#महत्वाचा_थ्रेड
छत्रपती संभाजीराजे यांनी महाआघाडीकडे राज्यसभेची उमेदवारी मागितली, काही दिवस वाटही पाहिली मात्र त्यांचा राष्ट्रवादी आणि शिवसेनेने अक्षरशः अपमान केला, जेव्हा पहिल्यांदा राज्यसभेचा विषय आला आणि राजेंनी सांगितलं की "मी अपक्ष फॉर्म भरणार आहे मला मदत करावी." तेव्हा+
राष्ट्रवादीचे शरद पवार म्हणाले आमचा उमेदवार निवडून येऊन उरलेली मतं आम्ही संभाजीराजेंना देणार! उरलेली? खरंतर उरलेली मतं हा शब्दच चांगला नाही, तुम्हाला द्यायची होती तर हक्काची उमेदवारी आणि तीही पहिली द्यायला पाहिजे होती. मात्र त्या स्टेटमेंट नंतर 24 तासांनी शरद पवारांनी पलटी मारली+
आणि शिवसेना सहाव्या जागेवर ज्यांना उमेदवारी देईल त्यांना आम्ही आमची मते देणार अशी घोषणा केली. म्हणजे संभाजीराजे यांना दिलेला शब्द 24 तासात फिरवला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर कमाल केली, थेट संभाजीराजे यांना अटी शर्ती आणि अल्टीमेटम देत दुसऱ्या दिवशी 12 वाजेपर्यंत मातोश्रीवर+
या दोरा बांधायचा आहे असा जणू आदेशच सोडला. त्याला राजेंनी पद्धतशीर कोलला तो भाग निराळा! पण त्यात अजून अशा अटी होत्या म्हणे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम करावं लागेल, सर्व बैठकांना हजर रहावं लागेल, पक्षाच्या प्रचारासाठी सक्रिय शिवसेनेचे म्हणून फिरावं लागेल. आणि हे सर्व मान्य असेल+
तर मातोश्रीला या आणि जर प्रवेश केला तरच उमेदवारी देणार आणि तीही सहाव्या नंबरची हा सेनेचा अजेंडा होता. त्याला संभाजीराजेंनी लाथाडला!
राजेंना महाआघाडी उमेदवारी देणार नाही हे आता उघड आहे, आणि शिवसेनेने तर आपला संजय पवार हा उमेदवारही काल जाहीर केला आहे, त्यानंतर मात्र संजय राऊत+
यांनी जे स्टेटमेंट दिले ते कानपिचक्या देणारे आहे, या संजय पवारांच्या उमेदवारी संदर्भात बोलताना राऊत म्हणतात, "संजय पवार हा मावळा आहे, आणि मावळे असतात म्हणून राजे असतात." याचा अर्थ राजेंना उमेदवारी तर मिळणारच नाही पण राजेंचा अपमानही केला.
मुळात ज्या शिवरायांच्या नावावर सेना इतकी+
वर्षे राजकीय पोळी भाजते त्यांना बिनशर्त आणि हक्काच्या जागी उमेदवारी द्यायला कसली अडचण आहे? मला तर वाटत होतं संजय राऊतांच्या जागेवर संभाजीराजे यांना उमेदवारी द्यायला हवी, कारण गेल्या 15 वर्षात राऊतांनी खासदार असूनही वाद आणि काड्या निर्माण करण्याशिवाय वेगळं काय केलं आहे? मग अशा+
वाचळवीराला चौथ्यांदा खासदारकी देण्यापेक्षा एकदा राजेंना द्यायला हवी अशी राज्यभरातील लोकांची मागणी आहे.
आणि खरंतर संभाजीराजे यांना भाजपापेक्षा आजपर्यंत राष्ट्रवादी आणि शिवसेनाच जवळची वाटत आली आहे, मराठा आरक्षण मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणणारी शिवसेना राजेंना जवळ वाटली, राजे+
उपोषणाला बसले होते तेव्हा तब्येत ढासळेपर्यंत कुणी सरकारचा एकही माणूस फिरकला नव्हता, याच संजय राऊतांनी उदयनराजेंना वंशजांचा पुरावा मागितला होता. वारंवार राजघराण्याचा अपमान करण्याचे जणू टेंडरच यांनी घेतले आहे.
आता काहीजण म्हणतात की भाजपा का राज्यसभा देत नाही, तर तयांच्या+
माहितीसाठी सांगतो, पहिल्यांदा आणि तेही कोणत्याही अटी शर्ती न ठेवता बिनशर्त राष्ट्रपती कोट्यातून संभाजीराजे यांना देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने खासदार केले होते, ते सहा वर्षे खासदार होते, त्यानंतर त्यांना कधीही भाजपने आमच्या झेंड्याखाली काम करा, पक्षाचा प्रचार करा असे+
सांगितले नाही. आणि त्यानंतर गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी रायगड प्राधिकरण स्थापन करून त्यांना त्याचे अध्यक्ष केले, कॅबिनेट मंत्री दर्जा दिला. दिल्ली दरबारी त्यांना कायम VIP ट्रीटमेंट मिळावी याची सर्व व्यवस्था लावली गेली. भाजपाने कायम संभाजीराजे यांचा सन्मानच केला हे खुद्द राजेंना+
माहिती आहे.
तरीही एकदा राजे म्हणाले होते मी, भाजपच्या जीवावर खासदार झालेलो नाही. मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. खासदारकी दिली तर काय उपकार केलेत का? यानंतर भाजपच्या एकही नेत्याने कधी त्यांच्यावर ना टीका केली, ना चकार शब्द काढला! असो!
संभाजीराजे यांचीच इच्छा आहे की त्यांना+
आघाडीने आणि शिवसेनेने राज्यसभेत खासदार करावं तर शिवसेनेने यांचा अपमान न करता राऊतांची हक्काची जागा मोठ्या मनाने छत्रपती संभाजीराजे यांना द्यावी, शिवरायांच्या नावाने इतके दिवस राजकारणच केले आता सन्मान देण्याची वेळ आहे, तो हक्काची जागा देऊन द्यावा. जर सेना काँग्रेसमधून आलेल्या+
प्रियांका चतुर्वेदी यांना राज्यसभेत पाठवू शकते तर राजेंना का नाही? हा खरा सवाल आहे!
- विकास विठोबा वाघमारे
मोहोळ, जि. सोलापूर
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
"चर्चेत ठरवण्यात आलेला ड्राफ्ट नंतर परस्पर बदलण्यात आला आणि उद्धव ठाकरेंनी माझा फोनही उचलला नाही" असा गौप्यस्फोट संभाजीराजे छत्रपती यांनी आज केला आहे. शिवसेनेच्या या कुटील कारस्थानामुळे आज संभाजीराजे यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. खरंतर हा छत्रपती घराण्याशी खूप मोठा+
दगा आहे, आणि शिवसेनेने राजघराण्याला दगा देऊन मोठं नुकसान करून घेतलं आहे.
जी शिवसेना छत्रपती आणि मराठी मुलाखांच्या गप्पा मारते त्यांनीच राजघराण्याला असा शब्द फिरवून दगा द्यावा हे दुर्दैवी आहे.
आज राजेंनी खुलासा केल्यानंतर मला मागची एक घटना आठवली, जेव्हा 2019 ला विधानसभा निवडणुका+
झाल्या, युतीला बहुमत आलं, तेव्हा अचानक उद्धव ठाकरेंना उपरती झाली अन सेनेला भाजपने अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाचा शब्द दिल्याचा कांगावा करत महाआघाडी सोबत सरकार स्थापन केलं, मुळात भाजपाने कोणता शब्द दिलाच नव्हता.
आज त्याच उद्धव ठाकरेंनी संभाजीराजे यांना शब्द देऊन फिरवला आणि हेच+
थ्रेड👇
केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांना अटक करण्यासाठी पोलीस प्रशासनावर कसा दबाव टाकला जात होता हे ऑन रेकॉर्ड महाराष्ट्राने पाहिले, एवढा माज आणि मग्रुरी मंत्री अनिल परब तेव्हा दाखवत होते. आज त्याच अनिल परबांवर ईडीने आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला आहे, सोबतच परबांशी+
संबंधित 7 प्रॉपर्टीवर सकाळीच धाडी टाकल्या गेल्या आहेत, सध्या परब ज्या शासकीय निवासस्थानी आहेत तिथेच सकाळपासून धाड सुरूच आहे.
शिवसेनेने हट्ट करून किरीट सोमय्या यांच्या राजकीय करिअरला ब्रेक लावण्याचा प्रयत्न करत तिकीट कापण्यासाठी अडून बसले, पण आज तेच किरीट सोमय्या सेनेच्या+
नेत्यांची वेशीवर टांगत आहेत.
जेव्हा परबांच्या दापोलीच्या रिसॉर्ट विरोधात स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार दिली, त्यानंतर कारवाईच्या अगोदरच पोलीस स्टेशनला आग लागली आणि त्यामध्ये अनेक महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याची भीती व्यक्त केली, पण सोडून देतील ते सोमय्या कसले! त्यांनी रीतसर+
महत्वाचा थ्रेड👇
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांचा काल कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी चौकशी समितीसमोर जबाब नोंदवला, त्यात त्यांनी मांडलेली भूमिका ऐकल्यानंतर धक्का बसला, मला त्यांच्या मागच्या अनेक स्टेटमेंटची आठवण आली, कारण शरद पवार जे बाहेर बोलत होते ते आतमध्ये आयोगासमोर+
शपथेवर का बोलले नाहीत? हा खरा सवाल आहे!
कोरेगाव भीमाचा हिंसाचार झाला 1 जानेवारी 2018 रोजी, आणि 2 जानेवारी 2018 ला शरद पवार मीडियासमोर आले, अजून पुरता हिंसाचार थांबला नव्हता, द्वेष आणि हिंसा मनात धगधगत होती, त्यावेळी मिडियासमोर येऊन शरद पवार म्हणाले की, "मी वढू गावातून माहिती+
घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा काही हिंदुत्ववादी संघटनांनी पुणे शहरातून त्या ठिकाणी जाऊन चिथावणी देण्याची भूमिका अगोदर 3-4 दिवस केली, मी त्यांची नावे घेऊ इच्छित नाही पण ग्रामस्थ सांगतात!"
हे शरद पवार बोलेपर्यंत कोणीही हिंदुत्ववादी संघटनांचे नाव घेतले नव्हते, ना कोणी संशय व्यक्त+
कोरेगाव भीमाच्या दंगलीत भिडे गुरुजींचा सहभाग नाही!
पुणे पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातून भिडे गुरुजींचे नाव वगळण्यात आलं. भिडे गुरुजी विरोधात कोणताही पुरावा नाही.
खरंतर पहिल्या दिवसांपासून आम्ही म्हणतोय की गुरुजी अशा कृत्यात अजिबात नसतात, देव, धर्म आणि देशासाठी अखंड हयातभर+
समर्पित भावनेने काम करणारे गुरुजी थोर आहेत!
शरद पवारांनी केवळ द्वेष करत त्याला रंग देऊन समाजात दुही माजवण्याचे काम केले, पवार ज्यांना विचारवंत समजतात ते आज अर्बन नक्षलवादी म्हणून काही तुरुंगात आहेत, काही जामिनावर बाहेर! बाहेर मिडियासमोर काहीही द्वेषपूर्ण वक्तव्ये करणारे+
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार परवा भीमा कोरेगाव चौकशी समितीसमोर यु टर्न मारून आपल्याकडे कोणतीही माहिती नसल्याचे सांगून आले आहेत, आता तरी शरद पवारांनी थोतांड आणि तुष्टीकरणीय राजकारण थांबविले पाहिजे!
भिडे गुरुजींना त्या दंगलीच्या आरोपातून मुक्तता मिळाली, ही आनंदाची बातमी आहे!❤️🚩+
थ्रेड👇
अपक्ष खासदार नवनीत राणा आणि अपक्ष आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीसा पठण करण्याच्या मुद्द्यावर शिवसेनेला चांगलंच कोंडीत पकडलं आहे. राज्याला लागलेल्या साडेसाती आणि शनीतून मुक्तता मिळवण्यासाठी आम्ही मातोश्रीवर येणार असून संकटमोचक हनुमानाची चालीसा म्हणणार असल्याचं त्यांनी+
जाहीर केलं होतं. त्यांनी तशी घोषणा केल्यानंतर शिवसेना इकडे सतर्क होत आज पहाटेपासूनच शिवसैनिक रेल्वेस्टेशनवर जाऊन वाट बघत बसले होते आणि त्यांना तिथेच बसवत राणा दांपत्य थेट विमानाने मुंबईत दाखल झाले आहे. ताटकळत बसलेल्या शिवसैनिकांचा चांगलाच हिरमोड झाला. एकीकडे हे शिवसैनिक+
रेल्वेस्थानकावर तर काही शिवसैनिक आणि आमदार, खासदार थेट मातोश्रीच्या बाहेर येऊन या रखरखत्या उन्हात रस्त्यावर वाट बघत बसले आहेत. पण राणा दांपत्याने उद्या सकाळी 9 वाजता मातोश्रीबाहेर येणार असल्याचं पत्रकार परिषदेतून सांगितलं आहे.
"मातोश्री हे आमचं पवित्र ठिकाण, इथे कुणीही हनुमान+
थ्रेड👇
आज एक बातमी वाचली आणि मला प्रकर्षाने देवेंद्रजी फडणवीस यांची आठवण आली. राजकीय पक्षाच्या आणि राजकीय नेत्यांच्या मांदियाळीत भाजपा आणि देवेंद्र फडणवीस हे कसे वेगळे आहेत याचं फक्त एक उदाहरण बघा! तुम्ही कौतुक करावं किंवा त्यांची वाहवा करावी असं नाही, पण या छोट्या गोष्टी+
समाजात मोठ्या परिणाम करतात!
कोरोना प्रादुर्भावाचा भयंकर मोठा काळ सुरू होता, एका बाजूला सामान्य नागरिक ऑक्सिजन, इंजेक्शन, बेड, उपचार यासाठी वणवण फिरत होते, कोव्हीड सेंटर फुल्ल होते, काहींमध्ये घोटाळे सुरू होते, नागरिक जिवाच्या आकांताने प्रयत्न करून उपचार घेण्यासाठी धडपडत होते,+
सरकार आपल्याच तालात होते तेव्हा विरोधी पक्षनेते असलेला देवेंद्र फडणवीस हा माणूस राज्यभरात पायाला भिंगरी लावून दौरे करत होता, कोव्हीड सेंटरमध्ये जात लोकांना धीर देणं, औषधोपचार मिळतात का याची व्यवस्था पाहणं, लोकांना मदत देण्यासाठी प्रयत्न करणं हे सुरू होतं आणि एके दिवशी खुद्द+