My Authors
Read all threads
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज कोरोना विषाणू संदर्भात महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुढील मुद्दे मांडले:
आपण कोरोनाशी लढत आहोत, त्यामध्ये निसर्ग चक्रीवादळ आलं. आपण सर्व किनारपट्टीतील लोक श्वास रोखून बघत होतो की हे वादळ कुठे धडकणार. रायगडमध्ये हे वादळ धडकलं, त्या वादळाची भीषणता भयानक होती.
आपल्या शासन यंत्रणेने चांगले काम केले. मनुष्यहानी किंवा जीवितहानी कमीत कमी कशी होईल यासाठी सतर्कता दाखवली. एक सुद्धा कोळी बांधव किंवा मच्छिमारी करणारी बोट आपण समुद्रात राहु दिली नाही, त्यांना वेळेमध्ये घरी सुरक्षित जागी आणलं. त्यामुळे प्राणहानी कमीत कमी ठेवण्यात आपल्याला यश आलं.
या नुकसानीमुळे सरकार खंबीरपणे या किनारपट्टीतील कोकणवासियांच्या आणि ज्यांच ज्यांच नुकसान झालं, त्या सगळ्यांच्या पाठी खंबीरपणे उभे आहे.
परवा १ तारीख आहे, जे आपल्यासाठी योद्धे बनून लढत आहेत, त्या डॉक्टर्सचा राष्ट्रीय डॉक्टर दिन आहे, त्या सगळ्यांचे कौतुक करतो, त्यांना धन्यवाद देतो. तुम्ही आमच्यासाठी जी लढाई लढत आहेत, त्याच्यात आम्ही सुद्धा तुमच्यासोबत आहोत, तुम्हाला सहकार्य करत आहोत आणि करू, हे वचन त्यांना देतो.
१ तारखेला डॉक्टर दिनाबरोबर आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचाही जन्मदिवस. हा सप्ताह आपण शेतकरी सप्ताह म्हणून साजरा करतो. म्हणजे आपले जीव वाचवतात त्या डॉक्टरांचा दिवस आहे आणि वसंतरावांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने शेतकरी दिन साजरा करतो, त्यांचा सुद्धा हा दिवस आहे.
माननीय पंतप्रधानांनी ३० जूनपर्यंत हा लॉकडाऊन जाहीर केला आहे. ३० जूननंतर काय होणार? आता लॉकडाऊन हा शब्द बाजूला ठेवायचा आणि हळूहळू सोयी, सुविधा आणि सेवा या उघडत जाणार म्हणजेच ३० तारखेनंतर लॉकडाऊन उठणार का? अत्यंत स्पष्ट शब्दात नाही!
आपण पुन:श्च हरी ओम म्हणून सुरुवात केली आहे. याचा अर्थ धोका टळलेला नाही. पण आपण थोडं कात्रीत सापडले आहोत. आपल्याला मधोमध तोल सांभाळून हा संकटाचा काळ पार पाडायचा आहे.
हे सरकार तुमचं आहे, मजबूत आहे. महाराष्ट्राची काळजी घेणारं हे सरकार आहे म्हणून माझं कर्तव्य तुम्हाला धोक्यापासून सावध करणे आहे. मला अभिमान आहे की महाराष्ट्रातील सर्व माता बांधव यांचा सगळ्यांचा माझ्यावर, आपल्या सरकारवर विश्वास आहे आणि जे सरकार सांगत आहे त्या सूचना तुम्ही पाळत आहात.
मी शेतकरी दादांना सांगू इच्छितो की तुम्ही काळजी करू नका, हे सरकार तुमचं आहे. ज्यांनी तुम्हाला फसवलं ते कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही, त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करून सजा होईल. पण ज्यांनी तुमचं नुकसान केल आहे, त्यांच्याकडून सरकार नुकसानभरपाई मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही.
विठुराया, कशी परिस्थिती आहे? तुझे करोडो भक्त तुझ्या दर्शनाविना घरात आहेत. कोरोनाचे संकट नष्ट करून महाराष्ट्रच नाही तर जगाला सुखाचे, समृद्धीचे, निरोगी आयुष्य दाखव हे साकडं घालायला मी जाणार आहे. मी आषाढी एकादशीला मुख्यमंत्री म्हणून नाही तर तुमचा प्रतिनिधी, वारकरी म्हणून मी जाईन.
दहीहंडी येत आहे, दहीहंडीच्या मंडळांना मला धन्यवाद द्यायचे आहेत. सर्वांनी सामाजिक भान ठेऊन दहीहंडीचा उत्सव रद्द केला. मी गणपती उत्सवाबद्दल एक विनंती केली आहे. गणपती मंडळांना सुद्धा मला धन्यवाद द्यायचे आहेत की सर्व मंडळांनी मला सांगितले की सरकार घेईल तो निर्णय आम्हाला मान्य आहे.
मी अभिमानाने सांगेन की आपला महाराष्ट्र, आपली मुंबई, आपले डॉक्टर्स, टास्क फोर्स उपचाराच्या बाबतीत जगाच्या बरोबरीने आपण चाललो आहोत, कुठेही आपण जगाच्या पाठी नाही. चहूबाजूला आपली नजर आहे.
प्लास्मा थेरेपी आपण मार्च-एप्रिल पासून सुरू केली आहे. पण एक गोष्ट मला अभिमानाने सांगावीशी वाटते की सुरवातीला १-२ ठिकाणीच प्लास्मा थेरेपी वापरत होतो. आजपर्यंत जर आपण १० जणांवर उपचार केले असतील तर जवळपास ९ जणं बरे झालेत, ७ जणं तर बरे होऊन घरी पण गेले आहेत.
त्यासाठी उद्याच आपण एका गोष्टीचं लोकार्पण करतो आहोत. कदाचित देशातील सगळ्यात मोठं प्लास्मा थेरेपीचा वापर करणारे आपले पहिले राज्य ठरेल. आपण ही केंद्रे वाढवत आहोत.
जे रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, त्यांना विनंती करतो आहे की कृपा करून आपण पुढे या, वैद्यकीय विद्यालय, शासकीय डॉक्टर्स आहेत त्यांना संपर्क करा. जसं आपण रक्तदान करतो तसेच प्लास्मादान करा.
तुम्ही नाव सांगा ते औषध आपण वापरत आहोत परंतु ही औषधे वापरण्यासाठी आपल्याला केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाची परवानगी लागते.
आपण मे च्या सुरवातीला रेमडेसिविर आणि फॅविपिराविर या औषधांच्या उपलब्धतेसाठी पाठपुरावा सुरू केला. येत्या काही दिवसात याचा पुरेसा साठा आपल्याला उपलब्ध होईल, किंमतीची पर्वा करू नका. आपण ही औषधे मोफत उपलब्ध करून देण्याच्या विचारात आहोत.
काही ज्येष्ठ डॉक्टर्स, ज्यांना अनुभव आहे ते सुद्धा थोडे घाबरून हॉस्पिटल मध्ये जात नाही आहेत. मी त्यांना नम्रपणे विनंती करतो की आपण काळजी करू नका. जे जे तुमच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे, ते संपूर्ण खबरदारी घ्यायची जबाबदारी सरकारची आहे. आपली महाराष्ट्राला गरज आहे.
आता अँटी बॉडी आणि अँटी जेन टेस्ट करण्याचे रॅपिड किट्स येत आहेत, ते ही आपण घेत आहोत. या ही टेस्ट आपण करत आहोत.
मला शहरी भागात राहणाऱ्या सर्व लोकांना सांगायचं आहे की यावेळेला आपले सगळे कर्मचारी कोरोनाच्या लढाईमध्ये आहेत, अफाट मेहनत करत आहेत. पण हे जे दिवस असतात ते डेंग्यू आणि मलेरियाचे दिवस असतात त्यामुळे थोडी स्वतःची काळजी घ्या.
३०जूनला प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेमध्ये भगवे रेशन कार्डधारकांना व ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही त्यांना अन्नधान्य देण्याची मुदत संपते. मी पंतप्रधानांच्या व्हिसीमध्ये मागणी केली होती की ही मुदत आणखी ३ महिन्यासाठी वाढवून द्या. आपल्याला त्याबद्दल परवानगी मिळेल याची मला खात्री आहे.
अर्थचक्राचा बाबतीमध्ये आपण खचून गेलेलो नाही आहोत. मला अभिमान आहे की गेल्या १५ दिवसात महाराष्ट्रने जवळपास ₹ १६,००० कोटींचे सामंजस्य करार काही विदेशी कंपन्यांसोबत केले आहेत. या संकटातसुद्धा महाराष्ट्र हा विविध गुंतवणूकदारांना आणि उद्योजकांना आपला वाटतो आहे हे फार महत्त्वाचे आहे.
या गुंतवणूकदारांना आपण कुठेही दरवाजे बंद ठेवलेले नाही आहेत. माझ्या महाराष्ट्रात या, माझ्या विदर्भात, मराठवाड्यात, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र मध्ये या. जे जे काही तुम्ही कराल, तुम्ही जरूर करा. तुमचासाठी आमच्या महाराष्ट्राची दार उघडी आहेत.
गुंतवणूकदार आल्यानंतर साहजिकच आहे. अर्थचक्राला गती मिळाली पाहिजे, माझ्या स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे.
शाळा सुरू होणार का? शाळा सुरू होणार का त्यापेक्षा शिक्षण कसं सुरू होणार त्यावर आपण लक्ष देत आहोत. मग ते शालेय शिक्षण असेल, महाविद्यालयीन शिक्षण असेल, सगळ्याच बाबतीत आपण एकेक गोष्टी करत आहोत.
मला खात्री आहे जसं सहकार्य तुम्ही मला आजपर्यंत केलं, सरकारला केलं तसेच याही पुढे कराल. जे जे आपण काय करू ते तुम्हाला आधीच सांगितलेले आहे. लॉकडाऊन हा शब्द जरी मी वापरत नसलो तरी याचा अर्थ आपण परवा पासून सगळ काही उघडतो आहे असा गैरसमज करून घेऊ नका.
बाहेर पडलात तर तोंडावर मास्क पाहिजे, हात धुत राहिले पाहिजे, सनिटायझर पाहिजे, साबणाने हात धुत राहिले पाहिजे. या सगळ्या गोष्टी अजूनही काही काळ पाळाव्याच लागतील.
या अंतिम टप्प्यात आपल्याला हे युद्ध अर्धवट सोडून चालणार नाही. अजुन संकट टळलेले नाही. लॉकडाऊन पुन्हा करण्याची वेळ येऊ नये यासाठी आपले सहकार्य जसे सरकारला आजपर्यंत मिळाले तसेच यापुढे मिळेल अशी अपेक्षा व विश्वास व्यक्त करतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र!
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with CMO Maharashtra

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!