काल अर्ध्यरात्री हायकोर्टात राज्यसरकार विरुद्ध #CBI केसची सुनावणी झाली !
अनिल देशमुखाविरोधात असलेल्या #FIR मधील 1-वाझेंची नियुक्ती 2-गृहखात्यातील बदल्या हे दोन उतारे #CBI ने वगळावे ही राज्यसरकाची मागणी आहे कारण ह्याने सरकार पडू शकते !
ह्यावरच एक #शॉर्ट_थ्रेड
सर्वप्रकारणाची सुरवात मार्च 2021 ला झाली जेव्हा मनसुख हिरेण ह्यांचा बद्दल विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसानी विधानसभेच्या बजेट सेशन मध्ये प्रश्न उपस्थित केले ! प्रश्न काय देवेंद्रजींनी सरकारची पुरती पोलखोल केली ! आणि वाझेंचा #CDR च विधानसभे समोर मांडला !!
#CDR त्यांनी विधानसभे समोरच मांडला कारण , विधानसभेत उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरून त्यांची चौकशी करताच येत नाही !तरीही तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी अकलेचे जाहीर प्रदर्शन करून फडणवीसांनी #CDR कोठून आणला ह्याची चौकशी करू अशी वलग्ना केली जी आता त्यांच्या सारखीच दिसेनाशी झाली !
वाझेंचे तात्काळ निलंबन करू असे आश्वासन अजित दादा आणि गृहमंत्र्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या कक्षात फडणवीसांना दिले , पण मुख्यमंत्र्यांनी निर्णय फिरवला आणि वाझे काय लादेन आहे काय असा बचाव केला ! ही त्यांची घोडचूक ठरली !! एका सध्या API साठी मुख्यमंत्री असा स्टँड घेतो ! ह्याने
सगळेच चक्रावून गेले ! आणि सूत्रे फिरली , वाझेंना #NIA ने अटक केली आणि मुख्यमंत्री तोंडघशी पडले !!
आता वाझेंचा आणि मुख्यमंत्र्यांचा काय सबंध असावा ह्यावर जनसामान्यात देखील चर्चा सुरू झाली ! आणि वाझेंची माहिती पुढे येऊ लागली !
वाझेनी कशी शिवसेना जॉईन केली, ते कसे वर्षा बंगल्यावर रहात असत , अर्णब गोस्वामी असो किंवा अंबानी स्फोटक प्रकरण सगळीकडे कसे साध्या #API ला चौकशीचे प्रमुख करण्यात आले , सेवेतून निलंबित झालेल्या वाझेना कसे तडकाफडकी सेवेत रुजू करून डायरेकट #CIU चे प्रमुख करण्यात आले ,कमिश्नर ऑफिस
मध्ये जिथे मोठे मोठे IPS ऑफिसर CPच्या भेटी साठी तात्कळत बसलेले असतात तिथे वाझेना कसा सरळ प्रवेश असे ह्याच्या चर्चा फक्त मीडियातच नाही तर पोलीस खात्यातही दबक्या आवाजात चर्चिल्या गेल्या ! आणि वाझे आणि परमबीर ह्याचे काय सबंध आहेत ह्यावर सर्वांचा फोकस स्थिरावला !
#CIU चा हेड हा सरळ CP ना रिपोर्ट करतो मग अश्या स्थितीत , अंबानी स्फोटक प्रकारणत अटक झालेल्या वाझेंची माहिती परमबीर ह्यांना असणें क्रमप्राप्त होते ! आणि त्यामुळेच #NIA तत्कालीन मुंबई कमिश्नर परमबीर सिंग ह्यांची चौकशी करणार हे उघड होते ! किंबहुना चौकशी साठी #NIA चे प्रमुख दिल्लीहून
मुंबईत दाखल देखील झाले होते !! आधीच दोन पोलीस अधिकारी दोन कोन्स्टेबल अटक झालेल्या मुंबई पोलिसांची अब्रू पूर्णतः गेली असती जर साक्षात CP ह्यांची चौकशी #NIA ने केलीं असती !! त्यामुळे अब्रू वाचवण्यासाठी परमबीर ह्यांची हकालपट्टी क्रमप्राप्त होती आणि ती तशी झाली देखील !
कमिश्नर परेंत पोहचलेले धागे गृहमंत्री अनिल देशमुखापरेंत पोहचणे अवघड नव्हते हे लक्षात आल्याने स्वतःवरील पुढे चालून येणारे आक्षेप आधीच ढकलण्यासाठी देशमुखांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सगळा दोष परमबीर ह्यांच्यावर ढकलला आणि स्वतःच्या पायावर धोंढा मारला !
आधीच पायउतार झालेले परमबीर ह्यांनी इट का सॉरी मुलाखतीचा जवाब पत्र से दिला ! आणि 100 कोटीच्या खडणी रॅकेटचा गौप्यस्फोट केला ! तिकडे वाझेंनीपण पत्र लिहून परमबीर ह्यांना साथ दिली आणि गृहमंत्र्यांचा बचाव करण्यात खुद्द पवार काका तोंडघशी पडले
आता फोकस पुन्हा मुख्यमंत्र्यांवर आला ,मुख्यमंत्र्यांनी गृहमत्र्यांची चौकशी करावी ही मागणी जोर धरू लागली पण मुख्यमंत्री नेहमीप्रमाणे घरात बसून राहिले मीडियाला साधी प्रतिक्रिया दिली नाही !!
अश्यातच गृहमंत्र्यांची #CBI चौकशी करा असा आदेश हायकोर्टाने दिला आणि भकास आघाडीचे धाबे दणाणले !! देशमुखांची खुर्ची गेली पण आता इथे मुख्यमंत्र्यांचे म्हणजेच शिवसेनेचे वांदे झाले कारण , कोर्टाने पास केलेल्या आदेशात एक मेख होती !
कोर्टाने #CBI ला दिलेल्या आदेशात लिहले आहे की #CBI ने प्राथमिक चौकशी करावी आणि त्यानुसार पुढील करवाई करावी ! आता #CBI ने काल कोर्टात सांगितले की प्राथमिक चौकशीतून त्यांना आढळले की मामु च्या आदेशाने वाझेंची नियुक्ती झाली आणि गृहखात्यात पैसे घेऊन बदल्या झाल्या !!
आता कोर्टात राज्यसरकार काय म्हणले ते बघा ,राज्यसरकार म्हणतंय की 100 कोटींच्या खंडणीचे चौकशी #CBI ने जरूर करावी पण वाझेंची नियुक्ती आणि बदल्यांच्या प्रकरणाला हात लावू नये ! कारण ह्याने सरकार डळमळीत होईल !
आता साधा प्रश्न आहे की #CBI असे काय करू शकते ज्याने "भकास आघाडी" डळमळीत होऊ शकते ?? काय #CBI आमदार फोडू शकते ?? नाही , मग असा आरोप ठाकरे सरकार का लावत आहे ?? तर मेख समजून घ्या !
वाझे प्रकरणावरून #CBI खुद्द मुख्यमंत्र्यांना चौकशीला बोलावु शकते आणि बदली प्रकरणावरून अनेक मंत्री
जवळपास सगळेच #CBI च्या रडारवर येतात ! अश्यात समजा #CBI ने कोणा मंत्र्याला पुराव्याने अटक केली तर आधीच डळमळीत असणारी भकास आघाडी पुरती कोलमडले ! खुद्द मुख्यमंत्र्याची चौकशी झाली तर सरकारवरचाच विश्वास उडेल ! ही प्रचंड मोठी भीती वाटत असल्याने #CBI ची चौकशी फक्त खंडणी आणि
देशमुखांपुरती मर्यादित राहावी असा भकास आघडीचा प्रयास आहे ! येत्या शुक्रवारी कोर्टाचा निर्णय येईल तेव्हा कळेल की #CBI काय करू शकते काय नाही ! पण जर कोर्टात #CBI ला परवानगी मिळाली तर 100 कोटी खंडणीचे प्रकरण चिल्लर वाटेल इतके मोठे गौप्यस्फोट होतील ह्यात शंकाच नाही !
वरकरणी कितीही एकजुट दिसली तरी भकास आघाडीला अनेक ठिकाणी भलेमोठे क्रॅक गेलेले आहेत , मार्मिक ठिकाणी बसलेला हलकासा प्रहार देखील भकास आघाडीला खूप मोठा हादरा देईल ज्याने आघाडी जमीनदोस्त होईल ! #CBI तो प्रहार करणार काय ?? लवकरच कळेल ✌️
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
