My Authors
Read all threads
@RakyaDadoos_ #भुतांच्या_गोष्टी
लांजा अंदाजे रत्नागिरी पासून ४५ किमी वर असलेले कोकणातील एक टुमदार गाव. इथून जवळपास १२-१५ किमी अंतरावर अनंत वन सृष्टीने नटलेले एक खूपच सुंदर खेडे आहे गोळवशी. आज पर्यंत ह्या ठिकाणाला काही फारशी प्रसिद्धी लाभली नाही ना इथे मोबाइलला नेटवर्क
ना धड वीज पुरवठा फक्त ७ ते ८ तास वीज, एसटी सुद्धा दिवसाला केवळ तीनच फेऱ्या मारते - संध्याकाळी ५  किंवा ६ वाजता शेवटची. इथे उतरल्या वर तुमच्या स्वागताला असतात फक्त दाट वनराई, मातीच्या आणि दगडाच्या पायवाटा, पक्ष्यांच्या शिट्ट्या
मला काही कोकणातल्या मित्रां कडून समजले होते कि गोळवशी
मध्ये बायंगी नवा चे भूत विकत घेता येते आणि हे भूत आपल्याला व्यवसायात सुबत्ता देते. सहज उत्सुकता म्हणून मी ठरवले कि ह्या गावी जाऊन बघायचे कि काय प्रकार आहे. 
दादर वरून सकाळी जनशताब्दी पकडली आणि रत्नागिरी गाठली तेथून पुढे काळीपिवळी ने अंदाजे दुपारी १ च्या सुमारास लांजाला पोहोचलो
लांजा एसटी स्टॅण्डवर गोळवशी बस बद्दल चौकशी केली तर समजले दिवसातून फक्त ३ गाड्या जातात, पुढची गाडी २.३० वाजता होती म्हणून रिक्षा मिळते का ते पहिले. रिक्षावाल्यांनी गोळवशी ऐकल्यावर आधी माझी चौकशी करायला सुरुवात केली कोण गाव? कुठून आलात? कोणाकडे जायचे आहे तुम्हाला? का आलात इकडॆ?
इत्यादी मी स्पष्ट सांगितले "मला बायंगी करायचे आहे म्हणून आलोय, आयुष्यात पहिल्यांदा आलो आहे इथे, मला माहित नाही कोण करते कसे करते पण मला करायचे आहे, जर तुम्हाला माहित असेल तर मला घेऊन जा". हे ऐकल्यावर एकही रिक्षावाला मला घ्यायला तयार झाला नाही. मग वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता
३ वाजता एसटी आली आणि निघालो. कंडक्टरला सांगितले गोळवशी दे तर तो लगेच म्हणाला तुम्ही इथले दिसत नाहीत परत कसे जाणार कारण आज परतीची गाडी रद्द झाली आहे. माझी तर हवाच निघाली हे ऐकल्यावर पण जवळ बिस्कीट आणि पाणी मुबलक होते मनात ठरवले जे होईल ते पाहून घेऊ पण परत फिरायचे नाही.
माझ्या शेजारी एक आजोबा बसले होते ते म्हणाले बाळा बायंगी साठी आलास का? मी ताडकन उडालो मनात आणि हो म्हणालो ते म्हणाले मी सांगतो त्या ठिकाणी उतर आणि देवीच्या गुरवाचे घर विचार. अंदाजे अर्ध्यातासात पोहोचलो परिसर रम्य होता दगडी पायवाट उतरल्यावर वस्ती लागली गुरव मंदिरात गेले होते म्हणून
मी पण मंदिरात निघालो तेव्हा मला समजले कि बायंगी हे भूत नसून देवी आहे आणि आपल्याला नारळ किंवा बाहुली देतात ती घरात किंवा गल्ल्यात ठेवायचे असते.
पहिले पहिले मला वाटले कि गुरव थोडे वेडे आहेत कारण ते माझ्याशी बोलता बोलता मनाशी बोलत होते आणि म्हणत होते कि थापाडे खरे बोल काय झालेय
कोणी काही केलाय कि नशीब साथ देत नाहीय कि देवाचा कोप का काही वेगळे, मी त्यांना मधेच विचारले तुम्ही कोणाला थापाडी म्हणत आहात तर ते म्हणाले बायंगीला. काही वेळ त्यांचे असेच चालले व मला म्हणाले बाळा तुझ्यावर कोणतीही बाधा किंवा नशिबाचा भोग नाही परंतु तू तुचीया असल्याने तुझा खेळ झालाय
फक्त माणसे ओळखायला शिक आणि व्यवहाराने वागत जा सगळे ठीक होईल. पण मला बायंगी हवीच होती म्हणून त्यांना म्हणालो मला खूप यश आणि प्रसिद्धी मिळवायची आहे मला बायंगी द्याच पाहिजे तर पैसे घ्या. तर ते लगेच खेकसले बायंगी तुझ्या बापाची नौकर नाही आणि पैस्यानी येत नाही आणि मी पण  भिकारी नाही
काही खरपूस शिव्या पण दिल्या मला.
संध्याकाळचे सात वाजले होते आणि अंधार पसरला होता म्हणून मी त्यांना विचारले कि मी परत कसा जाऊ परतीची एसटी नाही, तर ते म्हणाले आज पूजा आहे बघून जा रात्री, कसे मी म्हणालो. तेवढ्यात दुपारी पाहिलेला रिक्षेवाल्यातला एक रिक्षावाला तिकडे आला मला आश्चर्य
वाटले सकाळी तो माझे भाडे घेण्यास तयार नव्हता आणि आता इकडे हजर असो.

रात्री ९ च्या सुमारास पूजा चालू झाली कोंबडी, नारळ, बुक्का, दारू, फुले, लिंबे, नाग खिळे, बाहुल्या इत्यादी सामग्री होती. सर्वात आधी रिक्षावाल्याला गुरवाने नियम सांगितले दर अमावस्या आणि पौर्णिमेला तुला थापाडी (देवी)
नैवेद्य मागेल जे काहीही असू शकते नारळ लिंबू कोंबडी किंवा माणूस किंवा काहीही तुला ते द्यावे लागेल. बायंगी देवी पदरचे भूत बाहुलीत देते हि बाहुली कोणालाही दिसणार नाही अश्या ठिकाणी ठेवायची. मुदत १५ दिवस ते जन्मभरासाठी घेता येते परंतु लवकर येऊन परत केले तर बरे कारण मागण्या मोठ्या आणि
विचित्र होत जातात, दिल्लीतील बुराडी प्रकरणाचा दाखला दिला त्याला.
दारूच्या भोगाने पूजा सुरु झाली मंत्र हे कोकणी बोली भाषेतील वाटत होते, गुरव परत परत देवीला विनंती करत होता जा म्हणून परंतु देवी काही पदरचे भूत देण्यास तयार होत नव्हती तेव्हा तो म्हणाला मी देवीला जबरदस्ती करू शकत नाही
तिची मर्जी असेल तरच ती येईल एकदा शेवटचे गार्हाणे करून बघतो जर आली तर ठीक नाही तर तू जा. गुरवाने काकुळतेने गार्हाणे केले आणि आश्चर्य मंडळातील बाहुली उठून नाचायला लागली, पूजा फळली दारू आणि कोंबडी चा भोग झाला. गुरावानी सांगितले जर बायंगी परत करायच्या आत जर गुरव मेला तर बायंगी कोणाला
परत करायची ते आणि पूजा संपली अंदाजे सडे तीन वाजे पर्यंत हे चालले होते.
सकाळी ६ ला आम्ही निघालो रिक्षेवाल्याला मी रस्त्यात विचारले माझे भाडे का घेतले नाही तो म्हणाला ह्या ठिकाणी कधीच एकट्याने यायचे नसते जे लोक बायंगी परत करत नाहीत त्याचा किंवा त्याच्या जवळच्या नातलगाचा जीव जातो
आणि आत्मा देवी कडे येतो जर गुरवानं तुझा बळी दिला असता तर त्याला अजून अधिभौतिक शक्ती मिळाल्या असत्या , देवी तोच आत्मा बाहुलीत देते मी सुन्न झालो आणि परत आलो
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with Prasanna

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!