ADITI Gujar Profile picture
Apr 11 4 tweets 1 min read
मतदान नक्की कराच...कारण

१७७६ ला अमेरिकेमध्ये केवळ एक मत जास्त मिळाल्याने जर्मन भाषेऐवजी इंग्रजी भाषा राष्ट्रभाषा बनली.
मतदान नक्की कराच... कारण

इस २००८ मध्ये राजस्थानच्या नाथद्वारा सीटवर सी. पी. जोशी फक्त एका मताने हरले आणि गंमत म्हणजे वेळेअभावी त्यांचा ड्रायव्हरच मतदान करू शकला नव्हता.
मतदान नक्की कराच... कारण

१९२३ ला फक्त एक मत जास्त मिळाल्यामुळे हिटलर नाझी पार्टीचा प्रमुख झाला आणि हिटलर युगाची सुरुवात झाली.
मतदान अवश्य कराच... कारण

१८७५ ला फ्रान्समध्ये केवळ एका मताने राजेशाही जाऊन लोकशाही प्रस्थापित झाली.
मतदान अवश्य कराच... कारण
May 22, 2023 9 tweets 2 min read
♦️ विचारपुष्प♦️

🦅 गरुड 🦅

गरुड पक्षी ज्याला आपण गरुड किंवा शाहीनसुद्धा म्हणतो.

ज्या वयात इतर पक्ष्यांची पिल्ल आवाज करायला शिकतात त्या वयात मादी गरुड तिची पिल्ल पंजामध्ये पकडते आणि उंच उडते.
इतर कुणालाही पक्ष्यांच्या जगात असे कठोर आणि घट्ट प्रशिक्षण नसते. मादी गरुड तिच्या पिल्लाला सुमारे 12 कि.मी. वरपर्यंत नेते.
जेवढ्या वर विमान उडत असते एवढ्या वर जाण्यास मादी गरुड ७/८ मिनट घेते.
येथून त्या चिमुरड्या पिल्लाची कठोर परीक्षा सुरू होते.

त्याला येथे सांगितले जाते आपण कशासाठी जन्माला आलो आहोत?
आपले जग काय आहे? आपली उंची किती आहे?
May 20, 2023 5 tweets 1 min read
♦️ विचारपुष्प♦️

🌹मारुती🌹

मारुती हे नाव सगळयाना माहीत आहे पण मारुती नावाचा अर्थ खूप महान आणि गहन विषय आहे.

मा- म्हणजे मारुत.
मारुत - पवन किंवा वारा. महर्षी कश्यप यांचे 49 पुत्र जे अत्यंत बलवान होते. त्रिखंडात वारा आणि हवा पोहोचविण्याचे काम हे त्यांचेच. त्या 49 मारुतांची शक्ती एकट्या अंजनी पुत्रा मध्ये सामावलेली आहे.

दुसऱ्या बाजूने

मा- म्हणजे माधव, देव विष्णू.

रु - म्हणजे रुद्र. देव शिवशंकर
ती मध्ये
त - सत तत मधील त म्हणजे देव ब्रह्मदेव.

आता ती च्या वेलांटी बद्दल
ती मधली त + इ =ती
इ = गौरी+सरस्वती+लक्ष्मी= "शक्ती" त्यातील ती
Apr 15, 2023 10 tweets 2 min read
एक राजाला चार राण्या होत्या.
पहिली राणी इतकी सुंदर होती, कि तो तिला प्रेमाने बघतच रहायचा.
❕दुसरी राणी इतकी सुंदर होती की, तिला तो सतत जवळ घेऊन बसायचा!
❕तिसरी राणी इतकी सुंदर होती कि, तिला कायम बरोबर घेऊन फिरायचा . ❕पण चौथ्या राणीकडे तो कधीच लक्ष द्यायचा नाही !!!
❕राजा म्हातारा झाला, तो मरणासन्न अवस्थेत असताना त्याने पहिल्या राणीला बोलावले आणि म्हणाला,
"मी तुला एवढे प्रेम दिले, तू माझ्याबरोबर येशील का?"
❕राणी म्हणाली "नाही, मी तुम्हाला इथेच सोडून देणार आहे."
Mar 21, 2023 6 tweets 2 min read
🙏 गुढीपाडवा वर्षारंभ कां ?🙏

१) आपण सर्व हिंदू आहोत !
२) आपला वर्षारंभ शालिवाहन शक प्रमाणे आहे !
३) आपण तिथी प्रमाण मानतो !
४) तिथी हे कालक्रमण सत्य माप आहे !
५) तिथी अनादी काळ दर्शवते !
६) सृष्टी ही प्रवाहरूप अनादी आहे !
७) कालक्रमण हे ब्रह्मदेवा पासून आहे ! Image ८) सध्या ब्रह्मदेव ५३ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत !
९) ५२ वर्षे, १३ घटका, ४२ पळ, ३ अक्षरं हे त्याचं वय आहे !
१०) आता आपण वराह कल्पात आहोत !
११) या कल्पातील ७ व्या मन्वंतरात आहोत !
१२) ७ व्या मन्वंतरातील २८ व्या युगात आहोत !
१३) २८ व्या युगातील कलियुगात आहोत !
Feb 20, 2023 5 tweets 1 min read
|| हे सांगायला आमचीच पिढी कमी पडली ||

लग्न पूर्ण ठरेपर्यंत
स्पर्शाचा गंधही नव्हता..
नुकत्याच ठरलेल्या लग्नाला
स्पर्श मंद मंद स्पर्शत होता ..
जातायेता वाऱ्याने उडलेला पदर
गुदगुल्या करायचा ..
चहाच्या कपाची देवाणघेवाण
हळूच बोट धरायचा .
रस्त्याने चालताना समोरून येणारी गाडी खांदा धरायला भाग पाडायची
ती रुतलेली बोट
काळजापर्यंत भिडायची ..
हॉटेलमधे समोरासमोर बसल्यावर
नजरेला नजर स्पर्श करायची ..
टेबलाखाली लपलेली पावलही
अडसर दूर करुन पावलाला बिलगायची ..
मोगऱ्याच्या गजऱ्याचा सुगंध
केसांनाही स्पर्शुन जायचा ..
मानेवर ओघळलेल्या फुलाला नव्हे मानेला
Feb 16, 2023 11 tweets 4 min read
संध्येतील भगवान विष्णूंच्या केशव नावाच्या (२४ पैकी एक) शिल्पाचा परिचय

१) केशवाय नम

कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना, आचमन करतात. विष्णूंची केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः पहिली तीन नांवे घेताना, डाव्या हातातील पळीने उजव्या हातात पाणी घेऊन, प्राशन केले जाते व गोविंदाय नमः च्या वेळी ताम्हनात सोडले जाते.नंतर बाकीची २० नांवे म्हणताना हात जोडुन नमस्कार स्थितीत ठेवले जाते याला आचमन करणे म्हणतात. आचमनाने शरीर शुध्द होते.

यातील पहिले नांव ॐ केशवाय नमः असे आहे.
Feb 4, 2023 9 tweets 2 min read
एखादा माणूस माझ्या मनातून उतरला की, मी आयुष्यभर त्याच्याकडे ढुंकूनही बघणार नाही.. ह्या अश्या स्वतःच्या ग्रेट स्वभावाचा काही लोकांना प्रचंड गर्व असतो, म्हणूनच हा मेसेज मला सगळ्यांबरोबर शेअर करावासा वाटला..

कधी तरी निवांत बसून आयुष्यात येऊन गेलेल्या आणि दुरावलेल्या नात्यांचा डोळसपणे अभ्यास केला की, लक्षात येतं की, असे अनेकजण ज्यांनी "आपल्याला दुखावलं" म्हणून आपल्या आयुष्यातून आपण त्यांना
वजा केलं होतं ते अनेकदा समर्थनीय नव्हतंच !

भावना दुखावल्या, असं म्हणत आपण आपल्या अहंकाराला विनाकारण जोपासत बसलो..
Jan 22, 2023 11 tweets 2 min read
♦️ विचारपुष्प♦️

✍️ कोणाचाही द्वेष करण्याची सवय जीवनात कोणतेही सुख मिळवू देत नाही. ही सवय आपली मानसिक शांती भंग करते. तुम्ही कधी कधी जास्त स्पष्ट बोलता. त्यामुळे लोक तुमच्या पासून दुरावतात.

पण त्यांना तुमच्या बोलण्याचा अर्थ कळेपर्यंत त्याची वेळ निघून गेलेली असते. आयुष्यात दोनच गोष्टी पाहीजे. कुटूंबाच प्रेम आणि काही प्रेमळ व्यक्तींची साथ.

आधाराची अपेक्षा नकळत माणसाला अपंग बनवून जाते. अंथरुणावर रात्री झोपताना उद्याची चिंता भासली की, समजून जायचं आयुष्य जबाबदारीच्या पायऱ्या चढत आहे. धडा तर लहान मुलांकडून घेतला पाहिजे. की,
Jan 18, 2023 12 tweets 2 min read
♦️ विचारपुष्प♦️
🌹संस्कार🌹

सुई दोरा वापरण्याचा एक नियम पुर्वी पाळला जायचा, अजूनही अनेक घरात असेल. नियम असा असतो की, समजा एखाद्याने दोऱ्याने काही शिवलं आणि ओवलेला दोरा संपला तर त्याने परत सुईत दोरा ओवून गाठ मारुन तो नीट रिळाला गुंडाळून ठेवायचा. दुसऱ्याला सुईला दोरा लावलेला मिळतो, त्याचं काम झालं की त्यानं परत तेच करायचं.

पुर्वीच्या काळी पाण्याचे बंब असायचे. एकत्र कुटुंब असायचं. गरम पाण्याच्या बाबतीतही हा नियम असायचा की जो बंबातून पाणी घेईल त्यानं अंघोळीला जाण्यापुर्वी दुसऱ्यासाठी बंबात पाणी भरायचं.
Dec 16, 2022 9 tweets 2 min read
♦️ विचारपुष्प♦️

🌹 दोन हिरे🌹

एका व्यापाऱ्याला बाजारात एक भव्य उंट विकत घ्यायचा होता.
आणि एक उंट निवडल्यानंतर त्या उंटाची किंमत ठरवण्यासाठी उंट विक्रेता व व्यापारी यांच्यात बोलणी सुरू झाली . व्यापारी आणि उंट विक्रेत्यामध्ये करार झाला आणि शेवटी त्या व्यापाऱ्याने उंट विकत घेऊन घरी नेला !

घरी पोहोचल्यावर व्यापाऱ्याने आपल्या नोकराला उंटाचा काजवा (खोगीर) काढण्यासाठी बोलावले ..!

काजवेच्या खाली सेवकास एक लहान मखमली पिशवी सापडली ज्यामुळे उघडकीस आले की ते
Dec 15, 2022 6 tweets 1 min read
♦️ विचारपुष्प♦️

🌹गुरू शिष्य संबंध🌹

सद्गुरू आणि शिष्य यांचं नातं आई मुलासारखं किंवा त्याच्यापेक्षाही अधिक जवळीकीचं असतं कारण आई -मुलगा हा संबंध एका जन्माचा असतो तर सद्गुरू जन्मोजन्मी आपली काळजी घेतात. दुसरं म्हणजे आईच्या प्रेमाला थोडीशी स्वार्थाची झालर असते , सद्गुरूंच्या जवळ त्याचा लवलेशही नसतो.

पुढचं असं मनात येतं की , " आपले सद्गुरू कोण आणि ते आपल्याला कधी भेटतील ?

यावर श्रीमहाराज उत्तर देतात , " तुम्ही साधना सुरु करा. सद्गुरू कुठंही असुदेत ! ते तुम्हाला निश्चित भेटतील. जसं गुळाची ढेप कुठं ठेवलीये ते मुगळ्यांना सांगायला नको."
Nov 27, 2022 8 tweets 2 min read
♦️ विचारपुष्प♦️

🌹 "शांतता" 🌹

"शांतता ही का महत्त्वाची असते..?आज काल आपण पाहतो, काही माणसे लहान - लहान गोष्टींवर खुप चिडचिड करत असतात. त्याचा जीवनात आलेल्या संकटांवर त्यांना मात करता येते नाही . त्यामुळे ती माणसे स्वतःचा राग दुसऱ्यावर काढत असतात. पण, असल्याने काही होणार आहे का नाही ना..?तुम्ही जर स्वतःचा राग दुसऱ्यावर काढत असाल,तर तुम्ही दुसऱ्याचे मन दुखवत आहात. हे विसरून चालणार नाही.

विना कारण दुसर्याचे मन दुख उन स्वतःचे कधीच चांगले होत नाही .
Nov 26, 2022 7 tweets 1 min read
सात कोड्यांना बालोपासनेच्या वेळेस आईंने मुलांना दिलेली उत्तरे

१. या जगात सगळ्यात टोकदार वस्तू कोणती..??
मुले म्हणाली , तलवार...

आईंने सांगितले.. जीभ..
कारण या जिभेमुळे माणूस सहजपणे दुसऱ्याचा अपमान करतो, दुसऱ्याला दुखावतो, दुसऱ्याच्या भावनांना धक्का पोचवतो. २. या जगात आपल्यापासून सगळ्यात दूर काय आहे..??

एकजण म्हणाला, सूर्य, चंद्र, आकाशगंगा...

आई म्हणाल्या... भूतकाळ.

माणूस कितीही श्रीमंत असला तरी तो भूतकाळात जाऊ शकत नाही.त्यामुळे आपण आजच्या दिवसाचा आणि आपल्या आयुष्यात येणाऱ्या पुढील सगळ्या दिवसांचा चांगला उपयोग केला पाहिजे.
Nov 25, 2022 9 tweets 2 min read
♦️ विचारपुष्प♦️

🌹कर्म🌹

स्त्री असो वा पुरुष बोलताना शब्द जपून वापरावेत. नाहीतर किती मोठा अनर्थ घडू शकतो हे महाभारताच्या या उदाहरणावरून लक्षात येईल.

महाभारताचं युद्ध अठरा दिवस चालले. याचा द्रौपदीला खूप त्रास झाला. शरीराने व मनाने ती खूप खंगली होती, वयस्कर दिसत होती. हस्तिनापुरात सर्वदूर विधवा दिसत होत्या.
अनाथ मुले इकडे तिकडे फिरत होती. एखाद दुसरा पुरुष दिसत होता आणि सर्वांची महाराणी द्रौपदी हस्तिनापुराच्या महालात निजली होती..

तेव्हां श्रीकृष्ण तिच्या कक्षात आले..

त्याला पाहून तिला रहावलं नाही.
Nov 18, 2022 12 tweets 2 min read
पीर....मज़ार.....व हिरवी चादर.
😴🤔

मुसलमान हिरवी चादर घेऊन भीक का मागतात...? तुम्हीपण हिरवी चादर घेऊन भीक मागणाऱ्या दाढी वाल्यांना कधी ना कधी पाहिले असणार, खूप लोक पिराची पूजा करायला जातात. कारण काय आहे...??

हिंदू लोक पीर-मजार का पुजतात....? हिंदू मधली ही अंधश्रद्धा दूर करण्याची अत्यंत आवश्यकता आहे.

पीर म्हणजे काय.....?

मुस्लिम राज्यकर्त्यांचा एक अधिकारी असायचा ज्याला पीर म्हणले जायचे. ज्याची नऊ घेऱ्यांची सुरक्षा असायची, जशी आज-काल सुरक्षा मुख्यमंत्र्याला मिळते कमांडों ची तशीच.
Oct 21, 2022 25 tweets 4 min read
🔆🔅🔆🔅🕉️🔅🔆🔅🔆
🔆🪔 शुभ दिपावली 🪔🔆
🔆🔅🔆🔅🕉️🔅🔆🔅🔆

खरं तर आपल्या हिंदू धर्माचा सर्वात मोठा सण येतोय दीपावली, ज्याला आपण दिवाळी म्हणतो.
परंतु ~३०% लोकांनाच माहीत आहे की दिवाळी हा सण का साजरा केला जातो. बाकी ~७०% तर फक्त लहानपणापासून असे समजतात की फक्त दिवे लावणे, फराळ, आणि फटाके फोडणे, श्रीमती लक्ष्मी देवींचे पूजन करणे, बस हीच आहे दिवाळी. असो काही हरकत नाही...
दिवाळी हा सण सनातन हिंदूंचा सर्वात मोठा सण आहे. या दिवशी प्रभु श्रीराम, बंधू श्री लक्ष्मण जी आणि श्रीमती सितामाता यांच्यासोबत १४
Oct 19, 2022 4 tweets 1 min read
🌧🌧🌧🌧🌧

या वेळेस पाऊस म्हणाला
मी परत नाही जाणार 😏
दिवाळीची मजा
मी पण अनुभवणार 🤗

मी आल्यावर लोक करतात
नुसते उपास अन् तापास 🙃
कधीच मिळत नाही मला लाडू चिवडा चकल्यांचा वास🙁

वास घेऊन पदार्थांचा जेव्हा
होईल मी तृप्त 😌
मगच ठरवलय मी
ह्या थंडीत होईल लुप्त 🌫 चातुर्मासातला फराळ म्हणजे
साबुदाणा अन् भगर 😖
त्याला कशी येणार
दिवाळीच्या फराळाची सर 🤨

छत्री रेनकोट बघून बघून
मी ही कंटाळलोय 😩
दिवाळीचे नविन कपडे
बघायला मी थांबलोय 😍

म्हंटल होत आपणही कुर्रम कुरम चकली खाऊ 😉
पण माझ्या अनपेक्षित थांबण्याने तीही झाली मऊ 😒
Oct 19, 2022 10 tweets 2 min read
प्रसंगी अगदी स्वतःची कवच कुंडले सुद्धा रूप बदलून आलेल्या इंद्राला देऊन टाकली होती. इतकं सगळं असताना शेवटच्या महायुद्धात कृष्णाने अर्जुना करवी कर्णाला पाठीमागून बाण मारायला लावून मारले. हे अनेकांना न उलगडलेले कोडे...! तेच कोडे रुक्मिणीला सुद्धा पडलेले होते. युद्ध संपल्यावर कृष्ण जेव्हा घरी आला तेव्हा तिने त्याला विचारले "कर्ण सर्व बाबतीत निर्दोष होता तरी तुम्ही त्याला का मारले..?" त्यावर कृष्णाने सांगितलं की, "नक्कीच कर्ण दानशूर होता, चारित्र्य संपन्न होता. याचकाला कधीही त्याने विन्मुख पाठवले नाही.
Oct 18, 2022 10 tweets 2 min read
♦️ विचारपुष्प♦️

🌹ऋण🌹

ऋण फेडता आले पाहिजे.
वनवासाच्या काळात माता सीतेला तहान लागली,
तेव्हा श्रीरामाने सर्वत्र बघितले,
पण पाणी कोठेच मिळेना.
सर्वत्र जंगलच दिसत होते.
तेव्हा श्रीरामाने पृथ्वीमातेला प्रार्थना केली की,
जेथे कोठे पाणी असेल, तेथे जाण्याचा मार्ग आम्हांला दाखव.
तेव्हा एक मयुर 🦚तेथे आला,
व श्रीरामास म्हणाला,
येथून थोड्याशा अंतरावर एक जलाशय आहे.
चला मी आपणास दाखवतो.
पण तिथे मी उडत उडत जाईन,
आणि आपण चालत येणार,
त्यामुळे चुकामूक होऊ शकते.
म्हणून मी मार्गात एक एक पंख टाकत जाईन.
त्यामुळे आपणास मार्ग सापडेल
Sep 15, 2022 14 tweets 3 min read
♦️ विचारपुष्प♦️

🌹भक्ती🌹

आज मी तुम्हाला एक अदभुत गोष्ट सांगणार आहे. सावता माळ्याची.
मग तुम्हाला कळेल की भक्ती काय चीज असते !

सावता माळी हा शेती करून पोट भरणारा एक भक्त होता. त्याचा पांडुरंगावर व पांडुरंगाचा त्याच्यावर खूपच लोभ होता. सोलापूर जवळच्या एका गावी तो रहात असे.
सावता माळी अभंग रचनाही करीत असे. काशिबा गुरव हे त्यांचे अभंग लिहून ठेवत असत.
आज फक्त 37 अभंगच ज्ञात आहेत आपल्याला त्यांचे. पण तेवढेही पुरेसे आहेत भक्ती शिकायला.
त्या अभंगांचं सार हेच की 'प्रचंड उत्कट चिंतन केलं की भगवंत भेटतो.'