'पाणी हेच जीवन!!' असं असेल तर आपलं जगणं सध्या धोक्यात आहे.
'पाणी' या शब्दाचे आपणास गांभीर्य आहे का? असल्यास ते वाचवणे किंवा समन्यायी वाटप यासाठी आपण काय प्रयत्न करतो? एका अभ्यासानुसार 2025 नंतर जवळपास निम्म्याहून जास्त जग तहानलेल्या अवस्थेत असेल.आपण कुठाय यात? #म#धागा 👇
ज्यावेळी पाणी मुबलक असते तेंव्हा या विचारांची आपल्यास गरज नसते... आणि पाणी टंचाई किंवा दुष्काळ पडला की टँकरने पाणीपुरवठा, रोजगार हमीची कामे, विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी, शेतकऱ्यांना कृषीपंपांच्या वीज बिलात सवलत, चारा छावण्या असल्या ठोकळ उपाययोजना करतो.. 👇
खरंतर या उपाययोजना नसतातच.. वेगवेगळ्या पद्धतीने भ्रष्टाचाराची कुरणे असतात ही.. म्हणूनच म्हणल जातं.. 'दुष्काळ आवडे सर्वांना.'
या असल्या उचपतींनी दुष्काळ मात्र हटत नाही. फक्त जागा बदलतो. कधी मराठवाडा, कधी विदर्भ, कधी पश्चिम महाराष्ट्र, कोकण, तर कधी खानदेश. 👇
गेल्यावर्षी जे पाणी सांगली-कोल्हापूरकरांच्या नाकातोंडात गेले.. तोच ठसका यंदा विदर्भाने अनुभवला.. वास्तवात आपण काहीही शिकलो नाही यातून ही वस्तुस्थिती आहे.
दुष्काळ असो की महापूर ..निसर्ग देवतेचा प्रकोप म्हणून पहिल्यापासून 'Act Of God' च्या आड दडायची घाणेरडी सवय आपल्याला लागली.. 👇
नैसर्गिक प्रक्रिया यासाठी जरी कारणीभूत असली तरी नियोजन, प्रबोधन आणि व्यवस्थापन हे तरी आपल्या हातात असते ते तरी करतो का?
कायदे कानून बनवतानाच त्यात पळवाट कशी राहील हे जर पाहिलं जातं असेल तर आपण महासत्ता सोडा देश म्हणून राहण्यास ही लायक नाही आहोत. 👇
महाराष्ट्रात आज पाणी या विषयावर तीन तीन संस्था कार्यरत आहेत.. एक भूजल विकास प्राधिकरण, दुसरे जलसंपत्ती नियमन प्राधिकरण आणि तिसरी भूजल सर्वेक्षण करणारी यंत्रणा.. यांच्या दिमतीला 'महाराष्ट्र भूजल विकास व व्यवस्थापन कायदा' ही आहे.. 👇
पण नेमक्या या संस्था करतात काय? हाच संशोधनाचा विषय होऊ शकतो..
खरंतर वर उल्लेखलेला कायदा उत्तम आहे.. पण त्याची अंमलबजावणी राजकारण न करता व्हायला हवी.. त्यासाठी आता समाजानेच रेटा लावणे महत्वाचे आहे.. कारण, पाणी हा विषय राजकारणी या जमातीवर सोडण्याइतका बिनम्हत्वाचा नाही.👇
बाकी जगभरात पाणी या आघाडीवर काय चाललंय हे बघून तरी आपण काहीतरी करायला हवे ही लाज वाटायला हवी.. चीन, ऑस्ट्रेलिया या देशांत पाणी, उद्योग, शेती संशोधनासाठी स्वतंत्र विद्यापीठे आहेत. सिंगापूरमध्ये ‘वॉटर पॉलिसी इन्स्टिटय़ूट’ आहे. 👇
जगभरातील तज्ज्ञांना निमंत्रित करून देशाचे पाणी धोरण ठरविले जाते. चीनमधील जलसंपदामंत्री हा पदव्युत्तर पदवीधर असलाच पाहिजे असा नियम आहे.
केपटाऊन या द.आफ्रिकेतील शहरात दोनेक वर्षांपूर्वी जी परिस्थिती होती ती परिस्थिती येत्या दोनेक दशकात जवळपास निम्म्या जगावर ओढवू शकते. 👇
म्हणजे प्रत्येक व्यक्तीला 25 ली. एवढं पाणी.
त्याअगोदर अबुधाबी या शहरात अशीच टंचाई आली.. त्यावेळी फ्रेंच कंपनीने दक्षिण ध्रुवावरील एक हिमनग समुद्रातून ओढत आणून तहान भागवली होती.
अलीकडे कॅलिफोर्नियातील परिस्थिती ही गंभीर बनू शकते त्यासाठी तिथल्या यंत्रणा कामाला लागल्या आहेत. 👇
'तहान लागल्यावर विहीर खोदण्यात शहाणपण' नसते.. तसे झाले तर तहानेने व्याकुळ होऊन जीवाचा सोस पडतो.. एकतर आपण पूर्वव्यवस्था म्हणून काहीही हालचाल केली नाही.. सुरवातीला नदी, नाले मुजवले.. जे आहेत त्याच्या गटारी बनवल्या.. 👇
पिण्याच्या पाण्यासाठी भूगर्भातील लाव्हाच तेवढा उपसायचा बाकी सोडला.. असं असताना समजा तहान लागल्यावर विहीर खोदली तरी तिथं पाणी मिळणे मुश्किल कारण 'आडतच नसेल तर पोहऱ्यात कुठून येईल?' हे लक्षात ठेवून त्यावर चिंतन करणे गरजेचे आहे.❤
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
ठाणे-बोरिवली बोगद्याची १४४०० कोटींची निविदा.. तांत्रिकदृष्ट्या एकच निविदाकार पात्र ठरतो.. दुसरा त्याविरोधात लवादाकडे जातो..पण तिथून त्यास पिटाळले जाते..तो पात्र निविदाकार मेघा इंजि. आणि पिटाळलेला L&T..ही घटना मे-२०२३ ची.
महिनाभरापूर्वी मेघा ने १४० कोटींचे रोखे घेतलेले असतात.
१/न
ते रोखे कोणत्या पक्षाला गेले हे उद्या स्पष्ट होईलच..पण आज आत्ताही शेंबड्या पोरानेही योग्य उत्तर द्यावं..असाच हा प्रश्न आहे..याच मेघाला समृद्धी महामार्गाचे काही काम वर्धा जिल्ह्यात मिळालेलं..त्यात वन्यजीवांसाठी ये-जा करणारा उन्नत मार्ग कोसळला होता.. पण काहीच कारवाई झालीच नाही.
२/न
मेघाने आपल्या गत ४ वर्षीच्या एकूण निव्वळ नफ्याच्या तब्बल १५% इतकी रक्कम रोखे खरेदीसाठी वापरली आहे..बिनदिक्कत कंत्राट मिळणे, अक्षम्य त्रुटीवर क्षमा मिळणे..ही त्या १५% चीच कृपा म्हणायची..गेल्या पाच वर्षात ९६६कोटींचे रोखे मेघाने घेतलेत.
३/न
अखंड एक पिढी तुझा खेळ बघत लहानाची थोर झाली.. एखाद्या खेळाशी भावना जुळण्याची ती त्या पिढीची पहिलीच वेळ.. तुझा खेळ पाहतानाचे 'नेल-बाईटिंगचे' अनेक प्रसंग आजही जशाच तसे आठवतात.. तत्कालीन जाहिरातीमधील पेप्सीसारखा थंडावा सापडणारी.. तुझी प्रत्येक नजाकत रसिकांची मनं शांत करत गेली..❤️
अजून मिसरुटही न फुटलेला 'सच्या' ते पोक्त 'मास्टर ब्लास्टर सचिन' या प्रवासाचे यथासांग सहप्रवासी होण्याचे भाग्य आमच्या पिढीने अनुभवले..तो बावनकशी अनुभव पारिजातकाच्या सड्याप्रमाणे सदैव आमच्या आयुष्यात सुगंधी पिंगा घालत राहील..पण त्या समृद्ध अनुभवाच्या भरजरी पदराला एक मात्र डाग आहे..
तो डाग म्हणजे..मूकसंमतीचा.
क्रिकेट माणसांनीच बनवलेला खेळ आहे.. माणूस म्हणून जे अवगुण असतात ते त्या खेळातही येणारच.. एक क्रिकेट रसिक म्हणून क्रिकेटच्या त्या अवगुणी वृत्तीविरोधात सचिनने काही बोलावं..ही एकमात्र आशा तेंव्हा अपूर्ण राहिली..तुझी ती मुकसंमती तेंव्हाही वेदनादायक होती.
तिन्हीसांजेची लगबग रस्त्यावर दिसत होती.. रस्ता फार काही वर्दळीचा न्हवता.. हार-फुलांची दोनचार दुकानं आणि शांत चहापानासाठी कौलारू एकदोन हॉटेलं.. अधूनमधून कुंपणाच्या आतील घरं..तुरळक एखादं किराणा मालाचं दुकानं..आणि रस्त्याच्या टोकाला छोटेखानी कसलं तरी मंदिर.. बस् संपला रस्ता.. #Love
परिसर तुलनेत शांत होता.. कुठंतरी लांब चंदन अगरबत्ती धुराची काडी हवेत सोडत होती..ती काडी संपता संपता सायलेंट सुगंध त्याच्यापर्यंत पोहचवत होती..त्या सुगंधाने दिवसभराची ओढाताण हलकी होत होती..दिवेलागणीला असतो तो आभाळातला भडक तांबूसपणा आता विझत आला होता..त्यातच थंडीची धांदल सुरू होती.
नगराच्या मध्यवर्तीत असूनही हा तळ मनाला भुरळ पडणारा होता..वाहतूक अगदी शिस्तीत जात होती.. मंदिराकडे जाणारी माणसं दुर्मिळ असणाऱ्या शांत चेहऱ्याने लगेच ओळखू येत होती.
फुलांच्या दुकानात 'मेरे दिल में आज क्या है.. तू कहे तो मैं बता दूँ।' वाजणारं गाणं फुलांना अजूनच खुलवत होतं..
दिवसाच्या पहिल्या प्रहराची सुरवात..रात्री बाराला गडगडाटी पाऊस पडून गेला होता..घरी सगळे साखर म्हणावी अशा झोपेत..रातकिड्यांची किरकिर शांत वातावरणाची शांतता भयाण रातीत परावर्तित करत होती.. मधूनच एखादं कुत्रं रडायचं..पण ते कोणीतरी तोंड दाबून धरल्यागत लगेच शांत पण व्हायचं. #Annabelle
मला जाग आली तेंव्हा घरात सगळे आपापल्या रूममध्ये झोपले होते..फॅनची घरघर सोडता कसलाच आवाज न्हवता..अजून थोडा वेळ आहे, पडावं..या हिशोबाने मी कलंडलो..इतक्यात लहान मुलांच्या सायकलचं ते इंग्लिश संगीत वाजायला सुरवात झाली..पहिल्यांदा मला बाहेरून आवाज येतोय वाटलं..पण ते फक्त पाचच मिनिट.
कारण आवाजाची दिशा ही आपल्याच घरातून होती..आणि इतक्या उशीर आमच्या घरात एकसारखं ते संगीत वाजायची ही पहिलीच वेळ..आणि एवढं घाबरायचीही ही पहिलीच वेळ.. अगदी The Conjuring, Annabelle एका दणक्यात आठवावी इतकी.
काय करावं कळत न्हवतं..आणि खोलीचं दार उघडलं आणि काही दिसलंच तर करायचं काय?
उघड्या माळावर कुसळं उगवून वाळून जायची..ती खायला जनावरं सुद्धा नसायची..नजर जाईल तिथवर चिटपाखरूही न्हवतं..उघडे डोंगर-माळ ज्यांच्या मालकीचे..ते ही काही करू शकत नव्हते..अशात त्यावर नजर पडली एका बड्या पवनचक्की कंपनीची..आणि एका रातीत लोकांना पैशे ठेवायला नव्या ट्रंका घ्याव्या लागल्या.
जमिनीचे सौदे ठरतील तसं एका एका घराचे वासे फिरू लागले.. लाकडी तुळई जळणात गेल्या..त्या जागी RCC पिलर आले.. सायकलची चैन पडायची त्याच जागेवर धूळ आत येऊ नये म्हणून चारचाकी काचा वर करू लागल्या.. ३ डोकी घरात असूनही दारात ४-४ दुचाकी आणि २-२ चारचाक्या सर्रास दिसू लागल्या.
मळलेल्या कॉलर गेल्या..व्हाइट कॉलर आता ड्रायक्लीन होऊन येऊ लागल्या..पाण्याच्या घोटासाठी वाट बघणारे.. आता बार मालकाला खिशात ठेऊ लागले..सो कॉल्ड बरकतीने गाव सारा फुलून उठला..भावंडात हिश्श्यावरून धराधरीही झाली..हा सगळा गोंधळ चांगला दशकभर सुरू राहिला..खर्चापेक्षा जमा जास्त होती.
रशिया-युक्रेन कुस्ती फक्त ५६" किंवा इंधन महागाई एवढ्यापुरती मर्यादित नाही..युक्रेन पट्टीचा गहूनिर्यातदार देश आहे..सूर्यफूल,सोयाबीन इ. तेल ही तो पिकवतो.. सांगायचा मुद्दा आहे..युक्रेन युद्ध धांदलीत अडकल्याने.. आंतरराष्ट्रीय बाजारात त्या जिन्नसांचा तुटवडा आहे..❤️ #farm
आपल्याकडे आत्तापासूनच खाद्यतेल महागाई जाणवत आहे ती त्यामुळेच..खाद्यतेलाच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण नाही..त्यास पर्याय नाही..पण, गव्हाचे तसे नाही.. सद्यस्थितीत भारत गव्हाचे चार दाणे बाळगून आहे.. शिवाय यंदाचे रब्बी उत्पादन ही येईल..तेंव्हा केंद्राने निर्यातबंदी न करता हा योग साधावा.
शेतकऱ्यांना चार पै ज्यादाचे मिळतील त्याने.. पण, केंद्राची शेतकऱ्यांप्रति असलेली भावना यापूर्वी कांदा आणि साखर निर्यातबंदीत दिसलीच आहे..अन्नसुरक्षा या सदराखाली शेतकऱ्यांचा जीव घेऊनच स्वस्त धान्य दुकानांची शृंखला चालवण्याची परंपरा यंदा तरी खंडित व्हायला हवी.