एकीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र दिलं आहे की आमच्या गटालाच शिवसेना म्हणून मान्यता द्या आणि दुसरीकडे सुप्रीम कोर्टात गद्दार गटाचे वकील म्हणतायत पक्षातल्या एवढ्या मोठ्या सदस्यांना सध्याचं नेतृत्व मान्य नसून त्यांनी पक्षात राहूनच वेगळा गट निर्माण केला आहे तर ती बंडखोरी कशी..? 👇
जर एवढ्या आमदार खासदार पदाधिकारी यांचा सध्याच्या पक्ष नेतृत्वाला विरोध असेल तर पक्ष नेतृत्व बदलण्यात गैर काय..?

बघितलं ना काय चालू आहे.? काही लक्षात येतंय.? किती खालच्या पातळीवर उतरून राजकारण चालू आहे हे आता तरी समजलं का.? अख्खा पक्षच स्वतः च्या नावावर करण्याचा घाट घातला आहे. 👇
आजपर्यंत करोडो शिवसैनिकांनी ठाकरेंच्या नेतृत्वाखाली रक्ताचं पाणी करून वाढवलेला पक्ष एका फटक्यात स्वतः च्या मालकीचा करण्याचे मनसुबे रचले गेले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्ट दोन्ही ठिकाणी पक्षावर दावा केला आहे आणि उघडपणे उद्धवजी ठाकरे साहेबांना विरोध दर्शवला आहे. 👇
कालपर्यंत शिंदे गटातले जे नेते उसणं आवसान आणून बोलत होते की आमचे मातोश्रीशी वाद नाही, उद्धव साहेबांशी वैर नाही, ठाकरेंविरोधात बोललेलं खपवून घेणार नाही, उद्धवजींना विरोध करणं आमच्या रक्तात नाही वगैरे वगैरे बाणा मारणार्‍या नाटकी नेत्यांचं आता यावर काय म्हणणं आहे..? 👇
तुमची नाटकं आज उघडी पडलीच ना..? कुठं फेडणार आहात हे पाप..? लाखो शिवसैनिकांचा तळतळाट लागेल हे विसरू नका.

अरे ज्या माणसाने आजपर्यंत एवढी वर्ष आमदार खासदार बनवलं, एवढी पदं दिली, ज्या माणसाच्या जिवावर आज तुम्ही आमदार खासदार मंत्री झाले, ज्या आडनावाच्या आणि पक्षाच्या जिवावर करोडो 👇
रुपयांची संपत्ती जमवली, सात पिढ्या बसून खातील एवढी माया कमवली... स्वतःच्या पोरांचं राजकीय भवितव्य उभं केलं, ज्यांनी एवढा मान सन्मान आणि प्रेम दिलं, ज्या रश्मी ठाकरेंनी एवढी मॉंसाहेबांप्रमाणे एवढी माया दिली त्यांच्यासारख्या शांत, संयमी, सरळमार्गी आणि प्रेमळ माणसाला धोका देताना 👇
देताना एकदाही पाय कचरले नाहीत..? आरशासमोर उभे राहून तुम्ही ताठ मानेने स्वतः तरी स्वतःचा चेहरा बघु शकता का..?

खरंच राजकारण एवढं नीच पातळीवर घेऊन जाता येतं..? पैशात एवढी ताकद आहे..? इमान, स्वाभिमान या गोष्टी तुम्हाला काहीच मॅटर नाही करत..? ठाकरेंनी तुम्हाला मोठं करून 👇
किंवा तुमच्या वर विश्वास ठेवला ही चूक झाली? शिवसैनिकांनी घरची भाकर खाऊन, कसलीही अपेक्षा न ठेवता पायाला भिंगरी लावून प्रचार करून तुम्हाला धनुष्य बाणाच्या चिन्हावर उभे आहात म्हणून निवडून आणलं याचं हे फळ देताय..?

भाजपच्या पाठिंब्यावर आज दिवस तुमचे असतील पण उद्या पुन्हा दिवस बदलतील.
नियतीचा खेळ खुप भयानक आहे. इथं केलेली पापं इथंच फेडावी लागतात. अख्खा देश तुम्हाला आज गद्दार म्हणून हिणवतोय. जनतेत एवढा आक्रोश आहे की अक्षरशः तुम्हाला तुमचे कमेंट बॉक्स बंद करून ठेवावे लागले आहेत ते ही गेला महिनाभर पासून.

शिवसैनिक भावनिक झालाय, व्याकूळ झालाय, त्यांचे 👇
डोळे पाणावले आहेत, व्यथित झालाय पण तोच शिवसैनिक तुम्हाला येणाऱ्या काळात तुम्हाला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात असु द्या. शिवसैनिक एखाद्याला मोठं करू शकतो तर त्याला सपाटून आपटू सुद्धा शकतो.

तुर्तास इतकेच. जय महाराष्ट्र. 🙏🚩

#ShivSena #Shivsenacrisis

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with #शिवसैनिक अक्षय काळे - Akshay Kale

#शिवसैनिक अक्षय काळे - Akshay Kale Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Akshay_Kale96

Jul 21
शिवसेनेत एवढी मोठी फूट पडायला, एवढे आमदार खासदार पक्षासोबत बंडखोरी करायला @rautsanjay61 जबाबदार आहेत..? वाचा एकदा.

कोरोना काळात मुद्दाम साप सोडणे वगैरै चालू होते तेव्हा हे ५१ आमदार आणि १२ खासदार शेपटं घालून होते...तेव्हा एकटे संजय राऊत लढत होते...👇 Image
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात आदित्यजी ठाकरे, शिवसेना, मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राची यथेच्छ बदनामीची मोहीम चालू होती,पोलीस तपास पण दळभद्री बिहारी पोलीसांकडे दिला गेला तेव्हा देखील हे गद्दार शेपटं घालून होते आणि एकटे संजय राऊत लढत होते..

अर्णव गोस्वामी सरळ सरळ "ए उद्धव ठाकरे...."👇
असं म्हणत एकेरी भाषेत गर्जना करत होता ,एका मुख्यमंत्र्याला अशी भाषा वापरत महाराष्ट्राची छी थू करत होता तेव्हा देखील हे बंडखोर शेपटं घालून होते आणि तेव्हा सुद्धा एकटे संजय राऊत सामना मधून किल्ला लढवत होते.

कंगना राणावत , सरळ सरळ मुंबईचा, महाराष्ट्राचा अपमान करत विविध स्टेटमेंट 👇
Read 10 tweets
May 2
#Thread 🙂

महाराष्ट्रात 2 लाखाहून जास्त मंदिरं आहेत आणि 3-4 हजार मस्जिद, भोंग्यांचा परिणाम बहुसंख्य हिंदूंच्या धार्मिक बाबींवर, सणांवर होणार हे लक्षात घ्या.

आता तुम्हाला फक्त आणि फक्त मशिदीवरचे भोंगे दाखवले जातायत परंतु कायद्याप्रमाणे भोंगे बंद झाले तर ते सर्वधर्मीयांच्या 👇
प्रार्थनास्थळांवरील भोंगे बंद होणार मग त्यात सगळी मंदिरे देखील आली‌. पहाटेच्या काकड आरत्या, रात्रभर हरिनाम सप्ताहात चालणारी मधुर भजनं, प्रत्येक सण उत्सवात चालणारे आवाज, हे सगळं काही बंद होईल. जर हे सगळं बंद झालं तर आयुष्य जगण्याची मजा राहिल असं वाटतं का ?? 👇
किती लोकाना या गोष्टींच्या आवाजाचा रोज त्रास होतो ते खरं सांगा बरं. माझं विचाराल तर काकडआरत्या,भजन,किर्तन,सणवारातले भोंगे आणि मशिदींवरील भोंगे या सगळ्याची बालपणापासून सवय झालेली असल्याने मला तरी हा मुद्दा आजच्या घडीला इतर सगळ्या महत्वाच्या मुद्द्यांपेक्षा मोठा आहे असं वाटत नाही👇
Read 9 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(