#Thread भाग -१ पेशवे-सर्वश्रेष्ठ कपटपटु
पेशवे म्हटले की सामन्यात: आपल्याला अटकेपार झेंडे, पानिपत, बाजीराव मस्तानी, चिमाजी अप्पा, बारभाई कारस्थान, ध चा म,
काका मला वाचवा अशा खुप गोष्टी आठवतात.
पण यापलीकडेही पेशव्यांची लुप्त ओळख ही सर्वश्रेष्ठ कपटपटु उर्फ कटकारस्थानी पेशवे होय.
२) सध्या पेशव्यांच्या वैचारिक वारसदारीचं बांडगुळ फोफावत चाललं आहे. कारण उत्तर पेशवाईमधे जेवढे हाफ डझनभर बाजीरावांचे असले नसलेले पराक्रम आपल्या सोयीनुसार लिहण्याचा जो सपाटा चालला त्याने सामन्य रयत किंवा इतिहासात रुची ठेवणारे,
३) असे सर्वजन भ्रमित झाले. या पेशवाई हितसंबंधी कलम कसाईंनी पेशव्यांचे असे काही पराक्रम लिहुन ठेवले की त्यांच्या पराक्रमाच्या तेजापुढे, कुंतीपुत्र भीम अर्जुन, राम लक्ष्मण, अंगद, मारुती, अशा सर्व थोर वीरांच्या तेजस्वी तलवारीच-धनुष्याच, गदेचं पाणी पाणी झाल्याशिवाय राहीलं नसणार..
४) शस्र आणि शास्र यांचा अलौकिक संगम जुळवत जणु ब्रम्हदेवानेच आळीपाळीने पिढी दरपिढी बाळाजी विश्वनाथांच्या घरी जन्म घेतला असावा, अशी शक्यता बळावतेच.
ह्या पेशवाई कंपुची लेखणी अशीच शाई ओकत राहिली तर इतिहासात पेशवाई म्हणजे चक्रवर्तीराज्य अशी समाज धारणा होईल.
५) पेशवाई म्हणजे समाजविघातक, स्वराज्यविनाशक, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील काळा नायटा अथवा गजरकण होय, जो पुढे त्यांच्या वैचारिक पैदाशीनी खाजवुन खरडून मोठा केला. आता त्यावर सत्यशोधनाचा जालीम मलम लावायचे काम तुम्ही आम्ही सामान्यजन करू शकत नाही हे ही खरे.
६ ) पण आपल्या सत्यशोधक लोकांनी त्याची योग्य तजवीज केली आहे, ती धुंडाळून आपण तीच वाचन मनन अवलोकन करणे फार गरेजचे तरच आपण यावर विस्तृतपणे बोलू शकतो अन्यथा मुखवाणी मधे पटाईत असलेले आपल्याला शब्दाच्या जाळ्यात केव्हाही अडकवू शकतात. पेशवे म्हणजे खुप मोठे प्रशासक या भाकड
७ ) कल्पनेला छेद देणारा, पेशवाईला छत्रपतींच्या विचारांची जोरदार उलट सलामी देणारा हा लेख - पेशवाईचा पहिला पेशवा म्हणजे बाळाजी विश्वनाथ हा मूळचा कोकणातील श्रीवर्धनचा तिथे कायस्थ प्रभु कुळकर्णी कडे कारकुनी करायचा, आपल्या जीवनाचा उत्कर्ष साधण्यासाठी हा कोकण सोडून घाटावर आला.
८) घाटावर, धनाजी जाधवांकडे सेवावृत्ती पत्करली, अवघ्या काही काळातच त्याने सातारच्या राजकीय लोकांशी बस्तान बांधले,
छत्रपती शाहूंच्या नाट्यशाळेतील वीरबाई गुलबाई यांच्या वशील्याने बाळाजी छत्रपतीकडे पोहचला. प्रसंगाचा सोळा अणे फायदे करणे व आपल्या हेतुपुढे कोणत्याही नैतिक कर्तव्याला
९) फाट्यावर मारणे यात पेशव्यांचा हात या धर्तीवर कोणी धरूच शकत नाही. पुढे बाळाजी शिकारीच्या क्षुल्लक कारणावरून जाधवांवर उलटला. आपल्या अन्नदात्या धन्याशी बेईमनी करणे या सर्व वेदआज्ञा गुंडाळून उकिरड्यावर फेकल्या असेच म्हणावे लागेल. नंतर चिटणीसांच्या शिफारशीच्या बळावर, -
१०) छत्रपती शाहूकडुन पेशवाईचे वस्त्रे मिळवली. बाहिरोपंत पिंगळ्याना रक्ताचा एकही थेंब ना सांडवता कान्होजी आंग्रेकडुन सोडवून आणल्याबद्दल ही पेशवाई त्याना दिली असेही म्हणतात. पण (बाळाजी विश्वनाथाने पेशवाई मिळवली ती, आपल्या कारकुनीच्या बळावर, शौर्याच्या पराक्रमाच्या बळावर नव्हे.)
११) असा उल्लेख राजराम शास्त्री आपल्या मराठ्यांच्या संबंधाने चार उद्गार या ग्रंथात करतात. नंतर पुढच्या पिढीत त्यांचा पुत्र बाजीराव, खटाला सवाई खट निघाला ह्याच्या राजकाळात मराठेशाही भरभराटीला नक्कीच आली, पण त्याच्या या उदात्त कर्मामागे राष्ट्रीय भावनेचा चिखल जास्त साचला.
१२) याची वाणी ओजस्वी होती, थोड्या कालावधीत छ.शाहूकडून मुख्य प्रधान, सेनापती हे अधिकार प्राप्त केले, व स्वतंत्रपणे कारभार हाकू लागला. याने शाहूंराजेंचा हस्तक्षेप नसावा यासाठी पुण्याला राजधानी हलवली, आणि राजरोसपणे स्वतःला मराठाशाहीचा राजा मानून फर्मान सोडू लागला.
१३) मराठा सरदारांना लुटारू बनवण्याचा कुचाळ प्रघात यानेच पाडला. हे पेशवे छत्रपती समोर आदराने वागत, व मागे कपटीकृत्य करत. याचा चिमाजी अप्पाने छत्रपती शाहूंचा तीन वेळा अपमान केला. स्वामींभक्ती काय असते हे पेशव्याकडे सूक्ष्मदर्शिका लावून पाहिलं तरी दिसणार नाही.
१४) नंतर नानासाहेब यांची कारकीर्द सुरू होण्यापूर्वीच शाहू महाराज वारले, मग तर यांनी सगळेच स्वराज्य बळकावले. नानानी क्षत्रिय मराठेशाहीला ठार पाडुन, भटभिक्षुकशाही व्यवस्थेला नवीन च्यवनप्राश दिले. नानासाहेबाच राजकारण हे मंद विषाप्रमाणे परिणाम करणारं होत. कावेबाजपणा हेच शस्र.
१५ ) शाहुपत्नी माँ सकवारबाई ह्या फार धोरणी मुत्सद्दी पण त्यांचाही टिकाव लागू दिला नाही.
सकवारबाईंनी स्वराज्याला गेलेली प्रतिष्ठा प्राप्त करून दिली असती पण, हे संभव न होऊ देणे यातच नानाच सौख्य सामावल होत. शास्रपुराणांचा आधार देत राणीच्या भावाला नरकाची भीती दाखवत राजपत्नी माँ,-
१६) सकवारबाईंना शाहूंच्या पादुकांच्या सरणावर जिवंत जाळली. यावर आचार्य राजाराम शास्त्री यांचे उद्गार पहा- 'नानासाहेबाने राजपत्नीशी केलेला कावा खरोखरीच आम्हा ब्राम्हणानां खाली पाहावयास लावणारा आहे'
असे हे पेशवे नंतर राजसत्ता मिळाल्याने भयंकर माजले, पदोपदी छत्रपतीचा अपमान करत.
१७) आपल्या दरबारी जातिवंत कुलवंत शूर मराठ्यांना न ठेवता आपले हितसंबंध जपणाऱ्याला ठेवत, शिंदे होळकर तर खुप कर्तृत्ववान पण रक्ताचा ओढा रक्ताकडे ओढला जाऊन त्यानी पेशव्यांना खड्ड्यातल्या विटी प्रमाणे कोलण्यास सुरवात केली. त्यामुळेच यांनी मराठे सरदारांना विविध ठिकाणी विखरून ठेवले.
१८ ) स्वराज्यसंस्थापक छत्रपतीनी उभारलेले सुसज्ज आरमार हे बलाढ्य युरोप राष्ट्राची धडकी भरवत, मात्र त्याच वाटोळं यांनीच केल, तेही इंग्रजांची मदत घेऊन. कोल्हापूर आणि सातारा गादीचा परस्परांशी असलेला जिव्हाळा नष्ट करण्याचे हर यत्न या नानानी केला. दोन घरात शक्य होईल तेवढा बेबनाव केला
१९) आपल्या पेशवाईमध्ये महत्वाच्या हुद्द्यावर आपले चित्पावन जातभाई आप्तेष्ट लोकांस बसवले. रघुजी भोसल्याना मोठी मोठी वचने मुलुख देऊन गार पाडले. मराठा सरदारांमध्ये फूट पाडण्यासाठी जे काही करता येईल ते त्यानी यशस्वी करून दाखवले व महाराष्ट्र मंडळामध्ये कपटद्युत काय असते हे दाखवले.
२० ) शाहूराजे नंतर चलाख स्वभावचा राजा गादीवर बसणार नाही यात पेशव्यांनी आपले षड्यंत्री कसब पणाला लावले, ते एवढे की शकुनी स्वतः येऊन यांच्या पायावर लोटांगण घालेल. ह्या स्वामीभ्रष्ट पेशव्यांनी छत्रपतीना देवळाताला महादेव करून सोडले व स्वतः नंदीबैलाप्रमाणे कारभार शिंगावर घेतला..
असे हे पेशवे यांच्या कपटकारकीर्दीवर लिहायच ठरवले तर 100 महाभारत होतील एवढ्या यांच्या कटकपटकथा आहेत. तुर्तास या भागाला विराम देतो..
संदर्भ - मराठ्यांच्या संबंधाने चार उद्गार- राजाराम शास्त्री भागवत, व प्रबोधनकर

हा थ्रेड इतरांनही शेअर करा जेणेकरून सर्वाना कळेल.👍 #जय_शिवराय

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with विजय गिते-पाटील.

विजय गिते-पाटील. Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @kingsmanT11

May 20
#Thread - अफजलखान वध
दगाबाज विरुद्ध दगलबाज..⚔️
१) अफजलवध म्हणजे आदिलशाहीचा पालापाचोळा करून टाकणारी ऐतिहासिक घटना. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ याचा सर्वश्रेष्ठ दाखला महाराजांनी सबंध जगाला दाखवून दिला व स्वराज्याची पेटती मशाल आणखी बुलंद केली. स्वराज्याचा मार्गही सुकर केला.
२) अफजलखान वध आपण चित्रपट-नाटक पोवाडा, पुस्तकाच्या किंवा आपल्या थोरां मोठ्यांच्यां वाणीने ऐकला असेल. पण इतिहासातील काही बारकावे बघत अफजलखान वधाचा हा व्यापक आढावा.
हा थ्रेड मोठा जरी होणार असला तरी छत्रपतींच्या शौर्यकीर्तिपूढे तो केवळ सुक्ष्मंच असेल.
३) छत्रपती महाराजांचे पराक्रम सारखे वाचावे वाटतात, त्यातील प्रत्येक चित्र, चलचित्र डोळ्यापुढे येतात. अशा सर्व शिवइतिहास वाचकप्रेमीनी जरूर वाचावे. शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ, दगलबाजी म्हणजेच मुत्सद्दीपणाची प्रेरणा आपल्या जीवनात घ्यावी. अशी विनंती.
Read 34 tweets
May 4
#Thread भट्ट सांगे आणि मठ्ठ ऐके - भाग २

परशुराम नाव ऐकलं की, आपल्याला कोण आठवत ? कुऱ्हाड आणि धनुष्य घेतलेला एक दाढी वाढलेला साधु, जो क्षत्रिय वेशात आहे.
यांची ख्याती हिंदु धर्मात आईच मुंडक उडवणे
व तब्बल २१ वेळ क्षत्रियांना खल्लास करणे.
यांच्या हातून कधीही समाजसेवा घडली नाही.
२)वर्णवर्चस्वावादी कलम कसाईंनी रक्त'दौतीत कुऱ्हाड बुडवून लिहलली भिक्षुक दशावतारी माहात्म्यकथा वाचा - परशुराम एवढा का पिसाळला की त्याने राष्ट्रातील सबंध क्षत्रीयक्षय केला.- सहस्रार्जुन नावाचा एक सर्वगुणसंपन्न त्रिलोकमान्य राजा होता, अस स्वतः मी म्हणत नाही हे उल्लेख पुराणात आहे.
३)सहस्त्रार्जुनाची निंदा करणार एकही अक्षर पुराणात नाही, एवढा तो महान राजदंडधारी
भुपती होता, त्याच्या तोडीला जर कुणाला उभं करायच असेल तर खुद्द बळीराजाच पात्र आहे.
अशा त्रिभुवनप्रिय नृपतीला ठार करायला ईश्वर अवतार घेतो, हे तर अवतारभानगडीच्या थोबाडीत मारणार तर्क आहे, म्हणजे काहीही.
Read 26 tweets
Mar 22
#Thread_१ - भट्ट सांगे अन मठ्ठ ऐके.
१) पोथी पुराणात भटांचे माहात्म्य प्रचंड गुळपाक घालुन तयार केले आहे की कल्पना केलेली बरी. आता भटी टाळक्यातुन निघालेली कथा वाचा > सरस्वती नदीवर सगळे गंजड गोसावडे ऋषी मुनी बसले होते ब्रम्ह, तप, ज्ञान, योग,कर्म या वादविवादाच्या सनाळ्या ठोकत..
२) त्यांच्यात चर्चा सुरू झाली त्रिदेवांपैकी
नक्की कोण श्रेष्ठ ? ब्रम्हा, विष्णु की महेश.
मग त्यांच्यात एक अतिमहान तपस्वी होते, त्यांच नाव भृगू हे एक अतिप्राचीन महर्षी व वैदिक सूक्तद्रष्टा, कृत्रिम रीत्या अग्नी निर्माण करण्याचा शोध प्रथम यानीच लावला. एवढे ते थोर शास्त्रज्ञ होते.
३) पहिला मनुने तयार केलेल्या कोणीतरी प्रजापतीचं वीर्य म्हणे अग्नीत पडलं आणि हे लगेच चमत्कारिकरित्या जन्मले, ( असा याचा जन्म ) भृगू साहेब हे स्वायंभुव मनुचे जावई, शिवशंकराचे साक्षात साडु व दक्षाच्या दोन कन्यांचे पतीराज असल्याचे, महाउल्लेखनीय उल्लेख आहे ग्रंथ गाठोड्यात.
Read 13 tweets
Dec 29, 2021
#अवतार
हिंदुस्थानात ईश्वर-अवतारा विषयी एवढा गाढव-गोंधळ आहे की नुसती कल्पना केलेली बरी. तस पाहिले तर महान चरित्र आपल्याकडे अनेक वर्षांनी जन्म घेतात, आणि त्यातली सर्वोच्च व्यक्तिमत्व असलेल्या महान विभुतींना आपण मनाच्या देव्हाऱ्यात बसवुन त्यांच्यावर अमर्याद प्रेमाचा वर्षाव करतो.
एखादा थोर सदाचारी पुरुष दिसला की, लगेच त्याला कंठ कोरडाठाक पडेपर्यंत धजन्या-भजन्यात धन्यता मानली जाते. नंतर अतिशयोक्तीचा मिष्टक्रुर कहर करून त्याना आपल्या 'प्राणप्रिय त्रिदेवा पैकी कोणत्याही देवाच्या समतुल्य मानून, हे मत सरळसोटपणे ठोकून दिले जातं. हा बलिशपणा इथवर थांबत नाही.
पुढे मग त्या महाविभुतीला त्याच्या मोक्षकार्या नंतर ग्रांथिक स्वरूपात प्रस्तुत केलं जातं,आणि मग इथुन सुरू होते अवताराची विचका वाटणारी शिमगा-धुळवड, मग अवताराला आलय दिलं जातं, सध्या त्याला देवालय म्हणतो आपण. चिकित्सक वृत्तीचा संन्यास हा नैतिकरित्या मनुष्याला खिळखिळा करतो.
Read 11 tweets
Dec 28, 2021
तू प्रथम क्रमांकाचा भक्त दिसतोय.काय मनोरंजक कथा रंगवली,तू इथं ट्विटरवर काय करतोस ? बॉलिवूड मध्ये जा..तिथं जाऊन मोठा कथालेखक होशील..
अरे बंद करा हे लोकांना भडकवायचे रिकामे धंदे ,जीवनमरणाचा प्रश्न आहे इथं लोकांना महागाई मुळे जीव मेटाकुटीला आला आहे,
आणि तुझ्या फालटू स्टोरीमुळे.🤣😬
या महाप्रचंड हुशाराने,कथेची सुरवात थेट दंगलमय केली, जाळीदार टोपी आणि टिळा.
आणि मुख्य म्हणजे संघी-भटाळ लोकांच्या लेखी, यांचा खलनायक हा जाळीदार टोपी वाला असणार हे त्रिकालबाधित सत्य असल्याने,या कुकथेला बुद्धीहीन भक्ताड टोळीमध्ये जाणूनबुजून कौतुकास पात्र बनवून प्रसिध्दी देण्यात आली.
याची बनवाबनवी इथेच पकडली गेली की आमच्या हिंदू तरुणी ह्या टिळा लावल्याने समोरच्या व्यक्तीच्या प्रेमात ठार वेड्या होतात,
इथे असंख्य हिंदू तरुण टिळा लावतात,आणि असंख्य तरुण टिळे लावत नाही, मग अनेकांना प्रश्न पडला आहे की टिळे लावल्याने तरूण मुली आपल्यावर मोहित होतात का ?
Read 9 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(