SDeshmukh Profile picture
May 31 24 tweets 4 min read Twitter logo Read on Twitter
ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे, तोच स्वकर्तुत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो असा संदेश देणाऱ्या व ज्यांच्या कृतिशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने केला जातो अशा लोकमाता अहिल्याबाई होळकर.
#अहिल्याबाई_होळकर Image
सर्वधर्मसमभाव ,अस्पृश्यता उच्चाटन ,सामाजिक एकात्मता, स्त्री पुरुष समानता, गोरगरिबांना विषयी कळवळा, हुंडा पद्धतीचे उच्चाटन, अनिष्ट चालीरीती रूढी परंपरांचा बिमोड, मूल दत्तक वारसाहक्क ,प्रजेविषयी तळमळ अशा कितीतरी समाजसुधारकांचे कृतिशील कार्य..
करणाऱ्या लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या छोट्याशा खेड्यात धनगर समाजातील माणकोजी व सुशीलाबाई शिंदे यांच्या पोटी झाला..
माणकोजी शिंदे हे सर्वसामान्य परिस्थितीतील असून देखील ते विद्वान व दूरदर्शी गृहस्थ होते.अठराव्या शतकामध्ये आजच्या सारखी शिक्षणाची साधने उपलब्ध नसताना देखील त्यांनी अहिल्येला शिक्षणाची घरीच व्यवस्था केली. अहिल्या मातेचे जीवन घडविण्यात त्यांचा फार मोलाचा वाटा होता.
अवघ्या आठ वर्षाची असतानाच होळकर घराण्याचे संस्थापक राजर्षी मल्हारराव होळकरांचा बारा वर्षाचा एकुलता एक शूरवीर मुलगा खंडेराव यांच्याशी अहिल्याचा विवाह 20 मे 1733 रोजी पुण्यातील शनिवारवाडा येथे झाला..
लग्नानंतर लगेच आपल्या चतुर ,क्षमाशील व शांत स्वभावाने त्यांनी कुटुंबातील सर्वांची मने जिंकून घेतली. त्यांना मालेराव व मुक्ताबाई अशी दोन अपत्ये झाली. दूरदृष्टी ठेवून मल्हाररावांनी देखील पुरुषप्रधान संस्कृतीच्या काळातही सुनेला तत्कालीन दरबाराची मोडी मराठी लिहिणे,वाचणे, गणित शिकवले.
तसेच घोड्यावर बसणे,दांडपट्टा फिरवणे, युद्धाचे व राजकारणाचे डावपेच आखणे,लढाया करणे,पत्रव्यवहार करणे न्यायनिवाडा करणे इत्यादी प्रशिक्षण दिले. परिणामी अहिल्येची सामाजिक व राजकीय बुद्धी परिपक्व झाली.
इ.स.1754 मध्ये कुंभेरीच्या लढाईत अहिल्याचा शूरवीर पती खंडेराव यांना वीरमरण आले. वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी वैधव्य आले असताना जुन्या रूढी परंपरेनुसार सती जाण्याचे नाकारून त्यांनी पुरोगामित्वाचा परिचय दिला.
सती न जाणे म्हणजे आयुष्यभर लोकनिंदा व चारित्र्यावर शिंतोडे हे माहिती असूनही सती जाणे तहकूब करण्यात अहिल्याबाईनी जे मनोधैर्य दाखवले ते अद्वितीय आहे. आपण सती गेलो तर स्वर्ग मिळेल किंवा नाही कोण जाणे.
परंतु जगलो तर लाखो प्रजाजनांना सुख देता येईल असा विचार करून अहिल्याबाईने प्रजेच्या हितासाठी जगण्याचा निर्णय घेतला व धर्म ,रूढी ,परंपरा यापलीकडे कर्तव्य महत्त्वाचे माणून रयतेला कल्याणकारी राज्य दिले.
मल्हारराव होळकरांच्या मृत्यूनंतर 29 वर्षे अत्यंत यशस्वीपणे खऱ्या कल्याणकारी योजना काय असू शकतात आणि त्या कशा राबवल्या जाव्यात हे त्यांनी दाखवून दिले. सासरा मल्हाररावांचा मृत्यू 20 मे 1766, मुलगा मालेरावांचा मृत्यू 27 मार्च 1767 मध्ये झाला.
अशी एकामागून एक दुःखे येत असतानाही अत्यंत धीराने आपली प्रजा सुखी,समाधानी आणि संपन्न बनवण्यासाठी स्वतःच्या दुःखाचा विचार न करता अहिल्याबाईंनी धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, बंधुता ,समता व न्याय या तत्त्वाप्रमाणे राज्य केले..
पेशवा रघुनाथराव याला होळकरांच्या राज्याचा व दौलतीचा लोभ सुटला. त्याने पेशवाईत होळकरांचे राज्य विलीन करण्यासाठी पन्नास हजारांची फौज घेऊन इंदोर वर चढाई केली.
हे वृत्त तेजस्विनी अहिल्याबाईला कळताच खचून न जाता त्यांनी रघुनाथरावांना खलिता पाठविला त्या म्हणतात,”आपण माझे राज्य हिरावून घेण्याचे कपट रचून आलात आमच्याकडील फितूरास गाठले. मला दुबळी समजलात की खुळी?
दुःखात बुडालेेल्यास आधिक बुडवावे हा तुमचा दुष्ट हेतू? आता आपली गाठ रणांगणात पडेल! माझ्याबरोबर युद्धात पारंगत असणाऱ्या स्त्रियांची फौज असेल मी हरले तर कीर्ती करून जाईल.
पण आपण हरलात तर आपल्याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. म्हणून लढाईच्या भरीस न पडाल तर बरे.मी अबला आहे असे समजू नका.मी खांद्यावर भाले घेऊन समोर उभे राहिले तर पेशव्यांना भारी पडेल.वेळ पडली तर हत्तीच्या पायी साखळीशी बांधून तुमचे स्वागत न केले तर होळकरांच्या सुनेचे नाव लावणार नाही.”
मुत्सद्दी अहिल्या म्हणजे तळपती समशेर आणि लखलखती वीज होती. त्यांनी आपल्या आयुष्य लोककल्याणकारी कार्यासाठी वेचत असताना प्रदेशाची मर्यादा न घालता संपूर्ण भारतात कार्य केलेले आहे. संपूर्ण भारतात अनेक विहिरी ,तलाव ,कुंड, घाट बांधले आहेत. रस्ते,पूल निर्माण केले आहेत..
जे काम भारताच्या शासन व्यवस्थेत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केले जाते ते काम लोकमाता अहिल्याबाईंनी केलेे. उद्योगधंद्यांना व त्याच्या विकासाला प्राधान्य दिले.
मल्हाररावांच्या मृत्यूनंतर इंदोर वरून संस्थानाची राजधानी महेश्वर या ठिकाणी आणून कारागीर ,मजूर, विणकर, कलावंत ,साहित्यिक अशा गुणी लोकांच्या विकासासाठी जमीन, पैसा, घर इत्यादी सोयी उपलब्ध करून दिल्या. आजही महेश्वरी साड्या, पैठणी, धोतर प्रसिद्ध आहेत.
मुंग्यांना साखर, माश्यांना कणकेचा गोळा, उन्हाळ्यात वाटसरूंना पिण्यासाठी पाणपोया, हिवाळ्यात गरजूंना गरम कपडे यांची सोय केली. आपल्या राज्यात सूक्ष्म जीवही उपाशी राहू नयेत यासाठी दक्षता घेतली. दिव्यांग, अनाथ व असहाय्य लोकांचे पुनर्वसन केले..
घाट बांधतांना केवळ तज्ञांची मत विचारात न घेता प्रत्यक्ष त्या भागातील स्त्रियांना बोलून घाटाच्या पायऱ्या कशा हव्यात , कपडे धुताना बाळ कुठे ठेवायला सोयीस्कर पडेल, कपडे बदलताना खोल्या कुठे असाव्यात? इतक्या बारीक तपशिलासह घाट बांधून घेतले.
सर्वधर्मसमभावाचा आदर्श मिरवीत मंदिरे ,मशिदी, दर्गे व विहार बांधली. तर काही मंदीरांचा जीर्णोद्धार केला. रस्ते व महारस्ते बांधल्यामुळे पर्यटनाला प्रोत्साहन मिळाले.मजुरांना काम मिळाले व सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन एकात्मता निर्माण झाली.
राज्यातील दरोडेखोरांचा बंदोबस्त करणाऱ्या यशवंत फणसे या बहादुरा सोबत स्वतःच्या एकुलत्या एक मुलीचा आंतरजातीय विवाह लावून जातीभेदाला तडा दिला. अहिल्याबाई ह्या समाजसुधारक होत्या.त्यांनी धर्मातील रूढी आणि परंपरांचा आंधळेपणाने कधीही स्वीकार केला नाही
अशी एक ना अनेक विधायक कामे संपूर्ण भारतात केल्यामुळे त्या खऱ्या अर्थाने लोकमाता व राष्ट्रमाता झाल्या. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला व विचाराला विनम्र अभिवादन…🙏🙏

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with SDeshmukh

SDeshmukh Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @SDesh01

Jun 1
सारांश
लवासाची लक्तरे
नव्या वळणावर

राष्ट्रवादी काॅगेसचे अध्यक्ष शरद पवार यानी आपल्या ' लोक माझे सांगाती ' या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचे मुंबईत नुकतेच प्रकाशन केले व ते कसे गाजले हे सर्वानाच ठाऊक आहे..
त्याची सद्यस्थितीही सर्वानाच माहिती आहे.ते प्रकरण ताजे असतानाच आता त्या सुधारित आवृत्तीमधील एकेक प्रकरण समोर येत आहे व त्याची चर्चाही होत आहे.
त्यातील दोन महत्वाची प्रकरणे म्हणजे त्यानी उध्दव ठाकरे यांच्याबद्दल केलेले मतप्रदर्शन आणि दुसरे त्यांचा तेवढाच जिव्हाळ्याचा विषय म्हणजे वादग्रस्त लवासा प्रकरण.त्या दोन विषयांपैकी उध्दव ठाकरे यांची आज काय स्थिती आहे हे आपण पाहतोच आहे..
Read 25 tweets
Jun 1
राहुल गांधी ४ जून रोजी न्यूयॉर्कमध्ये मुस्लिमांची परिषद आयोजित करत आहेत!!
राहुल गांधींचा अमेरिका दौरा.. इस्लामिक सेंटर ऑफ अमेरिकाने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी सर्व संपर्क कट्टरवादी इस्लामिक सेंटर ऑफ अमेरिकाचे आहेत.
@RahulGandhi
@INCIndia Image
अमेरिकेतील राहुल गांधींच्या कार्यक्रमाचे चारही आयोजक पाकिस्तानी मुस्लिम आहेत जे भारताचे कट्टर विरोधक आहेत, इस्लामिक इमारतींमधून कार्यक्रमासाठी त्यांनी व्यवस्था केलेल्या सर्व बसेस, संपूर्ण कट्टर इस्लामिक संघटना राहुल गांधींच्या कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत..
पाकिस्तानचे भारतातील माजी राजदूत अब्दुल बासित यांनी एका व्हिडीओमध्ये म्हटले आहे की इंशाअल्लाह यावेळी पाकिस्तानला 2024 मध्ये भारतात काँग्रेसचे सरकार नक्कीच येईल अशी आशा आहे, संपूर्ण पाकिस्तान वाट पाहत आहे आणि संपूर्ण इस्लामिक जग या प्रकरणात गुंतले आहे.
Read 4 tweets
Jun 1
मीठ आणि मलमपट्टी

जून २००९ च्या अखेरीस मुंबईत वांद्रे वरळी समुद्र सेतू बांधून तयार झाला. त्याचे लोकार्पण देशाच्या खऱ्या पंतप्रधान सोनिया गांधींच्या हस्ते त्यांच्याच विदेशी असण्याच्या मुद्द्यावरून काँगेसचा त्याग करून राष्ट्रवादाची शाल पांघरलेले शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडले. Image
सी लिंकला राजीव गांधी यांचे नाव देणे उचित ठरेल असे पवारांनी सुचवले आणि मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ते ताबडतोब मान्य केले.
केवळ मुंबईत जन्म झाला असले तकलादू कारण पवारांनी दिले होते.यामागे त्यांची राजकीय लाचारी होती..
स्वतःच्या बळावर कोणतेही पद मिळू शकणार नाही याची त्यांना स्वतःला खात्री पटली असावी. अशा परिस्थितीत काँग्रेसच्या लोकलला दरवाज्यात लटकून पुढील प्रवास करण्याशिवाय गत्यंतर नाही याची जाणीव झाली होती.यामुळेच पवारांनी मुंबईच्या माथी राजीव गांधी यांचे नाव मारले.
Read 12 tweets
May 31
Wherever he goes, he always talk about minority appeasement and caste politics about India…. But casteism is blamed on BJP …Never before an Indian politician went about criricising its government in a foreign soil….
@INCIndia twitter.com/i/web/status/1…
Such a shame people are clapping this idiotic and divisive and hatred speech about India….Pappu is the only opposition leader where he talks about India internal affairs to all over the world.…..
He particularly insults Indian hindus and some idiot people of India wants to make him as PM of India….seriously???…who the hell he is???….There should be law and rules from govt of India to control politician going other country and speaking against the country and govt....
Read 4 tweets
May 30
#स्टैम्पपेपर_घोटाला सड़े हुए सिस्टम का नंगा सच..

दुनिया में कई नशे को घातक माना जाता है... पर आज तक अगर सबसे अधिक लोग तबाह हुए हैं तो वह... अधिक पैसे के नशे की वजह से। ImageImage
आज हम बात करने जा रहे हैं एक ऐसे घोटाले की जिसकी नींव 'हर्षद मेहता स्टॉक मार्केट घोटाले' की वजह से पड़ी। स्टैम्प घोटाले का आईडिया इसके मास्टरमाइंड अब्दुल करीम तेलगी को स्टॉक मार्केट घोटाले की वजह से ही आया था।
तेलगी कर्नाटक राज्य के खानपुर से था। तेलगी के पिता रेलवे के एक चतुर्थ श्रेणी कर्मचारी थे। तेलगी जब छोटा था तभी उसके पिता का देहांत हो गया। अब परिवार की जिम्मेदारी तेलगी पर आ गई थी। उसने स्टेशन के बाहर ठेले लगाकर फल बेचना शुरू कर दिया।
Read 25 tweets
May 30
१] लोकसभेच्या सदस्यांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन नवीन संसद भवनाच्या इमारतीच बांधकाम करण्यात आल आहे.

२] कांही बड्‍या प्रस्थांच्या जागा भाडे तत्वावर घेऊन वर्षानूवर्ष अनेक सरकारी कार्यालये चालू होती.
#MyParliamentMyPride
३]हा भाड्‍याचा खर्च दर महिन्याला करोडो रुपये होता.आता ही सगळी कार्यालये या नवीन कॉम्प्लेक्स मध्ये स्थलांतरीत होतील व सरकारचा हा खर्च वाचेल.
४] जी भाड्याची रक्कम वाचेल, त्यातून कांही वर्षातच हा बांधकामाचा खर्च निघेल.त्यामुळे हे बांधकाम फ़्री मध्येच झाले आहे असे समजायलाही हरकत नाही
तेव्हां प्रधानसेवक मोदीजींनी देशाचा पैसा आपल्या हौशेसाठी उडवला ही ओरड निरर्थक आहे.

या इमारतीच्या शिलान्यासावर मोदीजींचे नांव काहीना काही प्रकारे येणारच. ते कोणी थांबवू शकत नाही.
Read 10 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(