#Thread - महाराष्ट्राचा पहिला सार्वजनिक नवरात्र उत्सव -
"श्री शिवभवानी नवरात्र महोत्सव"
( दादर-मुंबई- महाराष्ट्र राज्य )
हा उत्सव कुणी सुरू केला, त्यामागचा सद्हेतू काय होता. मराठी मातीचा गौरव वाढवणाऱ्या ह्या नवरात्र उत्सवाबद्दल माहिती देणारा हा लेख संपूर्ण वाचा. ( १३/१)
1920 च्या दशकातील घटना-
दादर ला सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी होण्यास बहुजन बांधवाना बंदी होती, यातून पूज्य डॉ आंबेडकर, रा. बोले व प्रबोधनकार ठाकरे यांनी आंदोलन उभा करत तो डाव हणून पाडला, यापुढे उत्सवात दलित नको ह्या कुयोजनेने ब्राह्मणांनी गणेशोत्सव बंद पाडला. ( १३/२)
मात्र प्रबोधनकार ठाकरेना मनोमन वाटायचे असा कुठला तरी उत्सव असावा ज्यात स्पृश्य-अस्पृश्य आदी मंडळी आनंदाने सहभागी व्हावे व महाराष्ट्र धर्म वृद्धिंगत व्हावा. याच पुण्यहेतू कारणे राव बहादूर बोले यांच्या बंगल्यावर अनेक पुरोगामी मंडळींची नियोजनबद्ध बैठक झाली व ठरले.. (१३/३)
महाराष्ट्राची मुख्य देवता श्री मायभवानी. तिच्या दरबारात सगळ्यांना मुक्तदार. तिचा नवरात्र महोत्सव हाच वास्तविक महाराष्ट्राचा राष्ट्रीय महोत्सव.
म्हणून आता आपण सर्वजण आदिशक्ती भवानी उत्सवाची योजना करून आकर्षक असा उत्सव मुंबईत साजरा करू, ज्यात सर्व जाती पंथातील लोक जमतील. (१३/४)
या उत्सवाचे अध्यक्ष- श्री राव बहादूर बोले, सोबतीला श्री भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, श्री प्रबोधनकार ठाकरे, व इतर वैचारिक स्नेही मंडळी - लोकहितवादी संघ.
साल - १९२६ मुंबई प्रांत.
दादरच्या काळ्या मैदानावर ( आताचे- वीर कोतवाल मैदान- प्लाझा सिनेमा जवळ ) हा उत्सव झाला. (१३/५)
८० × ६० फूट लांब रुंदीचा विशाल मंडप- त्यात ३०×१० चा भाग घटस्थापना, भवानीच्या मूर्ती फोटो साठी. ३०×१० भाग कार्यक्रमासाठी.
मैदानावर तोबा गर्दी जमू लागली, उत्सवात सहभागी होण्यास सर्वजण तयार- पूजेसाठी अथवा कार्यक्रमासाठी अमूक अमुक पाहिजे म्हटली की लगेच ती वस्तू हजर.
(१३/६)
मुंबईचे- तांब्या पितळाचे व्यापारी बाबाजी तारकर यांनी २ फूट व्यासाचा घट, माणसा एवढ्या उंच समयी, तेलासाठी मोठे पात्र एका शब्दावर आणून दिले. नंतर शिवरायांचा ६×५ लांब रुंद रेशमी भगवा ध्वज, त्याला ५० फूट उंचीचा पोल.
मग ७ फुटी तांडवनृत्याधारी श्री काली देवीची प्रतिमा. (१३/७)
ही सगळी कामे आजच्या प्रमाणे तरुण पोरानी पार पाडली.! मग उजाडला दिवस उत्सवाचा.
शिवरायांचा भगवा ध्वज उभारण्याचा मान ठाकरेंनी त्यावेळचे महार आमदार श्री सोळंकी याना दिला. घटस्थापना विधी महार दाम्पत्याकडून करण्यात आला. मग दादरचे प्रसिद्ध पालये शास्त्रीनी पूजाविधी केला.
(१३/८)
उत्सवाला विराट स्वरूप आले, प्रचंड गर्दी जमू लागली, मुलेमुली, आबालवृद्ध सर्वच इथे राबू लागले रमू लागले. भेदभाव कसलाच उरला नाही. रोज निरनिराळे कार्यक्रम व्हायचे. वक्ते, कीर्तनकार, प्रवचनकार, शाहीर, गायक कवी सर्व बहुजनचं.
जणू काय ही सारी जगदंबेची लेकरं सगळी एका छत्राखाली. (१३/९)
उमाजी नाइकांचा पोवाडा, एक १४ वर्षीय मुलीचे कीर्तन, खूब रंगत आली उत्सवाला.
भाजीवाल्या माळीण यमुना मावशीचे संस्कृत संदर्भासहित जीवनविषयक व्याख्यान तीन तास चालले.
सगळं मंडप आया बहिणनी गच्च भरलेला असायचा. पुरुषमंडळी बाहेर. कवी वसंत जोशी यांनी आरती रचली व सर्वानी गायली. (१३/१०)
अस्सल मराठ्यांच राष्ट्रीय गीत
दार उघड दार बये, भजनी पंचम बुवा यांनी केले. समदे श्रोते आनंदाने भजनात रंग- दंग..!
दादरकरासाठी सगळे दिवस खूप उल्हासात गेले. लांब लांबून लोक यायची. टिळकांच्या गणेशोत्सवापेक्षा हा उत्सव निश्चित छान पार पडला कारण यात किंचित भेदभाव नव्हता.
(१३/११)
दसरा मिरवणुकीला इंग्रजी पोलिसांनी परवानगी नाकारली. ती, रा.ब बोले, केळुस्कर मास्तर, नवलकर वकील यांनी भांडून मिळवली.
दादरच्या परिसरातुन वाजत गाजत मिरवणूक निघाली- पूर्ण मुंबईतुन लेजिम, मल्लखांब, भजनी फड सगळ्या सांस्कृतिक फलटणी हजर. महापुजा व आरती झाली मिरवणूक निघाली. (१३/१२)
बोलेंच्या हस्ते सुवर्णपूजन- आंबेडकरांचे भाषण झाले- प्रसाद वाटप.
देवी मिरवून पुन्हा मैदानवर आणली. असे का ? याचे स्पष्ट कारण ठाकरे देतात - जगदंबा सीमोल्लंघन करून मुलुखगिरी गाजवते अन सोन लुटुन स्वराज्यात येते. उत्सवमूर्तीला समुद्रात कळसविण्याचा प्रघात आम्हा मराठ्यांत नाही. (१३/१३)
तर असा झाला महाराष्ट्र भूमीचा पहिला-वहिला सार्वजनिक नवरात्र उत्सव- ज्यात अठरापगडा बारा बलुतेदार सर्व मराठा प्रदेश एकवटला..!
थोर ती समाजसुधारक मंडळी,
अन महान तो उत्सव माय भवानीचा..❣️
आज महाराष्ट्राचे लाडके, प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती. या निमित्ताने त्यांच्या महालोकप्रिय अशा देवळाचा धर्म धर्माची देवळे या पुस्तकातली काही मुख्य ओळी थ्रेडमार्फत आपल्या वाचनास देत आहे. नक्की वाचा..👍 आणि त्यावर विवेकबुद्धीने चिंतन करा. #लोकप्रबोधनदिन 🔥
१) देवळें म्हणजे भिक्षुकशाहीच्या जन्मसिद्ध वतनी जहागिऱ्या. देवळाशिवाय भट नाहीं आणि भटाशिवाय देऊळ नाहीं.
३) देशांतला शेतकरी कळण्याकोंड्याला आणि घोंगडीच्या ठिगळाला महाग होऊन देशोधडीला लागला, तरी देवळांतल्या भटसेनेच्या पोटाच्या चढत्या कमानीला तिला एवढाही खळगा आजपर्यंत कधी पडला नाही
४) गोळीला तुम्ही आणि पोळीला आम्ही
हा भटांचा ‘सनातन धर्म’ त्यांनी आजर्यंत पोटापाड मेहनत करून टिकविला आहे
#वाचकांचे_पार्लमेंट भाग -२
जळगांव मधील बातमीदार साप्ताहिकात वाचकांचे पार्लमेंट या सदरात वाचक विविध प्रश्न विचारायचे, अन प्रबोधनकार त्याना मार्मिक, तिखट, विनोदी, शैलीत उत्तर द्यायचे त्यालाच आपण ठाकरी स्टाईल म्हणतो.!
अशीच काही प्रश्नोत्तरे खाली दिले आहेत वाचा. 👇
भाजपचे नेते- जे लोकशाहीत अधिकृतपणे कुठल्याही शासकीय प्रशासनात सहभागी नाही.
ते प्रेस कॉन्फरन्स घेतात, विरोधी पक्षांतील नेत्यांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप करतात, अन शासकीय यंत्रणा लगेच कारवाई करतात..! याचा अर्थ जनतेने नक्की काय घ्यायचा ?
ज्या पक्षाचे सरकार आहे त्या पक्षातील पक्षातील नेते पदाधिकारी यंत्रणेत हस्तक्षेप कसा काय करू शकतात ? अन त्यांनी दिलेले पुरावे व तत्सम बाबींवर तातडीने होकारार्थी निर्णय घेऊन, सरकारी यंत्रणेतील लोक संबंधीत विरोधी पक्षातील नेत्यांची चौकशी मोठ्या वेगाने करतात, आणि थेट अटक करतात..!
नीट पाहिलं तर त्या राजकीय पक्षांनी केलेले आरोप हे फारसे मोठ्या स्वरूपाचे नसूनही, त्या यंत्रणा केवळ हुकमावरून असा हावभाव दाखवतात जणू काय त्यांनी भारत सरकारची तिजोरी फोडलीय. मला वाटत अशा आकसभावनेतून केलेल्या कारवाया समाजात, अन त्या विरोधी पक्षात एक विक्षिप्त मत तयार करत आहेत..!
देशात अनेक पुढारी होऊन गेले प्रत्येक जण लोकप्रिय होता, सर्वाना जनतेनं भरभरून प्रेम दिल, मात्र त्यात मला राष्ट्रपिता गांधी बापूचं व्यक्तिमत्त्व हे अधिक तेजस्वी आणि अद्वितीय दिसतं. त्याची अनेक कारणं आहेत, त्यापैकी मुख्य कारणे.👇
स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व गांधी बापु आधी बऱ्याच जणांनी केलं होतं, मात्र त्या सर्वांना गांधीजी इतका प्रतिसाद आणि प्रेम मिळाला नाही, फक्त गांधीजीना का लोकांनी डोक्यावर घेतले याचा कुणी मनन केलंय का ? ते मला ठाऊक नाही. पण मला जे वेगळेपण आढळलं ते थोडक्यात आपल्यापुढे स्पष्ट करतो..!!
कुठल्याही राष्ट्राला पारतंत्र्याच्या अभेद्य पोलादी साखळदंडातुन मुक्त करावयाचे झाल्यास नेमकं काय करायचं ? सशस्त्र उठाव, की आक्रमक आंदोलन, ? की शांततापूर्ण आंदोलन ?
ह्यामध्ये गांधींनी निवडलेला पर्याय आपल्याला ज्ञात आहेच. यामागे जी आंदोलने झाली ती हिंसक आणि नुकसानकारक होती.
१) नमस्कार, आपल्याला वाटेल मी हे काय नवीनच शीर्षक लिहलय ? त्यासाठी आपल्याला हा लेख विस्तृतपणे वाचावा लागेल..!
महाराष्ट्र हा बहुजनांची भुमी आहे. इतिहास, सांस्कृतिक ठेवण, लोकसंख्या, विचार प्रवाह, आदींकडे ढोबळमानाने आपण पाहिलं तर-
२) आपल्या हेच आढळून येईल की महाराष्ट्र हा बहुजनवादाचा भोक्ता आहे. मागे चित्पावन पेशवेशाहीचा काळ असेल किंवा थोड्या-फार फरकाने भटभिक्षुकशाहीचा वर्चस्ववादी वरवंटा या मराठी भुमीवर आदळत असेल.
त्याच्या ठिकऱ्या- ठिकऱ्या उडवण्याच काम संतांनी व आधुनिक काळात समाजसुधारकानी केलं.
३) त्यात प्रबोधनकार ठाकरे यांच नाव आपण आदराने घेतो. प्रबोधनकार हे समाजसुधारक, बहुजनवादी, प्रखर हिंदुत्ववादी होते.
ते एकट्याने त्यांची लढाई लढत, नंतर लोक त्यांच्या विचाराकडे आकर्षित झाली. पण त्यानी राजकरणात सक्रिय सहभाग घेतला नाही.
#Thread भट्ट सांगे अन मठ्ठ ऐके- भाग ३.
१)
पुर्वी कुठल्या प्रांतात भयंकर दुष्काळ पडला की, लोकांना भाकरीसाठी अमाप संघर्ष करावा लागायचा, त्याच वेळी ऐतखाऊ भटाळ टोणगे म्हणायचे देव कोपला, अमुक तमुक ग्रामदेव- ग्रामदेवता कोपली, आता चंदनात, तेलातुपात काजूबदामात; यज्ञ होमहवन करावं लागेल.
२) तेव्हा तो गरीब बहुजन, घरातली दागदागिने मोडुन पैशाची तजवीज करत, आणि त्या
बिचाऱ्या कुणब्याच्या अशा दुष्काळसमयी घरात शिळ्या भाकरी चटणीची पंचाईत पण भटभोजन मोठे राजेशाही पार पाडण्याकरिता, फार हाल काढावे लागत, तेव्हा कुठेतरी लचाड भटांचे पोटदेव तृप्तानंदी होऊन ढेकर देत..!!
३) आपल्याला दक्षिणा नावाचा प्रकार सर्वश्रुत असेलच, त्याकाळी हेच उपजीविकेचे साधन, दक्षिणा अल्पप्रमाणात मिळु नये यासाठी मनुनी आपल्या भिक्षुकी धर्मघटनेत खास तरतूद करूनच ठेवलिय.