*नक्की वाचा*

*शिवसेना सारख्या कट्टर हिंदुत्ववादी पक्षाने काँग्रेस सारख्या सेक्युलरवादी विचारसरणी असलेल्या पक्षासोबत अगदी सहज युती का केली.??? का?भाजपची साथ सोडली. @ShivSena @ShivsenaComms @AUThackeray @SardesaiVarun @OfficeofUT @rautsanjay61 @CMOMaharashtra
मराठी बाणा जपणाऱ्या,मराठी माणसाच्या हितासाठी सदैव झटणाऱ्या व हिंदुत्व ह्या शब्दासाठी कार्यरत असलेला पक्ष म्हणजे शिवसेना.हिंदुत्व ह्याच मुद्द्यावर मागील 25 वर्षे शिवसेना व भाजप दोन्ही पक्षाची युती झाली होती.देशात संसदेत सर्वाधिक काळ विरोधात राहिलेले हे दोन्ही पक्ष.तसेच राज्यात
सर्वाधिक काळ विरोधी पक्षात राहिलेला पक्ष म्हणजे शिवसेना होय.

शिवसेना भाजप सोबत युती तोडून आपला स्वतंत्र विचार करुन यापूर्वी कधिही काँग्रेस पक्षाला बाहेरुन पाठिंबा देऊन,किव्हा सत्तेत सहभागी होऊन सहजच केंद्रात अनेक वर्षे म्होठ म्होठे मंत्रिपद मिळवू शकत होते.तसेच राज्यात देखील इतर
पक्षाना सोबत घेऊन कायम सत्तेत राहू शकत होते.पण हिंदुत्व ह्या शब्दाला अंतिम मानणाऱ्या,व शब्दाला-वचनाला जागणाऱ्या,शिवसेनेने कधीच भाजपची साथ सोडली नाही.अनेक वर्षे विरोधात बसले, कित्येक वर्षे राज्याच्या सत्तेपासून दूर राहिले पण कधीही भाजप ची साथ सोडण्याचा विचार देखील केला नाही.
सुख दुःखात अगदी पक्षाच्या पडझड काळात देखील युती कायम ठेऊन युती धर्म कायम पाळला होता.
पण २०१४ नंतर देशात अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर एक काँग्रेस विरुद्ध लाट निर्माण झाली व त्या लाटेत भाजप पक्ष तारून गेले.देशाच्या सत्तेच्या प्रमुख पदी गुजरात चे माजी.मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे
विराजमान झाले आणि म्हणतात ना सत्ता एक नशा आहे त्यामुळे अहंकार होतो.आणि त्याला भाजप पक्ष देखील अपवाद नाही आणि यानंतरच शिवसेना च काय इतर मित्र पक्षांना संपविण्याचा डाव भाजपने अल्पावधीत आखला.शिवसेनेसारख्या पक्षाने दुःखात दिलेली साथ,कठीण परिस्थितीत देखील भाजप ची कधी साथ सोडली नव्हती.
शिवसेना व भाजप यांच्यातील युती पलीकडिल सबंध सुद्धा भाजप सत्तेत येताच विसरले व प्रादेशिक मित्रपक्षांना संपविण्याचा डाव भाजपने सुरू केल्याने वादाची खरी ठिणगी भाजप-शिवसेना पक्षात पडली गेली.भाजपचे वरिष्ठ नेते,सुब्रमण्यम स्वामीं यांनी स्वता उद्धव साहेब ठाकरे यांना सांगितले की दिल्ली
मध्ये भाजपच्या अंतर्गत चर्चा सुरू आहे की."बाळासाहेब अब नही रहे शिवसेना को खतम कर दो" ही खरी शिवसेना-भाजप च्या वादाची पहिली ठिणगी पडली होती.पण शिवसेना काहीही करू शकत नव्हते कारण मोदी सरकार ला अण्णा हजारे यांनी निर्माण केलेल्या लाटेत पूर्णता बहुमत मिळाले होते.म्हणून केंद्रात जे
ते घेऊन शांत बसण्याशिवाय पर्याय नव्हते.यानंतर देखील भाजपने शिवसेनेला खच्ची करण्याचे धोरण आखले होते.महाराष्ट्र् असो की दिल्ली शिवसेनेला सत्तेच्या बळावर भाजपने वेळोवेळी शह देण्याचा प्रयत्न केला.शिवसेनेच्या राजकीय हतबलतेचा भाजपने जास्तीत जास्त फायदा उठविला. ज्या पक्षाने देशात भाजप
म्होठे व्हॉवे हिंदू मतांमध्ये फूट नको म्हणून कधीही देशामध्ये म्होठया प्रमाणात राजकीय पाय रोवले नाही,भाजप साठी माघार च घेतली राजकीय पेक्षा हिंदुत्व मित्र असलेल्या शिवसेना पक्षाबद्दल थोडी देखील आपुलकीची जाणीव भाजप ला होत नव्हती.त्या खेरीज अनेक इतर कारणे देखील आहेत की त्यामुळे
शिवसेना भाजप युती तोडणे गरजेचे होते व काँग्रेस च काय इतर कोणासोबत देखील युती करणे गरजेचे.याबाबत काही उदाहरणे आपण पाहू.
१)२०१४ ला केंद्राच्या सत्तेत पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी जी विराजमान झाले.खऱ्या अर्थाने हिंदू चे राज्य आले असे मत निर्माण झाले.अनेक वर्षे साथ दिलेल्या शिवसेना  पक्षाला देखील आता सोन्याचे दिवस येतील असे मत झाले.पण झाले नेमके उलटेच.शिवसेना पक्षाचे १९ खासदार असतांना देखील ज्या अवजड
उद्योग मंत्री पदाची शिवसेनेने नेहनी अवहेलना केली तेच पद जाणून बुजून शिवसेनेच्या वाट्याला देण्यात आले.आणि एकही खासदार नसलेल्या रामदास आठवले यास सामाजिक न्याय मंत्रिपद देण्यात आले.हा एकप्रकारे देश स्तरावर भाजप ने केलेला सेनेचा सर्वात म्होठा अपमान होता.
२)* देशाची सत्ता मिळाल्यानंतर अहंकार व सत्तेची पिपासू वृत्ती जागी झाल्याने भाजपने एकट्याच्या बळावर महाराष्ट्र् राज्याची सत्ता बळकवायची हे धोरण निश्चित केले.त्यासाठी आपला कट्टर मित्र पक्ष शिवसेने ला सोडण्याचा जणू विडा च उचलला गेला.
आणि त्यानुसार त्यांनी केले देखील.२०१४ नंतर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत दिल्ली कार्यकारिणीच्या आदेशाने भाजपने युती तोडली.देशाच्या सत्तेचा फायदा भाजप ला झाला व १२२ जागा भाजप आपले उमेदवार जिंकू शकले.
शकले.पण बहुमताचा आकडा नसल्याने भाजप- शिवसेना भाजप पुन्हा एकत्र येईल असा समज निर्माण झाला. पण झाले उलटे सत्तेसाठी व शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने राष्ट्रवादी शी घरोबा केला.
पण कालांतराने अल्पावधीतच शिवसेना-भाजप मजबुरी म्हणून एकत्र येऊन सत्ता स्थापन केली.भाजप सत्तेसाठी राष्ट्रवादी सोबत जाऊ शकते म्हणून शिवसेनेनं वेळ पाहून व राजकीय स्तिथी पाहून जे काही पदरात पडेल ते घेऊन शांत राहण्याचे धोरण आखले.
3)पाच वर्षे शिवसेनेने राज्यात उपमुख्यमंत्री पद,गृहमंत्री,महसूलमंत्री असे कोणतेच खाते न घेता भाजपला  पाच वर्षे पाठिंबा दिला.एकप्रकारे पाच वर्षे फुकट पाठिंबा दिला.पण तेच भाजप आज अडीच वर्षे मुख्यमंत्री पद किव्हा पाच वर्षे उपमुख्यमंत्री पद शिवसेनेला २०१९ मध्ये विधासाभ निकाल नंतर
युती तुटण्याचे सर्वात महत्वाचे कारण हेच आहे.ते म्हणजे विधानसभा निवडणुकीत युती म्हणून भाजप शिवसेना एकत्र लढले.शिवसेनेने भाजपचे आमदार निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पण भाजप ने शिवसेनेला मंत्रिपद देऊ नये म्हणून रणनीती बनविली होती.
ती म्हणजे शिवसेनेच्या उमेदवारा समोर अपक्ष उमेदवार देऊन अपक्ष उमेदवाराला मदत करायची.किव्हा इतर प्रादेशिक पक्षाना मदत करायची व शिवसेनेच्या जास्तीत जास्त शीट पाडायच्या.व सेनेच्या मदतीने त्यांनी मात्र त्यांचे उमेदवार निवडून आणायचे.हेच काय अगदी आदित्य ठाकरे ला सुद्धा यांनी राजकीय मदत
केली नाही. ५)* २०१४ नंतर राज्यात अपरिहार्य म्हणून दोन्ही पक्ष एकत्र आले पण,भाजपने शिवसेनेला खच्ची करण्याचे,अपमान करण्याचे धोरण सुरूच ठेवले होते.मिळेल तशी कुरघोडी केली जात होती.
६)* अगदी मेट्रो सारख्या प्रकल्पाचे भूमिपूजन करताना भाजप ने उद्धव ठाकरे यांना सुरवातीला आमंत्रण दिले नव्हते.शिवसेनेच्या स्थानिक खासदार, आमदार याना देखील निमंत्रण नसायचे.
७)* अगदी नवी मुंबई विमानतळ भूमिपूजन सोहळ्यात देखील भाजपने हेच धोरण आखले होते.अशाप्रकरे च भूमिपूजन कार्यक्रमात उद्धव ठाकरे व सेना आमदार,खासदार यांना वारंवार वगळले गेले.
जाणून बुजून सतत शिवसेनेला डावलले जात होते,अपमान केले जात होते.पण देशाची एकहाती सत्ता भाजप कडे असल्याने व राष्ट्रवादी सोबत हे जाऊ शकतात ह्याची प्रचिती आल्याने शिवसेना सत्तेत राहून जी कामे करता येतील ती करून घ्यायची हे धोरण आखले. व स्वभाव असल्याने वेळोवेळी चुकीच्या गोष्टीना सत्तेत
सत्तेत राहून देखील विरोध करत राहिले.

*८)* मुंबई सारख्या ठिकाणी जेथे शिवसेनेची आत्मा समजली जाते ती महानगर पालिका सुद्धा भाजपने आपल्या हातात घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.अगदी देशाचे पंतप्रधान देखील महानगर पालिकेच्या निवडणुकीत प्रचार साठी आले होते.
उलट काँग्रेस-राष्ट्रवादी चे महाराष्ट्र राज्यातील नेते पूर्वीपासून शिवसेनेला महानगर पालिकेत कधीच जास्त विरोध करत नसत.जेणेकरून मुंबई मराठी माणसाच्या हातातच राहील हे मराठी प्रेम राष्ट्रवादी-काँग्रेस वाले वेळोवेळी दाखवत आले.पण भाजपने ने कधीच मैत्री पाळली नव्हती,सत्ता केंद्रस्थानी
असल्याने मुंबईत सेनेशी ते लढले.व त्यामुळे शिवसेना व भाजप यांच्यात मानसिक अधिक दुरावा निर्माण झाला.

*९)* शिवसेना जरी सत्तेत सहभागी होती तरी देखील भाजपने नेहमिच शिवसेनेच्या कार्यात अडथले निर्माण केलेकिव्हा जाणून बुजून विलंब करायचे. उदा.कोस्टल रोड हा शिवसेनेचा ड्रीम प्रोजेक्ट् हा
प्रकल्प पूर्णता मुंबई महानगर पालिका बनविणार असून सुद्धा फक्त परवानगी हवी होती.ती साधी परवानगी देखील दिल्ली सरकार मधील फॉरेस्ट विभाग देत नव्हते.तसेच बीडीडी चाल विकास प्रकल्प अनेक वेळा पाठपुरावा करून देखील मुख्यमंत्री योग्य सहकार्य करत नव्हते.
नव्हते.अगदी शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या महानगर पालिकेत मुख्यमंत्री योग्य निधी देत नव्हते व वेळेवर निधी देत सुद्धा नव्हते जेणेकडून शिवसेनेची बदनामी होईल व राजकीय ताकद कमी होईल.इतर...
१०)* २०१९ लोकसभेत गरज म्हणून अमित शाह मातोश्री वर एक नाही दोन वेळा आले.आणि शिवसेेनेने याच संधीचा फायदा घेत युती तुटल्यानंतर देखील अमित शहा यांच्या शब्दावर विश्वास ठेवत मोदी जी साठी पुन्हा युती केली.पण एक मात्र विधानसभेसाठी मुख्यमंत्री पद बाबत आश्वासन घेतले.
पद जबाबदारी यांचे समसमान वाटप करायचे ठरले म्हणून शिवसेनेच्या गोटात आनंद होते.पण हा शब्द देखील लोकसभा जिंकल्यानंतर भाजप कडून विधानसभेत पाळला गेला नाही..
११)उलट लोकसभेत गरज म्हणून सेनेच्या अटी मानल्या.पण जशी विधानसभा निवडणूक लागली तसे भाजपने रंग दाखवायला सुरवात केली.पुन्हा एकहाती सत्तेसाठी भाजप मध्ये मेघा भरती करून तय्यारी करून घेतली. पण सेनेने देखील तोडीस तोड म्हणून मेघाभरती करून घेतल्याने भाजप ला युती करणे गरजेचे ठरले.
नाहीतर ऐकला चलो चा ध्येय निश्चित होता.

*१२)* पद,जबाबदाऱ्या,जागांचे समसमान वाटप ठरलेले असतांना देखील पुन्हा भाजप ने जागावाटप वरून वाद सुरू केले.अगदी युती तुटते काय ही चर्चा सुरू झाली पण वेळ पाहुन सेनेने पुन्हा माघार घेतली
जागावाटप बाबत एक पाऊल मागे आले.पण तरी देखील अपक्ष उमेदवार देऊन खोटेपणा भाजप कडून झालाच.अगदी शिवसेनेच्या ५२ उमेदवार यांना त्याचा फटका बसला,जवजवल ४२ जागा शिवसेनेच्या पडल्या नाही भाजप कडून पाडल्या गेल्या.
१३)* पण नियतीने खेळ करून दाखवले भाजप ला बहुमत पासून रोखले व ह्याचाच सेनेने फायदा घ्ययचा ठरविले आतापर्यत झालेला,अपमान,विश्वासघात,राजकिय अपमान,सर्व गोष्टींचा परिपूर्ण हिसाब करायचा शिवसेना नेतृत्वाकडून ठरविले गेले.
यातच भाजप ने शिवसेना काँग्रेस सोबत जाऊ शकत नाही हे लक्षात घेतल्याने पुन्हा राजकीय डावपेच सुरू केले.भाजप ला वाटले शिवसेनेला पर्याय नाही? काँग्रेस सोबत ते कधी जाऊ शकत नाही,म्हणून जास्तीत जास्त ताणून घेऊन दोन चार खाती देऊन गप्प बसवायचे धोरण भाजपने आखले.
पण अपमान किती काळ सोसायचा,विश्वासघात होऊन देखील किती काळ शांत रहायचे,का? लाचार म्हणून राजकारण करायचे?ह्या सगळ्या मागील घटना म्हणून शिवसेना सत्तेसाठी नाहीतर भाजपने दिलेल्या वागणुकीचा बदला म्हणून,सुडाचा बदला म्हणून पेटून उठले.आणि त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत युती करायचे पक्के
केले व ते झाले देखील.शेवटी गद्दार मित्रापेक्षा उगड शत्रू चांगला असतो.*

जय महाराष्ट्र!🚩🚩🚩

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Aniruddha Karanjkar

Aniruddha Karanjkar Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(