अफजल्याचं वर्णन करताना जो अभिमान, चहऱ्यावर ती मिठी दाखवतांना जे तुमचे हावभाव होते.. ते बघून वाईट वाटलं! फाटलेल्या अफजल्याच तुम्हाला जर इतकं कौतुक असेल, तर विचार कर त्याला ज्यांनी फाडला त्या महाराजांचं आम्हाला किती कौतुक असेल?
तू मला बेचिराख करण्याची स्वप्ने बघ, मी तुला भेटण्यासाठी तुझ्याच छावणीत प्रवेश करेन! तू मला मिठीत घेऊन दाबण्याचा प्रयत्न कर मी तुला आहे तिथेच पुरून मोकळा होईल!! तू जे केलंस ते मीही करू शकलो असतो पण मी धर्म आणि धर्म रक्षक आहे मला दगा करायची शिकवण दिलेली नाही.!
शस्त्र चालविता येणं ही कला नसते. योग्यवेळी शस्त्र कसं आणि कुठे वापरावं याचं शास्त्र माहित असावं नाहीतर प्रत्येक जण जेता झाला असता ना! रणांगणावर असताना लढवय्ये म्हणून लढावं आणि रणभूमीबाहेर माणूस म्हणून, नेमक तुला हेच ठाऊक नव्हतं म्हणून तू चुकलास!
आणि तुझा पराभव अटळ झाला! हे आजच्या काळात सुद्धा तुझ्या आवलादिंनी लक्षात घ्यावं...! जेव्हा तल्लख बुद्धीने केलेला जीवघेणा वार एखाद्या दाहक शस्त्राच्या वारापेक्षा घातक ठरतो, तेव्हा प्रतापगडाचा रणसंग्राम आठवतो.!
मिठी काय असते हे त्या फितूर अफजल खानाच्या कबरीवर जाऊन कोणीही विचारा! मिठी मारून दगा करणाऱ्या बत्तीस दातांच्या बोकडाचा वध महाराजांनी कसा केला वाटलं तर हेही विचारा त्याच्या कबरीवर जाऊन.आजही ती कबर महाराजांच्या नावाने कशी थरथरते बघा मग.!
आणि हो एक लक्षता ठेवायचं! तो आला नव्हता, त्याला आणला होता आणि तो मेला नव्हता, त्याला मारला होता..! साडेसहा फुटाचा आणि जबरदस्त मगरमिठी असलेला बोकड महाराजांनी प्रताप गडाच्या पायथ्याशी टरा टरा फाडला होता, तोही बोटांच्या फक्त नखांनी फाडला होता..!
जय शिवराय..🙏
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
आज प्रयागराज HCने अडवाणी यांच्या सहित 32 रामभक्तांच्या निर्दोष मुक्ततेला आव्हान देणारी याचिका फेटाळली! हे समजताच, पूर्वी 'जर-तर' म्हणत क्रेडिट घेतलेल्यांनी आता पुन्हा एकदा क्रेडिट खायचा घाट घातलाय!
⚡ फॅक्ट-चेक : 👇
खालील माहिती मी देत नाहीये, पण नक्की वाचा :
6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत एकही शिवसैनिक उपस्थित नव्हता! पण मनोहर जोशी, सुधीर जोशी आणि प्रमोद नवलकर यांसारखे बाळासाहेबांचे शिलेदार मुंबईतून अयोध्येला जातो म्हणून गेले होते हेही खरं आहे..👇
अयोध्यानगरी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि भाजपचे वरिष्ठ नेते व व कार्यकर्त्यांमुळे खचाखच भरले होते. हॉटेल्स आणि गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची सर्व व्यवस्था आधीच फुल्ल झाली होती. जागा नसल्याने शिवसेनेच्या नेत्यांची तात्पुरते तंबूत तळ ठोकण्यास सांगण्यात आले..👇
पत्राचाळ प्रकरण काय आहे?
मुंबईतील गोरेगाव येथे सिद्धार्थ नगरमध्ये 672 घरांच्या पुनर्विकासासाठी रहिवाशांनी म्हाडा आणि बिल्डरसोबत करार केला आणि 2008 साली पत्राचाळ पुनर्विकास हा प्रकल्प सुरू झाला..
म्हाडा, गुरूआशिष बांधकाम कंपनी आणि रहिवाशांमध्ये या घरांच्या पुनर्विकासासाठी तीन पार्टी करार झाला.
13 एकरपैकी साडेचार एकरवर मूळ रहिवाशांना घरं दिली जातील आणि उर्वरित भागात म्हाडा आणि बिल्डर विक्री करेल असंही ठरलं..
पण या जमिनी गुरुआशिष बिल्डर आणि अधिकाऱ्यांनी परस्पर खासगी बिल्डरांना विकल्याचं समोर आलं आणि आणि हा प्रकल्प रखडला. 1034 कोटी रुपयांची फसवणूक या सर्व लोकांनी मिळून केल्याची तक्रारही दाखल झाली..
G20 हा आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक सहकार्य करणाऱ्या 20 मोठ्या अर्थव्यवस्थांचा समुह आहे, जो जागतिक GDP च्या 85 %, जागतिक व्यापाराच्या 75% पेक्षा अधिक आणि जगाच्या 2/3 लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतो. 1 डिसेंबर 22 ते 30 नोव्हेंबर 23 हे एक वर्ष भारताकडे G20 चे अध्यक्षपद राहणार आहे..
भारत, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, UK, US व EU हे G20 चे सदस्य आहेत! या एक वर्षात विविध विषयांवर G20 च्या 200+ जास्त बैठका भारतात होणार आहेत..
यजमानपद असल्याने त्या अधिकाराचा वापर करून भारताने बांगलादेश, इजिप्त, मॉरिशस, नेदरलँड, नायजेरिया, ओमान, सिंगापूर, स्पेन आणि UAE या देशांना 2023 मध्ये होणाऱ्या शिखर परिषदेसाठी 'पाहुणे' म्हणून आमंत्रित केले आहे..
भारताचे सरन्यायाधीश उदय उमेश लळीत आज रिटायर झाले. जस्टीस एस.एम.सीक्री नंतर 'बार' टू 'बेंच' अशी पदोन्नती देण्यात आलेले ते दुसरे सरन्यायाधीश होते. त्यांनी केवळ 74 दिवसांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आणि निकाल दिले.. तेही कार्यवाहीचे थेट प्रक्षेपण करत..
हल्ली एक ट्रेंड बघायला मिळतो. जज ने जजमेंट कोणाच्या बाजूने दिली बघून बरीच लोकं त्यांना लेबल लावून टाकतात. कधी जज लेफ्टीस्ट असतो, तर कधी संघी. कधी इकोसिस्टिम चा भाग घोषित केले जाते तर कधी पोस्ट-रिटायरमेंट फायदे मिळवायला त्यांनी अमुक निकाल दिला असं लोकं सहज बोलून जातात..🤣 पण..
बऱ्याचदा तसं काहीही नसतं. समोर असलेल्या कायद्याचे पुस्तक व घटना यात काय लिहिलं आहे यावर त्यांचा निर्णय होतो. काही वेळा इंटरप्रिटेशन ला वाव असतो, पण म्हणून काही मनमानी ते करत नसतात. CJI उदय लळीत यांचेच काही निकाल आपण बघूया..
2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून आपण एक गोष्ट सातत्याने महाराष्ट्रात होताना बघत आहोत. ती म्हणजे जनतेशी संबंधित नसलेल्या फालतू विषयांवरून वेळोवेळी घडवून आणलेले वाद आणि (विकाऊ मिडियाकडून) त्यात तेल ओतून जनतेला त्यातच बिजी ठेवायची रणनीती..
2019 मध्ये मविआ नावाचा दहावा ग्रह महाराष्ट्राच्या राशीत आल्यापासूनच हे सगळं सुरू झालं आहे. युवक, शेतकरी, बेरोजगार, महिला, विकास, अर्थव्यवस्था असे विषय चर्चेत येऊ द्यायचे नयेत हीच मविआची रणनीती होती. सत्तेत असताना स्वतः काही केलं नाही, आता जे करताहेत त्यांना करू द्यायचं नाही..
मलिक, दोन्ही राणा, बच्चू कडू, सुषमा अंधारे, अब्दुल सत्तार, नितीन व संजय राऊत, गुलाबराव, सुप्रियाताई, उद्धव आणि आदित्य ठाकरे, पेडणेकर, नाना पटोले आणि त्यांचे डजनभर सहकारी सतत विवादास्पद, भांडणाच्या किंवा आगलावू भाषणबाजीत मश्गुल होते/आहेत! यांनी बडबड करायची, बाकी मीडिया आहेच..
6 राज्यांमधील 7 विधानसभा जागांवरील पोटनिवडणुकीत भाजपाने 6 जागा लढवल्या, 4 जिंकल्या. या 7 पैकी केवळ 2 जागा भाजपा-शासित राज्यांत होत्या, तर 5 विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांत होत्या. भाजप-शासित राज्यांतील 2/2 जागा भाजपने जिंकल्या, ज्यातील 1 काँग्रेस कडून हिसकावून घेतली..
विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या बिहार मध्ये 1 व ओडिशा मध्ये 1 अशा भाजपने अजून 2 जागा जिंकल्या. तेलंगणातील जागेवर भाजपाचे मतदान काही पटीत वाढले व भाजपा 2 क्रमांकावर आला, तेही भारत जोडो यात्रा हल्लीच राज्यातून काढलेल्या काँग्रेसचे डिपॉजित जप्त करून..
महाराष्ट्रातील एक जागा सर्वपक्षीय नेत्यांनी भावनिक आव्हान केल्याने (हात जोडले, पाया पडले!) भाजपने लढवली नाही. पण, जनतेत भाजप-विरोधी पक्षांबद्दलचा रोष असा आहे भाजपा चा उमेदवार नसल्याने 68.3% मतदारांनी मतदानच केलं नाही! ज्यांनी केलं, त्यातील 14.89% (12721) मतदारांनी नोटा वापरला..