डेडपूल... Profile picture
उन्हातान्हात राहतो Cool, नाव माझं Deadpool. ॥ Social ॥ Pacifism ॥ Rational॥ #पांडुरंग #Volleyball #Wrestling #Tilling

Sep 29, 2020, 9 tweets

भारतीय संसदीय लोकशाहीत विरोधकांचे महत्व अनन्यसाधारण आहे. याच भान विरोधकांना आहे का? यंदाच्या कोविड काळात जे अधिवेशन झालं त्यात विरोधकांनी काय साध्य केलं? उलट सरकारने त्यांना हवे तसे फासे टाकून परिस्थिती त्यांना हवीतशी बनवली हे लोकशाही समाज म्हणून आपल्या लक्षात आलं का? #म 1/n

परवा राज्यसभेत जो गोंधळ झाला त्याची जबाबदारी सरकारची असली तरी विरोधकांनी योग्य डावपेच आखून संसदीय आयुधांचा वापर कुशलतेने करणे गरजेचे होते..संख्याबळ कमी असल्याने तर ती महत्वाची अटच होती. ज्या फार्म बिल्स वरून संसदेत गदारोळ झाला..त्यासाठी आता रस्त्यावर उतरून काय फरक पडेल? 2/n

आता सरकार आणि त्याचे पाठीराखे 'बघा विरोधकांना संसदेत चर्चा नको आणि रस्त्यावर दंगा हवाय.' असा प्रचार करताना दिसत आहेत. त्यातील सत्यता विरोधकांनी कितीही ओरडून सांगितली तरी काही फरक पडेल असे वाटत नाही..कारण फार्म बिल्स कशी शेतकरी फायद्याची आहेत याचे संदेश बातम्या आणि चर्चा यातून3/n

सरकार पसरवू लागले आहे.म्हणजे हुकूमशाही वृत्तीने अध्यादेश आणून ही तो कायदा पारित करण्यात सरकार यशस्वी झाले. याउलट विरोधकांचे आठ शिलेदार निलंबित झाले..त्यांच्यासाठी बाकी कामकाजावर बहिष्कार घालून सरकारला चर्चेविना लेबर बिल पास करण्यास विरोधकांनी मदतच केली असे म्हणण्यास वाव आहे.4/n

आता शेतकरी आणि बाकी रस्त्यावर उतरले आहेत पण ते फार काळ तसे करू शकत नाहीत कारण त्यांच्यासमोर तसा काही सुचिबद्ध कार्यक्रम नाही..सरकार त्यातील बऱ्याच संघटनात फूट पडणार हे इतिहासावरून सिद्ध आहे.विरोधक किती काळ ट्विटर आणि फेसबुकवर फक्त गाऱ्हाणी गाणार हा खरा प्रश्न आहे.5/n

आता येत्या काही काळात राज्यसभेत विरोधकांचे संख्याबळ अजून कमी होईल..राज्यसभेत 243 सदस्यांपैकी 86 हे भाजपचे आहेत..येत्या दिवसात 11 सदस्य निवृत्त होतील.नवीन जे निवडले जातील त्यातील विरोधकाना एकही सीट मिळण्याची शक्यता नाही..त्यावेळी भाजपचे 94 सदस्य होतील..तेंव्हा विरोधक काय करतील?6/n

त्यासाठी संसदीय कायदेशीर नियम आणि आयुधांचा खुबीने वापर करणारे मुरब्बी राजकारण गरजेचे आहे.जे सरकारवर नाराज आहेत किंवा न्यूटरल आहेत त्यांना सभात्याग करायला लावून सरकारला कोंडीत पकडून चर्चेस भाग पाडायची रणनीती गरजेची आहे.धांगडधिंगा घातलाकी जनतेच्या डोळ्यासमोर तेच चित्र उभं राहतं.7/n

त्याने विश्वासार्हता गमवण्याचा धोका आहे. तो धोका टाळायचा असेल तर बेरजेचे राजकरण शिकायला हवे अन्यथा ही वजाबाकी ही विरोधकांच्या पाचवीलाच पुजलेली असेल.पक्ष म्हणून तुमचे काय व्हायचे ते होवो.. पण तुमच्या आडमुठ्या धोरणाने लोकशाही आणि पर्यायाने समाजाचा जीव जाऊ नये एवढंच. ❤ n/n

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling