Makarand Desai Profile picture
Sep 21, 2020 15 tweets 3 min read Read on X
थ्रेड: मोदींची #FarmBills आणि त्यांना आमचा उजव्या भूमिकेतून असलेला विरोध

१. शेतकऱ्यांना मार्केटमध्ये फेयर प्लेग्राउंड मिळावं यात वाद नाही. खाउजा-मध्ये उरलेल्या दोन सेक्टर्सना खुली सूट आणि शेतकऱ्याला मात्र जुनी, अपग्रेड न होणारी व्यवस्था देणं हा प्रायमरी सेक्टरवर होणारा 1/15
अन्याय आहे त्याचे परिणाम आपण प्रायमरी सेक्टरच्या गेल्या काही दशकांतील जीडीपीमधील घसरत्या शेअरच्या रूपाने बघत आहोत. त्यामुळे शेतीसाठी आर्थिक सुधारणांची द्वारे खुली करणे, शेतकऱ्याला संधी देणे, प्रायमरी सेक्टरसाठी फेयर प्लेग्राउंड तयार करणे याला आमचा आधीही पाठिंबा होता, 2/15
पुढेही राहील.

२. पण इथे फक्त तात्त्विक पातळीवर आमची अशी उजवी भूमिका आहे म्हणून भाजप करतंय ते सगळं चालवून घ्यायला आम्ही मूर्ख नाही. मोदींच्या राजवटीचं ट्रॅक रेकॉर्ड हे रिफॉर्म्सबाबतीत अत्यंत सुमार आणि देशाचं नुकसान करणारं राहिलं आहे. एखादा चांगला रिफॉर्मसुद्धा देशाला 3/15
ग्रासणारा राक्षस म्हणून उभा करण्यात मोदींचा हात कोणी धरेल असं वाटत नाही. खोटं वाटतं तर जीएसटीच्या झालेल्या चिंध्या बघून या.

३. मोदी सरकार फॅसिस्ट आहे याहून वाईट आहे हे आहे की ते अत्यंत सुमार दर्जाच्या लोकांनी भरलं आहे. याला कारण मोदींची खुशमस्करे जवळ करायची सवय आहे. 4/15
भाजपकडे सगळीच माणसे सुमार आहेत असं नाही. पण मोदी अशाच लोकांना संधी देतात जे त्यांचे चमचे आहेत, तळवे चटणारे आहेत, विरोध न करता चालणारे होयबा आहेत. (उदा. जावडेकर) यामुळे कोणताही रिफॉर्म हा तत्त्वतः मान्य असला तरी मोदी सरकारने आणलाय म्हणू। त्याविषयी शंका घेणे हा मोदीद्वेष 5/15
नसून मोदींच्या दैदिप्यमान ट्रॅक रेकॉर्डने पुरवलेला विश्वासाचा अभाव आहे.

४. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मोदींच्या किंवा भाजपच्या Doublethink चा. Doublethink म्हणजे स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी बेशरमपणे, तत्त्वे खुंटीला टांगून दोन विरुद्धार्थी/विरोधाभासी किंवा 6/15
विरुद्ध टोकाच्या भूमिका सोयीने घेणे होय! सुषमा स्वराज ज्याला शेतकऱ्यांचे ATM म्हणायच्या, शेतकऱ्यांसाठी आवश्यक अशी व्यवस्था म्हणायच्या असे APMC मधले दलाल-आडते अचानक सात-आठ वर्षांनंतर भाजपला भ्रष्टाचारी दानव का वाटू लागले याचं नक्की उत्तर काय ?

५. पुढचा मुद्दा भाजपच्या 7/15
खोटारडेपणाचा आहे. जी उजवी व्यवस्था, फ्री मार्केट इकॉनॉमी भाजप आम्ही अंत आहोत म्हणून सांगत आहे त्यात MSP ला स्थान असायचा प्रश्नच येत नाही. खोटं वाटत असेल तर नक्की फ्री मार्केट म्हणजे काय, त्यात सरकारी हस्तक्षेप किती असावा याबद्दल अर्थशास्त्राची अकरावी-बारावीची पुस्तके चाळून 8/15
9/ बघा. असं असताना मोदींचे "विरोधक तुम्हाला फूस लावत आहेत, MSP आम्ही देऊच" असे विधान हे वर म्हटलंय त्याप्रमाणे Doublethink चे उदाहरण आहे. जर प्रायव्हेट प्लेयर्स शेतकऱ्याकडून थेट खरेदी करणार आहेत तर अशा प्रत्येक व्यवहारात MSPची हमी नक्की कशी दिली जाणार याबद्दल सरकारकडून कोणी
10/ काही बोलायला तयार नाही. आणि जर MSP हमी द्यायची होतीच, तर कायद्यामध्येच तशी सुस्पष्ट प्रोविजन केली का नाही या विरोधकांच्या रास्त प्रश्नाला सरकारकडे उत्तर दिसत नाही.

६. यात अजून एक मुद्दा हा राज्यांच्या हक्काचा आहे. ज्याप्रकारे मोदींनी जीएसटीचा कारभार चालवला आहे त्यात आधीच
11/ केंद्र-राज्य संघर्ष उभा राहिला आहे. APMC हे राज्यांच्या शेतमालाच्या सप्लाय चेनवरील कंट्रोलचे एक महत्त्वाचे साधन होते. ज्याद्वारे राज्यांना साठा, आवक-जावक आणि एकंदरच राज्यातील कृषक अर्थव्यवस्थेची कल्पना येत असे. मात्र आता राज्यांना हे प्लॅनिंगचे साधन हिरावले जाण्याची भीती
12/ वाटत आहे आणि काल ज्याप्रकारे राज्यसभेत मोदींनी हे बिल निर्लज्जपणे रेटले ते बघता राज्यांची भीती ही अगदीच अवास्तव आहे असं म्हणण्यात अर्थ नाही.

७. त्यामुळे सदर रिफॉर्म्सना असणारी तात्विक सहमती आणि मोदींनी प्रत्यक्षात चालवलेल्या धोरणाला समर्थन असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
13/ जीएसटीला तात्त्विक सहमती आहे म्हणून मोदींचा जीएसटी योग्य ठरतो असं होत नाही. याला मोदींच्या राज्यातली सुमारांची सद्दी आणि मोदींचे बेमुर्वतखोर प्रक्रिया रेटण्याचे धोरण कारणीभूत आहे. एखादा साप आपल्याला तीन-चारदा (नोटबंदी, जीएसटी, लॉकडाऊन, अनलॉक, इ.) डसलेला असताना, "आता त्याला
14/ परत एकदा चान्स द्या-पूर्वग्रह ठेवू नका, मग बघा तो कसा तुम्हाला मालिश करून देईल" असं कोणी म्हणत असेल तर त्याला "तुझा साप तुला लखलाभ" म्हणणे कोणत्याही विवेकी माणसाला भाग आहे! यासाठी आमचा मोदींच्या सदर रिफॉर्म्सवर आक्षेप आहे आणि त्यांनी ज्याप्रकारे ते रेटले आहेत त्यावर तीव्र
15/ संताप आहे. आता तरीही ही अशी साकल्याने मांडलेली भूमिका म्हणजे मोदीद्वेष असे कोणाचे म्हणणे असेल तर त्याची आम्हाला फार काही तोशीस असण्याचे कारण नाही!

#FarmBills

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Makarand Desai

Makarand Desai Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @makmd

Jul 2, 2023
समृध्दी महामार्गावर कालच्या भीषण अपघातानंतर प्रश्न उपस्थित होत असताना "ही तर लोकांचीच चूक, त्यांना गाड्या चालवायची अक्कल नाही, सरकार काय करणार!" अशी तळी उचलायला येणारे आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळतात. पहिली गोष्ट सरकारने स्वतः, (1/6)
अगदी केंद्रीय मंत्री ते मुख्यमंत्री यांनी हा रस्ता कसा जलदगती आहे याच्या प्रचारकी थाटात घोषणा केल्या होत्या. एवढंच नव्हे तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी "टेस्ट ड्राईव्ह" करून बघितल्याच्या बातम्याही आल्या होत्या, (2/6)
ज्यात उपमुख्यमंत्री साहेबांनी कशी दीडशेच्या स्पीडने गाडी हाकली याचा गवगवा होता!

आता अशी जाहिरातबाजी करून झाल्यावर, त्या रस्त्यावर जलदगतीने वाहने जातात याचा सगळा दोष लोकांवर कसा आणि का म्हणून ढकलायचा बरं? (3/6)
Read 7 tweets
May 25, 2023
फक्त उद्घाटन त्यांच्या हस्ते? याला काय अर्थ आहे! हा माणूस दिवसाचे अठरा अठरा तास आपल्यासाठी राबतो, देशोदेशी फिरून आपल्या देशाचं नांव उंचावतो, एक्सट्रा 2AB सारखे मूलभूत सिद्धांत देऊन आपलं जगणं समृद्ध करतो त्याच्या हस्ते फक्त उद्घाटन? हे बरोबर नाही, (1/4)
या एकमेवाद्वितीय नेत्यासाठी नवीन इमारतीत सर्वात उंच स्थानी एक डोळे दिपवणारं सिंहासन तयार करावं, नवीन इमारतीत जमणाऱ्या लोकांना रोज एक तास 'मन की बात'चे जुने एपिसोड सक्तीने ऐकवण्यात यावेत, (2/4)
जेव्हा हा दिव्य अवतारी पुरुष सभगृहात येईल तेव्हा अवघ्या वास्तुमध्ये त्याचा जयजयकार गुंजेल असे किमान ब्याएंशी डेसिबलचे डॉल्बी स्पीकर्स वास्तुच्या प्रत्येक कोपऱ्यात लावावेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या नवीन इमारतीच्या समोर या महापुरुषाचा एक भव्यदिव्य पुतळा उभारावा (3/4)
Read 4 tweets
May 14, 2023
नुकताच सुमारे वीस हजार कोटी रुपयांचा आधार-जीएसटी घोटाळा उघडकीस आला असून त्यातील पाच हजार कोटी म्हणजे पंचवीस टक्के गैरव्यवहार हे एकट्या गुजरातमध्ये पकडले गेले आहेत. (1/11)
यामध्ये व्यवहाराशी कोणताही संबंध नसलेल्या लोकांची आधार कार्डे वापरून जीएसटी रजिस्ट्रेशन करण्यात आले आणि त्याद्वारे खोटी बिले तयार करून गैरव्यवहार सुरू होते. यामध्ये गरीब माणसांना एक हजार रुपये देऊन त्यांची आधार कार्ड घेतली जातात, (2/11)
त्यांना सरकारी योजना असल्याचे खोटे सांगितले जाते, त्यांच्या आधारला लिंक केलेला मोबाईल नंबर बदलण्यात येतो आणि मग त्याद्वारे खोटे पॅन कार्ड आणि खोटे जीएसटी रजिस्ट्रेशन बनवण्यात येते. मग याचा वापर शेल कंपन्या तयार करून खोटे इनपुट टॅक्स क्रेडिट दाखवण्यासाठी केला जातो. (3/11)
Read 13 tweets
May 13, 2023
आपले माननीय पंतप्रधान पूर्ण वेळ प्रचारक म्हणून सगळ्या राज्यात प्रचाराला जातात. अमर्याद पैसा, सरकारी यंत्रणा आणि आयटी सेल हे सगळे कामाला लावले जातात. तरी आज कर्नाटकमध्ये काँग्रेसचे आकडे भाजपला स्पष्टपणे मात देणारे आहेत...

(1/n)
दक्षिण भारतात केरळ, तामिळनाडूमध्ये भाजप काही यश मिळवू शकली नाही. कर्नाटक आता हातातून जात आहे. आंध्र-तेलंगणा भाजपच्या हातात नाही. महाराष्ट्रात राज्यपालांच्या मार्फत कुरापती करून, दुसऱ्यांचे नेते फोडून सरकार बनवायची वेळ आली. पंजाब-दिल्लीमध्ये आपने क्लीन स्वीप दिलेला आहे.

(2/n)
राजस्थानमध्ये असंख्य उचापती करूनही काँग्रेसचं सरकार स्थिर आहे. बिहारमध्ये नितीश यांना सोडून तेजस्वी यादवांना घेऊन सत्तेत बसले आहेत. छत्तीसगड आणि हिमाचलमध्ये काँग्रेस सत्तेत आहे. बंगालमध्ये दीदी ओ दीदी सारखे थिल्लर प्रकार करूनही ममता त्या सगळ्याला पुरून उरल्या!

(3/n)
Read 5 tweets
Apr 17, 2023
धर्माधिकारी भोंदू असतील नसतील, त्यांनी कधीचा मुहूर्त सांगितला असेल नसेल हा गौण मुद्दा आहे. जनतेने सरकारला निवडून दिलं आहे, धर्माधिकारी यांना नाही. पुस्तकार सोहळा सरकारचा होता. भारताचे गृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची जबाबदारी होती की आपल्यासमोर तळपत्या उन्हात

(1/n)
बसलेल्या लोकांची व्यवस्था करावी. किमान माणुसकी म्हणून तरी लोकांना इतक्या कडक उन्हात बसावं लागणार नाही याची सोय करणे ही सरकारची जबाबदारी होती.

धर्माधिकारी सायंटिस्ट असते, कुठल्याही जातीधर्माचे असते, त्यांनी काहीही करू केलेलं असतं तरी सरकारी हलगर्जीपणा,

(2/n)
सामान्य माणसाचा जीव तुच्छ लेखण्याची वृत्ती क्षम्य ठरली नसती. कारण पुरस्कार सरकारचा होता, कार्यक्रम सरकारने आयोजित केलेला होता, भारताचे गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला स्वतः हजर होते, त्यांच्या नांवाने कार्यक्रमाची जाहिरात केली गेली होती.

(3/n)
Read 5 tweets
Mar 26, 2023
पक्षाचे अधिकृत मुखपत्र आणि एखादे सामान्य व्यावसायिक वृत्तपत्र यात फरक करायचा की नाही?सरकारी जाहिराती नाकारणे नियमात न बसल्याने सरकारने जाहिराती बंद केल्या तर मुखपत्राला आर्थिक फटका बसेल हे बरोबर आहे. पण मुखपत्र फक्त आर्थिक गणितावर चालवायचे असेल तर त्याला मुखपत्र का म्हणावे?
(1/n)
मुखपत्राचे संपादक महाशय ज्या सत्ताधारी लोकांना चोर म्हणतात, जे सरकारच असंविधानिक आहे वगैरे जप ते सातत्याने करत असतात, ज्या सरकारचा जन्म ज्या पक्षाचे मुखपत्र आहे त्या पक्षाशी गद्दारी करून झाला असा आरोप सातत्याने संपादक साहेबांकडून होत असतो; अशावेळी मुखपत्राच्या मुखपृष्ठावर

(2/n)
त्याच सत्ताधारी नेत्यांची प्रचारकी जाहिरात छापणे हे नक्की काय म्हणून क्षम्य मानावे?

नुसता राजकीय विरोध असणे आणि राजकीय वैर असणे यात फरक आहे. ज्या नेत्यांना तुम्ही उघड वैरी मानता, गद्दार मानता, चोर म्हणता, शिव्याशाप देता, त्यांना राजकारणातून संपवून टाकायची भाषा करता,

(3/n)
Read 7 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us!

:(