अल्लाद्दुन खिलजी ने जेवढं हिंदूच नुकसान केलं नसेल तेवढं नुकसान मोदी हिंदुचं करत आहे. शिक्षण व शेती धोरणाची वाट तर लावलीच पण रोजगाराची परिस्थिती बिकट करुन ठेवली. काश्मीर ३७०, CAA, आणि राम मंदिराच्या मोबादल्यात हिंदुना काय दिले ?
शासकीय नौकऱ्या शिल्लकच नसताना खासगी क्षेत्रात किमान कायद्यान्वये पर्मनंट रोजगाराची प्रोवीजन जी होती ती पण काढुन घेतली. कोणत्याही हिंदु परिवाराचं सरासरी आर्थिक उत्पन्न व आर्थिक स्थिरता ही २०१४ पासुन सतत ढासळत आलेली आहे.
आर्थिक गरजा भागवण्यासाठीच अल्पभूधारक शेतकरी व त्यांची मुलं मोठ्या प्रमाणात शहरीकरणाचा भाग होत असतानाच ज्या उद्दिष्टासाठी स्थलांतर होत होतं ते हानुन पाडलं. खरं तर भांडवलवादी व कमी उत्पन्न गटात मोदींची लोकप्रियता जास्त आहे.
भांडवलवाद्याचं ठिक आहे पण कमी उत्पन्न गटात मोदीची भक्ती, भवितव्य धोक्यात घेऊन जाणारी ठरत आहे. मुस्लिमचा बाऊ करुन हिंदूचीच ठासली गेली. ना शासकीय नौकरी, ना खासगी नौकरी पर्मनंट, ना शेती सुलभ धोरण, ना शैक्षणिक सवलती.
स्वताला हिंदु म्हणवुन घेणारा मोठा वर्ग आजही मुस्लिम द्वेष, अट्रोसिटी, आरक्षण यावर अडुन बसलाय. मोदी शिक्षण, शेती, रोजगाराची विकृत धोरणं राबवुन ताट्यातली भाकर ओढुन घेतोय याचं यांना भान नाही.
भगव्या टिळ्या व्यतिरिक्त यांच्या मौतीवर कपाळाला लावायला एक रुपया पण मोदी ठेवतो की नाही माहीत नाही इतका प्रवास द्रुतगतीने पुढे चालला.
...🖋️राहुल पगारे.
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
