The Mahrattas (मराठी) Profile picture
क्षत्रिय महरट्टा (सूर्य ☀️ चंद्र 🌙 यदु 🤺 नाग 🐍 वंशी मिळून ९६ क्षत्रिय कुळांचा समूह ) इंग्रजी माहिती साठी - @tmahrattas

Dec 18, 2021, 25 tweets

पानिपत मोहिमेमध्ये झालेल्या नुकसानीच्या आकडेवारीची समीक्षा (भाग १)⚔️

पानिपत मोहिमेविषयी गंभीर गैरसमज पसरले याचे मुख्य कारण म्हणजे प्राथमिक स्त्रोतांचे निवेदन चुकीचे व केवळ एकाच दिवसाच्या (१४ जानेवारी १७६१) संघर्षावर लक्ष केंद्रित करणारे आहे.
(1)

#The_Mahrattas

मराठ्यांनी १७६० मध्ये साध्या "firepower" वापर करून (ग्रेनेड) दिल्ली मुक्त केली. त्यामुळे दुर्रानी लाल किल्यावरील ताबा सोडावा लागला. त्यानंतर मराठ्यांनी कुंजपुरा ला कूच केले. त्यावेळी
कुंजपुरा तीन शक्तिशाली अफगाण सरदारांच्या ताब्यात होते.
(2)

१.अब्दुस समद खान Governor of Sirhind
२. कुतुबशाह रोहिल्ला Qazi of Najib-Ud-Daulah & killer of Dattaji
३. नजबात खान Governor of Kunjpura
कुंजपुरा लढाईमुळे मराठे व पश्तून यांच्यात भावनिक तानवनिर्माण झाला. त्यामुळे कुंजपुरा हत्याकांड पानिपत मोहिमेचा महत्वाचा भाग ठरतो.

(3)

पानिपत मोहिमेचे प्राथमिक ध्येय महान मराठा सरदार दत्ताजी शिंदे पाटील यांच्या हत्येचा सूद घेणे हे होते.
कुतुबशाह रोहिल्ला हा मुख्य गुन्हेगार होता. ज्याने बुरारी घाटामध्ये दत्ताजी शिंदेंचा विश्वास घाताने शिरच्छेद केला होता.

(4)

मराठा फौज मथुरेला पोहचल्यावर अहमद शाह अब्दालीने भारातातून पळून जाण्याचा विचार केला. परंतु नजीब उद्दौला याने भारतातून सर्व पश्तून नष्ट होण्याची भीती व्यक्त केली व अब्दालीला लढण्यासाठी विनंती केली.

(5)

अहमद अस्लम अन्सारी (१७७०-१७७१) च्या फरहाट-अन-नाजिरींन च्या मते मराठ्यांनी कुंजपुरा येथे २०,००० अफगाणांना ठार केले.
नजाबत खानाची बोटे तेलात बुडवलेल्या कापडाने बांधली व त्यास पेटवून दिले. त्यानंतर त्याला पोत्यात बांधून आगीत ढकलले.

(6)

तारीख-ए-मुझफ्फरी नुसार अब्दुस समद खानाच्या प्रत्येक बोटामध्ये लोखंडी खिळे ठोकण्यात आले.
कुतुबशाहाची डोके कापून मराठा छावणीत फिरवण्यात आले.
ज्यांनी दाती तृण धरले व हिंदू मराठ्यांना "आम्ही तुमच्या गायी आहोत" असे म्हणून दयेची भीक मागितली, केवळ त्यांनाच सोडण्यात आले.

(7)

होळकरांची थैली मध्ये मराठा सैन्याचे व अफगाण सैन्याच्या कुंजपुरा हत्याकांडाचे तपशीलवार वर्णन केलेले आहे.
सुमारे १५००० जिहादींना थेट ठार करण्यात आले. व
मराठ्यांचे नुकसान - १०००
अफगाण्यांचे नुकसान - १५००० ते २००००

(8)

जुलै १७६० मध्ये मराठे मथुरेत पोहोचताच अब्दालीने भारत सोडण्याची तयारी केली.
पानिपत मोहिमेतील अत्यंत महत्वाचा परंतु दुःखद भाग म्हणजे यमुना नदीला आलेल्या जास्त पुरामुळे मराठ्यांना नदी पार करून रोहिल्यांवर आक्रमण करणे शक्य झाले नाही.

(9)

अहमदशाह अब्दाली हा मराठ्यांवर आक्रमण करण्याच्या ५ महिने आधीपासूनच घाबरून होता. परंतु देहलवी वलिउल्ला, काझी काद्रीस आणि नजीब उद्दौला यांच्या दबावामुळे, त्याला जिहादीच्या व पठाणांच्या बंधुत्वात राहणे भाग पडले.

(10)

१० ऑक्टो. १७६० मध्ये मराठ्यांनी पानिपत गाठले.
पानिपत त्या काळातले जवळजवळ पूर्णपणे मुस्लिम लोकांनी वसलेले शहर.
पानिपत मधील मराठ्यांच्या तोफखाना भारतीय इतिहासात त्याचबरोबर प्रभावतेच्या दृष्टीने जागतिक इतिहासात देखील अतुलनीय होता.

(11)

कृष्णराव जोशी यांनी ५ नोव्हे. रोजी लिहलेल्या पत्रात असे दिसून येते कि, प्रत्येकी मराठा ५० ते १०० अफगाणांना मारत होता. नोव्हेंबरच्या अखेरीस अब्दालीला त्याचा सैन्यासह २ कोस मागे जाणे भाग पडले.

(12)

१२ नोव्हे. १७६० - मराठ्यांनी पहिला हल्ला केला.
अधीर अफगाणी सैन्याने शिंदेशाही व होळकर यांच्यावर हल्ला केला. परंतु त्यांनी अफगाणांचा पराभव केला.
दुर्रानी वझीराला वाचविण्यासाठी शूजा उद्दौला धाव घ्यावी लागली. नाहीतर मराठ्यांनी विजयी निशाण फडकलेच होते.

(13)

१२ नोव्हे. १७६० - मराठ्यांनी पहिला हल्ला केला.
अफगाण नुकसान - ४०० ठार, १०० जखमी, १०० घोडे लुटले.

source - maratha envoy's report: २७ नोव्हेंबर (पेशवा देफ्टर नोंद)

(14)

२२ नोव्हे. १७६० ची पुनरावृत्ती.
नजीब खानाच्या सैनिकांवर महाराजा जनकोजी शिंदेशाही यांचा हल्ला.
तरुण योद्धा जनकोजी राव शिंदेशाही यांच्या नेतृत्वाखाली शिंदेशाही यांच्या तुकडीने अफगाणी सैन्याचा पहिल्या तुकडीवर
गारदी च्या सैन्यासह हल्ला केला.

(15)

काशिराजने नोंद ठेवली त्यानुसार अफगाणांची पहिली घुसखोरी दुर्रानी ग्रँड वजीरच्या अधीन होती आणि मराठ्यांनी त्याचा बचाव करण्यासाठी सैन्यदलाच्या लढतीपर्यंत त्यास जवळजवळ नष्ट केला.
जवळपास 4000अफगाण मारले गेले आणि त्या दरम्यान मराठ्यांची संख्याही तितकीच होती, जे असंभव वाटणारे आहे.

(16)

या हल्ल्यातील मृतांचा अचूक अहवाल समकालीन साक्षीदार भाऊसाहेबांची बखर यामध्ये आहे.
- "नजीब खान रोहिल्ला, अहमद खान लंगडा पठाण, शुजा-उद-दौलाचे सैन्य आणि 10-15 तोफांसह दुर्रानी सैन्यावर होळकरांचे सरदार सरदार संताजी वाघ यांनी हल्ला केला.

(17)

सरदार संताजी वाघ यांनी मराठा गणिमी कावा डावपेच खेळण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांची संख्या जास्त असल्याने ते बाहेर पडले आणि मुस्लिम सैन्याने सरदार संताजी वाघ यांचा पाठलाग सुरू केला.
महाराजा जानकोजीराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदेशाही सैन्य त्यांच्या बचावासाठी धावून आले
(18)

शिंदशाही-होळकर यांचे एकत्रित सैन्य वानर आणि पांडवांच्या क्षमतेने लढले.
सरदार बळवंतराव या लढ्यात सामील झाले नाहीत अन्यथा दुर्रानी त्या रात्रीच चिरडले गेले असते.
शिंदे सैन्याला त्यांचा फायदा गमवायचा नव्हता आणि ...

(19)

शिंदेशाहींनी "हर! हर! महादेव!" असे मोठ्याने ओरडले.
त्यांनी थेट अब्दालीच्या मुख्य छावणीवर छापा टाकला आणि 2-4 मोठ्या तोफांची लूट केली.
लुटलेले अफगाणी सामान सुरक्षित ठेवण्याचे कार्य सुरू असता त्यामध्ये 500 ते 700 मराठे मरण पावले.
अब्दालीचे 1000 ते 1200 सैनिक मारले गेले.

(20)

काशीराज पं. यांच्याकडे दुर्रानी सैन्याच्या अत्यंत तंतोतंत हिशोब आणि त्यांच्या स्वत:च्या छावणीतील नुकसान-नफ्याचे हिशोब लक्षात घेता,यामध्ये मारल्या गेलेल्या 4000अफगाणांच्या विषयी त्यांचा अहवाल अधिक अचूक आहे.
अंतिम अहवाल
अफगानांचे नुकसान-4000
मराठ्यांचे नुकसान- 500-700 दरम्यान

(21)

28 ते 30 नोव्हें. -3रा मराठा हल्ला -
मल्हारजी होळकरांचा शाह वली खानच्या सैन्यावर हल्ला.
महाराजा मल्हारराव होळकर गार्दीच्या बचावात्मक युद्धाच्या नियोजनास असंमत असल्याने त्यांनी शाहवली खानच्या अफगाण तुकडीवर मराठा सैन्याद्वारे विजेसारखा हल्ला करण्याचा निर्णय घेतला.

(22)

असे दिसते की काशीराज पंडित यांचा २ नोव्हेंबर रोजी चा मल्हारजी होळकर यांचा हल्ला व २२ तारखेला महाराजा जानकोजी शिंदे यांच्याद्वारे केलेला हल्ला यांमध्ये गैरसमज होता .
आपण हे आता 29 नोव्हेंबर असे अंदाजे समजू शकतो.

(23)

29 नोव्हेंबर 1760 - तिसऱ्या मराठा हल्ल्याचा अहवाल
अफगाणांचे नुकसान: 2,000 हून अधिक अफगाणी ठार.
मराठ्यांचे नुकसान: 1,000 ठार.
स्त्रोत: नाना फडणवीस यांचे पानिपत रणसंग्राम (विभाग १, पत्र सातवे)

(24)

आतापर्यंत अफगान्यांची हानी
20,000+ (1 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर. 22*50 किंवा 100 = 1100 ते 2200)+4,000+2,000 = 27,100 ते 28,200 अफगाणी मारले गेले
मराठयांचे नुकसान
1,000+39+500 ते 700+1,000 = 2,539 ते 2,739 मराठे हुतात्मा.
आपण आधीच अंतर पाहू शकतो.

( क्रमशः भाग 2 मध्ये )

(25)

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling