The Lone Wolf Profile picture
May 9 19 tweets 8 min read
आजच साईबाबा याविषयी बऱ्याच पोस्ट बघितल्या व लोकांच्या कमेंट बघितल्या. परंतु खालील गोष्टीची कल्पना त्यांना असते की नसते हे माहीत नाही.
1. लोकांना वासुदेवानंद सरस्वती म्हणजे टेंबे महाराज माहिती असतील तर स्वतः टेंबे महाराज यांनी साईबाबा यांना नारळ पाठवल्याचे लिखित रूपात आढळले आहे.
2. लोकमान्य टिळक यांनी ज्याप्रमाणे शेगावचे गजानन महाराज व गोंदवलेकर महाराज यांचे आशीर्वाद आपल्या स्वराज्यस्थापनेच्या कार्यासाठी घेतले होते तसेच ते शिर्डी येथे जाऊन साईबाबांना भेटल्याचे देखील आढळते.

3. नाशिकचे अत्यंत महान नाथपंथी योगी श्री ब्रह्मभूत गजानन महाराज गुप्ते यांनी
स्वतःच्या आत्मचरित्रात " आत्मसाक्षात्कार मार्ग प्रदीप" यामध्ये लहानपणी साधनेच्या कालखंडात ते शेगाव येथे गजानन महाराज त्याचप्रमाणे मारुती महाराज शिर्डी येथील साईनाथ महाराज यांच्या सहवासात राहिल्याचे त्यांनी स्वतः सांगितले आहे.
4. याच श्री गजानन महाराज गुप्ते यांचे श्रेष्ठ शिष्य नानामहाराज पाठक व पुणे येथील श्री दादा महाराज आंबेकर यांच्या स्वतःच्या आत्मचरित्रात " सद्गुरु चरणा खाली" या पुस्तकामध्ये शिर्डी येथे जाऊन साईबाबा यांच्या समाधीची स्वतः पूजा केलेली आढळते व त्या ठिकाणी मोठा साईबाबांचा फोटो स्थापन,
केल्याचे देखील आढळते.
5. शेगाव येथील अत्यंत महान संत श्री गजानन महाराज यांच्यावर लिहिलेला सर्वोत्तम ग्रंथ ज्याचे पारायण बहुतांश गजानन महाराज यांचे भक्त करतात तो म्हणजे "गजानन विजय". या ग्रंथाचे लेखक आहेत दासगणू महाराज. व दासगणू महाराज हे एकमेव श्री साई बाबा यांचे शिष्य होय.
माझा दास गणू एका बाजूला व बाकी सर्वजण एका बाजूला अशा पद्धतीने साईबाबांनी नेहमीच दासगणू यांना वागवले. वामन शास्त्री इस्लामपूरकर हे खरेतर दासगणू महाराज यांचे अनुग्रह देणारे गुरु. परंतु त्यांच्याच दृष्टांत गाणे दासगणू महाराज हे साईबाबांच्या चरणी त्यांचे भक्त बनून राहिले
6. साईबाबा यांच्याकडे येणार्‍या जवळपास प्रत्येक किंवा भरपूर लोकांना साईबाबा यांनी विष्णुसहस्त्रनाम जपण्यास सांगितले होते. त्याने स्वतः समोर बसवून लोकांकडून विष्णुसहस्त्रनाम याची पारायणे करून घेतलेली आहेत. आषाढी कार्तिकी एकादशी ला प्रचंड मोठी भजने करवून घेतलेली आहेत.
7. साई चरित्र यामध्ये बऱ्याच ठिकाणी अद्वैत वेदांत वाचतो आहे की काय अशी भावना तयार होऊ शकते अशा पद्धतीने ब्रम्हा माया व त्या ब्रह्माचे स्वरूप मांडलेले आहे त्याचप्रमाणे सगुणभक्ति सुंदर गुणवत्तेकडे कसे जावे लागते त्याचे नितांत सुंदर वर्णन केलेले आहे. हेमाडपंथी या सत्पुरूषाने साई
चरित्र लिहिलेले आहे.
8. साईबाबा यांच्या वागणुकीत बऱ्याच इस्लाम किंवा सोपे संबंधी गोष्टी होत्या यात वाद नाही परंतु त्याच बरोबर आपल्याकडे आलेल्या मुस्लिमांना त्यांना जे काही अर्पण करायचे होते ते हनुमानाच्या देवळात जाऊन हनुमानाला अर्पण करा कारण हनुमान आणि अल्ला एकच आहेत हे सांगणारे
तेच होते.
9. अक्कलकोट येथील स्वामी समर्थ यांनी देखील साईबाबांचा उल्लेख अत्यंत आदराने केलेला आहे.

आता मुद्दा हा येतो की त्यांचे वागणूक काय होते उदाहरणार्थ ते चिलीम ओढत असत किंवा कधी दारू पीत असत किंवा मांसाहार तर नक्कीच करत असत. परंतु कितीजणांना माहीत आहे की स्वामी विवेकानंद
हे स्वतः मांसाहाराचे भोक्ते होते व जेव्हा शाकाहार आणि मांसाहार एकत्र असतील त्या वेळेला ते मासाहार जास्त निवडायचे. आणि ते देखील अत्यंत अभिमानाने. त्यांना स्वतःलाच अलीम केव्हा पाईप किंवा सिक्रेट या गोष्टी प्रचंड पसंत होत्या. नाशिकचे ब्रह्मीभूत श्री गजानन महाराज गुप्ते
हे तर रोज दारू प्यायला बसायचं किंवा एका वेळेला दोन ते तीन सिक्रेट फुकट बसायचे आणि त्यांच्या आत्मचरित्रात या सर्व गोष्टी त्यांनी स्वतः लिहिलेले आहेत
शंकर महाराज यांचे आज 75 वे समाधी देण आहे तेदेखील चार मिनार सिग्रेट ओढण्यासाठी प्रसिद्ध.
त्यामुळे आपण आत्मसाक्षात्कार पर्यंत पोहोचलेल्या संताला कोणत्या आधारावर मोजायला जायचे हा प्रत्येकाचा आपला प्रश्न आहे. काही काळानंतर संत कबीर यांच्यावर देखील अशा प्रकारचे आरोप होतील याची मला शंका नाही.
मुळात साईबाबा या व्यक्तीबाबत त्या काळात देखील कोणत्याही माणसाला त्यांच्याबद्दल कोणतेही माहिती नव्हते उदाहरणार्थ त्यांचे आई वडील कोण किंवा त्यांचे गुरु कोण किंवा ते कोणत्या घरात जन्माला आले कोणत्या गावांमधून आले यापैकी काहीही नाही. तर मग कोणत्या आधारावर आता हे सिद्ध केले
के साईबाबा मुळात मुस्लिम होते व त्याने फक्त मुस्लिम धर्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी हे सर्व ढोंग केले. असे असेल तर महान भक्त दास गणू किंवा लोकमान्य टिळक किंवा स्वामी समर्थ किंवा टेंबे महाराज हे सर्व तुमच्यासमोर किंवा तुमच्या ज्ञाना समोर मूर्ख आहेत असे म्हणावे लागेल.
असो शेवटी आपण नक्की किती अभ्यास करतो आणि किती नाक्यावर बसलेल्या गप्पांना ऐकून त्यांचे अनुकरण करून त्याच बोलायचा प्रयत्न करतो याचा भाग आहे हा.
ज्यांना पटेल त्यांचे ठीक आहे नाही पटणार तेदेखील ठीक आहे.
#साईनाथ
#नाथपंथ
#mayuryhelonewolf
सुफी*

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with The Lone Wolf

The Lone Wolf Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @mayurjoshi999

May 8
एक अथांग समुद्र. यामध्ये असंख्य लाटा.

एक नवीन छोटीशी लाट या समुद्रा मध्ये तयार झाली. तिला पण बेबी लाट म्हणू.

इकडे तिकडे बघून इतके मजा वाटली तिला. छोटे बुडबुडे कायम इकडे तिकडे येत होते. फेस असलेले पाणी. त्या छोट्या बुडबुडे बघून लाटेला वाटू लागले मी
बघा किती मोठी तुमच्यापेक्षा. एवढ्यात कैक मोठ्या लाटा देखील दिसल्या मग थोडीशी हिरमुसली. हळूहळू ही पण मोठी होत होती.

तेवढ्यात तीचे लक्ष किनार्‍यावर गेले. तेथे अनेक लाटा जाऊन जमिनीवर आपटत होत्या किंवा दगडांवर
आपटत होत्या आणि फुटून नष्ट होत होत्या.

तेवढ्यात तिला शेजारी एक मोठी लाट दिसली..

बेबी लाट: काय हो या लाटा किनाऱ्यावर जाऊन मरतात का?

मोठी लाट: हो कोणतीही लाट किनाऱ्या वर जाऊन आपटून फुटून नष्ट होऊन जाते.
Read 15 tweets
May 8
माझ्या आयुष्यात पहिला काढलेला फोटो.
माझ्या आईचा. तिसरीत असताना.
ती चिडली होती काही कारणाने माझ्यावर. आणि मी माकड उड्या मारत बसलेलो
तेव्हा बाबांनी हळूच आमचा कॅमेरा दिला माझ्या हातात. आणि हा फोटो क्लिक झाला. #MothersDay #MotherDay2022 #photo #PhotoOfTheDay
त्यानंतर राजधानी एक्स्प्रेस मध्ये 1999 मध्ये हा काढलेला
आई आणि मुलगा
आजी आणि नातू
Read 5 tweets
May 7
बरेच लोक स्थळ जुळवणे, लग्नामध्ये मध्यस्थी करणे वगैरे वगैरे काम करत बघितलेले आहे. बसल्या बसल्या कुंडल्या जुळवत बसणे. व आपण दोघांचे लग्न जुळवून किती मोठे काम केले आहे असे अत्यंत मानभावीपणाने समजतात आणि सांगतात.
त्यांच्याकडूनच इन्स्पिरेशन घेऊन एकटे, single, bachelor राहण्याची इच्छा असणाऱ्या मुलामुलींसाठी सल्ला *केंद्र किंवा *कोर्स उघडले पाहिजे असे वाटायला लागले आहे 😒😒😒🤣🤣
या कोर्समध्ये खालील गोष्टींचा समावेश करावा असे वाटते.

श्रींच्या कृपेने..
1. एकटे राहणे फायद्याचे कसे आहे हे त्या इच्छुक मुलाला आणि मुलीला किती समजले आहे हे बघून ते पूर्णपणे मनावर बिंबवणे.😁
2.आजूबाजूच्या लोकांना व्यवस्थित उत्तरे देऊन त्यांची तोंडे बंद कशी करावी याचे प्रशिक्षण.
Read 7 tweets
May 6
शंकराचार्य जयंती:
अद्वैत वेदांत हे म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानातील एक उच्च शिखर. परंतु एक काळ असा आला होता ज्या वेळेला याच तत्वज्ञानावर इतर अनेक शाखा एका प्रकारचे टीका करत होते. तर टीकेचे महत्त्वाचे कारण म्हणजे अद्वैत वेदांत या मधील "माया" ही संकल्पना.
अद्वैत वेदांत मानणाऱ्या व्यक्तीला मायावादी असे देखील म्हटले जात असे. भारतातील सनातन धर्मामध्येच अनेक शाखा उदाहरणार्थ विशिष्ट अद्वैतवाद किंवा बुद्धीजम ज्या वेळेला अत्यंत लोकप्रिय होऊ लागला होता त्यानंतर अद्वैत वेदांतवर बरीच टीका झाली.
आणि पुन्हा अद्वैत वेदांत आला भारतीय तत्त्वज्ञानातील शाखांमध्ये उच्च जागेवर ठेवण्याकरता पुन्हा त्याच अद्वैत गाणे मानवी शरीराने अवतार घेतला. ते म्हणजे आद्य शंकराचार्य. वयाच्या आठव्या वर्षीच शिवोहम् ही जाणीव झालेली आत्मसाक्षात्कार व्यक्ती म्हणजे शंकराचार्य.
Read 17 tweets
May 5
कोणत्याही नात्यात सगळ्यात महत्वाची जाणीव असली पाहिजे ती म्हणजे

I love you
But I don't need you.

ज्याला वरचे वाक्य पटू शकते किंवा त्याचा मतितार्थ अगदी नीट समजू शकतो. तो माणूस बेस्ट रेलेशन देऊ शकतो आणि बेस्ट एकटा पण राहू शकतो.
कोणत्याही रिलेशन अत्यंत जबरदस्त आणि पूर्णपणे यशस्वी होण्यासाठी फक्त वर जे काही लिहिलेले आहे तो एकच आणि एकच रस्ता आहे.

कोणी आयुष्यामध्ये आल्यामुळे तुम्हाला आनंद होत असेल तर ती एक प्रकारची गरज असते. कोणीतरी दुसरी व्यक्ती जेव्हा तुम्हाला आनंद देते त्या वेळेला तो
आनंद कधी ना कधीतरी संपणारा असतो हे नक्की.
त्यामुळे ज्या वेळेला स्वतःच्या आतून आपण स्वतः आनंदस्वरूप आहोत हे समजेल त्यावेळेला दुसऱ्या मुळे आनंदी होण्याची गरज संपते व एक वेगळाच प्रवास चालू होतो. समोरील व्यक्ती आपल्या आयुष्यात आली आहे म्हणून किंवा तिचे काही विचार किंवा वागणे आपल्याला
Read 6 tweets
May 4
आज जंगली महाराज रस्त्यावर थांबलो आणि एका हॉटेल मध्ये जाऊ लागलो. एवढाच दोन मॅनेजमेंट वगैरे करणाऱ्या मुली असतात, ज्या काही survey वगैरे करतात अश्या मुलींनी मला थांबवले. काहीतरी गळ्यात मारणार असे वाटत होते तेव्हाच त्यांनी सुरुवातीला सांगितले की आम्ही काहीही विकायला आलेलो नाही
त्यानंतर त्याने बरीच मोठी कहाणी सांगून त्यानंतर एक पुस्तक दाखवून त्यामध्ये बरेच फोटो दाखवून एकंदरीत हे सांगायचा प्रयत्न केला की भारतात एकूण किती मुलांचा जन्म झाल्यानंतर लवकर मृत्यू होतो. UNICEF त्यावर कसे काम करत आहे व त्याद्वारे तुम्ही कसे पैसे डोनेट करू शकता जेणेकरून
त्या मुलांचे आयुष्य वाचले जाऊ शकते. वगैरे वगैरे

त्या वेळेला माझ्या मनात विचार आला तो हा

1. UNICEF सारखे संघटना इतकी प्रचंड मोठी आहे व तिला इतका मोठा फायनान्स देखील मिळत असतो तरी देखील रस्त्यावर जाऊन भीक मागायची गरज काय?
Read 8 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(