मोदीजी -गडकरीजी तुलना
सोमनाथ कन्नर (फेसबुक वरून)

तुलनात्मक बघितल्यास गडकरी हे पॉलिश केलेले मोदीच आहे. दोघांच्या भाषेत फक्त तेवढा फरक आहे. म्हणजे मोदी सरळसरळ आ*ड म्हणतो तर गडकरी वृषण म्हणतात, बाकी वेगळं काही नाही.
नागपुरातील सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प असो, त्यातून युरिया निर्मिती प्रोजेक्ट असो, इंधन मुक्त गाड्यांचा प्रोजेक्ट असो की रस्त्यांचा विषय असो, आकड्यांसमोर नुसते झिरो वाढवत नेणं ही या माणसाची फेवरेट फॅन्टसी आहे.
बाकी ८ वर्षातील कामाचा लसावी काढल्यास या व्यक्तीच्या अपयशाचं गुणोत्तर मोदीच्या तोडीचंच आहे, पण रेशीमबाग तालमीत कसलेले असल्याने गाव जळो हनुमान नामानिराळा उक्तीप्रमाणे हे महोदय कायम लोकांच्या गुडबुकमध्ये असतात.
निराधार, अवास्तव, अशक्य बोलायचं पण रेटून बोलायचं हा गडकरींचा सक्सेस पॅटर्न आहे. त्यांना खात्री असते की कुणीही फॅक्ट क्रॉस चेक करत नाही. गतवर्षी यांनी भारतात प्रतिदिन ४० किलोमीटरचे रस्ते बनतात अशी पुडी सोडून दिली होती. कुणीतरी मेहनती पत्रकाराने अधिकृत माहिती काढली असता ते
अंतर निम्म्यापेक्षाही कमी होतं. प्रश्न विचारला असता गडकरीजींनी दुपदरी रस्त्याच्या दोन्ही बाजू वेगवेगळ्या मोजल्याचा निलाजरा खुलासा केला अन वेळ मारून नेली.

भाजपकडे भ्रमित करणारी माणसं आहेत. यांच्या मातृसंघटनेचा पायाच भ्रमिष्ट करणाऱ्या विचारांवर अवलंबून आहे.
कायम इतिहासातील कपोलकल्पित गोष्टींमध्ये रममाण होऊन आभासी तथ्यांचं गजकर्ण खाजवत त्यातून ऑर्ग्याजम मिळवणे यावर यांचं विचारसंचित अवलंबून आहे.

काल कुठतरी गडकरी नेहमीप्रमाणे तावातावाने अमेरिकेत एकरी ३० क्विंटल सोयाबीन उत्पादन होतं अन भारतात का होत नाही वगैरे
त्यांच्या शैलीत रेटून बोलत कृषी विद्यापीठांवर खापर फोडून आले. म्हणतात ना सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, नाहीतर तिथंच एखाद्याने गडकरीजींना सहा महिन्यांपूर्वीच सोयाबीन आयतीवरून उडालेला गदारोळ, जीएम तंत्रज्ञान, भारतातील तेल आणि पशुखाद्य उत्पादक लॉबीच्या सोयाबीन आयातीच्या
मागणीचं पत्र घेऊन खुद्द केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पंतप्रधान कार्यालयाच्या दारात घुटमळत होता, इत्यादी व्यवस्थित कान धरून सांगितलं असतं.

देशाची ३० टक्के गरजही देशांतर्गत सोयाबीन पूर्ण करू शकत नसताना शेतकऱ्यांना रडूनपडून ५ ते ६ हजार दर मिळत असेल तर
अतिरिक्त ६ पट उत्पादन घेऊन काय ते सोयाबीन फुकट वाटायचं की घरीच दोन्ही वेळ सोयाबीन वड्यांची भाजी खायची शेतकऱ्यांनी? अर्थात तर्क, अभ्यास वगैरे याचा अजिबात विचार न करता बेधडक मत ठोकून देणे, निर्णय घेणे आणि लोकांच्या कानाला खुश करून खिशात हात घालणे हे यांचं इथूनतिथून सारखं धोरण आहे.
त्यामुळे अर्थव्यवस्थेला भोकं पडून ठेवल्याने देशरूपी घराचं संपूर्ण छतच पावसात गळत असताना एखाद्याला तू तरी घरात मुतू नको बाहेर जाऊन सु सु कर असं कुणी म्हणावं तरी कोणत्या तोंडाने? म्हणून सगळे अर्थ, शेती क्षेत्रातील तज्ज्ञ लोक तोंडावर बोट ठेवून गप्प बसलेत.
गडकरीजींनी सोयाबीन उत्पादन वाढीसाठी रस्त्यांचा फॉर्म्युला वापरून एकराचं माप वाढवून ते ४० गुंठ्यांवरून ८० गुंठ्यांचा एक एकर असं घोषित केल्यास नवल वाटणार नाही. शेवटी समस्या सोडवणं हा यांच्या कायम आवाक्याबाहेरचा विषय आहे. म्हणून ते केवळ समस्यांचं सुलभीकरण करून मोकळे होतात.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with 𝓢𝓾𝓱𝓪𝓼 𝓦𝓪𝓻𝓮

𝓢𝓾𝓱𝓪𝓼 𝓦𝓪𝓻𝓮 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Suhas_writes

May 1
अफजल खानाचा कोथळा बाहेर काढल्या नंतर महाराजांची योजना होती की लगेच गडाच्या दरवाज्या कडे धाव घ्यायची.
महाराजांनी वाघनखे खुपसली, कोथला काढला. सय्यद बंडा आला, जिवा महालांनी त्याला ठार केलं.क्रुष्णाजी भास्कर आडवा आला, महाराजांनी त्याला कापला आणि प्रतापगडाच्या दरवाज्याकडे
पळत सुटले.
जाता जाता सोबतचे अंगरक्षक मोजु लागले...

१,
२,
३,
४,
५,
६,
७,
८,

फक्त ९??

सोबत तर दहा होते...

मग कोण बाकी राहिलं राजांनी विचारलं...

कोणी तरी म्हटलं,'संभाजी कावजी नाही जी'
राजे म्हणाले, 'नाही?
काय झालं?
मधुनच कुठे गेला?'
तेवढ्यात संभाजी कावजी धापा टाकत आला.
राजे संतापले आणि म्हणाले, 'संभाजी कुठे होतास?'
संभाजी कावजी म्हणाला,
'राजं तुम्ही वाघनख मारली खानाला पण म्हटलं
मरत्यो की न्हाई म्हणुन मागे गेलो आणि त्याचं शीर
कापुन आनलं' आणि त्यानी कापुन आनलेलं खानाचं डोकं वर केलं
राजांना दाखवायला...
Read 7 tweets
Mar 26
"इचिगो ईची"

हेक्टर गारसिया आणि फ्रांसेक मीरालेस
अनुवाद : प्रसाद ढापरे

'इकिगाई' या पुस्तकात लेखकांनी जीवन जगण्यासाठी ध्येय असावे हे सांगितले आहे.

त्या साखळीतील दुसरी एक जापनीज पद्धती म्हणजे ईचीगो ईची.
जी आपल्याला वर्तमानात जगायला आणि प्रत्येक क्षणाला अविस्मरणीय करायला शिकविते.
ईचीगो ईची म्हणजे आत्ता आहे त्या क्षणात जगा.
आपण रोज जगताना अनेक विचार आणि भावना सोबत बाळगत असतो. आणि त्या विचारांमुळे आणि भावनेमुळे आपण ना धड आनंदी असतो ना धड दुःखी.
त्यामुळे, आपण सध्याचा प्रत्येक क्षण हा पूर्ण उत्साहाने जगलो तर जीवन कसे cheerful असू शकते ते सांगितले आहे.
आहे त्या क्षणाला भरभरून आणि सगळ्या आप्तांसमवेत अनुभवून आणि मजेत जगा, अशी ही पद्धती आहे.
एकाग्रतेने गोष्टी समजून घेऊन सोबतच ऐकण्याच्या, पाहण्याच्या, स्पर्शाच्या, स्वाद घेण्याच्या, सुगंध घेण्याच्या माध्यमातून आपण सध्याचा क्षण पूर्णपणे जगून घेतला पाहिजे असं यात सांगितले जाते.
Read 6 tweets
Mar 25
इकिगाई
हेक्टर गारसिया आणि फ्रांसेक मीरालेस
अनुवाद : प्रसाद ढापरे

फक्त कार्यरत राहिलात तरीही शतायुषी व्हाल, या जापानी म्हणी पासून पुस्तकाची सुरुवात होते.
इकिगाई, म्हणजे आपल्या flow मध्ये जगणं.
म्हणजेच जे आवडते ते करत राहणे आणि सतत स्वतःला व्यस्त ठेवणे.
सहज बोलताना जगण्याच्या आणि सहज बोलता बोलता या पुस्तकाची कल्पना प्रसवते आणि हे पुस्तक जन्माला येते.

पाश्चात्य लोकांच्या मानसिक स्थितीवरून दीर्घायुषी जपानच्या लोकांविषयी चर्चा रंगात जाते आणी पुस्तकाची निर्मिती होते. 😊
या पुस्तकात दीर्घायुषी, निरोगी आणि आनंदी जीवन कसे जगावे या बद्दल सांगितले आहे.
जपानमधील लोक इतके दिवस कसे काय जगतात. त्यांच्या जीवनामध्ये ते नेमके काय करतात उभा बद्दल लेखकाने सांगितले आहे.
शेवटी पुस्तकाचे सार 10 मुद्द्यांमध्ये सांगितले आहे ते खालील प्रमाणे :
Read 4 tweets
Mar 24
"रावण"
राजा राक्षसांचा

शरद तांदळे यांचं हे चर्चित पुस्तक वाचून पूर्ण केलं.
रावण म्हणजे रामायणातील खलनायक ज्याने सीतेला पळवून नेले होते आणि म्हणून त्याची रामाने हत्या केली.
इतकी जुजबी माहिती मला या पुस्तकातील नायकाविषयी होती.
पण हे पुस्तक हाती लागले आणि रावण उलगडलायला लागला. Image
रावणाच्या वंशावळी ने या पुस्तकाची सुरुवात होते आणि आपल्याला समजते की राक्षस कूळ हे असुर, दैत्य, दानवादी कुळांचा समूह आहे.

पुढे रावण हा स्वतः बद्दल माहिती सांगतोय अश्या पद्धतीने पुस्तक पुढे नेते.

रावण स्वतःबद्दल त्याच्या ऋषी कुलाबद्दल आणि त्याच्या वडीलांबद्दल सांगतो.
पौलस्त्य ऋषींचा नातू पण दासीपुत्र असल्याने त्याला अनेक गोष्टी नाकारल्या जातात त्यामुळे तो थोडा चिडखोर बनतो.
त्याची आई आणि दोन मावश्याना कुबेर (जो रावणाचा सावत्र भाऊ होता) आपल्या पित्याला भेट म्हणून देतो.
नंतर दशग्रीवाचे (रावण) आईचे वडील सुमती आणि मामा प्रहस्त त्यांना सोडवितात.
Read 9 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(