लोकमान्य आज हयात असते तर ज्वाजल्या डोळ्यांनी हा सवाल करते झाले असते.
यंदाच्या जून महिन्यात सरकारने कायद्यात बदल करून कांदा आणि बटाटा यांना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळले होते.. #म#धागा 👇
का? तर शेतकऱ्यांना चार पैसे मिळवून देण्यात हा कायदा आडकाठी आणत होता.. त्यावेळी आम्हीच कसे शेतकऱ्यांचे कैवारी म्हणत ऐतिहासिक वगैरे पाऊल म्हणत सरकार आणि भक्तांनी कल्लोळ माजवला होता.. ते पाऊल जर ऐतिहासिक असेल तर आज कांदा निर्यातबंदी हे पाऊल मागास आणि त्यांच्या बुद्धीप्रमाणे 👇
बुरसटलेले म्हणावे लागेल.
2014 ला काँग्रेसने अशी निर्यातबंदी घातली तेंव्हा ते नालायक आहे असे आरोळी भाजप ठोकता झाला.. कानफाट्या नाव पडलेल्या काँग्रेसला ते नाकारताही आले नाही ही शोकांतिका आहे.
मुळात बाजारदरात कृत्रिम हस्तक्षेप करण्याची सरकारला गरज काय? 👇
ज्याला कांदा घ्यायला परवडत नाही त्याने तो खाऊ नये.. कांदा न खाल्ल्याने माणूस मरत नाही.. मध्यमवर्गीय ग्राहकांची एवढीच सरकारला काळजी असेल तर सरकारने कांदा चढ्या दरात खरेदी करून स्वस्त धान्य दुकानातून तो जनतेस उपलब्ध करून द्यावा.. 👇
शेतकऱ्यांना गाडून मध्यमवर्गीयांचे चोचले पुरवण्याचा दलाली धंदा आतातरी सरकारने बंद करावा.
वर सांगितल्याप्रमाणे जून महिन्यात कांदा नियंत्रणमुक्त करायचा आणि सप्टेंबर महिन्यात त्यावर बंदी घालायची यात सरकारच्या धोरणातील अज्ञानपणा तेवढा दिसतो.. कांदा हे पीक ज्यावेळी भरगोस उत्पादित 👇
होते तेंव्हा तो योग्य किमतीविना फेकून द्यायची वेळ शेतकऱ्यांवर येते..उत्पादन खर्च ही निघत नाही..तेंव्हा हे सरकार आणि ग्राहक त्याच्या मदतीला येतात काय?
याचं उत्तर नाही असं आहे कारण, राजकीयदृष्ट्या मध्यमवर्गीय हा एकगठ्ठा वोट बँक आहे तसे शेतकऱ्यांचे नाही.. 👇
सतरा शेतकरी संघटना अस्तित्वात आहेत पण त्यांचा आवाज एकतर दाबला जातो किंवा त्याचे नेते सत्तेच्या वळचणीला जाऊन उभे राहतात ही वस्तुस्थिती आहे.. शेतकरी मात्र आहे तिथेच मरणाच्या दारात उभा राहतो.
सध्या बिहारी लोक निवडणुकीस सामोरे जातायत.. त्यांच्यासाठी हा निर्णय घेतला हे उघड आहे.. 👇
वास्तविक यंदा एप्रिल ते जून या दिवसांत 20 कोटी डॉलर्स एवढी निर्यात झाली... गेल्यावर्षी ही निर्यात 44 कोटी डॉलर्स होती.. बाकी सगळ्या निर्यात आघाडीवर बोंबाबोंब असताना जे काही निर्यात होत असून चार पै परकीय चलन मिळत असताना.. हा पाय कुऱ्हाडीवर मारणारा निर्णय घेणाऱ्यांची बौद्धिक 👇
क्षमता आतातरी जनतेने ओळखायला हवी.
खोट्या घोषणा आणि लांगुलचालन करण्यात हातखंडा असलेले ही लोक शेतकऱ्यांचे उत्पन्न येत्या 2 वर्षात दुप्पट करतो म्हणाले होते.. त्यात किती सत्यता असेल हे विविध अर्थ आणि शेती तज्ञांनी त्यावेळीच दाखवून दिले होते.. 👇
आपल्या शेती जाणिवा बळीराजा, काळी आई, धनी या भावानेपर्यंतच आहेत त्या मोडून... वस्तुस्थितीचा अभ्यास आपण कधी करणार? हा प्रश्नच आहे.
भूक लागली की स्वयंपाक बनवायला घ्यायचा नसतो तो अगोदर तयार असावा लागतो.. नाहीतर कडाक्याची भूक मरून नंतर तयार केलेल्या अन्नावरची वासनाही उडून जाते..👇
आपलं तसं होण्याआधी आपण सावध होऊन योग्य ती काळजी घ्यायला हवी.🙏
संदर्भ - माहितीजाल, लोकसत्ता.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
ठाणे-बोरिवली बोगद्याची १४४०० कोटींची निविदा.. तांत्रिकदृष्ट्या एकच निविदाकार पात्र ठरतो.. दुसरा त्याविरोधात लवादाकडे जातो..पण तिथून त्यास पिटाळले जाते..तो पात्र निविदाकार मेघा इंजि. आणि पिटाळलेला L&T..ही घटना मे-२०२३ ची.
महिनाभरापूर्वी मेघा ने १४० कोटींचे रोखे घेतलेले असतात.
१/न
ते रोखे कोणत्या पक्षाला गेले हे उद्या स्पष्ट होईलच..पण आज आत्ताही शेंबड्या पोरानेही योग्य उत्तर द्यावं..असाच हा प्रश्न आहे..याच मेघाला समृद्धी महामार्गाचे काही काम वर्धा जिल्ह्यात मिळालेलं..त्यात वन्यजीवांसाठी ये-जा करणारा उन्नत मार्ग कोसळला होता.. पण काहीच कारवाई झालीच नाही.
२/न
मेघाने आपल्या गत ४ वर्षीच्या एकूण निव्वळ नफ्याच्या तब्बल १५% इतकी रक्कम रोखे खरेदीसाठी वापरली आहे..बिनदिक्कत कंत्राट मिळणे, अक्षम्य त्रुटीवर क्षमा मिळणे..ही त्या १५% चीच कृपा म्हणायची..गेल्या पाच वर्षात ९६६कोटींचे रोखे मेघाने घेतलेत.
३/न
अखंड एक पिढी तुझा खेळ बघत लहानाची थोर झाली.. एखाद्या खेळाशी भावना जुळण्याची ती त्या पिढीची पहिलीच वेळ.. तुझा खेळ पाहतानाचे 'नेल-बाईटिंगचे' अनेक प्रसंग आजही जशाच तसे आठवतात.. तत्कालीन जाहिरातीमधील पेप्सीसारखा थंडावा सापडणारी.. तुझी प्रत्येक नजाकत रसिकांची मनं शांत करत गेली..❤️
अजून मिसरुटही न फुटलेला 'सच्या' ते पोक्त 'मास्टर ब्लास्टर सचिन' या प्रवासाचे यथासांग सहप्रवासी होण्याचे भाग्य आमच्या पिढीने अनुभवले..तो बावनकशी अनुभव पारिजातकाच्या सड्याप्रमाणे सदैव आमच्या आयुष्यात सुगंधी पिंगा घालत राहील..पण त्या समृद्ध अनुभवाच्या भरजरी पदराला एक मात्र डाग आहे..
तो डाग म्हणजे..मूकसंमतीचा.
क्रिकेट माणसांनीच बनवलेला खेळ आहे.. माणूस म्हणून जे अवगुण असतात ते त्या खेळातही येणारच.. एक क्रिकेट रसिक म्हणून क्रिकेटच्या त्या अवगुणी वृत्तीविरोधात सचिनने काही बोलावं..ही एकमात्र आशा तेंव्हा अपूर्ण राहिली..तुझी ती मुकसंमती तेंव्हाही वेदनादायक होती.
तिन्हीसांजेची लगबग रस्त्यावर दिसत होती.. रस्ता फार काही वर्दळीचा न्हवता.. हार-फुलांची दोनचार दुकानं आणि शांत चहापानासाठी कौलारू एकदोन हॉटेलं.. अधूनमधून कुंपणाच्या आतील घरं..तुरळक एखादं किराणा मालाचं दुकानं..आणि रस्त्याच्या टोकाला छोटेखानी कसलं तरी मंदिर.. बस् संपला रस्ता.. #Love
परिसर तुलनेत शांत होता.. कुठंतरी लांब चंदन अगरबत्ती धुराची काडी हवेत सोडत होती..ती काडी संपता संपता सायलेंट सुगंध त्याच्यापर्यंत पोहचवत होती..त्या सुगंधाने दिवसभराची ओढाताण हलकी होत होती..दिवेलागणीला असतो तो आभाळातला भडक तांबूसपणा आता विझत आला होता..त्यातच थंडीची धांदल सुरू होती.
नगराच्या मध्यवर्तीत असूनही हा तळ मनाला भुरळ पडणारा होता..वाहतूक अगदी शिस्तीत जात होती.. मंदिराकडे जाणारी माणसं दुर्मिळ असणाऱ्या शांत चेहऱ्याने लगेच ओळखू येत होती.
फुलांच्या दुकानात 'मेरे दिल में आज क्या है.. तू कहे तो मैं बता दूँ।' वाजणारं गाणं फुलांना अजूनच खुलवत होतं..
दिवसाच्या पहिल्या प्रहराची सुरवात..रात्री बाराला गडगडाटी पाऊस पडून गेला होता..घरी सगळे साखर म्हणावी अशा झोपेत..रातकिड्यांची किरकिर शांत वातावरणाची शांतता भयाण रातीत परावर्तित करत होती.. मधूनच एखादं कुत्रं रडायचं..पण ते कोणीतरी तोंड दाबून धरल्यागत लगेच शांत पण व्हायचं. #Annabelle
मला जाग आली तेंव्हा घरात सगळे आपापल्या रूममध्ये झोपले होते..फॅनची घरघर सोडता कसलाच आवाज न्हवता..अजून थोडा वेळ आहे, पडावं..या हिशोबाने मी कलंडलो..इतक्यात लहान मुलांच्या सायकलचं ते इंग्लिश संगीत वाजायला सुरवात झाली..पहिल्यांदा मला बाहेरून आवाज येतोय वाटलं..पण ते फक्त पाचच मिनिट.
कारण आवाजाची दिशा ही आपल्याच घरातून होती..आणि इतक्या उशीर आमच्या घरात एकसारखं ते संगीत वाजायची ही पहिलीच वेळ..आणि एवढं घाबरायचीही ही पहिलीच वेळ.. अगदी The Conjuring, Annabelle एका दणक्यात आठवावी इतकी.
काय करावं कळत न्हवतं..आणि खोलीचं दार उघडलं आणि काही दिसलंच तर करायचं काय?
उघड्या माळावर कुसळं उगवून वाळून जायची..ती खायला जनावरं सुद्धा नसायची..नजर जाईल तिथवर चिटपाखरूही न्हवतं..उघडे डोंगर-माळ ज्यांच्या मालकीचे..ते ही काही करू शकत नव्हते..अशात त्यावर नजर पडली एका बड्या पवनचक्की कंपनीची..आणि एका रातीत लोकांना पैशे ठेवायला नव्या ट्रंका घ्याव्या लागल्या.
जमिनीचे सौदे ठरतील तसं एका एका घराचे वासे फिरू लागले.. लाकडी तुळई जळणात गेल्या..त्या जागी RCC पिलर आले.. सायकलची चैन पडायची त्याच जागेवर धूळ आत येऊ नये म्हणून चारचाकी काचा वर करू लागल्या.. ३ डोकी घरात असूनही दारात ४-४ दुचाकी आणि २-२ चारचाक्या सर्रास दिसू लागल्या.
मळलेल्या कॉलर गेल्या..व्हाइट कॉलर आता ड्रायक्लीन होऊन येऊ लागल्या..पाण्याच्या घोटासाठी वाट बघणारे.. आता बार मालकाला खिशात ठेऊ लागले..सो कॉल्ड बरकतीने गाव सारा फुलून उठला..भावंडात हिश्श्यावरून धराधरीही झाली..हा सगळा गोंधळ चांगला दशकभर सुरू राहिला..खर्चापेक्षा जमा जास्त होती.
रशिया-युक्रेन कुस्ती फक्त ५६" किंवा इंधन महागाई एवढ्यापुरती मर्यादित नाही..युक्रेन पट्टीचा गहूनिर्यातदार देश आहे..सूर्यफूल,सोयाबीन इ. तेल ही तो पिकवतो.. सांगायचा मुद्दा आहे..युक्रेन युद्ध धांदलीत अडकल्याने.. आंतरराष्ट्रीय बाजारात त्या जिन्नसांचा तुटवडा आहे..❤️ #farm
आपल्याकडे आत्तापासूनच खाद्यतेल महागाई जाणवत आहे ती त्यामुळेच..खाद्यतेलाच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण नाही..त्यास पर्याय नाही..पण, गव्हाचे तसे नाही.. सद्यस्थितीत भारत गव्हाचे चार दाणे बाळगून आहे.. शिवाय यंदाचे रब्बी उत्पादन ही येईल..तेंव्हा केंद्राने निर्यातबंदी न करता हा योग साधावा.
शेतकऱ्यांना चार पै ज्यादाचे मिळतील त्याने.. पण, केंद्राची शेतकऱ्यांप्रति असलेली भावना यापूर्वी कांदा आणि साखर निर्यातबंदीत दिसलीच आहे..अन्नसुरक्षा या सदराखाली शेतकऱ्यांचा जीव घेऊनच स्वस्त धान्य दुकानांची शृंखला चालवण्याची परंपरा यंदा तरी खंडित व्हायला हवी.