जगप्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी Oracle ने आपल्या जागतिक कर्मचाऱ्यांपैकी सुमारे १८% (जवळपास ३०,००० कर्मचारी) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
३१ मार्च २०२६ रोजी सकाळी अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याचे ईमेल प्राप्त झाले, ज्यामुळे टेक विश्वात खळबळ माजली आहे.
Thread 🧵
या कपातीचा सर्वाधिक फटका भारताला बसल्याचे दिसत आहे.
रिपोर्टनुसार, भारतातील अंदाजे १२,००० कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आलं आहे . विशेष म्हणजे कोणतीही पूर्वसूचना न देता, थेट ईमेलद्वारे ही कारवाई करण्यात आली.
a) कपातीमागची मुख्य कारणे:
AI मधील गुंतवणूक: ओरॅकल सध्या Artificial Intelligence आणि डेटा सेंटर्समध्ये मोठी गुंतवणूक करत आहे. यासाठी लागणारा निधी (सुमारे $८ ते $१० अब्ज) उभारण्यासाठी ही कर्मचारी कपात केली जात असल्याचे समजते.
OpenAI सोबतची भागीदारी: सॅम ऑल्टमन यांच्या OpenAI सोबतच्या मोठ्या करारासाठी ओरॅकलला मोठ्या प्रमाणावर रकमेची गरज आहे.
पुनर्रचना: कंपनी आपल्या जुन्या व्यवसायांकडून लक्ष काढून क्लाउड आणि एआय आधारित सेवांकडे वळत आहे. त्यामुळे अनेक पारंपारिक भूमिका redundant ठरल्या आहेत
सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत 'Right to Disconnect Bill' मांडले आहे.
वरकरणी हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या बाजूचा वाटतो, पण याच्या Fine Print मध्ये आणि अंमलबजावणीत अनेक अडचणी आहेत.
हे बिल नक्की काय आहे आणि ते भारतात लागू करणे का अवघड आहे? चला पाहुयात.
Thread 🧵
A) The Core Provision (What the Bill actually says)
कायद्यातील मुख्य तरतुदी :
१. कामाच्या वेळेनंतर कॉल/ईमेलला उत्तर न देण्याचा कर्मचाऱ्याला अधिकार.
२. उत्तर दिले नाही म्हणून कंपनी शिस्तभंगाची कारवाई करू शकत नाही.
३. जर कंपनीने या नियमाचे उल्लंघन केले, किंवा कर्मचाऱ्यावर दबाव टाकला, तर कंपनीला दंड होऊ शकतो.
महत्त्वाचा मुद्दा: दंड कॉल न उचलल्याबद्दल नाही, तर कॉल न उचलल्यामुळे त्रास दिल्याबद्दल आहे. फरक समजून घ्या.
B) The Emergency Loophole: कायद्यातील सर्वात मोठी पळवाट: "Emergency Exception"
जगातील प्रत्येक Right to Disconnect'कायद्यात (फ्रान्स असो वा ऑस्ट्रेलिया), आणीबाणीच्या काळात संपर्क करण्याची मुभा असते.
आजकाल आपल्याला कोणताही प्रश्न पडला, किंवा एखादी माहिती हवी असली की आपण लगेच ChatGPT सारख्या जनरेटिव्ह AI कडे धाव घेतो.
या तंत्रज्ञानाने आपले आयुष्य सोपे आणि अधिक कार्यक्षम बनवले आहे, यात शंका नाही.
पण या सोपेपणाची आपण एक मोठी किंमत तर चुकवत नाही ना?
Thread 🧵#Repost
एका नव्या संशोधनाने या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याचे निष्कर्ष अत्यंत धक्कादायक आणि विचार करायला लावणारे आहेत.
एका नव्या अभ्यासानुसार, या साधनांवर जास्त अवलंबून राहिल्याने आपली Critical Thinking आणि Problem-Solving Skills कमी होण्याची चिन्हं दिसत आहेत.
हे केवळ एक मत नसून, प्रतिष्ठित विद्यापीठांनी केलेल्या संशोधनातून समोर आलेले एक 'निदान' आहे.
जॉर्ज मेसन युनिव्हर्सिटी आणि मायक्रोसॉफ्टसारख्या संस्थांच्या संशोधकांनी GenAI वापरकर्त्यांच्या सवयींचा अभ्यास केला आणि त्यांना काही चिंताजनक लक्षणे आढळली:
लक्षण १: खोटा आत्मविश्वास:
GenAI वापरकर्त्यांना असे वाटते की त्यांची कार्यक्षमता वाढली आहे आणि ते अधिक सक्षम झाले आहेत. पण हा आत्मविश्वास पोकळ असतो.
प्रत्यक्षात, ते स्वतःच्या बुद्धीचा वापर कमी करत असल्यामुळे त्यांची मूळ बौद्धिक क्षमता कमी होत असते.