#कड़वत देशप्रेम
लेखणीचे निर्भय होणे गरजेचे आहे. घाबरलेली शाही कधीच सत्य लिहू शकत नाही व निर्भय शाही, असत्य समोर झुकत नाही. मी लिहिल, कुठपर्यंत माहीत नाही, पण लिहिल, लिहिण्याचा प्रयत्न करेल आणि सत्य लिहिण्याचा प्रयत्न करेल. ह्या गोष्टीची हमी नाही की .
माझे सत्य आणि तुमचे सत्य एकच असेल पण, निडर होऊन लिहिल याची हमी मात्र नक्की असेल.

मला हे नाही माहित की तुमच्या नजरेत राष्ट्रवादी असण्याची खरी व्याख्या काय आहे, तुम्ही राष्ट्रप्रेमाला कुठल्या नजरेने बघतात. पण जर तुम्ही सत्य ला सत्य व असत्य ला असत्य म्हणण्याची ताकत नाही ठेवत
स्वतः जवळ तर मात्र स्वतःच्या आत डोकावून बघण्याची आज गरज आहे.

एका महान व्यक्तिमत्व असलेल्या माणसाने म्हटले होते की,
"पार्टियां आती जाती रहेंगी परन्तु देश सर्वोपरि है, उसका रहना आवश्यक है."

खूप चांगले असे काहीच नसते, जे असते ते फक्त कमी वाईट असेच असते, आणि आपण तुलना करून ते
निवडतो जे कमी वाईट आहे. याचा अर्थ असा नाही की आपण निवडून दिलेल्या लोकांनाच प्रश्न नाही करू शकत पण हो ते प्रश्न देखील बरोबर, सार्थक आणि देशहिताचे असले पाहिजे.

राष्ट्रवाद सोबत, आपण राष्ट्राच्या संज्ञेचे देखील अध्ययन केले पाहिजे. वेळ काढून त्या लोकांबद्दल माहिती
घेतली पाहिजे ज्यांनी निस्वार्थ पणे राष्ट्रासाठी तन, मन, धन बलिदान केले.

राष्ट्र म्हटल्यावर अधिकार सर्वांना आठवतात पण जबाबदार्‍यांचे काय? जबाबदारी पूर्ण करण्यासाठी कोणी प्रयत्न करताना दिसतो का?
देशासाठी मरायला सर्वच तयार असतात, तुम्ही पण एका पायावर तयार व्हाल. पण देशासाठी मरणे राष्ट्रप्रेम नाही दाखवत. देशासाठी जगणे, चांगला विचार करणे, ते विचार अंमलात आणणे, लोकांसमोर स्वताचे चांगले उदाहरण दाखवून देणे. हे आहे राष्ट्रप्रेम.

देशासाठी सीमेवर लढणारा सैनिक असो किंवा
महानगरपालिकेत कचरा गोळा करणारा एक साधारण कामगार, दोघेही देशासाठीच काम करताय आणि आपण मात्र देशप्रेमाच्या गप्पा मारून देशात कचरा फेकून घाण करणारे नालायक. सार्वजनिक गोष्टींचे नुकसान करणारे नालायक, का करतो नुकसान? कारण कोणी भरपाई मागायला येणार नाही आहे,
स्वताच्या गाडीमध्ये नाही थुंकणार पण एसटी मध्ये मात्र पूर्ण वेळ थुंकत राहू, कोण बोलणार आहे आपल्याला अस म्हणून अधिकार असल्यासारखे वागू व घरी येऊन भ्रष्टाचार करतात म्हणून राजकारण्यांना शिव्या देऊ.

शेवटी, राष्ट्रवाद एक भावना आहे, तिला चुकीच्या
दिशेला नेऊन तिचा अपमान करू नका कारण ही गोष्ट फक्त आपली नाही आपल्या येणार्‍या पिढ्यांची देखील आहे. आपण जे बीज आज पेरू उद्या तसेच फळ लागतील.
अजून 4 दिवस आहेत स्वातंत्र्य दिन यायला, दरवर्षी सारखा येईल आणि जाईल पण त्या दिवसाच्या निमित्ताने थोडेतरी जागरूक होऊ का आपण देशाप्रती हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा
🙏🇮🇳 जय हिन्द 🌺

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Surya🇮🇳🚩

Surya🇮🇳🚩 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Surya_20111988

Aug 13
इंग्रजीत एक शब्द आहे
"Expansive-poverty" याचा अर्थ ... "महाग - गरीबी" म्हणजे ... गरीब दिसण्यासाठी खूप खर्च करावा लागतो. अशी गांधीजींची गरिबी होती. एकदा सरोजिनी नायडू यांनी त्यांची खिल्लीही उडवली होती की "तुम्हाला गरीब ठेवणे आम्हाला खूप महागात पडले आहे!!" असे का ?...... Image
गांधीजी जेव्हा जेव्हा थर्ड क्लासमध्ये प्रवास करायचे तेव्हा ते सामान्य थर्ड क्लास राहत नसे. व्हिक्टिम कार्डचा लाभ गांधीजींना मिळावा, अशी इंग्रजांची इच्छा नव्हती, वाईट परिस्थितीत गर्दीत प्रवास करूत असतानाचे वृत्तपत्रांत छापून यावेत
म्हणूनच जेव्हा तो रेल्वेने प्रवास करायचा तेव्हा त्याला एक विशेष ट्रेन दिली जायची ज्यामध्ये एकूण ३ डबे होते. जे फक्त गांधीजी आणि त्यांच्या साथीदारांसाठी होते, कारण प्रत्येक स्टेशनवर लोक त्यांना भेटायला यायचे.
Read 10 tweets
Aug 11
शबरी म्हणाली - जर रावणाचा अंत करायचा नसता तर राम, तू इथे अजिबात आला नसता!
राम गंभीरपणे म्हणाले, आई तू गोंधळू नकोस राम रावणाला मारायला आला आहे का?
अहो, लक्ष्मण अगदी पायाने रावणाचा वध करू शकतो.
हजारो कोस पायी चालत या खोल जंगलात राम आला आहे, फक्त आई तुला भेटायला आलो आहे,
म्हणजे हजारो वर्षांनी जेव्हा एखादा ढोंगी भारताच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे करेल तेव्हा इतिहास ओरडून उत्तर देईल की या राष्ट्राला वाचवण्या साठी
क्षत्रिय राजा राम आणि त्याची भिलाणी आई यांनी एकत्र मिळुन बनवला आहे
Read 13 tweets
Aug 7
... १९७०च्या दशकात इंग्लंड मध्ये "हिप्पी" नावाचा एक पंथ उदयाला आला... खांद्यापर्यंत रुळणारे केस... अनेक दिवस न केलेली दाढी... अंगावर गोंदलेलं... बनियन आणि बर्मुडा असा वेश... तोंडात कायम सिगरेट... तारवटलेले डोळे... जीवन जगण्याचे कुठलेही नियम नाहीत...सगळ्यांना बांधणारा समान
दुवा म्हणजे अमली पदार्थांचे व्यसन... विशेषतः चरस गांजा... धूम्रपानाद्वारे करता येणारी नशा अधिक... अगदी एका शब्दात वर्णन करायचे झाले तर "मवाली"... आपल्याकडे अनेक वर्षांपूर्वी तरुणांमध्ये लोकप्रिय असलेला "हिप्पी" कट हे याच हिप्पी पंथाचं वैशिष्ट्य होतं...
...
या हिप्पींच्या टोळ्या असत... प्रत्येक टोळीचा एखादा अड्डा असायचा... प्रत्येक टोळीत प्रचंड एकजूट... हिप्पी टोळ्यामध्ये ही चांगला समन्वय असायचा... या संघटीत शक्तीच्या जोरावर हिप्पी पंथीयांनी इंग्लंडमध्ये एक नवीन प्रथा सुरु केली होती... हिप्पी टोळकं
Read 14 tweets
Aug 6
माणसांची पारख करायची आहे ?
तीन मिनिटे वेळ काढून वाचा !!
***********
थंडीचे दिवस असतात. त्यामुळे एका राजाने त्याचा दरबार महालात न भरवता उघड्या मैदानात भरवलेला असतो. सूर्याच्या कोवळ्या उन्हात प्रजा बसलेली. कामकाज सुरु होते. इतक्यात तिथे बाहेरगावाहून एक माणूस येतो. तो राजाला म्हणतो,
"माझ्याजवळ दोन वस्तू आहेत. त्यात एक नकली आहे आणि एक असली आहे. मी आजवर अनेक राज्यातून फिरत आलोय. आजवर एकानेही असली वस्तू ओळखली नाहीये. ती जर तुमच्यापैकी कोणी ओळखली तर ती वस्तू तुमच्या खजिन्यात मी आनंदाने जमा करेन, मात्र कोणीच ओळखली नाही तर त्या
असली वस्तूच्या किमती इतके धन तुम्ही मला दिले पाहिजे. आजवर माझे हे आव्हान कोणीही जिंकू शकलेले नाहीये."
***
जमलेल्या लोकात उत्सुकता पसरते. कि काय असेल ती वस्तू ? शेवटी राजा तयार होतो. राजाच्या समोरच्या मंचावर तो माणूस आपल्या पोतडीतून दोन वस्तू काढून
Read 10 tweets
Jul 24
*रिकाम्या खुर्चीचं रहस्य...*
...
...
...
एकदा एक तरुण मुलगी एका संतमहात्म्याकडे गेली आणि त्यांना आर्जवानं विनंती करत म्हणाली, “माझे बाबा गेले अनेक महिने आजारी असल्यानं त्यांना स्वतःहून काहीही हालचाल तर करता येत नाहीच, परंतु ते रुग्णशय्येला खिळून आहेत. तुम्ही एकदा येऊन
त्यांना भेटाल का?”

“का नाही...? नक्कीच येईन मी...” करुणासागर असलेले संत उद्गारले.

त्या घरी भेट दिली असता, त्या संतांना असं दिसलं की रुग्णशय्येला खिळून असलेल्या त्या वृद्ध व्यक्तीच्या पलंगाशेजारी एक रिकामी खुर्चीही ठेवलेली आहे.

“तुम्ही कदाचित् मी येण्याचीच वाट पहात होता असं
दिसतंय?” त्या खुर्चीकडे पहात संत म्हणाले.

“नाही...नाही...तसं नाहीये.” वृद्ध व्यक्ती उद्गारली.

त्यानंतर ती वृद्ध व्यक्ती विनंतीच्या स्वरात म्हणाली, “हे महाराज! कृपया खोलीचं दार लावून घ्याल का?”

संतांनी दार बंद केल्यावर, वृद्ध व्यक्ती पुन्हा बोलू
Read 16 tweets
Jul 24
आंध्रप्रदेशातील तिरुपती बालाजीच्या चेकपोस्टवर छत्रपति शिवरायांची मुर्ती असलेल्या गाड्या अडवण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यावरुन लगेच काही हिंदुद्रोही सक्रीय झाले आहेत. लगेच गाडीवरील तिरुपती बालाजीचे फोटो फाडण्याचे व्हिडिओदेखील मूर्ख हिंदुच शेअर करत आहेत.
हिंदुमध्ये फुट पाडण्याचा हा मोठा डावही असू शकतो!

1) ही घटना टोल नाक्यावरील आहे. तेथील आधिकारी याला जबाबदार आहे. त्याच्यावर कारवाईची मागणी झाली पाहिजे. शिवतीर्थ रायगडावरही पुरातत्व विभागाकडुन असाच त्रास शिवभक्तांना कधी कधी होतो, प्रशासनाच्या या चुकांमुळे आपण शिवरायांनाही
नाकारणार आहोत का?

याला आंध्रप्रदेश सरकारला व मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनाच जबाबदार धरले पाहिजे. आंध्र प्रदेश सरकार तिरुपती संस्थानवर हिंदूंच्या राजालाच प्रवेश कसा देत नाही? हिंदू मंदिरावर सरकारचे नियंत्रण असणे असे धोख्याचे होत चालले आहे.
Read 7 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(