ADITI Gujar Profile picture
Oct 21 25 tweets 4 min read
🔆🔅🔆🔅🕉️🔅🔆🔅🔆
🔆🪔 शुभ दिपावली 🪔🔆
🔆🔅🔆🔅🕉️🔅🔆🔅🔆

खरं तर आपल्या हिंदू धर्माचा सर्वात मोठा सण येतोय दीपावली, ज्याला आपण दिवाळी म्हणतो.
परंतु ~३०% लोकांनाच माहीत आहे की दिवाळी हा सण का साजरा केला जातो. बाकी ~७०% तर फक्त लहानपणापासून असे समजतात की
फक्त दिवे लावणे, फराळ, आणि फटाके फोडणे, श्रीमती लक्ष्मी देवींचे पूजन करणे, बस हीच आहे दिवाळी. असो काही हरकत नाही...
दिवाळी हा सण सनातन हिंदूंचा सर्वात मोठा सण आहे. या दिवशी प्रभु श्रीराम, बंधू श्री लक्ष्मण जी आणि श्रीमती सितामाता यांच्यासोबत १४
वर्षाचा वनवास संपल्यानंतर अयोध्येत परत आले होते.अयोध्या नगरीमध्ये जेव्हा हे कळले की प्रभु श्रीराम यांनी रावणाचा अंत केला आहे आणि अयोध्येमध्ये पुन्हा येणार आहेत तेव्हा पूर्ण अयोध्येमधल्या लोकांनी त्या जल्लोषात दसऱ्यापासूनच रांगोळी आणि दिव्यांनी अयोध्या सजवली होती.🪔
जेव्हा दसऱ्याच्या दिवशी रावणाचा अंत झाला त्याच्याबरोबर २१ दिवसांनी श्रीराम हे अयोध्येत पोहोचले होते तेव्हापासून दिवाळी हा सण साजरा केला जातो.म्हणजे लाखो वर्षांपासूनची ही परंपरा अजूनही हिंदू बांधव साजरी करतात.
दिवाळी हा सण ६ दिवस चालणारा सण आहे आणि याच्या प्रत्येक दिवसाचं एक वेगळं महत्त्व आहे. चला तर तुम्हांला या ६ दिवसाचं महत्त्व जाणून घेवूया 👍
१:- वसू बारस/ गोवत्स द्वादशी: अश्विन कृष्ण द्वादशी:
पहिला दिवस आहे वसू बारस अर्थात गोवत्स द्वादशी चा.
भारतीय संस्कृती मध्ये अर्थव्यवस्था, शेती गायीवर आधारीत आहे. आणि गोवंश प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवशी गाय वासरे यांचे पूजन केले जाते.
२:- धनत्रयोदशी - अश्विन कृष्ण त्रयोदशी:
दिवाळीचा दुसरा दिवस आहे धनत्रयोदशी. पूर्वीच्या मान्यतेनुसार सगळ्या
देवांनी असुरांसोबत समुद्रमंथन केलं होतं तेव्हा समुद्रातून १४ रत्न निघाले. याच्यातील एक आहे भगवान धन्वंतरी. आपल्या पंचांगानुसार पितृपक्षाच्या १३ दिवसांनंतर भगवान धन्वंतरी हे समुद्रातून हातामध्ये अमृताचा कुंभ घेऊन प्रकट झाले. भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदाचे जनक आहेत.
त्यांनीच पूर्ण संसाराला आयुर्वेदाची ओळख करून दिली. त्यादिवसांपासून या दिवसाला धनतेरस, धनत्रयोदशी असे नांव पडले आणि भगवान धन्वंतरी यांच्या नावाने हा दिवस साजरा केला जातो.
३:-नरकचतुर्दशी - अश्विन कृष्ण चतुर्दशी:
दिवाळीचा तिसरा दिवस आहे नरकचतुर्दशी.
👍
एके काळी या संसारात भूमिपुत्र नरकासुराचा आतंक होता, त्याला वरदान होतं की त्याचा मृत्यू फक्त त्याच्या आईच्या हातानेच होऊ शकतो. पुढच्या जन्मात भूमिदेवीने माता सत्यभामाच्या रूपात अवतार घेतला, सत्यभामेचे लग्न भगवान श्रीकृष्ण यांच्यासोबत झाले.
त्यानंतर माता सत्यभामेने नरकासुराचा अंत केला.
तेव्हापासून आजपर्यंत त्या दिवसाला नरकचतुर्दशी या नावाने ओळखलं जातं.
४:-लक्ष्मीपुजन- दर्श अमावस्या: दिवाळीचा चौथा दिवस आहे लक्ष्मीपुजन.
👍
देव आणि दैत्य जेव्हा समुद्र मंथन करत होते तेव्हा माता लक्ष्मी प्रकट झाल्या होत्या.
तेव्हापासून त्या दिवशी आपल्या घरी भरपूर यश, सुख आणि संपत्तीसाठी माता लक्ष्मी देवी यांची पुजा होते.
दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मी यांच्यासोबत श्री गणेश जी यांची सुध्दा पुजा होते. पुरातन मान्यतेनुसार महालक्ष्मी मातेला कोणतेही संतान नव्हते आणि माता पार्वतीचे २ पुत्र होते.
माता लक्ष्मी देवीने मता पार्वतीजवळ श्री गणेश जी यांना दत्तक घेण्याची इच्छा प्रकट केली. माता पार्वतीला चिंता होती की श्रीमती लक्ष्मी देवी कधीच एका जागी थांबत नाही, मग श्री गणेश जींची काळजी त्या कश्या घेतील.
याच्यावर श्रीमती लक्ष्मी म्हणाल्या की मी जिथे जाईन तिथे श्री गणेश यांना सोबतच घेऊन जाईन. म्हणून तेव्हापासून
जिथे माता लक्ष्मीची पूजा होते तिथे श्री गणेश जि यांची सुध्दा पुजा होते.
खरंतर दिवाळीच्या दिवशी प्रभू श्रीराम अयोध्येत आले होते परंतु या
दिवशी माता लक्ष्मी आणि श्री गणेश यांची पुजा होते.पुरातन ग्रंथानुसार त्यावेळी भगवान श्री विष्णू हे शयन (आराम) करतात आणि प्रभू श्रीराम हे भगवान श्री विष्णू यांचा अवतार आहेत. त्यामुळे दिवाळीला प्रभू श्रीराम यांची पुजा केली जात नाही.
५:- बलिप्रतिपदा/ गोवर्धन पूजा - कार्तिक शुक्ल प्रतिपदा, विक्रम संवत २०७९ आरंभ (यावर्षी २६ अॉक्टोबर २०२२ ला): मित्रांनो अश्विन अमावस्येला लक्ष्मीपुजन झाल्यानंतर बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा होतो.
साडे तीन मुहूर्तांपैकी एक हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.
अक्षयतृतीया, गुढीपाडवा, विजयादशमी हे पूर्ण मुहूर्त असून दिवाळी पाडवा हा अर्ध मुहूर्त आहे. यादिवशी सोने खरेदी, सुवासिनी कडून पतिला ओवाळले जाते.असे खूप काही महत्त्व आहेत व्यापारी लोकांचे नविन वर्ष याच पाडव्यापासून सुरू होते. हिशोबाच्या नविन वह्या ज्याला खतावणी
(चोपडी) म्हणतात त्यांचे पुजन करून नवीन सुरूवात केली जाते.
कोणतीही नवीन गोष्ट विकत घेण्यासाठी हा उत्तम मुहूर्त मानला जातो. याच दिवशी गोवर्धन पुजा, अन्नकुट केला जातो.
👍
रामायणानुसार जेव्हा प्रभू श्रीराम हे लंकेवर आक्रमण करण्यासाठी
सेतूचे बांधकाम करत होते तेव्हा सगळे वानर (वानर सेना) हे आपआपल्या शक्तीनुसार दगड जमा करत होते तेव्हा श्री हनुमानजीनी हा सेतू बांधण्यासाठी गोवर्धन पर्वतच उचलून आणला होता.परंतु ते यायच्या आतच सेतूचं काम झालं होतं. सेतूमध्ये मदत नाही करता आली म्हणून
गोवर्धन पर्वताने त्याचं दुःख श्रीरामांकडे प्रकट केलं. प्रभू श्रीराम यांनी वचन दिलं की पुढच्या जन्मात ते त्या पर्वताचा उपयोग नक्की करतील.आणि श्री हनुमंत यांना सांगितले की हा पर्वत पुन्हा त्या जागी ठेवून ये. पुढच्या जन्मात जेव्हा भगवंतांनी श्रीकृष्ण अवतार घेतला तेव्हा वृंदावन मधील
लोकांना गोवर्धनाची पुजा करण्यास सांगितली.याला नाराज होऊन श्री इंद्र देवांनी गोवर्धन पर्वतावर आक्रमण केले. तेव्हा भगवान श्रीकृष्ण यांनी लोकांना वाचवण्यासाठी गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलला आणि श्री इंद्र देव यांचा गर्व मोडला.तेव्हापासून गोवर्धनाची पुजा केली जाते, अन्नकुट
उत्त्सव साजरा केला जातो.
६:- भाऊबीज - कार्तिक शुक्ल द्वितीया: सहावा दिवस आहे भाऊबीज 👍
यादिवशी देवता श्री यमराज आपल्या बहिणीला यमुना देवीना भेटायला त्यांच्या घरी गेले.
त्यांच्या बहिणीकडून झालेला आदर सत्कार पाहून ते खूप प्रसन्न झाले.
तेव्हा श्री यमराज यांनी हे वरदान दिले की या दिवशी जो भाऊ त्याच्या बहिणीच्या घरी जाईल, त्याला संकटापासून मुक्ती मिळेल आणि मोक्ष मिळेल. तेव्हापासून हा दिवस भाऊबीज नावाने साजरा होतो.यादिवशी सगळ्या बहिणी तिच्या भावाच्या सुरक्षेची भगवंतांना प्रार्थना करतात.
तर मित्रांनो हे ६ दिवस दिवाळीचे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत.आपण कट्टर हिंदू आहोत आपल्याला या गोष्टी १००% माहीत असायला हव्यात.
स्वामी विवेकानंद यांनी म्हटल्याप्रमाणे, "गर्व से कहो हम हिंदू हैं", आपले सण आवर्जून साजरे करा, कारण सण साजरे केल्यानेच संस्कृती टिकते.
भविष्यात सेक्युलर अथवा गैरहिंदुनी "दिवाळी" का साजरी केली जाते असे विचारल्यास तुम्हाला या गोष्टी तोंडपाठ पाहिजेत.ही माहिती प्रत्येक हिंदूपर्यंत , पाठवा!..जय श्रीराम 🙏🚩
सर्वांना येणाऱ्या दिवाळीच्या आरोग्यमय,
आनंदमय आणि हार्दिक शुभेच्छा

🪔 🙏

शुभ दिपावली (हॅप्पी म्हण्यापेक्षा शुभ म्हणुया)

🔆🔅🔆🔅🕉️🔅🔆🔅🔆
🔆🔅 रामकृष्णहरी 🔅🔆
🔆🔅🔆🔅🕉️🔅🔆🔅🔆

#CP

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with ADITI Gujar

ADITI Gujar Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @AditiGujar

Oct 19
🌧🌧🌧🌧🌧

या वेळेस पाऊस म्हणाला
मी परत नाही जाणार 😏
दिवाळीची मजा
मी पण अनुभवणार 🤗

मी आल्यावर लोक करतात
नुसते उपास अन् तापास 🙃
कधीच मिळत नाही मला लाडू चिवडा चकल्यांचा वास🙁

वास घेऊन पदार्थांचा जेव्हा
होईल मी तृप्त 😌
मगच ठरवलय मी
ह्या थंडीत होईल लुप्त 🌫
चातुर्मासातला फराळ म्हणजे
साबुदाणा अन् भगर 😖
त्याला कशी येणार
दिवाळीच्या फराळाची सर 🤨

छत्री रेनकोट बघून बघून
मी ही कंटाळलोय 😩
दिवाळीचे नविन कपडे
बघायला मी थांबलोय 😍

म्हंटल होत आपणही कुर्रम कुरम चकली खाऊ 😉
पण माझ्या अनपेक्षित थांबण्याने तीही झाली मऊ 😒
लाडू बसला फुगून
करंजी बसली गुरफटून 👿
"अतिथी देवो भव"
सारेच कसे गेले विसरू🤔

मला बघून सारेच जण हिरमुसून बसले 😼
उदास चेहरे बघून त्यांचे
मला रडू फुटले 😭
बघायचा होता मला
फटाक्यांचा धूर 🎆
Read 4 tweets
Oct 19
प्रसंगी अगदी स्वतःची कवच कुंडले सुद्धा रूप बदलून आलेल्या इंद्राला देऊन टाकली होती. इतकं सगळं असताना शेवटच्या महायुद्धात कृष्णाने अर्जुना करवी कर्णाला पाठीमागून बाण मारायला लावून मारले. हे अनेकांना न उलगडलेले कोडे...! तेच कोडे रुक्मिणीला सुद्धा पडलेले होते.
युद्ध संपल्यावर कृष्ण जेव्हा घरी आला तेव्हा तिने त्याला विचारले "कर्ण सर्व बाबतीत निर्दोष होता तरी तुम्ही त्याला का मारले..?" त्यावर कृष्णाने सांगितलं की, "नक्कीच कर्ण दानशूर होता, चारित्र्य संपन्न होता. याचकाला कधीही त्याने विन्मुख पाठवले नाही.
अशी अनेक चांगली कामे (कर्म) त्याने केले.

मात्र जेव्हा अभिमन्यूने लहान वयातही कौरवांचा चक्रव्यूह भेदून आत प्रवेश केला होता, तेव्हा खरेतर त्याने सर्वाना जणू पराभूत केलेच होते. त्यामुळे तिथून बाहेर पडणे इतकेच बाकी होते.
Read 10 tweets
Oct 18
♦️ विचारपुष्प♦️

🌹ऋण🌹

ऋण फेडता आले पाहिजे.
वनवासाच्या काळात माता सीतेला तहान लागली,
तेव्हा श्रीरामाने सर्वत्र बघितले,
पण पाणी कोठेच मिळेना.
सर्वत्र जंगलच दिसत होते.
तेव्हा श्रीरामाने पृथ्वीमातेला प्रार्थना केली की,
जेथे कोठे पाणी असेल,
तेथे जाण्याचा मार्ग आम्हांला दाखव.
तेव्हा एक मयुर 🦚तेथे आला,
व श्रीरामास म्हणाला,
येथून थोड्याशा अंतरावर एक जलाशय आहे.
चला मी आपणास दाखवतो.
पण तिथे मी उडत उडत जाईन,
आणि आपण चालत येणार,
त्यामुळे चुकामूक होऊ शकते.
म्हणून मी मार्गात एक एक पंख टाकत जाईन.
त्यामुळे आपणास मार्ग सापडेल
व आपण जलाशया जवळ पोहचाल.

आपणास माहिती आहे की,
मयूर पंख, हॆ एक विशेष काळी,
व एक विशेष ऋतुमध्ये पंख तुटून पडतात.
पण मोराच्या इच्छेविरूद्ध पंख निघत असतील,
तर त्याचा मृत्यु होतो.
आणि तेच झाले.
त्याचे पंख निघत होते,
त्यामुळे त्याचा मृत्यूचा काळ जवळ आला होता.
Read 10 tweets
Sep 15
♦️ विचारपुष्प♦️

🌹भक्ती🌹

आज मी तुम्हाला एक अदभुत गोष्ट सांगणार आहे. सावता माळ्याची.
मग तुम्हाला कळेल की भक्ती काय चीज असते !

सावता माळी हा शेती करून पोट भरणारा एक भक्त होता. त्याचा पांडुरंगावर व पांडुरंगाचा त्याच्यावर खूपच लोभ होता.
सोलापूर जवळच्या एका गावी तो रहात असे.
सावता माळी अभंग रचनाही करीत असे. काशिबा गुरव हे त्यांचे अभंग लिहून ठेवत असत.
आज फक्त 37 अभंगच ज्ञात आहेत आपल्याला त्यांचे. पण तेवढेही पुरेसे आहेत भक्ती शिकायला.
त्या अभंगांचं सार हेच की 'प्रचंड उत्कट चिंतन केलं की भगवंत भेटतो.'
तर, हा सावता माळी त्याच्या शेतात गव्हाचं पिक घेत असे. एके वर्षी भरपूर पिक आलं होतं. त्याच सुमारास पंढरपूर कडे जाणारी वारकर्यांची दिंडी त्याच्या शेतावरून जात असताना त्याने थांबवुन त्यांना भोजन घातलं.
सगळे भोजनाने खूश झाले.
Read 14 tweets
Sep 13
🌸🌸🌸ॐ गं गणपतेय नमः 🌸🌸🌸

- यक्षाने धर्मराजाला विचारलेले प्रश्न..

👉 1) देवपूजेपेक्षा श्रेष्ठ सेवा कोणती. ?
उत्तर : आईवडीलांची सेवा ही अधिक श्रेष्ठ.
👉 2) उघड शत्रूपेक्षा अधिक घातक कोण?
उत्तर : कृतघ्न मित्र अधिक घातक.
👉 3 ) गृहस्थाश्रमाचे खरे वैभव कोणते?
उत्तर : त्यागशील आणि सद्गुणांची पत्नी.
👉 4)सर्वात मोठे आश्चर्य कोणते?
उत्तर : आपल्या डोळ्यांसमोर रोज अनेक माणसे मरताना दिसतात, पण आपण मात्र अमर आहोत असे अनेकांना वाटते, हे मोठे आश्चर्य.
👉 5) मानवाचा सर्वात मोठा शत्रू कोणता?
उत्तर : क्रोध राग .
👉 6) पृथ्वीपेक्षा गौरवास्पद काय?
उत्तर : आई.
👉 7) गवतापेक्षा अधिक गतीने कोण वाढते?
उत्तर : चिंता - काळजी.
Read 9 tweets
Sep 9
♦️ विचारपुष्प♦️
🌹।।नमस्कार ।।🌹

दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या पायऱ्यांवर किंवा ओट्यावर थोडा वेळ का बसतात?
आपल्यापैकी बऱ्याच जणांना आपल्या वयस्क किंवा वडीलधाऱ्या लोकांनी कधीतरी सांगितलेलं असेलच की मंदिरात दर्शनाला गेल्यानंतर दर्शन करून लगेच निघू नये मंदिरात काही वेळ बसायला पाहिजे
परंतु तुम्हाला माहिती आहे का
या परंपरेमागचं मूळ कारण काय आहे?
आजकाल काही लोकं दर्शनाला जातात आणि वडीलधाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे पायऱ्यांवर बसतात आणि तिथं बसून व्यावसायिक किंवा राजकीय चर्चा सुद्धा करतात.
परंतु ही प्राचीन_परंपरा एका विशिष्ट उद्देशासाठी बनवली गेली होती.
वास्तविक पाहता आपण सर्वांनी दर्शन घेऊन निघताना किं श्लोक म्हणायला हवा, जो आजकाल बहुतांश लोकांना माहित नाही.

आपल्या माहितीसाठी तो श्लोक सांगत आहे तुम्ही नक्की वाचा व इतरांनाही सांगा
Read 9 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(