Discover and read the best of Twitter Threads about #अभिवादन

Most recents (3)

यशवंतराव चव्हाण ही एक व्यक्ती नसून तो एक प्रगल्भ विचार आहे,जो विचार देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अग्रस्थानी होता आणि स्वातंत्र्यानंतर देशाच्या आणि राज्याच्या सर्वांगीण विकासात आणि राष्ट्रउभारणीत मोलाचा वाटा उचलणारे असे पुरोगामी,सुसंस्कृत,बहुआयामी,ऋषितुल्य,संयमी व्यक्तिमत्त्व
महाराष्ट्राला लाभले हे राज्याचे थोर भाग्यच मानायला पाहिजे..
या पुरोगामी महाराष्ट्राला दिशा देण्याच काम यशवंतराव यांनी केले आजही राज्य त्यांच्या पावलावर पाय ठेऊन चालत आहे.समाजहिताचे, लोकहिताचे अनेक कायदे त्यांनी केले त्यामध्ये कृषी,सिंचन, सहकार,औद्योगिक इ कामांच्या विकासावर
त्यांनी भर दिला,ग्रामीण विकास असो की औद्योगिक विकासाचा विस्तृत पाया यासाठी यशवंतराव कुठेच कमी पडले नाहीत.स्थानिक शासनाचे विकेंद्रीकरण करून सत्तेत जास्तीतजास्त लोकांना सहभागी करण्याच्या धोरणाचा देशाने स्वीकार केला यातच त्यांच्या कर्तुत्ववाची व्याप्ती कळते.1962 मध्ये जवाहरलाल नेहरू
Read 4 tweets
माझं शिक्षण ग्रामिण भागात झालं.
१९९०/९१ चा काळ. तेंव्हा शाळेत वर्षभर चालणाऱ्या विविध स्पर्धा हे मुलांच्या डेव्हलपमेंटचं महत्वाचं माध्यम.

विज्ञानप्रदर्शन, भाषणं, बुद्धिबळ, मैदानीखेळ, प्रश्नमंजूषा, कलापथक, लोकसंगीत असे विविध प्रकार चालायचे.

#पंडितजवाहरलालनेहरू #आठवण #बालपण
१/१८
अशाच एका वक्तृत्व स्पर्धेत तालूका पातळीवर मी पहिला आलो. काही दिवसातच जिल्हा पातळीवरील स्पर्धेसाठी वाईच्या द्रविड हायस्कूलला जायचे होते.

त्याकाळी एसटीच्या तिकिटाचे पैसे एवढाच काय तो खर्च असायचा पण त्यासाठीही घरून पैसे मिळणे अशक्य असायचे. मग शाळेतले काही शिक्षकच त्यांच्यातच
२/१८
वर्गणी काढून आम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचे. जेवणाचा दोनतीन वेळेचा डबा काय तो घरून असायचा.

माझा भाषणाचा विषय होता - आधूनिक भारताचे शिल्पकार - पंडीत जवाहरलाल नेहरू.

तालूका पातळीवर जे भाषण केले होते तेच रिपीट करायचे असं माझं मनोमन ठरलेलं पण आमच्या सरांना ते काही पटत नव्हतं.
३/१८
Read 18 tweets
#अभिवादन
... हिंदुस्थानला स्वातंत्र्य दिल्यानंतर त्यांच्यातील प्रत्येक संस्थान हा एक वेगळा देश बनेल अशी ब्रिटिशांची कल्पना होती... त्यावेळी स्वतंत्र भारतात ५६० हून थोडी अधिक संस्थाने होती... ब्रिटिशांचे षड्यंत्र चुकीच्या गृहितकांवर आधारलेले नव्हते... मात्र नियती आडवी आली... सरदार Image
वल्लभाई पटेल स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री झाले होते... गोड बोलून, संस्थानिकांची समजूत घालून, प्रसंगी त्यांना थोडीशी भीती दाखवून या महापुरुषाने बरीच संस्थाने विलीन करून घेतली...
... हैदराबादचा निजाम आपल्या रझाकारांच्या जोरावर स्वतंत्र राहण्याचे मनसुबे रचत होता.... रझाकारांनी
राज्यातील हिंदू जनतेवर अनंत अत्याचार सुरू केले होते आणि गृहमंत्र्यांनी हैदराबाद संस्थानावर पोलीस ऍक्शन घेतली... सशस्त्र सैन्यासह हैदराबाद रणगाडे घुसवले... रझाकारांच्या रक्त मांसाचा चिखल झाला... आपल्या रझाकारांची वाताहात बघून हैदराबादचा निजाम गुलाबाचे फुल घेऊन पंतप्रधान पंडित जवाह
Read 6 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!