My Authors
Read all threads
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज कोरोना विषाणू संदर्भात महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुढील मुद्दे मांडले:
हा आपला गेल्या काही दिवसांचा रिवाज झाला आहे. काही दिवसांच्या कालावधीनंतर मी नियमितपणे आपल्या समोर येत आहे आणि आपल्याला धन्यवाद देण्यासोबत कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपण कुठे आहोत याची माहिती काहीही न लपवता आपल्याला सांगत आहे.
ईद येत आहे, मी मुस्लिम समाजातील माता भगिनींना ईदच्या शुभेच्छा देतो पण त्यांना विनंती करतो की ईद साजरी करताना रस्त्यावर न येता, गर्दी न करता, घरीच आपण प्रार्थना करा आणि त्या प्रार्थनेमध्ये आपल्या राज्यासाठी, देशासाठी, जगासाठी लवकर हे कोरोनाचे संकट नष्ट होवो अशी सुद्धा दुआ मांगा.
गेल्या अधिवेशनमध्ये आपण सर्वांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने जाणारा अर्थसंकल्प मांडला,ते अधिवेशनच या संकटामुळे आपल्याला लवकर संपवावे लागले. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, सगळी शहरं यांच्यासाठी प्रत्येक क्षेत्रातील स्वप्न सत्यात नक्की आणणार!
आता जो टप्पा सुरू झालेला आहे, त्यामध्ये केंद्र सरकारच्या टीमच्या अंदाजाप्रमाणे महाराष्ट्रात सव्वा ते दीड लाख रुग्ण असतील असा त्यांचा अंदाज होता. आपण खबरदारी घेण्यासाठी त्यांनी हे सांगितले होते. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये ३३,७८६ पॉझिटीव्ह केसेस आहेत.
४७१९० रुग्णांपैकी १३,४०४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सव्वा लाख रुग्णांची शक्यता होती, आज अॅक्टिव केसेस हे ३३,७८६ आहेत. तुम्ही जी शिस्त पाळली, हिंमत दाखवली त्यामुळे हे शक्य झाले.
जवळपास साडे तीन लाखाच्या आसपास टेस्ट महाराष्ट्रात झाल्या आहेत. त्यामध्ये जवळपास ३ लाख केसेस नेगेटीव्ह आल्या. दुर्दैवाने यामध्ये १५७७ मृत्यू झाले आहेत.
मी काही दिवसांपूर्वी सांगितले होतं की ८४ वर्षांच्या आजी बऱ्या होऊन घरी गेल्या. आता त्याही पुढे आपण गेलो, एक ९० वर्षांच्या आजी मुंबईमध्ये बऱ्या होऊन स्वतःच्या पायाने घरी गेल्या आहेत. नवजात अभ्रकांपासून ते ९० वर्षांच्या आजींपर्यंत सर्व कोरोनाचा यशस्वी मुकाबला करत आहेत.
पुढील लढाई अधिक बिकट होणार आहे. आपल्याकडे काही केसेस वाढणार आहेत पण घाबरण्याचे कारण नाही आहे. आपण मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा निर्माण करत आहोत. राज्यात काही लाखांमध्ये आपण रुग्णशय्याची व्यवस्था करत आहोत.
एप्रिल महिन्याच्या शेवटी आपल्याकडे हॉस्पिटल्स आहेत त्यामध्ये हजाराच्या आसपास बेड होते. आज आपण हे हॉस्पिटल्स आणि फील्ड हॉस्पिटल्स यांची एकत्रित संख्या मोजल्यास मे अखेरीस आपण किमान १४,००० बेड आपण उपलब्ध करून देऊ शकतो.
आपल्याकडे पुढचे ८-१० दिवस पुरेल एवढा रक्तसाठा आहे.मी तमाम रक्तदात्यांना नम्र आवाहन करत आहे की महाराष्ट्राला रक्ताची गरज आहे व महाराष्ट्राचं रक्त काय असतं,महाराष्ट्राच्या रक्तामध्ये संकटाविरुद्ध लढण्याची जिद्द आहे हे पुन्हा दाखवायचे आहे म्हणून पुन्हा रक्तदान करण्याची आवश्यकता आहे.
हाय रिस्क ग्रुप, ५५ वर्षांच्या वर, ज्यांना मधुमेह, रक्तदाब, किडनीचे आजार, इतर आजार असतील त्यांच्यावर कोरोना विषाणू जास्त घातक दुष्परिणाम करतो आणि त्यासाठी आपण पावसाळी साथींपासून दूर राहण्याची गरज आहे.
कोरोना विषाणूवर औषध नाही, हे सत्य असलं तरी आपले डॉक्टर्स प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत त्या सगळ्या डॉक्टर्सना, आपल्या युद्धातल्या सैनिकांना जेवढे आपण धन्यवाद देऊ तेवढे थोडे आहेत.
मला एका गोष्टीचा अभिमान आहे, माझा विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, शहरं आहेत हे सगळे खूप जिद्दीने या लढ्यात उतरले आहेत.
मी काल परदेशात असलेल्या एका मराठी डॉक्टरशी बोललो. त्यांच्याशी बोलत असताना मी त्यांना विचारले की तुमच्या देशात काय चाललेले आहे, त्यांनी त्यांच्या देशातली परिस्थिती सांगितली आणि मला असं सांगितले की, "उद्धव जी, आपला महाराष्ट्र ज्या पद्धतीने लढतोय, ही फार अभिमानाची गोष्ट आहे."
काही जणं असं म्हणत आहेत की तुम्ही पॅकेज का नाही दिले? पॅकेज द्यायला पाहिजे. सगळं काही देत आहोत, पहिले जे संकट आपल्या डोक्यावर घोंगावत आहे, ते आरोग्याचं संकट आहे. जोपर्यंत आरोग्यविषयक सुविधा आपण करत नाही तोपर्यंत पोकळ घोषणा करणारं महाविकास आघाडीचं सरकार नाही आहे.
जसं रेशन कार्ड नसलेल्यांना आपण धान्य देत आहोत, तसं रेशन कार्ड नसलेल्यांना उपचार कसे घ्यायचे? म्हणून आपली महात्मा फुले योजना आहे त्यात आपण १००% लोकांना आपण नोंदणीकृत हॉस्पिटल्समध्ये १००% मोफत उपचार करून देणार आहोत.
केंद्राने रेल्वेची सोय केल्यानंतर केंद्र सरकारने ८५% रक्कम जाहीर केली आहे. ते मिळतील, जसे आजपर्यंत मिळाले तसे ते ही मिळतील. पण राज्याने आजपर्यंत ४८१ ट्रेन्स सोडल्या आहेत. ६-७ लाख प्रवासी मजुरांची आपण सोय केली आहे. यासाठी राज्य सरकारने ८५ कोटी रुपये ट्रेनच्या भाड्यापोटी दिले आहेत.
मजुरांची दिशाहीन भटकंती चालू आहे, त्या सगळ्यांना आपली एसटी त्यांना ज्या स्टेशनवर जायचं होत त्या स्टेशनवर सोडत आहे, काही लोकांना एसटीमधून परराज्यात नेत आहे. एसटी बसेसच्या ३२,००० फेऱ्या झाल्या आहेत त्यातून आपण ३,८०,००० मजुरांना स्टेशनपर्यंत किंवा त्यांच्या राज्यापर्यंत पोहोचवले आहे
आताचा सिझन शेती आणि शिक्षणाचा आहे. आपण जूनमध्ये शाळा, कॉलेज सुरू करू शकतो की नाही याचा अभ्यासगट तयार करून त्याबाबत विचारविनिमय करून निर्णय घेत आहोत. शाळा पुढे गेल्या तरी शिक्षण कसं चालू ठेवता येईल तेही बघतोय. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निर्णयही महत्त्वाचा आहे.
महाराष्ट्रात जवळपास ५०,००० उद्योग सुरू झालेले आहेत. त्यामध्ये अनेक मजुर कामावर आले आहेत. रोजगार हमी योजनेमध्ये सुद्धा काही लाखांमध्ये मजुरांनी काम करायला सुरुवात केली आहे. भिवंडी आणि मालेगाव येथील यंत्रमाग सुरू करायला आपण परवानगी दिली आहे.
परवा सोनिया जी आणि इतर सर्व पक्षांतल्या नेत्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. त्यामध्ये मी बोललो होतो की पुढच्या १५ दिवसांत आपल्या देशाचे खरे चित्र समोर येईल, आपण नेमके कुठे आहोत. कारण मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले आहे, होत आहे.
परवा खरिप हंगामाच्या तयारीची बैठक मंत्रिमंडळाने घेतली. त्यामध्ये पीक कर्जाचा विचार आला, विम्याची योजना आली, शेतकऱ्यांना बांधावर बी बियाणे कसे उपलब्ध करून देता येईल हा नवीन प्रयोग आपण करत आहोत. आपण शेतीच्या कामांना कुठेही अटकाव केला नाही आहे.
कापूस खरेदीचा विषय अनेक जणांनी मांडला. आजपर्यंत आपण ७५-८०% कापूस खरेदी केलेली आहे. अजूनही चालूच आहे, बंद नाही केली आहे. तसचं इतर अन्नधान्याच काय करणार त्याही बाबतीत पूर्ण विचार करत आहोत, हे करत असताना आरोग्याचा विचार करत आहोत कारण तो महत्त्वाचा आहे.
हा संकटाचा काळ आहे, कोणीही राजकारण करू नये, अजिबात करू नये. राजकारण तुम्ही सुरू केलं तरी आम्ही नाही करणार, कारण आमच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी आहे आणि आमच्यावर महाराष्ट्राचा विश्वास आहे. त्या विश्वासाला आम्ही कधी तडा जाऊ देणार नाही.
फक्त राजकारण म्हणून राजकारण करायचं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभेसे नाही आहे. मी महाराष्ट्र जपतो, महाराष्ट्राची संस्कृती जपतो, महाराष्ट्राचे संस्कार जपतो म्हणून माझ्या संस्कारात या अडचणीच्या वेळेला राजकारण करणे बसत नाही, मी राजकारण करणार नाही.
आपण हळूहळू आपली आयुष्याची गाडी ही पूर्वपदावर आणत आहोत. हळूहळू जसं बंद करत गेलो तसं हळूहळू चालू करत आहोत. आणि रिओपन करताना पावलं अत्यंत खबरदारीने टाकायची आहेत.
कोरोनासोबत जगायला शिका म्हणजे काय शिकायचं? पुढचे काही दिवस, काही महिने आपल्याला मास्क घालूनच समाजात फिरावं लागेल, आपले हात धुत राहावे लागतील, सतत तोंडाला हात न लावणे, एकमेकांपासून अंतरावर राहणे, रस्त्यावर थुंकू नये. कोरोनानंतरचे जग असे असेल.
प्रत्येकाने आपापल्या ईश्वराकडे प्रार्थना करा की लवकरात लवकर हे जग ज्या संकटाने ग्रासून टाकले आहे त्या संकटाला नष्ट करून आम्हाला सुखाचे, आनंदाचे आणि निरोगी आयुष्याचे दिवस पुन्हा जगायला मिळो ही प्रार्थना करा!

जय हिंद, जय महाराष्ट्र!
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Enjoying this thread?

Keep Current with CMO Maharashtra

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!