हा थ्रेड वाचत असताना तुम्हास काही गोष्टी #unpopularopinion वाटू शकतात.. कोणाच्याही भावना दुखावणे हा आमचा हेतू नाही.
गोष्ट यंदाच्या जूनच्या पहिल्या आठवड्यातली.. केरळमध्ये एक प्रेग्नन्ट हत्तीण मारल्याची घटना घडली होती..फार दुःखद आणि चीड आणणारीच घटना होती ती.. #म#धागा 👇
तावातावाने सगळेच व्यक्त होत होते त्यावेळी.. पण त्यात प्राणीप्रेमापेक्षा दांभिकपणा जास्त दिसत होता.. इथं वैयक्तिक पेक्षा सामाजिक भान या अर्थानं मी दांभिकता म्हणतोय.
खरंतर मानवी जीवन हे आशा हिंसेच्या पायावरच उभं आहे. अगदी पूर्वी शिकार करून खाण्यापासून ते आत्ता संकरित 👇
प्रजाती निर्माण करण्यापर्यंत सगळीकडे हिंसा भरून राहिलेली पहावयास मिळते. मानव जसजसा शेती करून स्थायिक व्हायला सुरुवात झाली.. तशी मानवी संस्कृतीत एका भावनेने बळ धरलं.. ती भावना म्हणजे 'निसर्गातील इतर प्राणी एकतर आमच्या सोबत असतील किंवा आमच्या विरोधात.' 👇
या भावनिक न्यायाने 'उपद्रवकारी आणि अउपद्रवकारी' असे सरळ सरळ दोन गट प्राण्यांत पाडले गेले. त्यातूनच पुढे उपद्रवकारी नसलेली आणि मानसाळलेली प्राणी प्रजाती पाळीव प्राणी म्हणून उदयास आली..त्यांचा फायदेशीर वापर मानवाने 'फक्त आपल्याच' भल्यासाठी करून घेतला..👇
आणि आजतागायत बैलपोळा साजरा होतो ते याच कृतज्ञतेच्या भावनेने. ही दृश्य बाब. अर्थात हे सर्व न करता मानव फक्त शिकार करूनच राहिला असता तर आपण अजूनही जंगलात राहिलो असतो.
आता उपद्रवकारी प्राण्यांना संपवणे ही मानवी परंपरा आहे. उदाहरणार्थ.. उंदरांना फॉस्फईड खाऊ घालणं.. 👇
आता त्या गोळ्या प्रेग्नन्ट मादी उंदीरही खातच असेल ना.. तिचंही कुटुंब असेल.. पिल्लं असतील.. पण,इथं ती उपद्रवकारी असल्याने तिला संपवणे श्रेयस्कर. फळात स्फोटक घालणे हा ट्रॅप असतो.. उपद्रवकारी हत्ती, रानडुक्कर यांच्यासाठी..👇
वरील उंदरांना मारणे ग्राह्य धरल्यास.. इथं हत्ती आणि डुक्कर यांची हत्या नैतिक मुद्द्यांवर कशी नाकारणार हा प्रश्न आहे.
निसर्गाच्या सगळ्यात जवळचा उद्योगसाथी म्हणजे शेतकरी.. भूतदया या विषयात शेतकऱ्यांइतका निष्णात कोणीच नसेल.. पाळीव प्राण्यांना जीव लावणे म्हणजे काय असतं.. 👇
जनावरांना जीव लावणे म्हणजे काय असतं हे आपल्यापैकी बऱ्याच जणांची शेतकरी पार्श्वभूमी असल्याने माहिती असेलच.आता उपद्रवमूल्य जास्त असणाऱ्या काही कीटकांचा-प्राण्यांचा बंदोबस्त करणे हा सांस्कृतिक वारसा असल्याने शेतकरी त्यापासून दूर राहणे अशक्यच.तरीही अशा काही घटना घडल्याकी पहिल्यांदा👇
टीकेची तोफ डागली जाते शेतकऱ्यांवर. इकडं 'पुट डाऊन' च्या गोंडस नावाखाली बाकीजण जिवंत प्राणी गाडत असतात त्याबद्दल कोणास काही वाटत नाही.. हा दुटप्पी दांभिकपणा झाला.
मागे हरियाणात एका घोड्यास फार गंभीरपणे मारलं गेलं.. जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 👇
पामराने हे कृत्य केलं म्हणून समाजाने ते स्वीकारलं असं म्हणण्यास इथं वाव आहे तशाच पद्धतीने बाकी घोड्यास अश्व लावताना आपण रोज बघत असतोच.उदा. रेसकोर्स,वरातीत नाचणारे घोडे.अतोनात हाल होतात या प्राण्याचे या ठिकाणी..आपण बंदी घालतो कशावर तर घोडागाडी शर्यतीवर.ही झाली निवडक दांभिकता.👇
जगभरात दुबदुभत्या जनावरांची डायरेक्ट सिमेन ट्रान्स्फर करून संकरित प्रजाती निर्माण केल्या जातात.. त्यास आता कितीतरी दशक लोटली. ह्या अनैसर्गिक सेक्शुअलपणाबद्दल आपणास काही वाटत नाही.. तसं पाहिलं तर हा बलात्कारी मानसिकतेचा परिपाक होऊ शकेल.. पण त्याविषयी बोललो तर आपली सुखवस्तू 👇
विकासाची व्याख्याच बदलावी लागेल म्हणून 'चालतंय की.. त्याला काय होतंय' अस म्हणून आपण विषयास बगल देतो.
आत्ता परवा अमेरिकेत 'जेनेटिकली मोडीफाईड मोस्कीटो' संकल्पना राबवण्याबाबत चाचपणी सुरू झालीय.. टेक्सास प्रांतात डासांच्या या उत्पत्तीने मानवास फायदेशीर काही करता येईल का? 👇
याबाबत खल सुरुय. इथं डासांचा विचार करावा की मानवाच्या सुखवस्तू हव्यासाचा हा प्रश्न आहे.
जाताजाता एक.. विज्ञान प्रगत होत गेलं.. तशी मानवी सुखी विकासाची व्याख्या बदलत गेली.आणि त्या बदलाने इतर दुर्बल प्राण्यांची गळचेपी वाढत गेली हा इतिहास आहे.. वर्तमान आहे.आणि भविष्यही तेच असेल.👇
एका स्तिमित मर्यादे पर्यंत विज्ञान फायदेशीर आहे.. विज्ञानावरची मानवी निष्ठा बदलली की त्याचं शस्त्र होतं.. 'अणू विज्ञान' हे त्याचं उत्तम उदाहरण.. ऊर्जेची भूक भागवण्यासाठी अणू एकदम परफेक्ट सोल्युशन.. पण त्याचं weapon बनवलं की सत्यानाश अटळ आहे.. 👇
मग हे जग हिरोशिमा नागासाकी वेळी म्हणलं..'आइन्स्टाइन बघ तुझ्यामुळे काय झालं' असो.. जगाची रितच ती.. 'चांगल्याला जग सोबती असतं.. वाईट एकलकोंड असतं.'
सांगायचा मुद्दा आहे.. भूतदया हवीच पण निवडक नको.. काहीतरी फॅशन म्हणून 'व्हेगन' बनणं वेगळं आणि खरोखर व्हेगन असणं वेगळं.. 👇
मानवी हिंसा ही मानवाच्या अपरिहार्य जीवनाचा भाग आहे.. इतर प्राण्यांनाही जगण्याचा हक्क आहे.. फक्त आपण आपली दांभिकता सोडायला हवी. जिथं उपद्रवमूल्य जास्त असणाऱ्या प्राण्यांची गाठ पडेल त्यावर शस्त्राने मार्ग न काढता शास्त्राने मार्ग काढायला हवा.. एवढंच.👇
टीप - प्राण्यांची हत्या करण्यास आमचा पाठिंबा नाही. हिंसेस आमचा तीव्र विरोधच आहे. समाजमाध्यमातून आणि इतर ठिकाणी व्यक्त होताना जो एककल्ली विचार प्रदर्शित होतो त्याची दुसरी बाजू मांडण्याचा हा प्रयत्न होता. यातून कोणाची भावना दुखावली असल्यास त्रिवार क्षमस्व: .🙏
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
ठाणे-बोरिवली बोगद्याची १४४०० कोटींची निविदा.. तांत्रिकदृष्ट्या एकच निविदाकार पात्र ठरतो.. दुसरा त्याविरोधात लवादाकडे जातो..पण तिथून त्यास पिटाळले जाते..तो पात्र निविदाकार मेघा इंजि. आणि पिटाळलेला L&T..ही घटना मे-२०२३ ची.
महिनाभरापूर्वी मेघा ने १४० कोटींचे रोखे घेतलेले असतात.
१/न
ते रोखे कोणत्या पक्षाला गेले हे उद्या स्पष्ट होईलच..पण आज आत्ताही शेंबड्या पोरानेही योग्य उत्तर द्यावं..असाच हा प्रश्न आहे..याच मेघाला समृद्धी महामार्गाचे काही काम वर्धा जिल्ह्यात मिळालेलं..त्यात वन्यजीवांसाठी ये-जा करणारा उन्नत मार्ग कोसळला होता.. पण काहीच कारवाई झालीच नाही.
२/न
मेघाने आपल्या गत ४ वर्षीच्या एकूण निव्वळ नफ्याच्या तब्बल १५% इतकी रक्कम रोखे खरेदीसाठी वापरली आहे..बिनदिक्कत कंत्राट मिळणे, अक्षम्य त्रुटीवर क्षमा मिळणे..ही त्या १५% चीच कृपा म्हणायची..गेल्या पाच वर्षात ९६६कोटींचे रोखे मेघाने घेतलेत.
३/न
अखंड एक पिढी तुझा खेळ बघत लहानाची थोर झाली.. एखाद्या खेळाशी भावना जुळण्याची ती त्या पिढीची पहिलीच वेळ.. तुझा खेळ पाहतानाचे 'नेल-बाईटिंगचे' अनेक प्रसंग आजही जशाच तसे आठवतात.. तत्कालीन जाहिरातीमधील पेप्सीसारखा थंडावा सापडणारी.. तुझी प्रत्येक नजाकत रसिकांची मनं शांत करत गेली..❤️
अजून मिसरुटही न फुटलेला 'सच्या' ते पोक्त 'मास्टर ब्लास्टर सचिन' या प्रवासाचे यथासांग सहप्रवासी होण्याचे भाग्य आमच्या पिढीने अनुभवले..तो बावनकशी अनुभव पारिजातकाच्या सड्याप्रमाणे सदैव आमच्या आयुष्यात सुगंधी पिंगा घालत राहील..पण त्या समृद्ध अनुभवाच्या भरजरी पदराला एक मात्र डाग आहे..
तो डाग म्हणजे..मूकसंमतीचा.
क्रिकेट माणसांनीच बनवलेला खेळ आहे.. माणूस म्हणून जे अवगुण असतात ते त्या खेळातही येणारच.. एक क्रिकेट रसिक म्हणून क्रिकेटच्या त्या अवगुणी वृत्तीविरोधात सचिनने काही बोलावं..ही एकमात्र आशा तेंव्हा अपूर्ण राहिली..तुझी ती मुकसंमती तेंव्हाही वेदनादायक होती.
तिन्हीसांजेची लगबग रस्त्यावर दिसत होती.. रस्ता फार काही वर्दळीचा न्हवता.. हार-फुलांची दोनचार दुकानं आणि शांत चहापानासाठी कौलारू एकदोन हॉटेलं.. अधूनमधून कुंपणाच्या आतील घरं..तुरळक एखादं किराणा मालाचं दुकानं..आणि रस्त्याच्या टोकाला छोटेखानी कसलं तरी मंदिर.. बस् संपला रस्ता.. #Love
परिसर तुलनेत शांत होता.. कुठंतरी लांब चंदन अगरबत्ती धुराची काडी हवेत सोडत होती..ती काडी संपता संपता सायलेंट सुगंध त्याच्यापर्यंत पोहचवत होती..त्या सुगंधाने दिवसभराची ओढाताण हलकी होत होती..दिवेलागणीला असतो तो आभाळातला भडक तांबूसपणा आता विझत आला होता..त्यातच थंडीची धांदल सुरू होती.
नगराच्या मध्यवर्तीत असूनही हा तळ मनाला भुरळ पडणारा होता..वाहतूक अगदी शिस्तीत जात होती.. मंदिराकडे जाणारी माणसं दुर्मिळ असणाऱ्या शांत चेहऱ्याने लगेच ओळखू येत होती.
फुलांच्या दुकानात 'मेरे दिल में आज क्या है.. तू कहे तो मैं बता दूँ।' वाजणारं गाणं फुलांना अजूनच खुलवत होतं..
दिवसाच्या पहिल्या प्रहराची सुरवात..रात्री बाराला गडगडाटी पाऊस पडून गेला होता..घरी सगळे साखर म्हणावी अशा झोपेत..रातकिड्यांची किरकिर शांत वातावरणाची शांतता भयाण रातीत परावर्तित करत होती.. मधूनच एखादं कुत्रं रडायचं..पण ते कोणीतरी तोंड दाबून धरल्यागत लगेच शांत पण व्हायचं. #Annabelle
मला जाग आली तेंव्हा घरात सगळे आपापल्या रूममध्ये झोपले होते..फॅनची घरघर सोडता कसलाच आवाज न्हवता..अजून थोडा वेळ आहे, पडावं..या हिशोबाने मी कलंडलो..इतक्यात लहान मुलांच्या सायकलचं ते इंग्लिश संगीत वाजायला सुरवात झाली..पहिल्यांदा मला बाहेरून आवाज येतोय वाटलं..पण ते फक्त पाचच मिनिट.
कारण आवाजाची दिशा ही आपल्याच घरातून होती..आणि इतक्या उशीर आमच्या घरात एकसारखं ते संगीत वाजायची ही पहिलीच वेळ..आणि एवढं घाबरायचीही ही पहिलीच वेळ.. अगदी The Conjuring, Annabelle एका दणक्यात आठवावी इतकी.
काय करावं कळत न्हवतं..आणि खोलीचं दार उघडलं आणि काही दिसलंच तर करायचं काय?
उघड्या माळावर कुसळं उगवून वाळून जायची..ती खायला जनावरं सुद्धा नसायची..नजर जाईल तिथवर चिटपाखरूही न्हवतं..उघडे डोंगर-माळ ज्यांच्या मालकीचे..ते ही काही करू शकत नव्हते..अशात त्यावर नजर पडली एका बड्या पवनचक्की कंपनीची..आणि एका रातीत लोकांना पैशे ठेवायला नव्या ट्रंका घ्याव्या लागल्या.
जमिनीचे सौदे ठरतील तसं एका एका घराचे वासे फिरू लागले.. लाकडी तुळई जळणात गेल्या..त्या जागी RCC पिलर आले.. सायकलची चैन पडायची त्याच जागेवर धूळ आत येऊ नये म्हणून चारचाकी काचा वर करू लागल्या.. ३ डोकी घरात असूनही दारात ४-४ दुचाकी आणि २-२ चारचाक्या सर्रास दिसू लागल्या.
मळलेल्या कॉलर गेल्या..व्हाइट कॉलर आता ड्रायक्लीन होऊन येऊ लागल्या..पाण्याच्या घोटासाठी वाट बघणारे.. आता बार मालकाला खिशात ठेऊ लागले..सो कॉल्ड बरकतीने गाव सारा फुलून उठला..भावंडात हिश्श्यावरून धराधरीही झाली..हा सगळा गोंधळ चांगला दशकभर सुरू राहिला..खर्चापेक्षा जमा जास्त होती.
रशिया-युक्रेन कुस्ती फक्त ५६" किंवा इंधन महागाई एवढ्यापुरती मर्यादित नाही..युक्रेन पट्टीचा गहूनिर्यातदार देश आहे..सूर्यफूल,सोयाबीन इ. तेल ही तो पिकवतो.. सांगायचा मुद्दा आहे..युक्रेन युद्ध धांदलीत अडकल्याने.. आंतरराष्ट्रीय बाजारात त्या जिन्नसांचा तुटवडा आहे..❤️ #farm
आपल्याकडे आत्तापासूनच खाद्यतेल महागाई जाणवत आहे ती त्यामुळेच..खाद्यतेलाच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण नाही..त्यास पर्याय नाही..पण, गव्हाचे तसे नाही.. सद्यस्थितीत भारत गव्हाचे चार दाणे बाळगून आहे.. शिवाय यंदाचे रब्बी उत्पादन ही येईल..तेंव्हा केंद्राने निर्यातबंदी न करता हा योग साधावा.
शेतकऱ्यांना चार पै ज्यादाचे मिळतील त्याने.. पण, केंद्राची शेतकऱ्यांप्रति असलेली भावना यापूर्वी कांदा आणि साखर निर्यातबंदीत दिसलीच आहे..अन्नसुरक्षा या सदराखाली शेतकऱ्यांचा जीव घेऊनच स्वस्त धान्य दुकानांची शृंखला चालवण्याची परंपरा यंदा तरी खंडित व्हायला हवी.