मित्रानो आजचा धागा एक वेगळीच माहिती घेऊन येतो आहे काही जणांना माहित असेल पण बऱ्याच जणांना नक्कीच माहित नसेल,मित्रानो पुण्यातील दिवंगत आमदार रमेशभाऊ वांजळे माहित नाहीत असा कोणीच नसेल जो माणूस सोन्याने मढलेला असे ते रमेशभाऊ
त्यानंतर हि पुण्यातच त्यांच्या बऱ्याच कॉप्या निघाल्या
नाही नाही हा धागा त्यांच्या बद्दल नाही तर अशा एका अवलिया व्यक्तित्वाबद्दल आहे जो घरावरच सोन्याची कौले चढवणार होता खऱ्या सोन्याची बरे का
हि गोष्ट घडलीये मुंबईत तीही आजपासून जवळजवळ 170 वर्षांपूर्वीची पण एवढ्या मागे जाण्यापूर्वी आपण जाऊया १९१० सालात @gajanan137@Amruta39117837
१९१०ते १९१५ या काळात एडवर्डस हे मुंबईचे कमिशनर होते. या काळात त्यांनी मुंबई जवळून पाहिली, तिचा अभ्यास केला. या विद्वान अधिकाऱ्याने इंग्लंडला परत गेल्यावर आपल्या लाडक्या मुंबई वर चार पुस्तके लिहिली. या पुस्तकापैकी एक होते “by ways of bombay”
या पुस्तकात त्यांनी हा अवलिया माणसाचा किस्सा सांगितला आहे.
कमिशनर साहेबांना हे गाण खूप आवडल. त्यांनी त्याचा अर्थ विचारला. त्यावेळी त्यांच्या एका मित्राने या गाण्यामागची कथा सांगितली,या कथेचा नायक हाच आपल्या धाग्याचा सुवर्ण नायक
सुमारे दिडशे वर्षापूर्वीची गोष्ट. मुंबईमध्ये डोंगरी परिसरात एक श्रीमंत कोळी होता नाव होत झुरन पाटील
पाटीलबाबा मोठे जमीनदार होते मांडवी परिसरात बरीच जमीन त्यांच्या नावे होती. दर्यातल्या माशांनी त्यांना बरीच संपत्ती मिळवून दिली होती.घरात अफाट सोननाणं पडून होतं. झुरन पाटील घरातला सोन्याचा ढीग रस्त्यावर धुऊन वाळत घालायचे. येणारी जाणारी माणस पायाला मेण लावून सोने तुडवत जायची
आणि त्याला चिकटलेल सोन चोरायची. बिचाऱ्या भोळ्या पाटीलबुवांना वाटायचं की जसं कडक उन्हात वाळल्यानंतर मासे कमी होतात तसंच सोन देखील कमी होत असाव.त्याकाळचे पारसी अब्जाधीश सर जमशेदजी जीजीभाय बाटलीवाला हे झुरन पाटलांचे मित्र
त्यांच्याच नावाने पुढे सर जेजे स्कूल ऑफ आर्ट्स सुरु झाले. एकदा हे सर जेजे पाटलांना भेटायला त्यांच्या घरी गेले. नेहमी प्रमाणे पाटीलबुवांनी घरातले सोने चांदी वाळत घातल होत. त्यावर लक्ष ठेवून दोघे घरासमोरच गप्पा मारत बसले
योगायोगाने त्यावेळी तिथून नेमकी मुंबईच्या गव्हर्नरची बग्गी चालली होती. लॉर्ड एल्फिन्स्टन असावेत. त्यांना जाता जाता हे गमतीदार दृश्य दिसले. त्यांनी बग्गी थांबवली. स्वतः गव्हर्नरला पाहून सर जे जे अभिवादन करायला अदबीने उभे राहिले
रांगड्या पाटलाना या शिष्टाचाराच्या पद्धती माहित नव्हत्या. ते आपल्या जागीच बसून राहिले गव्हर्नरनी सर जेजेनां जवळ बोलावलं. त्यांना विचारलं हे कोण? जमशेदजीनी भोळ्या पण अतिशय श्रीमंत असलेल्या झुरन पाटलांची इत्यंभूत सगळी माहिती सांगितली
गव्हर्नरना खूप आश्चर्य वाटलं. त्यांनी पाटलाना विचारलं “तुमच्याकड एवढी संपत्ती आहे तर त्यापैकी थोडे पैसे सरकारला मदत म्हणून का देत नाही.” झुरन पाटील म्हणाले
त्यात कायसरकारला जितकी हवी तितकी देईन
गव्हर्नर म्हणजे किती जरी झालं तरी भारतात व्यापार करायला आलेल्या कंपनी सरकारचा अधिकारी
त्यान झुरन पाटलाना विचारलं, त्याबदल्यात तुम्हाला काय पाहिजे?
पाटीलबुवा म्हणाले,
“सरकार मला माझ्या घराला सोन्याची कौले घालायची परवानगी मिळावी”गव्हर्नरला ही अजब अट ऐकून हसूच आलं पण त्याने जातीच्या व्यापार्याप्रमाणे त्यातही थोडी घासाघीस केली
अखेर झुरीन पाटीलबाबांना घरावर तांब्याची कौले घालण्याची परवानगी मिळाली. ह्या प्रसंगाच्या वेळी सर जेजे बाटलीवाला तिथे हजर होते .म्हणून त्या गाण्यात शब्द आहेत की,“टोपी वाल्याने हुकुम केला बाटलीवाल्याच्या बराबर”
पोलीस कमिशनर एडवर्डस आपल्या लेखात म्हणतोझुरन पाटलांच्या घरावर तांब्याची
कौले चढली घर डोंगरी स्ट्रीटवर आहे,तिथे त्यांचे वंशज महादेव धर्मा पाटील राहतात.आता तिथे ती तांब्याची कौले नाहीत.कालौघात ती खराब झाली असतील अथवा कोणीतरी चोरून नेली असतील
आजही मुंबईच्या कोळी समाजात झुरन पाटील यांना आद्य कोळी म्हणून ओळखलं जात
असा आपल्या सोनेरी मुंबईचा सोनेरी भूतकाळ
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
"धर्मो रक्षति रक्षितः"
लव्ह जिहाद विरुद्ध लढायचे असेल तर आपल्या मुलींच्या मनात धर्माभिमान जागा झाला पाहिजे.
अन्य धर्मांतरवादी संप्रदाय त्यांचे रानटी स्वरूप आणि आपला हिंदू धर्म यातील फरक आपल्या मुलींना माहिती असलाच पाहिजे.
साध्या सोप्या उपासना पद्धती आत्मसात करून आणि त्याचे नित्य पालन करून या नरराक्षसांशी लढण्याची विजीगिषु वृत्ती प्रत्येक हिंदू तरुणीमध्ये निर्माण व्हावी म्हणून ही छोटी पुस्तिका उद्गार तर्फे आम्ही प्रकाशित केली आहे. या पुस्तिकेतील उपासना शक्ती तत्व जागृत करणारी आहे.
|| धर्मो रक्षति रक्षितः ||
फक्त २५ रुपये मूल्य असलेल्या या पुस्तिकेत हिंदू धर्माची मुख्य तत्वे सांगितली आहेत
आदि शंकराचार्य प्रणित देव पंचायतन पूजा पद्धती विस्तृत सांगितली आहेत आणि आपल्या घरातही पंचायतन पूजन प्रारंभ करा.
रोजच्या जीवनातील कुठल्याही प्रहरी रामरक्षा म्हंटली तरी प्रचंड प्रमाणात ऊर्जा तयार होते.
जी स्पंदने रामरक्षेतून जागृत होतात,
ती दाखविण्यासाठी कुठलाही चश्मा किंवा भिंग उपलब्ध नाही,परंतु "स्वानुभव"ह्या एकमेव साधनातून याची प्रचिती येते.
१/५
घरात एकटे आहात,रामरक्षा म्हणा,कुणी आजारी आहे, त्याच्या बाजूला बसून रामरक्षा म्हणा,प्रवासात आहात,रामरक्षा म्हणा, रस्त्यावरुन एकटे जात आहात,रामरक्षा म्हणा, पहिल्यांदाच प्रेजेंटेशन देणार आहात,रामरक्षा म्हणा,
नविन देशात अनोळखी लोकांच्यात आहात,
रामरक्षा म्हणा...!
२/५
आत्तसज्जधनुषा विषुस्पृशा वक्षया शुगनिषङ्ग सङिगनौ ।रक्षणाय मम रामलक्ष्मणा वग्रत:पथि सदैव गच्छताम् ॥ हा श्र्लोक म्हणताना अंगावर उभा राहणारा काटा अनुभवण्यासारखा असतो
कुठल्याही संकटात असाल, फारच निगेटिव वाटतंय, आपल्या आवडत्या व्यक्तिशी भांडण झालंय,
खूप वाईट वाटतंय,रडायला येतंय,
३/५
"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांना अनावृत्त पत्र"
महोदय,
माझ्यासारख्या तुच्छ व्यक्तीने आपल्याला पत्र लिहावे ही माझी पात्रता नाही हे मी आधीच नमूद करतो आहे, कारण आपण एका राष्ट्रीय पक्षाचे निवडून आलेले लोकसेवक आहात आणि मी एक सामान्य मानव आहे.
आजवर आपण वारंवार वादग्रस्त वक्तव्य करत आला आहात आणि माझ्यासारखे लोक आपले निखळ अज्ञान आहे असे समजून त्याकडे दुर्लक्ष करत आले आहेत. परंतु आपले कोणीही खंडण केले नाही म्हणजे आपण बोलतो तो प्रत्येक शब्द हा प्रमाण आहे असा आपला भ्रम झाला आहे, आपला हा गैरसमज दूर करणे यासाठी हा पत्रप्रपंच.
सध्या आपण सनातन धर्म या संकल्पनेला मनसोक्त शिव्या घालत आहात आणि सनातन धर्म अवैज्ञानिक आहे व बरेच काही बोलत आहात म्हणून आपल्याला अत्यल्प व अत्यंत प्राथमिक अश्या गोष्टी सांगतो
मुद्दा क्रमांक एक
धर्म या संकल्पनेचा विस्तार होताना तो सत्य धर्म-सत्य सनातन धर्म-सत्य सनातन वैदिक धर्म-
" दत्तमहाराज एखाद्याची एवढी कठोर परीक्षा का घेतात ?"
आपल्या आयुष्यात जे सुख-दुःखं आपण भोगतो त्याचा दाता कोणीही नसतो.कुठलीही वस्तू-कुठलीही व्यक्ती-कुठलंही वित्त आपल्याला कधीही सुख देत नाही वा दुःखं देत नाही."सुखस्य दुःखस्य न कोपि दाता । परो ददातिती कुबुद्धी रेषा "
१/६
ह्या न्यायानं सुख देणारा पण कोणीही नव्हे तसाच दुःखं देणारा पण कोणीही नव्हे.
" जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूंचि शोधोनी पाहे, मना त्वांची रे पर्व संचित केले,तया सारिखे भोगणे प्राप्त झाले."
ह्या श्री समर्थ उक्ती नुसार आपणच आपल्या अनंत जन्माच्या पूर्व कर्मानुसार
२/६
तयार झालेलं प्रारब्ध भोगत असतो.प्रारब्ध हे केवळ भोगूनच संपवावं लागतं!!
आपण जर दत्तगुरूंची उपासना करत असाल तर दत्तगुरूं आपली खडतर परीक्षा घेत आहेत असा विचारही अजिबात करू नका.उलट निर्माण झालेल्या प्रारब्धाच्या तडाख्यातून आपल्या भक्तांला कसं बाहेर काढायचं हे महाराज ठरवत असतात
३/६
"आत्मनिर्भर भारताचा युरोपला एक दणका"
आता अशा बातम्या वरचेवर वाचण्याची
सवय आपण लावून घेतली पाहिजे,💪
तर झाले आहे असे ,
युक्रेन युद्धानंतर G7 आणि युरोपियन देशांनी रशियन तेल खरेदीवर cap घातला. म्हणजे ६० डॉलरच्या खाली तेलाचे भाव असले पाहिजेत असे बंधन घातले.
तेल आपण रशियाकडून घेतो. त्यामुळे यात हे देश ढवळाढवळ करू शकत नाहीत. परंतु तेल वाहतूक करणारी जहाजे आणि ही वाहतूक करताना काढण्याचा विमा हे सर्व युरोपियन कंपन्यांच्या हातात होते. विमा न काढल्यास ही जहाजे इस्तंबूलमधून जाऊ देण्यास तुर्कस्थान तयार नव्हता.
या जहाजांना इस्तंबूल येथून जावे लागते. रशियाने आपली जहाजे देऊन हा पेच सोडविण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला रशियन कंपन्यांनी यासाठी विमाकवचही पुरविले. हे विमाकवच पुरविण्यासाठी वेळप्रसंगी पैसे देण्याची गरज भासल्यास विमा कंपन्यांच्या गंगाजळीत (Backup arrangement) पुरेसे डॉलर्स असणे