मीरेवर केलेल्या आख्यानात ओशो असं म्हणतात की कृष्णाच्या मुकुटात खोवलेल्या मोरपिसाला प्रतिकात्मक महत्त्व आहे. जसे मोरपिसात सगळे रंग आहेत, तसेच श्रीकृष्णातही सगळे रंग आहेत. तो योद्धाही आहे आणि योगीही. त्याला शांतीच्या शोधात हिमालयात जावं लागत नाही कारण त्याच्या आतच एक हिमालय आहे!
कृष्णाचं सावळं असणंही अर्थपूर्ण आहे. नदीचं पाणी जिथे उथळ असतं तिथे त्याचा तळ दिसतो. पण जसजशी त्याची खोली वाढत जाते, तसं ते गडद होत जातं आणि तळ दिसेनासा होतो. कृष्णाचा तळ दिसत नाही. श्रीकृष्णाचं संपूर्ण प्रतिबिंब मनाच्या काचेवर मावणं अवघडच! म्हणून ओशो म्हणतात की संतसुद्धा
कृष्णाचं सावळं असणंही अर्थपूर्ण आहे. नदीचं पाणी जिथे उथळ असतं तिथे त्याचा तळ दिसतो. पण जसजशी त्याची खोली वाढत जाते, तसं ते गडद होत जातं आणि तळ दिसेनासा होतो. कृष्णाचा तळ दिसत नाही. श्रीकृष्णाचं संपूर्ण प्रतिबिंब मनाच्या काचेवर मावणं अवघडच! म्हणून ओशो म्हणतात की संतसुद्धा
श्रीकृष्णाचा एकच पैलू घेतात. “ज्या सूरदासाने सुंदर स्त्री पाहून आपल्या मनात वासना जागृत होऊ नये म्हणून स्वतःचे डोळे फोडून घेतले, त्या सूरदासाचं नदीत नाहणाऱ्या स्त्रियांचे कपडे झाडावर लपवून ठेवणार्‍या श्रीकृष्णाशी कसं बरं जमावं! म्हणून सूरदास केवळ बाळकृष्णाच्याच लीलांमध्ये रममाण
होतात!”

सूरदास काय, किंवा मीरा काय – हे कृष्ण जगलेले लोक! म्हणूनच जेव्हा असिता नार्वेकर कृष्णचरित्रावर नृत्य-नाट्य करायचं म्हणाली आणि मला संगीत करण्यासाठी बोलावलं तेव्हा या विषयावर नवी गाणी लिहून घेण्यापेक्षा सूरदासाचीच पदं घ्यावीत असंच मी सुचवलं. यात माझा स्वार्थ असा होता की
लिखाण उत्तम असेल तर एका ठराविक स्तराच्या खाली आपली कलाकृती येऊच शकत नाही!

सोनिया परचुरे या नृत्यनाट्याचं दिग्दर्शन करणार होती. मुकुंदराज देवसारखे उत्तम वादक ताल संयोजन करणार होते. संपदा जोगळेकर कुलकर्णी, संज्योत हर्डीकर या नृत्यांगना सोनियाबरोबर यात सहभागी होणार होत्या. कथ्थक
नृत्यशैलीवर आधारित या बॅलेमध्ये गाणी शास्त्रीय संगीतावर आधारित अपेक्षित होती हे उघड होतं. माझ्यासाठी हे आव्हान होतं कारण माझी बैठक शास्त्रीय संगीताची नव्हती. जमेची बाजू अशी होती की मला पं. सत्यशील देशपांडेंसारख्या संगीतज्ञाचा सहवास लाभत होता. त्यांच्या प्रतिभेमुळे,
बुद्धिमत्तेमुळे माझं सांगितिक आयुष्य समृद्ध होत होतं. त्यांच्या निमित्ताने याच काळात संजीव चिम्मलगीसारख्या तरूण, गुणी गायकाशी ओळख झाली होती.

संजीव आणि हम्सिका अय्यर असे दोन गायक या कार्यक्रमात मी माझ्यासोबत घेतले होते. हम्सिकाचं संगीताचं शिक्षण दाक्षिणात्य पद्धतीत झालं असलं तरी
तिचा भावसंगीतातला अनुभव दांडगा होता.

कृष्णाच्या बालपणापासून द्वारकेच्या निर्मितीपर्यंतच्या घटनांवर विविध गाणी आम्ही सूरदासाच्या साहित्यातूनच निवडली. जिथे काही रिकाम्या जागा वाटल्या किंवा काही वेगळी कल्पना सुचली तिथे माधव चिरमुले यांनी गाणी लिहून दिली.

या बॅलेमधलं पहिलंच गाणं जे
मी संगीतबद्ध केलं ते होतं – ‘सिखवति चलन जसोदा मैया’. यशोदा लहानग्या श्रीकृष्णाला चालायला शिकवत आहे असं कल्पून सूरदासाने केलेली ही रचना. सूरदासाच्या रचनांचं जे वैशिष्ट्य मला जाणवलं ते असं होतं की हे कल्पित आहे असं न वाटता या सगळ्या प्रसंगांचा सूरदास प्रत्यक्ष साक्षीदार आहे असं
वाटावं असं या पदांमधलं वर्णन आहे. कुठलंही तत्त्वज्ञान नाही, कल्पनांची चमत्कृती नाही, शाब्दिक फुलोरे नाहीत, केवळ दर्शन आणि त्या दर्शनातून मिळालेली अनुभूती!

सिखवति चलन जसोदा मैया।
अरबराइ कर पानि गहावत, डगमगाइ धरनी धरे पैया।
अक्षरशः पाच मिनिटात माझी ही चाल बांधून झाली. गाण्याची
चाल बांधण्याची माझं एक तत्त्व आहे. माझी चाल हा त्या शब्दांना दिलेला स्वाभाविक भावनिक प्रतिसाद असतो. जे बौद्धिक चिंतन असतं ते चाल होईपर्यंत मी करत नाही. पण नंतर मात्र या चालीचं गाणं होईपर्यंत त्यावर भावनेबरोबर बुद्धीचेही संस्कार होत राहतात. मर्ढेकरांच्या उक्तीप्रमाणे –
“भावनेला येऊदे गा शास्त्रकाट्याची कसोटी” त्या प्रमाणे रचना सतत संस्कारित करत राहणं हे मला गरजेचं वाटतं. यात शास्त्रकाट्यालाही भावनेची कसोटी मात्र मी सतत लावत राहतो! एका बाजूला शास्त्र, तर्क आणि दुसऱ्या बाजूला भावना – याच्यामध्ये जी तारेसारखी रेषा आहे त्यावर चालत राहणं हाच संगीत
करण्याचा थरार आहे असा माझा पक्का समज आहे.

‘सिखवती चलन’ची सुरुवात सुरांच्या सरळ रेषेत होते. या स्वरवाक्यात कमालीचा सोपेपणा आहे. यात पहिली ओळ यशोदेची आणि दुसरी ओळ श्रीकृष्णाची आहे. बाळकृष्णाला अजून तोल सावरता येत नाही, डगमगतच तो जमिनीवर पाऊलं टाकत आहे. गाण्यातला तोल हा तालात असतो!
म्हणूनच दुसऱ्या ओळीतली काही स्वरवाक्यं ठोक्यावर आणि काही ठोका सोडून अशी आली आहेत ज्यातून तोल सावरण्याचा (काहीसा निष्फळ) प्रयत्न दिसून येईल. याच दुसऱ्या ओळीत रचनेत इतर कुठेही येत नसलेला कोमल गंधार येतो ज्यामुळे ‘आत्ता तोल जाईल की काय…’ अशी संभ्रमावस्था निर्माण होते.
हे सगळं असूनही संपूर्ण रचनेला एक वात्सल्याची आभा आहे. म्हणूनच बहुतांश रचना शुद्ध स्वरात असली तरी जिथे वातस्ल्याने उर भरून येतो तेव्हा कोमल निषादाचा स्पर्श या रचनेला होतो.

कबहुँक सुंदर बदन बिलोकति, उर आनँद भरि लेति बलैया |
कबहुँक कुल देवता मनावति, चिरजीवहु मेरौ कुँवर कन्हैया ||
बॅलेमध्ये सोनियाच्या उत्कृष्ट अशा नृत्यदिग्दर्शनाला न्याय दिला तो संपदा जोगळेकर-कुलकर्णी हिने. संपदाचा बोलका चेहरा म्हणजे साक्षात वात्सल्य! माझ्या यूट्यूब वाहिनीवर मी या गाण्यावरच्या तिच्या नृत्याचाही व्हिडिओ अपलोड केला आहे तो जरूर पहा.
मी काही आस्तिक नाही; पण सूरदास होता आणि जो हरी ब्रह्मांड चालवतो त्याला चालायला यशोदा शिकवते ही अनुभूती तो मला देतो. ही गोष्ट मला आस्तिकतेबद्दल, भक्तीबद्दल, श्रद्धेबद्दल एक दृष्टांत देऊन जाते हे मात्र नक्की!

#Gokulashtami #गोकुळाष्टमी #गोपाळकाला

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Kaushal S Inamdar| कौशल इनामदार

Kaushal S Inamdar| कौशल इनामदार Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @ksinamdar

Jul 20
अख़्तर-उल्-इमान, ज्यांना आपण ‘वक़्त’, ‘कानून’, ‘नया दौर’ सारख्या चित्रपटांचे पटकथाकार आणि संवादलेखक म्हणून ओळखतो, हे उर्दूतील प्रसिद्ध शायर होते. शायर असूनही त्यांनी ग़ज़ल हा काव्यप्रकार कधी हाताळला नाही. त्याबाबत त्यांना एकदा विचारलं असता त्यांनी असं उत्तर दिलं –
“मी कधी ग़ज़ल लिहिली नाही कारण ग़ालिबने त्यातल्या सर्व शक्यता संपवल्या आहेत!”
मला ग़ज़ल हा काव्यप्रकार म्हणून आणि संगीतप्रकार म्हणूनही अत्यंत प्रिय आहे परंतु अख़्तर-उल्-इमान म्हणतात त्याच कारणासाठी मी ग़ज़ल हा प्रकार इतका हाताळला नाहीए. ग़ज़ल गायकीच्या प्रामुख्याने दोन शाखा आहेत
– पहिली पारंपरीक – बरकत अली खाँ, बेग़म अख़्तर, इक़्बाल बानो, फ़रिदा ख़ानम, मेहदी हसन (मेहंदी नव्हे!) हे या पारंपरीक शैलीचे शिलेदार आहेत. माझं मत आहे की आधुनिक ग़ज़ल रचनेची नवी शाखा ग़ुलाम अली यांच्यापासून सुरू झाली. संगीतकार म्हणून त्यांची प्रतिभा इतकी अगाध आहे की त्यांनी
Read 14 tweets
Jul 5
बाहेर अविरत पाऊस पडतोय. अविरत. Continuously. शाळेत असताना व्याकरणात आपण Present Continuous Tense – अपूर्ण वर्तमानकाळ – शिकलो आहोत. हा अपूर्ण वर्तमानकाळ आपल्याला वाक्यातही आणता येतो आणि काव्यातही! परंतु हा अविरतपणा, अपूर्ण वर्तमानकाळ संगीत रचनेत कसा आणता येईल याचा
मी अनेकदा विचार करत असे.

काही वर्षांपूर्वी प्रा. अशोक बागवेंनी मला एक ग़ज़ल चाल लावण्याकरता दिली होती.

पाऊस हा फुलांचा पाऊस पाकळ्यांचा
डोळे हळूच आता आतून झाकण्याचा

या शब्दांमध्ये Here & Nowचा एक फील होता. हे आत्ता सुरू आहे. कदाचित, ‘पाऊस हा फुलांचा’ असं म्हटल्यामुळे असेल.
हे शब्द माझ्या मनात अनेक दिवस दरवळत होते पण चाल काही सुचत नव्हती.

मग एक दिवस मी पं. सत्यशील देशपांडेंकडे वाळकेश्वरला त्यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा ते राग झिंझोटीचा रियाज करत बसले होते. मलाही त्यांनी गायला बसवलं. त्या झिंझोटी रागाच्या आलापीत ते ‘रे’ या स्वरावरून सुरू करत होते
Read 12 tweets
Jul 3
#Replug
संगीतकार म्हणून माझ्या कारकीर्दीच्या अगदी सुरुवातीला मंगेश पाडगांवकरांनी मला एक सल्ला दिला होता - "कवितांना तू चाली देतो आहेस हे ठीकच आहे, पण तू गाणं explore कर." तेव्हा ते नेमकं काय सांगत आहेत ते मला नीटसं समजलं नव्हतं पण घरी आल्यावर शांताबाई शेळके यांचा गीतसंग्रह -
‘कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती’ उघडला आणि शांताबाईंची गीतं पाहायला लागलो. गीत आणि कविता यात नेमका फरक काय आहे यावर अनेक चर्चा, वाद झडले आहेत आणि त्यात मला आत्ता पडायचं नाही. इतकंच सांगतो की शांता शेळकेंचा संग्रह वाचू लागलो आणि मंगेश पाडगांवकर काय सांगू पाहत होते ते माझ्या
हळूहळू ध्यानात येऊ लागलं होतं.
‘कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती’ हा शांताबाईंच्या अशा गीतांचा संग्रह आहे की ज्यातली बरीचशी गाणी संगीतबद्ध किंवा ध्वनिमुद्रित झाली होती; पण या गाण्यांना फारशी प्रसिद्धी मिळाली नव्हती. काही गाणी चित्रपटांसाठी लिहिली होती पण ते चित्रपटच प्रदर्शित झाले
Read 13 tweets
May 19
I had a boy working for me who was a converted Christian. He was poor and when he came to me was in search of work. My son was in kg at the time and sometimes when I and my wife were away at work, we used to ask him to get our son home by rickshaw for which we paid him some
additional cash. One day my wife saw that despite taking money for rickshaw he got my son home by bus. She asked him why he didn’t come home in a rickshaw and he said he couldn’t get one. We let it be. One day I got a phone call from a colleague of mine to whom I had sent this
boy to pick up a cheque. My friend said, “Your boy was here and we got talking. He told me about your wife having caught him bringing your son by bus. He confessed to me that this was not the first time he had done this. He said he used to do it often to save up money. That
Read 7 tweets
May 17
In the summer of 1993, when I was still a confused young man, undecided on what career to choose, I came across a cassette of songs by #Ilaiyaraja in a small shop in Coimbatore, while on a trip to the south with my parents. I was still far away from considering Image
music as a career; I was contemplating to be a writer at that time, having won the prize of best playwright twice in INT and Unmesh competitions. But music was a permanent resident in my mind and lips and I hummed constantly.
I had been introduced to Ilaiyaraja’s music
through Balu Mahendra’s #Sadma and since then was absolutely enamoured by his genius. So when I came across this cassette of Ilaiyaraja compositions sung by the great #SPBalasubramaniam, I was more than excited.
Of all the songs in that cassette, ‘Pachamala poovu’,
Read 9 tweets
May 17
#Swatantryagaan
A music concert of songs from Indian cinema that contributed to the Indian freedom struggle and after.
It was great fun to conceive and curate this concert and work with such a talented team led by Kamlesh Bhadkamkar. Image
The musicians were some of the finest of our times - Archis Lele, Anil Karanjavkar, Datta Tawde, Hanumant Rawade, Amit Gothivrekar, Varad Kathapurkar, Rahul Deo and Kamlesh himself.
The singers did such a rocking job that ImageImage
2 and a half hours of only patriotic songs from films from 1936 to 2021 and yet the audience was kept glued to the seats. A small clip from the concert will give you an idea how electrifying the atmosphere was.
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(