Yogesh.R.Sathe Profile picture
Apr 1 18 tweets 5 min read
#ThanksPhuleAmbedkar भारतीय रिझर्व बँकेचे जनक – डॉ.बाबासाहेब आंबेडकर.महात्मा गांधी देशाच्या संविधान निर्मितीच्या अगोदर आपल्या सहकार्यांशी बोलताना म्हणतात, “भारत देशाचे संपूर्ण अर्थकारण,राजकारण,समाजकारण,इतिहास, भाषावार प्रांतरचना विश्लेषण,भौगोलिक रचना,भारतीय व्यापार,शेती(१८/१)
भारतीय कामगारांचे प्रश्न या विविध बाबतींची सखोल माहिती जर कोणाला असेल तर ते डॉ.आंबेडकर हे आहेत.संविधान निर्मितीसाठी त्यांच्यासारखा विद्वान पंडित कोणी नाही.म्हणून कोणत्याही परिस्थितीत डॉ.आंबेडकरांना संविधान समिती मध्ये निवडून आणा.”आर्थिक विकासासंदर्भात डॉ.आंबेडकर यांच्या मते(१८/२)
अल्पभूधारकांवर आधारित भारतीय शेतीची उत्पादकता व उत्पन्न कमी असण्याचे मुख्य कारण शेतीमधील अल्प भांडवली गुंतवणूक हे आहे.फक्त शेतीच नव्हे तर कामगारांचे आर्थिक धोरण यावर सुद्धा त्यांनी विस्तृत विचार मांडणी केली आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील संपुर्ण घटकांचा विश्लेषणात्मक(१८/३)
अभ्यास केला होता.त्यात भारतीय अर्थव्यवस्था व त्यावरील समस्यांचे उपाय यावर त्यांनी जागतिक दर्जाच्या तीन पदव्या प्राप्त केल्या.अर्थशास्त्रावर तीन विद्वत्तापूर्ण प्रबंध कोलंबिया(अमेरिका) व लंडन विद्यापीठाला एम.ए.पीएचडी व डीएस्सी साठी सादर केले आणि विशेष म्हणजे पुढे तीनही(१८/४)
प्रबंध पुस्तक रूपाने प्रकाशित करण्यात आले.
१.(Administration and Finance of the East India Company) – ईस्ट इंडिया कंपनी:प्रशासन आणि वित्तप्रणाली यात इ.स.१७९२ ते १८५८ या कालखंडातील ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभाराचा ऐतिहासिक आढावा,ज्यात ब्रिटिश सरकारच्या अधिपत्याखाली(१८/५)
भारतीयांना कशा हालअपेष्टा भोगाव्या लागल्या त्यावर परखड भाष्य डॉ.आंबेडकरांनी स्पष्ट केले आहे.(२) The Evolution of Provincial Finance in British India – ब्रिटिश भारतातील प्रांतिक वित्ताची उत्क्रांती यामध्ये प्रामुख्याने इ.स.१८३३ ते १९२१ या कालखंडातील ब्रिटिश भारतातील केंद्र(१८/६)
शासन व घटक राज्ये यांच्यातील आर्थिक संबंधाचे चिकित्सक विश्लेषण जे केंद्र आणि राज्याच्या आर्थिक संबंधाच्या बाबतीत महत्वपूर्ण आहे.(३)The problem of the Rupee: its origin and Its Solution– भारतीय रुपयाचा प्रश्न:उद्गम आणि उपाय या प्रबंधात भारतीय अर्थव्यवस्थेच्या घडीसाठी (१८/७)
उपाययोजना बाबतीत अतिशय सूक्ष्म आणि चिकिस्तक पद्धतीने मांडणी केली आहे.‘भारतासाठी सुयोग्य चलन पद्धती कोणती?’आर्थिक धोरणे या व त्या काळाच्या गहन प्रश्नांची चर्चा करणारा अत्यंत मौलिक असा अर्थशास्त्रीय दस्तावेज आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या स्थापनेत (१८/८)
नेमके काय योगदान आहे हे महत्वाचे आहे.भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास आणि सुधारणा करण्यासाठी १९२४-२५ मध्ये ब्रिटिश सरकारने रॉयल समिती नेमली होती.त्यालाच Hilton Young Commission असेही म्हटले जाते. या समितीकडून अर्थव्यवस्थेवर बोलण्यासाठी डॉ.आंबेडकरांना आमंत्रित केले होते आणि (१८/९)
विशेष म्हणजे त्या समितीतील प्रत्येक सभासदांकडे The problem of the Rupee हे पुस्तक होते.भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रत्येक सभासद हा या पुस्तकाचा संदर्भ म्हणून उपयोग करू पाहत होता हे पाहून डॉ.आंबेडकर हर्षित झाले डॉ.बाबासाहेब आंबेडकर या समितीसमोर भारतीय चलनात असलेल्या(१८/१०)
अडचणी व त्यावरील उपाय,बँकिंग कार्यपद्धती कशी असावी,वित्तीय धोरण,चलनाचा मापदंड काय असावा,सामूहिक शेतीव्यवसाय,आर्थिक धोरण,जमीनदारी पद्धती,जमीन कर या सर्वांचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम,सर्वात महत्वाचे चलन विनिमय व्यवस्थेत ‘सोने’ हा मापदंड मानला पाहिजे असे त्यांनी ठासून (१८/११)
सांगितले.पहिल्या महायुद्धानंतर १९३५ साली ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली असलेली भारतीय अर्थव्यवस्था सुरळीत चालू राहावी,म्हणून भारतीय रिझर्व्ह बँक स्थापन करण्याचे ठरले. आणि ही बँक Hilton Young Commission या समितीच्या तपशील लक्षात घेऊन स्थापन करण्यात आली.(१८/१२)
बाबासाहेबांनी लिहलेल्या वरील तीनही पुस्तक प्रबंधाचा उपयोग हा ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या’ स्थापनेचा पाया ठरला आणि ही मध्यवर्ती बँक अस्तित्वात आली.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सुचवलेले मार्गदर्शक तत्वे आणि कार्यप्रणाली यावर आजही ही बँक तटस्थ उभी आहे.१ एप्रिल १९३५ मध्ये बँकेची (१८/१३)
स्थापना करण्यात आली खरी मात्र १९४९ मध्ये ही खऱ्या अर्थाने भारतीयांच्या ताब्यात घेण्यात आली.बाबासाहेब हे किती महान अर्थशास्त्रज्ञ होते हे यावरून लक्षात येईल.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८नोव्हेंबर२०१६ साली ५०० व १००० रू.च्या नोटांचे विमुद्रीकरण केले.ही मूळ संकल्पना (१८/१४)
बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या Problem of the Rupee या पुस्तक प्रबंधामधून घेण्यात आली होती.सेवायोजन कार्यालयांची Employment Exchange ची स्थापना,Skill Development ची पायाभरणी याचे संपूर्ण श्रेय डॉ.आंबेडकरांना जाते. त्यांच्यामुळेच ही भारताला देणगी लाभलेली आहे.“भारताचे महान(१८/१५)
अर्थशास्त्रज्ञ डॉ.अमर्त्य सेन ज्यांना अर्थशास्त्रामध्ये ‘नोबेल पारितोषिक’ मिळाले आहे ते असे म्हणतात.“डॉ.आंबेडकर हे अर्थशास्त्रात माझे वडील आहेत.त्यांच्याऐवढा जागतिक कीर्तीचा महान अर्थशास्त्रज्ञ होणे नाही.”लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स विद्यापीठात (१८/१६)
डॉ.आंबेडकरांचा पुतळा बसविण्यात आला आहे. त्याचबरोबर ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासन’ देखील चालू करण्यात आले आहे.
जगाने बाबासाहेबांचा खूप मोठा यथोचित सन्मान केला. मात्र भारताने RBI बँकेच्या स्थापनेपाठीमागील सर्वात महान योगदान बाबासाहेबांचे असताना त्यांचा पाहिजे तेवढा सन्मान(१८/१७)
केला नाही.भारतासाठी ही फार मोठी दुर्दैवी बाब आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते. #ThanksPhuleAmbedkar . #JaiBhim 💙 #ThanksPhuleAmbedkar . #JaiBhim 💙 #ThanksPhuleAmbedkar . #JaiBhim 💙 #ThanksPhuleAmbedkar . #JaiBhim 💙 #ThanksPhuleAmbedkar . #JaiBhim 💙 #ThanksPhuleAmbedkar (१८/१८)

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Yogesh.R.Sathe

Yogesh.R.Sathe Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @YogeshS1414

Apr 1
#ThanksPhuleAmbedkar
#JaiBhim 💙
जोतीराव - वास्तविक विचारअंती असें ठरतें की ब्राह्मण लोक हे समुद्राचे पलीकडेच जो इराण देश आहे त्या देशांतील मूळचे राहणारे होत.पूर्वी त्यास इराणी किंवा आर्य लोक म्हणत असत. असे कित्येक इंग्लिश ग्रंथकारांनी त्यांच्याच ग्रंथावरून सिद्ध केले आहे. (७/१)
प्रथम त्या आर्य लोकांनी मोठमोठ्या टोळ्या करून या देशांत येऊन अनेक स्वाऱ्या केल्या व येथील बहुतेक राजांच्या मुलुखात वारंवार हल्ले करून मोठा धिंगाणा केला.पुढे वामनाचे मागून आर्य लोकांचा ब्रह्मा या नावाचा मुख्य अधिकारी झाला.त्याचा स्वभाव फार हट्टी होता.(७/२)
#JaiBhim 💙
त्याने आपल्या कारकीर्दीत येथील आमच्या मूळ पूर्वजांस रणांगणी जिंकून आपले दास केले; व त्याने आपले लोक आणि हे दास या उभयांतामध्ये हमेशा भेद रहावा म्हणून अनेक त-हेचे नेम बांधिले.ह्या सर्व कृत्यांवरून ब्रह्मा मेल्यानंतर आर्य लोकांच्या मूळच्या नांवाचा आपोआप लोप होऊन (७/३)#JaiBhim 💙
Read 7 tweets
Nov 18, 2020
#उठा_भीमाच्या_लेकरानो_समाजाचे_होतकरू_लेकरांचे_बळी_पडत_आहे.
१० नोव्हें २०२० रोजी मयत समाधान शिंदे यांनी आत्महत्या केली अशी बातमी वाऱ्यासारखी सोशल मीडियावर पसरली त्याचे कारण असे की,मयत समाधान हा गणेश मोरे नामक व्यक्तीच्या ट्रॅक्टर वर ड्रायव्हर म्हणून काम करीत होता.(१७/१)
ऐके दिवशी तो ट्रॅक्टर चोरीला जातो आणि त्याचा मालक मयत समाधान वर संशय घेत गणेश मोरे चे अन्य सहकारी धनंजय गुंड,काका सुद्रिक,नाना गायकवाड यांच्या सह कारखान्याचे कर्मचारी गावडे,काळे यांनी पोलिस कर्मचारी म्हेत्रे यांना हाताशी धरून त्याला मारहाण करीत त्याला ट्रॅक्टर चोरला आहे,(१७/२)
असे म्हणत कबूल होय पण मयत समाधान शिंदे हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारा एक अनुयायी होता तो त्यांच्या मनगट शाही ला काही केल्याने बळी पडला नाही,म्हणून त्याला त्या ९ नोव्हेंबर २०२० च्या रात्री पोलिसांनी जबाब घेऊन सोडून दिले.(१७/३)
Read 18 tweets
May 31, 2020
#संकलित
रणरागिणी #कोंडाबाईचा भीमपराक्रम - ज्या काळात महिलांना केवळ चूल आणि मूल सांभाळण्याची जबाबदारी रूढी-परंपरेने सोपविली होती,त्या काळात पाच महिन्यांची गरोदर असलेल्या एका महिलेने निधड्या छातीने हल्लेखोलांशी दोन हात केले.पोटात वाढत असलेल्या अंकुरासह स्वतःच्या(१/९)
जीवाची पर्वा न करता डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे प्राण वाचविले.ती महिला आता १११ वर्षांची झाली.तिचे नाव आहे कोंडाबाई कांबळे.या रणरागिणीचा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सत्कार झाला.१९३८ सालची ही गोष्ट.संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या लढाईत उतरला.(२/९)
अशातच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या गावी सायंकाळी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.गावातील चावडीवर आयोजित कार्यक्रमात बाबासाहेब येताच महिलांनी त्यांना कुंकू लावून औक्षण करण्याचा प्रयत्न केला. या वेळी 'बायांनो,मला कशाला हळद-कुंकू लावता?'(३/९)
Read 9 tweets
Feb 18, 2020
पुन्हा एकदा महाराष्ट्राचे अभिनंदन।गर्व वाटतो मनुवादी आणि सडलेल्या मानसिकता असलेल्या लोकांमध्ये राहतो त्याचा।पुन्हा एकदा निर्दयी महिला अत्याचार केला त्याबद्दल तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहे।आधी खैरलांजी केलं मग कोपर्डी ,अमरावती, औरंगाबाद केलं आणि पुन्हा एकदा औरंगाबाद केलं,(१/५)
आता बाकीचे जिल्हे राहिले आहेत तिथे याच्यापेक्षा जास्त भयंकर अत्याचार झाले पाहिजे।त्यासाठी मनुवादी आणि सडलेल्या मानसिकता असलेल्या लोकांना शुभेच्छा।तुम्ही तुमच काम एकदम निष्ठेने करतात आणि आम्ही चांगले लोक पण तुमच्या पेक्षा कमी नाहीत,आम्ही हिंदू,मुस्लिम,open, obc, sc, st...(२/५)
यावर चांगले भांडण करतो, आम्ही दुसऱ्यापेक्षा कसे जास्त श्रेष्ठ आहोत हे दाखवण्यासाठी दुसऱ्याला खाली दाखवायला आम्ही अजिबात कमी पडत नाही,आमचा सर्वात मोठा प्रश्नच जातीचा आहे ,बाकीच आम्हाला काही देणं घेणं नाहीजेव्हा आमच्या जातीच्या महिलेवर अत्याचार होणार आणि तो पण दुसऱ्या जातीच्या(३/५)
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(