Discover and read the best of Twitter Threads about #शिवराज्याभिषेक_सोहळा

Most recents (3)

Jun 6th 2021
#थ्रेड
#शिवराज्याभिषेक_सोहळा
#हिंदू_साम्राज्य_दिवस
-:युगकर्ते शिवराय:-
साधारण तीनशे वर्षांपूर्वी या दिवशी सूर्य एक नवीन सकाळ घेऊन आला. तुम्ही म्हणाल की सूर्यासोबत दरोजचं सकाळ होते, मग या दिवसाच्या सूर्योदयात काय विशेष होते.? तर,आजच्या दिवसाचा सूर्य एक नवीन
१/
उषःकाल घेऊन आला होता तो म्हणजे स्वातंत्र्याचा. कारण ३०० वर्षांपूर्वी आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज अभिषिक्त झाले आणि शेकडो वर्षांच्या म्लेंच्छ अत्याचारांपासून महाराष्ट्र मुक्त झाला.
महाराज छत्रपती झाले यात अनेक वीरांचे मोलाचे योगदान होते. स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेऊन
२/
हे मावळे स्वराज्यासाठी व महाराजांसाठी प्राणाची ही किंमत मोजायला तयार होते. आई भवानीच्या व भगवान रायरेश्वराच्या आशीर्वादाने महाराजांनी स्वराज्याचा उद्योग आरंभला व त्यानंतर पुढील काळात महाराजांनी आपल्या विश्वासू मावळ्यांसह अखंड अहोरात्र स्वराज्य चळवळ चालवली.
३/
Read 8 tweets
Jun 6th 2020
महाराष्ट्रातल्या ब्रह्मवृंदांनी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करायला विरोध केला, हे सत्य तर सर्वांना माहीतच आहे. चातुर्वर्ण्याच्या रचानेप्रमाणे व हिंदू धर्मशास्त्रप्रमाणे राजा होण्याचा अधिकार फक्त ब्राम्हणांना आणि क्षत्रियांनाच होता. शिवाजी शुर असला, त्याने राज्ये कमावले असले,
तरी तो राजा होण्यास पात्र नाही असे धर्ममत होते. काहींना त्याच्या क्षत्रियत्वाची शंका होती. आणि उरलेल्याना तो मुळात क्षत्रिय कुळातला असला तरी संस्कारक्षय झाल्याने क्षत्रिय राहिला नव्हता. शिवाजीची मुंज झाली नव्हती. मंत्रविधिसह लग्न झाले नव्हते. मग शिवाजी राजा कसा होऊ शकणार?
काही सनातनी धर्ममार्तंडांची त्यावरही कडी होती. ते सांगत होते,

"नंदांतम् क्षत्रिय कुलम्" नंद राजाचा अंत झाला तोच क्षत्रिय कुळाचा अंत होय. त्यानंतर कुणी क्षत्रिय उरलाच नाही. अकबराच्या काळी कृष्ण भट शेष याने 'शुद्राचार शिरोमणी' नावाचा ग्रंथ लिहिला.
Read 13 tweets
Jun 15th 2019
"या युगी पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा, मऱ्हाटा पातशहा एवढा छत्रपती जाहला ही गोष्ट काही सामान्य नाही" 

- कृष्णाजी अनंत सभासद

महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी #शिवराज्याभिषेक करण्यास नकार दिला/विरोध केला हे धादांत असत्य. कोणताही समकालीन पुरावा उपलब्ध नाही.

उलटपक्षी; १/क्ष
३५० वर्षे एकही हिंदू राजा न झाल्याने समग्र राज्याभिषेक विधी येथील ब्राह्मणांना ज्ञात नसल्याने तसेच समर्थ रामदास स्वामींनी गागाभट्ट यांचे नाव सुचवल्याने त्यांना #शिवराज्याभिषेक_सोहळा पार पाडण्यास पाचारण करण्यात आले.

(संदर्भ: भट्टवंश)
गागाभट्टांचे मूळ हे आपल्याच मातीतले; महाराष्ट्रातील पैठण इथले!! रामेश्वरशास्त्री भट्ट हे गागाभट्टांचे पणजोबा. ते द्वारकेच्या यात्रेला गेले आणि त्यानंतर पुढे कशी येथे स्थायिक झाले. अतिशय विद्वान असे हे घराणे.
Read 9 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!