दि. 18 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते दि. 19 सप्टेंबर सकाळी 9 वाजेपर्यंत घोड़बंदर रोड़, पातलीपाड़ा, पवार नगर, कोठारी कम्पाऊन्ड़, गांधी नगर, जॉन्सन, इटर्निटी, समतानगर, इंदिरानगर, लोकमान्यनगर, श्रीनगर, ऋतुपार्क, सिध्देश्वर, साकेत, उथळसर, मुंब्रा रेतीबंदर, कळवा येथे पाणी पुरवठा बंद राहील.
घोड़बंदर विभागात पाणी पुरवठा करणाऱ्या 1158 मीमी व्यासाच्या जलवाहिनीचे क्रॉस कनेक्शन मेट्रोच्या कामासाठी स्थलांतरीत करणे तसेच साकेत येथील मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्व्हचे दुरुस्तीचे काम करणे, बाळकुम जलकुंभाच्या इनलेट वाहिनीवरील व्हॉल्व्ह बदलणे तसेच ...
सोहम संप येथे नवीन विद्युत पॅनल बसविणे या कामाकरीता ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या योजनेमधून व स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा पाणी पुरवठा 24 तास बंद ठेवण्यात येणार आहे.
या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्यतो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
*शुक्रवारी ठाण्यातील काही भागातील पाणीपुरवठा बंद* (१/७)
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा मार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. (२/७)
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत नवीन टाकलेल्या बारवी गुरत्व वाहिन्या कार्यान्वित करण्याचे तातडीचे काम हाती घेतल्यामुळे. (३/७)
ठामपाच्या सहकार्याने तुरुंगातील महिला कैदी व महिला पोलीसांची कॅन्सर तपासणी (१/७)
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने ठाणे मध्यवर्ती कारागृहातील महिला कैद्यांसाठी आणि पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नुकतेच कॅन्सर तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. (२/७)
ठाणे महापालिकेने या शिबिरास सहकार्य केल्याबद्दल कारागृह प्रशासनाने ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर व महापालिकेच्या आरोग्य विभागाचे आभार व्यक्त केले आहेत. (३/७)
आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार सुरक्षा रक्षकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन (१/१७)
रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या हाती जसे रुग्णालयाची सुरक्षा अवलंबून असते, त्याचबरोबर अनेकदा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांनी काही माहिती विचारल्यास किंवा एखाद्या तपासणीबाबत चौकशी केल्यास ते सांगण्यासही कर्तव्यावरील सुरक्षारक्षक मदत करतात. (२/१७)
हीच जबाबदारी अधिक चोखपणे पार पडण्यासाठी नागरिकांशी सौजन्याने कसे बोलावे, त्यांच्याशी कसे वागावे, त्याचबरोबर रुग्णालयात कोणाचा गैरवावर सुरू असेल तर संबंधित व्यक्तीसोबत कशा पध्दतीचे वर्तन करावे. (३/१७)
ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या योजनेमधील 2000 मि.मी व्यासाची मुख्य जलवाहिनी लोढा धाम येथे भारतीय राष्ट्रीय महामार्ग एन-एच 3 च्या बाजूस बुधवार दिनांक 15/03/2023 रोजी स्थलांतरीत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. (२/६)
परिणामी सकाळी 9.00 ते गुरूवारी सकाळी 9.00 वाजेपर्यत 24 तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. (३/६)
सावित्रीबाईंचे विचार लक्षात घेवून आजच्या स्त्रियांनी विवेकवादाच्या आधारावर
वाटचाल केल्यास त्यांना निश्चितच बळ मिळेल : प्रा. हरी नरके (१/१९)
सावित्रीबाई फुले यांचे विचार आज जसेच्या तसे लागू होतील असे नाही, काळ बदललेला आहे, आव्हाने बदललेली आहेत, प्रश्न बदललेले आहेत. काळ हा गुंतागुंतीचा आहे त्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरे आपली आपल्यालाच शोधावी लागतील. (२/१९)
पण आज सावित्रीबाई आणि ज्योतीराव फुले असते तर त्यांनी कशी उत्तरे शोधली असती याचा विचार करुन आजच्या स्त्रियांनी समतोल भूमिका घेत विवेकवादाच्या आधारावर वाटचाल केली तर त्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी निश्चिचत अधिक बळ मिळेल. (३/१९)