Discover and read the best of Twitter Threads about #शिवराज्याभिषेक

Most recents (14)

रायगडावरील स्वप्नपूर्ती,
शिवराज्याभिषेक सोहळ्याची..

"प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय"
#शिवराज्याभिषेक Image
न भूतो ना भविष्यंती" असा सुवर्ण क्षण भारतवर्षात अखेर आला. स्वप्नवत अशा "माझे हिंदवी स्वराज्य" अर्थात सुराज्य या स्वप्नाची पूर्ती झाली.
सहिष्णु भारतीय संस्कृतीवर आदिलशाही.. कुतुबशाही.. निजामशाही.. इंग्रज.. पोर्तुगीज.. डच अशा अनेक शत्रूंनी आक्रमण केले होते. तलवारीच्या जोरावर या बलाढ्य शत्रूच्या जुलमी अत्याचाराने कळस गाठला होता.
Read 17 tweets
“एक लक्षात घेतले पाहिजे की, शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला, तो हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे केला आणि तो तसा करणे आवश्‍यक होते. याचा अर्थ शिवाजी महाराजांचे राज्य फक्त हिंदूंकरिता निर्माण झाले असे नाही. शिवरायांचे राज्य हे भूमिपुत्रांचे राज्य होते.
#ShivrajyabhishekDin #Shivray
आणि म्हणून हिंदू धर्मशास्त्रापासून पूर्णपणे फारकत न घेता शास्त्र व परंपरा सांभाळून महाराजांनी महाराष्ट्रातल्याच नव्हे, तर सर्व देशातल्या भूमिपुत्रांना आश्‍वस्त केले. या देशात आता भूमिपुत्रांचे राज्य निर्माण झाले आहे.”
- डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ इतिहास संशोधक
#ShivajiMaharaj
सांस्कृतिक संघर्ष उभा राहवा म्हणून काहीजण त्यांच्या पद्धतिने/सोयाने मुद्दे मांडतात परंतु ते जनसामन्यांना पटत नाही कारण आता लोक तेवढे चिकित्सक नक्कीच झाले आहेत आणि त्यात डॉ. जयसिंगराव पवार सरांसारखे ज्येष्ठ इतिहास संशोधक असल्यामुळे आपल्या सर्वांपुढे खरा इतिहास समोर येतो.
Read 4 tweets
#शिवराज्याभिषेक #कशासाठी

#१)_धार्मिक:- तत्कालीन धार्मिक समजुतीप्रमाणे क्षत्रियालाच राजा होता येत असल्याने आणि हिंदू समाजात क्षत्रियच उरला नसल्याने हिंदूपैकी कोणीही राजा होणे शक्य नव्हते.
१/
हे राहणे ही ओघाने आलीच. शिवाजीराजांनी ही खुळचट कल्पना दूर करून हिंदूही या देशाचा राजा होऊ शकतो हे सिध्द करायचे होते.

#२)_राजकीय:- शिवाजीराजांनी स्वकर्तृत्व सिध्द केले असले तरी आदिलशाहीचे दृष्टीने ते आदिलशाही च्या शहाजीराजे या जहागीर दाराचे पुत्र म्हणजे आदिलशाहीचे चाकर होते
२/
त्यामुळे विजापूरचा आदिलशाहा आणि गोवळकोंड्याचा कुतुबशहा राजांना बरोबरीच्या नात्याते वागविण्यास तयार नव्हते मोगल बादशहा, इंग्रज, पोर्तुगीज हे सुध्दा बंडखोर, जहागीरदार म्हणून शिवाजीरांजाची संभावना करीत, आपण एक स्वतंत्र राजे असून आपल्या राज्याला धर्म व कायदाच अधिष्ठान आहे हे
३/
Read 18 tweets
post by - Amol Shinde

६ जून १६७४ हा दिवस खुप महत्त्वाचा आहे, हा दिवस महाराष्ट्राच्या भाग्यात सहजासहजी आला नव्हता, त्यामागे जवळपास ३० वर्षाचे अविश्रांत घेतलेले कष्ट होते, #Shivrajyabhishek #शिवराज्याभिषेक
महाराज अमाप वैभवाचे, गडकोटांचे, जलदुर्गांचे तसेच लाखभर सैन्याचे स्वामी होते, त्यांचे पायदळ, घोडदळ,नौदल ही होते, चार पातशहांना तडाखा देऊन सलग मोठा प्रदेश त्यांनी काबीज केला होता, असे असूनही त्या प्रदेशाला स्वतंत्र सार्वभौम राज्य म्हणता येत नव्हते, #Shivrajyabhishek #शिवराज्याभिषेक
कारण या राज्याला अभिषिक्त असा राजा नव्हता, राज्याला विशिष्ट घटना नव्हती,
मूळ सत्तेपासून बंड पुकारलेले एक बंडखोर म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जात होते, उदा. जावळीचे मोरे स्वतःला राजे मानत पण शिवाजी महाराजांना राजे मानायला ते तयार नव्हते, #Shivrajyabhishek #शिवराज्याभिषेक
Read 15 tweets
#THREAD
विषय : शिवाजी महाराजांचा द्रष्टेपणा व हिंदू संस्कृती प्रती निष्ठा.

शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्याच्या सर्व विभागाचे जर आपण बारकाईने निरीक्षक केले तर आपल्याला महाराजांच्या द्रष्टेपणाची व हिंदू संस्कृती प्रती असलेली निष्ठा हि गोष्ट नक्की जाणवेल.

#शिवराज्याभिषेक
महाराजांनी कधीही कुठेही न खचता आपल्या असामान्य कर्तृत्ववाने हिंदवी स्वराज्याचे सुवर्णस्वप्न अनेक शत्रूवर मात करून साकार करून दाखविले. २
स्वराज्य हे स्वयंपूर्ण असावे यासाठी महाराजांनी शस्त्रांचे कारखाने काढले. तसेच त्याकाळच्या कोणत्याही राज्यकर्त्यांला न सुचलेली न जमजेली "स्वातंत्र्य नौदलाची" कल्पना त्यांनी सत्यात उतरवली. यावरून महाराजांचे सैन्याप्रतीचे द्रष्टेपण स्पष्ट दिसून येते. ३
Read 21 tweets
मित्रानो , कोणाचातरी "भक्त " बनण्यासाठी कोणाचं तरी "दैवीकरण" करावं लागतं . आपल्या छत्रपतींच असं दैवीकरण होऊ देऊ नका. एकदा का दैवीकरण झालं कि पुढे त्याभोवती चमत्कारांच्या भाकडकथा रचायला वेळ लागणार नाही.
#शिवराज्याभिषेक #Shivrajyabhishek
चमत्कारांच्या आड पराक्रम झाकोळले जातील. काही मंडळी सरड्यासारखी याच संधीची वाट बघताय. त्यांना छत्रपतींची अशी दैवी प्रतिमा तयार करून धार्मिक ध्रुवीकरणाचा डाव साधण्यासाठी त्या प्रतिमेचा वापर करायचा आहे.
#शिवराज्याभिषेक #Shivrajyabhishek
त्यांचा डाव साधला जाईल. पण त्यात जगाच्या पाठीवरचं पहिलं 'रयतेचं राज्य' ही आपली ओळख पुसली जाईल, 'रयतेचा राजा' म्हणून महाराजांची असलेली ओळख पुसली जाईल आणि इतर अनेक सत्तांसारखीच एक अशी केवळ ' धार्मिक ' सत्ता म्हणून ओळख निर्माण होईल.
#शिवराज्याभिषेक #Shivrajyabhishek
Read 5 tweets
हिंदू साम्राज्य की हिंदवी स्वराज्य?
छ्त्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले हे राज्य मुळी 'हिंदू साम्राज्य' कधी नव्हतंच. हे ते 'साम्राज्य' मुळीच नव्हतं जे कोण्या एका 'हिंदू राजाने' आपल्या 'हिंदू जनतेसाठी' उभारलं होतं.हे ते 'स्वराज्य' होतं जे एका 'रयतेच्या राजाने'
#शिवराज्याभिषेक
1/6
जुमली पातशाह्यांना खिंडार पाडून 'गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी' उभारलेले होतं.. हे ते 'स्वराज्य' होतं जे एका 'जाणत्या राजाने' सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन 'महाराष्ट्रधर्म' राखण्यासाठी निर्माण केलं होतं.
#शिवराज्याभिषेक
2/6
शिवाजी महाराज हिंदू होते आणि त्यांना हिंदू धर्माचा सार्थ अभिमानही होता पण 'धर्मवेडाने' राज्य मोठे होत नसून त्यासाठी 'सर्वधर्म सहिष्णुता' असावी लागते हे महाराज जाणून होते, त्यामुळे 'स्वराज्य' हे कोणा एका धर्मासाठी नसून स्वराज्याचा पायाच मुळी 'धर्मनिरपेक्ष लोककल्याण' हा होता.
3/6
Read 6 tweets
शिवराज्याभिषेक पश्चात :

शेकडो वर्षे राजभाषा फारसी किंवा उर्दू असल्यामुळे संस्कृत आणि मराठी भाषेला अवकळा प्राप्त झालेली होती. राजकीय पत्रव्यवहारातून तर #मराठी शब्द जवळजवळ हद्दपार झालेले होते.

#शिवराज्याभिषेक
परकीय संस्कृतीचे सावट दूर करण्यासाठी आणि फारसी भाषेचा प्रभाव कमी करण्यासाठी रघुनाथ पंडीत या विद्वानास ‘राज्यव्यवहारकोश’ तयार करण्याची आज्ञा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली.

#शिवराज्याभिषेक
ज्याप्रकारे मराठी भाषा व मराठी संस्कृती यांना अवकळा प्राप्त झालेली, संस्कृत भाषा समजेनाशी झाली होती, त्यामुळे आपल्या राज्यातील हे मरगळलेले समाजजीवन पुन्हा चैतन्यमय करण्यासाठी शिवाजी महाराजांनी विविध प्रकारच्या योजना कार्यवाहित आणण्याचा निश्चय केला.

#शिवाजीमहाराज #शिवराज्याभिषेक
Read 3 tweets
कोवळ्या वयात, हे स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा म्हणत श्री रायरेश्वराच्या पिडींवर रक्ताची धार सोडत स्वराज्याचं 'तोरण' बांधलं...

काहीच वर्षात जुलमी मुघली राजवट टाचेखाली आणत जगातील सर्वात मोठे (तिसरे) सैन्य असलेल्या पातशहाला घाम फोडला..

#शिवराज्याभिषेक
#Shivrajyabhishek Image
अस्सल बावनकशी मावळ्यांची सरदारपदी नेमणूक, पुरंदरचा तह, आग्र्याची सुटका, शास्ताखानाची बोटे छाटणं.. प्रत्येक घटनेत शौर्य, धैर्य, शक्ती, बुद्धि, राजकारण आणि गनिमी काव्याचा अजोड नमुना उभा करत लंडन दरबारालाही दखल घ्यायला भाग पाडले

#शिवराज्याभिषेक
#Shivrajyabhishek Image
वडीलांच्या अपनानास नि भावाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अफजल्याचा कोथळा बाहेर काढला..

मराठी राज्य जाहले म्हणजे झाले.. आता अय्याशि करू हा संकुचित विचार मनी शिवू दिला नाही.. थेट जिंजीपर्यत धडक मारली.
दक्षिणदिग्विजय साधला..

#शिवराज्याभिषेक
#Shivrajyabhishek Image
Read 4 tweets
महाराष्ट्रातल्या ब्रह्मवृंदांनी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करायला विरोध केला, हे सत्य तर सर्वांना माहीतच आहे. चातुर्वर्ण्याच्या रचानेप्रमाणे व हिंदू धर्मशास्त्रप्रमाणे राजा होण्याचा अधिकार फक्त ब्राम्हणांना आणि क्षत्रियांनाच होता. शिवाजी शुर असला, त्याने राज्ये कमावले असले,
तरी तो राजा होण्यास पात्र नाही असे धर्ममत होते. काहींना त्याच्या क्षत्रियत्वाची शंका होती. आणि उरलेल्याना तो मुळात क्षत्रिय कुळातला असला तरी संस्कारक्षय झाल्याने क्षत्रिय राहिला नव्हता. शिवाजीची मुंज झाली नव्हती. मंत्रविधिसह लग्न झाले नव्हते. मग शिवाजी राजा कसा होऊ शकणार?
काही सनातनी धर्ममार्तंडांची त्यावरही कडी होती. ते सांगत होते,

"नंदांतम् क्षत्रिय कुलम्" नंद राजाचा अंत झाला तोच क्षत्रिय कुळाचा अंत होय. त्यानंतर कुणी क्षत्रिय उरलाच नाही. अकबराच्या काळी कृष्ण भट शेष याने 'शुद्राचार शिरोमणी' नावाचा ग्रंथ लिहिला.
Read 13 tweets
छत्रपती संभाजी महाराजांनी 'बुधभूषण' या आपल्या ग्रंथात राज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन खुप सुंदररित्या केले आहे
ते म्हणतात

"आकर्णाटकदेशतो गिरीरवरे सह्योप्यसह्यो परैः।
दूर्गाणि. क्षितीपालनाय नृपतैः यो बागलाणवधि।।
आकृष्णतटमाससमुद्रमभितः कृत्त्वा कृती दुर्गमे। Image
दुर्ग रायरिसंद्नके विजयते भुमिभृतमग्रणीः ।।

अर्थ :
सह्याद्रीच्या कठीण अशा पर्वत रांगे पासून
ते कर्नाटक देशपावेतो जी दुर्गराशी आहे ती
व बागलाणच्या सीमेपासून ते कृष्णा नदीचे समुद्रास मिळणारे
ठिकाण या प्रदेशातील अनेक दुर्ग काबीज करणारे
पृथ्वीचे पालनकर्ता शिवनृपती होते. Image
त्यांनी दुर्गम अशा रायरी किल्यावर स्वतःस धरणीधाराग्रणी घडवून
"राजाधिराज" हे नामाधिमान धारण केले.

|| शिवराज्याभिषेक सोहळा चिरायु होवो ||
🚩🚩🚩🚩🚩

#शिवराज्याभिषेक #Shivrajyabhishek_Din
#छत्रपतीशिवाजीमहाराज
#म
#मराठी #महाराष्ट्र @MarathiRT
#RT Image
Read 3 tweets
सुमारे साडे तीनशे वर्षांपूर्वी आदिलशाही, निजामशाही,मुघल सल्तनत,सिद्दी जौहर, कुतुबशाही,इंग्रज,पोर्तुगिज, डच व जुलमी राजवटींच्या विरुद्ध लढा उभारुन रयतेचं राज्य निर्माण करून लोकशाहीची बीजे या मातीत रोवणाऱ्या,इथली जमीन नांगरुन अन् माणसांच्या मनात स्वराज्य पेरणाऱ्या,
#शिवराज्याभिषेक Image
स्त्री ही उपभोगाची वस्तू नसून ती एक नवनिर्मितीचा ऊर्जास्रोत आहे हे कृतीतून दाखवून देणारा, गरिबांच रक्तपिऊन मदमस्त झालेल्या धर्मसत्तेला राजदंडाचा धाकनिर्माण करणारे, अठरापगड जाती बारा बलुतेदार अठरा अलुतेदारांना क्षत्रिय बनवून हाती शस्त्र व लढण्याची स्फूर्ती देणारे
#शिवराज्याभिषेक Image
कुळवाडीभूषण बहुजनप्रतिपालक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना यांना मानाचा मुजरा 🙌🏻

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा!

#जागर_शिवकिर्तीचा
#शिवराय_असे_शक्तीदाता
🚩🚩 जय जिजाऊ 🚩🚩
||♦|| #जय_शिवराय ||♦||

#शिवराज्याभिषेक Image
Read 4 tweets
#थ्रेड
#Thread
विषय:-शिवराज्याभिषेक आणि तत्कालीन राजकारण
#शिवराज्याभिषेक
आज आपण शिवराज्याभिषेकाकडे एक सोहळा म्हणून पहातो पण त्या काळात शिवराज्याभिषेकाचे महत्व अनन्यसाधारण असे होते.
आणि त्याची निकड ही तेवढीच होती. काल च श्याम मानव यांचे एक भाषण ऐकले Image
त्यात त्यांचं म्हणणं होतं की राज्याभिषेक केला नसता तरी चाललं असत कारण शिवाजी महाराज राजे होते आणि सर्वमान्य होते. मला असं वाटत की ही गोष्ट चूक आहे, कशी ते पाहू.
१. स्वराज्य एक तात्विक आणि राजकीय अधिष्ठान :-
त्यावेळची जी राजकीय परिस्थिती होती त्यात मुघल,नवाब,राजपूत, निजामशाही, कुतुबशाही, डच, इंग्रज, फ्रेंच इ च्या नजरेमध्ये स्वराज्य हे मराठ्यांचे बंड होते यापेक्षा जास्त काही नाही. मुघल किंवा या इतर राज्यकर्त्यांना विचारल्याशिवाय काही कर, Image
Read 16 tweets
"या युगी पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा, मऱ्हाटा पातशहा एवढा छत्रपती जाहला ही गोष्ट काही सामान्य नाही" 

- कृष्णाजी अनंत सभासद

महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी #शिवराज्याभिषेक करण्यास नकार दिला/विरोध केला हे धादांत असत्य. कोणताही समकालीन पुरावा उपलब्ध नाही.

उलटपक्षी; १/क्ष
३५० वर्षे एकही हिंदू राजा न झाल्याने समग्र राज्याभिषेक विधी येथील ब्राह्मणांना ज्ञात नसल्याने तसेच समर्थ रामदास स्वामींनी गागाभट्ट यांचे नाव सुचवल्याने त्यांना #शिवराज्याभिषेक_सोहळा पार पाडण्यास पाचारण करण्यात आले.

(संदर्भ: भट्टवंश)
गागाभट्टांचे मूळ हे आपल्याच मातीतले; महाराष्ट्रातील पैठण इथले!! रामेश्वरशास्त्री भट्ट हे गागाभट्टांचे पणजोबा. ते द्वारकेच्या यात्रेला गेले आणि त्यानंतर पुढे कशी येथे स्थायिक झाले. अतिशय विद्वान असे हे घराणे.
Read 9 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!