #म 1/n
एडन क्रॉली : डॉ. आंबेडकर, भारतात लोकशाही काम करेल असं वाटतं का?
डॉ. आंबेडकर : नाही ती फक्त नावापुरती असेल. म्हणजे लोकशाहीचा लवाजमा, पंचवार्षकि निवडणुका, पंतप्रधान इत्यादी. 2/n
एडन क्रॉली : तुम्हाला निवडणुका महत्त्वाच्या वाटतात काय?
डॉ. आंबेडकर : नाही. या प्रक्रियेतून चांगले लोक तयार होत नसतील तर निवडणुका महत्त्वाच्या नाहीत. 3/n
एडन क्रॉली : पण सत्ताबदलाच्या दृष्टीने निवडणुका महत्त्वाच्या नाहीत काय?
डॉ. आंबेडकर : बदल घडवण्यासाठी मतदान करायचे, हा विचार रुजला आहे का? लोकांना अजूनही ती समज आलेली नाही. आपली निवडणूक पद्धती लोकांना उमेदवार निवडण्याचं स्वातंत्र्य देते का? 4/n
उदाहरणार्थ, काँग्रेसने बलाला मत द्या असं आवाहन केलं. आता तो बल कोणाचं प्रतिनिधित्व करतो याचा विचार लोक करतात का? त्या बलाच्या चिन्हावर एखादं गाढव उभं आहे की कोणी सुशिक्षित व्यक्ती, हा विचार कोणीच करीत नाही.5/n
एडन क्रॉली : मी पक्षपद्धतीवर बोलणार नाही, पण तुम्ही नावापुरती लोकशाही म्हणता, तेव्हा तुम्हाला काय अभिप्रेत आहे?
डॉ. आंबेडकर : इथे संसदीय लोकशाही काम करणार नाही. कारण इथली समाजव्यवस्था तिच्याशी विसंगत आहे. 6/n
एडन क्रॉली : ही व्यवस्था विषमतेवर आधारित आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का?
डॉ. आंबेडकर : हो. जोवर समाजव्यवस्था बदलत नाही, तोवर आत्ताची व्यवस्था विषमतेवर आधारित आहे. शांततामय मार्गाने व्यवस्था बदलायला वेळ लागेल हे मलाही मान्य आहे. पण कोणीतरी त्यासाठी प्रयत्न करायला हवेत ना. 7/n
एडन क्रॉली : तुमचे पंतप्रधान तर याबद्दल अनेक भाषणं करतात?
डॉ. आंबेडकर : ती न संपणारी भाषणं.. कार्लाईलने जेव्हा स्पेन्सरला कागदपत्रांचा गठ्ठा दिला तेव्हा तो काय म्हणाला, डँ, ‘Oh, this endless speaking Ass in christiandom’ 8/n
मला भाषणांचा कंटाळा आलाय. आता कृती हवी. एखादी योजना, एखादी संस्था, जी ही व्यवस्था बदलू शकेल.
एडन क्रॉली : याला पर्यायी व्यवस्था काय असू शकते?
डॉ. आंबेडकर : एखादी साम्यवादी व्यवस्था याला जबाबदार असू शकते. 9/n
एडन क्रॉली : ज्याचा देशाला फायदा होऊ शकेल असं तुम्हाला वाटतं का? लोकांच जीवनमान सुधारेल असं वाटतं का?
डॉ. आंबेडकर : होय सुधारू शकेल. लोकांना निवडणुकांपेक्षा आपल्या मूलभूत गरजांची काळजी जास्त असते. 10/n
अमेरिकेत लोकशाही काम करत आहे, तिथे साम्यवाद येईल असं मला वाटत नाही. याचे कारण, प्रत्येक अमेरिकन माणसांचं उत्पन्न खूप जास्त आहे.
एडन क्रॉली : ते इथे करता येईल असं नाही का वाटत तुम्हाला?
डॉ. आंबेडकर : कसं करता येईल? लोकांकडे पुरेशी जमीन नाही, पाऊस पुरेसा नाही, 11/n
जंगलतोड प्रचंड आहे, करायचं काय? या समस्या जोवर सोडवल्या जात नाहीत, तोवर या सरकारला हे प्रश्न सोडवता येतील असं मला वाटत नाही.
एडन क्रॉली : या देशातदेखील?
डॉ. आंबेडकर : हो अर्थात. युद्धात कत्तल होते, बरोबर? तुम्हाला त्याचं दु:ख नाही, 12/n
स्वत:च्या हितसंबंधांच्या रक्षणासाठी ते करणं तुम्हाला गरजेचं वाटतं?
एडन क्रॉली : ही व्यवस्था कोसळेल असं तुम्हाला वाटतं का?
डॉ. आंबेडकर : हो, ही व्यवस्था कोसळेल. मी माझ्या लोकांचा विचार करत आहे. ते अत्यंत उतावीळ झाले आहेत. आणि ते समाजातल्या सगळ्यात खालच्या स्तरात आहेत. 13/n
जर एखाद्या इमारतीचा पाया कोसळत असेल तर सगळ्यात आधी खालचा स्तर कोसळतो.
एडन क्रॉली : माझ्या लोकांचा, असं म्हणताना तुम्ही अस्पृश्यांबद्दल बोलत आहात ना?
डॉ. आंबेडकर : होय. आणि कम्युनिस्ट काम करत आहेत का? नाही. 14/n
कारण त्यांचा माझ्यावर भरवसा आहे आणि माझा त्यांच्यावर. ते मला विचारत असतात. मला त्यांना काहीतरी उत्तर द्यायला हवं ना!
झाली संपली मुलाखत..
या महामानवाने हे विचार 53 साली मांडले होते..आपण त्यांना महामानव मानलं की नाही मानलं त्याने त्यांची वैचारिक उंची तसूभरही कमी होणार नाही. 15/n
एक समाज म्हणून आपली समस्या ही आहे. की, 'आपण विचार काय मांडले यापेक्षा विचार कोणी मांडले यावरून ठरवतो ते विचार आत्मसात करायचे की नाही.'
हे करणं आपल्याला सुलभ जावं म्हणून आपण महापुरुष वाटून घेतले..घेतले तर घेतले वाटणीला आलेल्या महापुरुषांच्या विचारास तिलांजली ही दिली. 16/n
हे कुठंतरी थांबावं अस वाटत असेल तर भेदाभेद विसरून आपण सर्वांनी वैचारिक आणि सामाजिक पातळीवर अंग मोडून काम करणे गरजेचे आहे..ते कराल ही अपेक्षा.❤ n/n
ठाणे-बोरिवली बोगद्याची १४४०० कोटींची निविदा.. तांत्रिकदृष्ट्या एकच निविदाकार पात्र ठरतो.. दुसरा त्याविरोधात लवादाकडे जातो..पण तिथून त्यास पिटाळले जाते..तो पात्र निविदाकार मेघा इंजि. आणि पिटाळलेला L&T..ही घटना मे-२०२३ ची.
महिनाभरापूर्वी मेघा ने १४० कोटींचे रोखे घेतलेले असतात.
१/न
ते रोखे कोणत्या पक्षाला गेले हे उद्या स्पष्ट होईलच..पण आज आत्ताही शेंबड्या पोरानेही योग्य उत्तर द्यावं..असाच हा प्रश्न आहे..याच मेघाला समृद्धी महामार्गाचे काही काम वर्धा जिल्ह्यात मिळालेलं..त्यात वन्यजीवांसाठी ये-जा करणारा उन्नत मार्ग कोसळला होता.. पण काहीच कारवाई झालीच नाही.
२/न
मेघाने आपल्या गत ४ वर्षीच्या एकूण निव्वळ नफ्याच्या तब्बल १५% इतकी रक्कम रोखे खरेदीसाठी वापरली आहे..बिनदिक्कत कंत्राट मिळणे, अक्षम्य त्रुटीवर क्षमा मिळणे..ही त्या १५% चीच कृपा म्हणायची..गेल्या पाच वर्षात ९६६कोटींचे रोखे मेघाने घेतलेत.
३/न
अखंड एक पिढी तुझा खेळ बघत लहानाची थोर झाली.. एखाद्या खेळाशी भावना जुळण्याची ती त्या पिढीची पहिलीच वेळ.. तुझा खेळ पाहतानाचे 'नेल-बाईटिंगचे' अनेक प्रसंग आजही जशाच तसे आठवतात.. तत्कालीन जाहिरातीमधील पेप्सीसारखा थंडावा सापडणारी.. तुझी प्रत्येक नजाकत रसिकांची मनं शांत करत गेली..❤️
अजून मिसरुटही न फुटलेला 'सच्या' ते पोक्त 'मास्टर ब्लास्टर सचिन' या प्रवासाचे यथासांग सहप्रवासी होण्याचे भाग्य आमच्या पिढीने अनुभवले..तो बावनकशी अनुभव पारिजातकाच्या सड्याप्रमाणे सदैव आमच्या आयुष्यात सुगंधी पिंगा घालत राहील..पण त्या समृद्ध अनुभवाच्या भरजरी पदराला एक मात्र डाग आहे..
तो डाग म्हणजे..मूकसंमतीचा.
क्रिकेट माणसांनीच बनवलेला खेळ आहे.. माणूस म्हणून जे अवगुण असतात ते त्या खेळातही येणारच.. एक क्रिकेट रसिक म्हणून क्रिकेटच्या त्या अवगुणी वृत्तीविरोधात सचिनने काही बोलावं..ही एकमात्र आशा तेंव्हा अपूर्ण राहिली..तुझी ती मुकसंमती तेंव्हाही वेदनादायक होती.
तिन्हीसांजेची लगबग रस्त्यावर दिसत होती.. रस्ता फार काही वर्दळीचा न्हवता.. हार-फुलांची दोनचार दुकानं आणि शांत चहापानासाठी कौलारू एकदोन हॉटेलं.. अधूनमधून कुंपणाच्या आतील घरं..तुरळक एखादं किराणा मालाचं दुकानं..आणि रस्त्याच्या टोकाला छोटेखानी कसलं तरी मंदिर.. बस् संपला रस्ता.. #Love
परिसर तुलनेत शांत होता.. कुठंतरी लांब चंदन अगरबत्ती धुराची काडी हवेत सोडत होती..ती काडी संपता संपता सायलेंट सुगंध त्याच्यापर्यंत पोहचवत होती..त्या सुगंधाने दिवसभराची ओढाताण हलकी होत होती..दिवेलागणीला असतो तो आभाळातला भडक तांबूसपणा आता विझत आला होता..त्यातच थंडीची धांदल सुरू होती.
नगराच्या मध्यवर्तीत असूनही हा तळ मनाला भुरळ पडणारा होता..वाहतूक अगदी शिस्तीत जात होती.. मंदिराकडे जाणारी माणसं दुर्मिळ असणाऱ्या शांत चेहऱ्याने लगेच ओळखू येत होती.
फुलांच्या दुकानात 'मेरे दिल में आज क्या है.. तू कहे तो मैं बता दूँ।' वाजणारं गाणं फुलांना अजूनच खुलवत होतं..
दिवसाच्या पहिल्या प्रहराची सुरवात..रात्री बाराला गडगडाटी पाऊस पडून गेला होता..घरी सगळे साखर म्हणावी अशा झोपेत..रातकिड्यांची किरकिर शांत वातावरणाची शांतता भयाण रातीत परावर्तित करत होती.. मधूनच एखादं कुत्रं रडायचं..पण ते कोणीतरी तोंड दाबून धरल्यागत लगेच शांत पण व्हायचं. #Annabelle
मला जाग आली तेंव्हा घरात सगळे आपापल्या रूममध्ये झोपले होते..फॅनची घरघर सोडता कसलाच आवाज न्हवता..अजून थोडा वेळ आहे, पडावं..या हिशोबाने मी कलंडलो..इतक्यात लहान मुलांच्या सायकलचं ते इंग्लिश संगीत वाजायला सुरवात झाली..पहिल्यांदा मला बाहेरून आवाज येतोय वाटलं..पण ते फक्त पाचच मिनिट.
कारण आवाजाची दिशा ही आपल्याच घरातून होती..आणि इतक्या उशीर आमच्या घरात एकसारखं ते संगीत वाजायची ही पहिलीच वेळ..आणि एवढं घाबरायचीही ही पहिलीच वेळ.. अगदी The Conjuring, Annabelle एका दणक्यात आठवावी इतकी.
काय करावं कळत न्हवतं..आणि खोलीचं दार उघडलं आणि काही दिसलंच तर करायचं काय?
उघड्या माळावर कुसळं उगवून वाळून जायची..ती खायला जनावरं सुद्धा नसायची..नजर जाईल तिथवर चिटपाखरूही न्हवतं..उघडे डोंगर-माळ ज्यांच्या मालकीचे..ते ही काही करू शकत नव्हते..अशात त्यावर नजर पडली एका बड्या पवनचक्की कंपनीची..आणि एका रातीत लोकांना पैशे ठेवायला नव्या ट्रंका घ्याव्या लागल्या.
जमिनीचे सौदे ठरतील तसं एका एका घराचे वासे फिरू लागले.. लाकडी तुळई जळणात गेल्या..त्या जागी RCC पिलर आले.. सायकलची चैन पडायची त्याच जागेवर धूळ आत येऊ नये म्हणून चारचाकी काचा वर करू लागल्या.. ३ डोकी घरात असूनही दारात ४-४ दुचाकी आणि २-२ चारचाक्या सर्रास दिसू लागल्या.
मळलेल्या कॉलर गेल्या..व्हाइट कॉलर आता ड्रायक्लीन होऊन येऊ लागल्या..पाण्याच्या घोटासाठी वाट बघणारे.. आता बार मालकाला खिशात ठेऊ लागले..सो कॉल्ड बरकतीने गाव सारा फुलून उठला..भावंडात हिश्श्यावरून धराधरीही झाली..हा सगळा गोंधळ चांगला दशकभर सुरू राहिला..खर्चापेक्षा जमा जास्त होती.
रशिया-युक्रेन कुस्ती फक्त ५६" किंवा इंधन महागाई एवढ्यापुरती मर्यादित नाही..युक्रेन पट्टीचा गहूनिर्यातदार देश आहे..सूर्यफूल,सोयाबीन इ. तेल ही तो पिकवतो.. सांगायचा मुद्दा आहे..युक्रेन युद्ध धांदलीत अडकल्याने.. आंतरराष्ट्रीय बाजारात त्या जिन्नसांचा तुटवडा आहे..❤️ #farm
आपल्याकडे आत्तापासूनच खाद्यतेल महागाई जाणवत आहे ती त्यामुळेच..खाद्यतेलाच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण नाही..त्यास पर्याय नाही..पण, गव्हाचे तसे नाही.. सद्यस्थितीत भारत गव्हाचे चार दाणे बाळगून आहे.. शिवाय यंदाचे रब्बी उत्पादन ही येईल..तेंव्हा केंद्राने निर्यातबंदी न करता हा योग साधावा.
शेतकऱ्यांना चार पै ज्यादाचे मिळतील त्याने.. पण, केंद्राची शेतकऱ्यांप्रति असलेली भावना यापूर्वी कांदा आणि साखर निर्यातबंदीत दिसलीच आहे..अन्नसुरक्षा या सदराखाली शेतकऱ्यांचा जीव घेऊनच स्वस्त धान्य दुकानांची शृंखला चालवण्याची परंपरा यंदा तरी खंडित व्हायला हवी.