@Jollyboy Profile picture
Sep 13, 2020 13 tweets 3 min read Read on X
आरक्षण : काही समज काही गैरसमज

आरक्षण हा विषय सर्वप्रथम समजून घेताना घटना समितीने आरक्षण जातीच्याच आधारावर का दिले याचा आपण अभ्यास केला तर आपल्याला असे दिसेल, कि ज्या वंचित जाती हजारो वर्षे "सामाजीक-शैक्षणिक-आर्थिक-राजकीय-बौद्धिक क्षेत्रात मागास(वंचित) ठेवला गेल्या त्याच
1)
आधारावर त्यांना आरक्षण हे सामाजिक स्थैर्य आणि संधी प्राप्त व्हावी म्हणून देण्यात आले. ना कि आर्थिक निकषावर. घटनेत आरक्षणा बद्दल काय तरतुदी करून ठेवल्या हे पहिले तर आपण संपादकीय लेखात किती खोटी माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहात हे सर्वांच्या लक्षात येईल.
2)
मुलत: आरक्षण हे दोन प्रकारात मोडते पहिले म्हणजे शैक्षणिक-नोकरी इ. आणि दुसरे म्हणजे राजकीय.

परंतु बरेच आरक्षण विरोधी विद्वान (त्यात प्रिंट आणि इलेक्ट्रिकल मिडिया पण आला) हेतुपुरस्सर चुकीची माहिती लोकांसमोर देऊन सर्वसामान्य लोकांची दिशाभूल करून आरक्षण समर्थक आणि आरक्षण
3)
विरोधक यांच्यात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आरक्षण विरोधाकांपैके ९९ % लोकांना घटना आरक्षणा बद्दल काय तरतुदी लिहिल्या आहेत हे माहीतच नसतात. फक्त ऐकीव (ती पण चुकीची) माहितीच्या आधारे आरक्षण विरोधक तारे तोडत असतात.
जाती व्यवस्थे मुळे आरक्षण अस्तित्वात आले आरक्षणा मुळे
4)
जातिव्यवस्था नाही. त्या मुळे आधी जाती व्यवस्था धर्मातून नष्ट केल्या तरच आरक्षण सुद्धा नष्ट व्ह्यायला वेळ लागणार नाही. कारण आज जरी कागदोपत्री भेदभाव पाळला जात नसला तरी मनातून मात्र भेदभाव आणि तिरस्कार पाळला जातो. हे पावलो पावली जानवते. आणि खोट्या माहितीच्या आधारे कुठलाही
5)
मूर्ख हार्दिक पटेल सारखा उठतो आणि आरक्षण बंद करा म्हणतो. पण तो तरी काय करणार, घटना वाचून समजून घेण्या इतके पण शिक्षण त्याचे नाही. शिवाय त्याला कुणी वाचून सांगणार पण कुणी नाही. पण अश्या तरुणांना खोटी माहिती पुरवून त्यांच्या माध्यमातून आरक्षणावर प्रहार करण्याचे महापाप काही
6)
लोक-नेते करत असतात. त्यांच्या साठी हा घटनेतील खुलासा…

घटनेच्या भाग-3 : मुलभुत हक्क- कलम १४-१५(४)-१६(१,२, ३, ४, ४ क, ४ख ) यांमध्ये अनुसूचित जाती व जनजाती तसेच इतर जाती वर्गाना शैक्षणिक आणि सामाजिक समते साठी आरक्षण देण्यासंबंधी सुचित केले गेले आहे. ज्यात आरक्षणाची
7)
कुठेही कालमर्यादा नाही.

तसेच राजकीय आरक्षणा बद्दल कलम-३३४ नुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्या करिता असलेले राजकीय आरक्षण हे संविधानाच्या प्रारंभा पासून साठ वर्षाचा कालावधी संपताच अंमलात आणण्याचे बंध करावे असे सांगितले आहे. सेवा आणि पदांमधील १० वर्षाची अट हि
8)
विवक्षित सेवांमध्ये आंग्लभारतीय समाजाकरिता राखून ठेवण्यात आली आहे जी कलम ३३६ व ३३७ मध्ये आहे. परंतु नेहमी नेहमी या सर्व माहिती वारून आपणास असे लक्षात येते कि अनु जाती व जनजाती यांचे शैक्षणिक-नोकरी यांमधील आरक्षणाला कुठलीही काल मर्यादा नाही. जो पर्यंत त्याना योग्य प्रमाणात
9)
सामाजिक समानता मिळत नाही जो त्यांचा मुलभुत अधिकार आहे तो पर्यंत चालूच राहील.

स्वातंतत्र्या नंतर घटना राबवणारे हात त्यांची योग्य रित्या अंमलबजावणी निट करू शकले नाहीत. जर आरक्षणाची १००% अंमलबजावणी झाली असती तर २५-५० वर्षातच आरक्षण संपुष्टात आणता आले असते. पण मागासवर्गाचे
10)
अनुशेष न भरने , सरकारी पदे रद्द करणे, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांच्या साठी असलेले राज्य व केंद्राचा निधीचा योग्य खर्च योग्य ठिकाणी न होणे हे आरक्षण लांबणी मागील मुख्य कारण आहे. आणखी एक कारण आहे ती मानसिकता. जी काही केल्या बदलत नाही. खूप दिले मागास वर्गाला
11)
आता देण्याची गरज नाही असे म्हणत जे काही थोडे थोडके मिळत आहे ते सुद्धा हिरावून घेण्याचा प्रयत्न उच्च वर्गीय करत असतात.
12)
आरक्षण संपवायचे असेल तर चला "पुढील १५ वर्षात आहे त्या आरक्षणाच्या आणि मागासवर्गीय योजनांची १००% अंमलबजावणी करा, १००% अनुशेष भरा" आणि मग खुशाल आरक्षण बंध करा.
14).

#Sushim_Kamble

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with @Jollyboy

@Jollyboy Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Jollybo71936649

Nov 7, 2020
डॉ . अल्बर्ट एलिस .
अमेरिकेतील नामांकित मानसोपचारतज्ञ . यांना मानसशास्त्रज्ञ सुद्धा म्हणता येईल . विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती (rational emotive behaviour thearapy ) हा त्यांचा मनाच्या जगातील सर्वात महत्वाचा शोध . अनेकांना मानसिक स्थैर्य मिळवून देणाऱ्या या पद्धतीचा शोध
1)
खरंतर त्यांनी स्वतःला स्थिरता मिळवून देण्यासाठी लावला होता . या शोधाची सुरुवात त्यांनी लहानपणीच केली होती . भावनेच्या आहारी न जाता , तर्कसंगत बुद्धी वापरून केलेला विचार मनाला स्थिर करतो हा त्यांचा अनुभव त्यांनी जगाला पटवून दिला . त्यासाठी अनेक उदाहरणे आणि दाखले दिले .
2)
आणि आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांच्या कार्याची दखल घेणे सर्व जगाला भाग पडले . त्यांनी मांडलेले काही सिद्धांत सोप्या भाषेत पुढीलप्रमाणे आहेत .

१) माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर त्याच्या प्रतिक्रिया आणि कृती अवलंबून नसतात , तर त्या घटनांकडे तो कोणत्या दृष्टीकोनातून बघतो
3)
Read 16 tweets
Nov 7, 2020
नाणेघाट

नुकतीच नाणेघाटला जाऊन आले होते.त्यासंदर्भात #मर्यादित वाचन केलं होतं.त्यातून हे कळालं की, हा नाणेघाट म्हणजे घाटांचा राजा.हा इसवीसनपूर्व काळात बांधला गेलाय.हे वाचूनच रोमांच उभे राहिले. काय ते कसब? अभियांत्रिकीमधला चमत्कारच.

सातवाहन सम्राज्ञी गौतमीपुत्र
1)
सातकर्णीची पत्नी नागणिका हिचा नाणेघाटातल्या लेणीतला तो प्रख्यात शिलालेख. पहिल्यांदा गेले तेव्हा वेड्यासारखी धावत गेले होते त्या भित्तीकडे. त्या पाषाणातल्या अक्षराईत हरवून गेले होते.मला न समजणाऱ्या ब्राम्ही भाषेतली ती अक्षरं पण विलक्षण प्रेमानं,कदाचित इतिहासाच्या फारसं न
2)
जपता आलेल्या वेडामूळे माझे हात त्या अक्षरांवरनं फिरत होते.नागणिका इथेच असेल का? माझ्या आसपास?माझी ही ओढ बघत असेल का?तिला छान वाटत असेल का आपला शिलालेख असा चिरंजीवी झालेला पाहून? तिचा चुडाभरला अमानवी हात माझ्यासोबतच तीही त्या अक्षरांवरनं फिरवत असेल का? धुक्यासारख्या तरल
3)
Read 42 tweets
Nov 7, 2020
सोनबा येलवे पाणपोई, पनवेल

इथल्याच (पनवेल स्टॅंडजवळ) एका छोटेखानी हाॅटेलवाल्याने बाबासाहेबांना पाणी नाकारले त्यावेळी अस्वस्थ झालेले, गरीब मजूर असलेले सोनबा येलवे बाबासाहेबांसाठी पाणी आणायला गेले.

पाणी आणले, तोपर्यंत बाबासाहेब पुढील प्रवासाला निघूनही गेले होते.
1)
बाबासाहेब परत याच मार्गाने येतील तेव्हा त्यांना पाणी मिळायला हवे आणि ते मी देईन या इच्छाशक्तीने ते दरदिवशी पाणी घेऊन येत. परंतु बाबासाहेब परत त्या मार्गाने आले नाहीत.

...आणि वाट पाहून अखेर, इथेच सोनबा येलवेंचा मृत्यू झाला.
2)
त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पनवेल महानगरपालिकेने ही पाणपोई बांधली आहे. येणार्‍या-जाणार्‍यांना पाणी मिळावे या उदात्त हेतूने.

उशीरा का होईना, बाबासाहेबांच्या प्रेमाखातर त्याग करणारी व्यक्तिमत्त्वं उजेडात येत आहेत.
3)
Read 4 tweets
Nov 7, 2020
मनुस्मृती दहन केल्यानंतर तत्कालीन काही ब्राह्मण्यग्रस्त वृत्तपत्रांनी टीकात्मक लेखन केले. त्यावर बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत पत्रातून त्यांचा समाचार घेतला. वाचा !
- आनंद गायकवाड

आमच्या मित्रांचा दुसरा असा एक आक्षेप आहे की मनुस्मृती ही जुन्या काळी अंमलांत असलेल्या
1)
नियमांची एक जंत्री आहे. त्या जंत्रीतील नियम आज कोणास लागू नाहीत. मग असले जुने बाड जाळण्यात काय अर्थ आहे ? मनुस्मृती हे एक जुने बाड आहे असे आमच्या मित्राप्रमाणे आम्हासही म्हणता आले असते तर आम्हास मोठाच आनंद झाला असता. परंतु दुर्दैवाने आम्हांस तसे म्हणता येत नाही. आणि आमची
2)
खात्री आहे की, भावी स्वराज्याचा चंद्रोदय केव्हा होतो हे पाहण्याकरिता, आमच्या मित्रांचे डोळे आकाशाकडे लागले नसते तर आपल्या पायाखाली काय जळते आहे हे त्यांना निरखून पाहताच आले असते. मनुस्मृती हे एक जुने बाड आहे, ते राहिले तरी काही हरकत नाही असा युक्तिवाद करण्याऱ्या गृहस्थांना
3)
Read 33 tweets
Nov 6, 2020
#जमालगढी_स्तूप_व_विहार

जमालगढी सध्याच्या पाकिस्तानातील खबैर पक्ख्तुन्ख्वामधील मरदानच्या कटलांग मरदान मिर्गापासून १३ किमी अंतरावर हे शहर आहे. जमालगढी येथे प्राचीन स्तूप व विहारांचे अवशेष सापडले आहेत.

जमालगढी येथील स्तूप व विहार १/५ शतकातील भरभराटीचे बौद्ध ठिकाण होते.
1)
जमालगढीचे स्थानीय नाव "जमालगढी कंदारत" किंवा "काफिरो कोटे" असे आहे. जमालगढीच्या भग्नावशेषांचा प्रथम शोध ब्रिटीश पुरात्ववेत्ता व गाढे अभ्यासक अलेक्झांडर कॅनिंगहॅम यांनी इसवी सन १८४८ मध्ये लावला.

कर्नल ल्युम्स्डेन यांनी जमालगढी येथे उत्खनन केले होते पण तेव्हा तेथे विशेष
2)
काही सापडले नाही. नंतर इसवी सन १८७१ मध्ये लेफ्टनंट क्राॅमटन यांनी पुन्हा येथे उत्खनन केले व अनेक बौद्धशिल्पे सापडली आहेत.

चित्र क्रमांक एक जमालगढी, मरदान, पाकिस्तान बौद्ध नगरीचे भग्नावशेष.

चित्र क्रमांक दोन १/३ शतकातील राणी महामायेचे स्वप्न शिल्प जमालगढी, मरदान,
3)
Read 5 tweets
Nov 5, 2020
आम के पेड़ के नीचे ब्राह्मण तुलसीदास रामचरित्रमानस लिख रहे थे. अचानक पेड़ से आम तुलसीदास के सर पर गिरा. तुलसीदास बहुत खुश हुआ, उसने आम को ईश्वर का दिया हुआ उपहार समझकर खा लिया !

मुग़ल राज में गाय कट रही थी, मुग़ल समोसे में गाय का मांस भर भर कर खा रहे थे.
1) Image
लेकिन तुलसीदास को कोई आपत्ति नही थी, वह मग्न होकर आनंदित होकर, लगा लिखने "ढोल गंवार पशु नारी सकल ताड़ना के अधिकारी" !

किसान का बेटा इसाक न्यूटन सेब के पेड़ के नीचे विज्ञान की पढ़ाई कर रहा था. अचानक से एक सेब न्यूटन के सर पर गिर गया. न्यूटन ने सेब उठाया उसे ध्यान से
2)
देखने लगे मानो कभी सेब देखा ही नही. लेकिन न्यूटन सेब नही देख रहे थे वह सोच रहे आखिर सेब नीचे क्यों गिरा ?

सेब ऊपर क्यों नही गया... नीचे ही क्यों आया ?. ऊपर चांद है वह क्यों नही गिरता. धरती में जरूर कोई फ़ोर्स है. ताक़त है जो चीजों को अपनी ओर आकर्षित करती है !
3)
Read 7 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us!

:(