काल राज्यसभेत कृषी सुधारणा कायदा २०२० पारित झाला ! शेतकऱ्यांना सशक्त करण्यासाठी तसेच २०२२ सालापर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुर्पट करण्यासाठी ह्या कायद्यात असलेल्या महत्वाच्या तरतूदी जाणून घेऊ ✅ #FarmersBill
#KisanWithPMModi
👇
ह्या कायद्यात एकूण तीन महत्वाच्या विधेयकांचा समावेश आहे
१. कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुविधा) विधेयक
२. शेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण) किंमत हमी आणि कृषी सेवा करार विधेयक
३. अत्यावश्यक वस्तू (सुधारणा) विधेयक
👇
१. कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुविधा) विधेयक
👉 नोंदणीकृत बाजार समित्यांच्या बाहेर शेतीमाल विकण्यास परवानगी
👉 राज्यांतर्गत तसेच राज्याबाहेर कृषीमाल विकण्यास परवानगी
👉 शेतीमालाचे व्यवस्थित मार्केटींग करून चांगला दर मिळण्यास मदत करणे
👇
२. शेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण) किंमत हमी आणि कृषी सेवा करार विधेयक
👉 विविध कृषी व्यवसाय संस्था यांच्यासोबत शेतीमालाचा दर पेरणीच्या वेळेसच निर्धारीत करणे
👉 बाजारातील अनिश्चिततेचा धोका शेतकऱ्यांकडून प्रायोजकांकडे
👉 पाच हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना फायदा
👇
३. अत्यावश्यक वस्तू (सुधारणा) विधेयक
तरतूद
👉 तृणधान्य,कडधान्य,तेलबिया,कांदा आणि बटाटा अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळले - साठा मर्यादा लावता येणार नाही
👉 शेतीमाल किंमत स्थिरीकरणासाठी शीतगृह/अत्याधुनिक अन्नधान्य पुरवठा साखळीसारख्या कृषी पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढ
👇
सर्वात महत्वाचे - ज्या विरोधी पक्षांनी एका ऐतिहासिक कायद्याला काल बेगडी विरोध दर्शवला ते शेतकऱ्यांचे कैवारी असूच शकत नाहीत.
हरित क्रांती नंतर जे कायदे त्वरीत अंमलात आणायला हवे होते ते #मोदी_सरकार मुळेच आज अस्तिवात आले - गरीब शेतकऱ्यावर होत असलेला अन्याय आता नक्कीच दूर होणार !
✳️
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
