बार्शीतील पहिली #अग्निवीर, रंगकाम करणाऱ्या बापाची लेक #सैन्य दलात....

केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी अग्निवीर ही सैन्य दलातील भरती प्रक्रियेसाठी नवी योजना लागू केली.या योजनेला मोठा विरोधही झाला. मात्र,आता या योजनेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. बार्शीतील (१/३)
श्रद्धा प्रमोद करंडे हिची अग्नीवर म्हणून निवड झाली असून शुक्रवार 25नोव्हेंबर रोजी तिने ड्युटी जॉईन केली.
श्रद्धा करंडे ही बार्शीतील पहिली अग्नीवर ठरली आहे.भारतीय नौसेनामध्ये INS चिल्का येथे तिला पहिली ट्रेनिंग पोस्टिंग मिळाली.श्रद्धाचे वडील प्रमोद करंडे यांनी आपल्या (२/३)
मुलीच्या यशाबद्दल आनंदही व्यक्त केला. प्रमोद करंडे हे रंगकाम(पेंटर)म्हणून काम करतात.
लोकांच्या घरांच्या भिंती रंगवून त्यांनी मुलीला शिकवले, या पदास योग्य बनवले. अर्थात, श्रद्धानेही वडिलांच्या कष्टाचे चीज केले.
तिच्या या यशाबद्दल तिचं सर्वत्र कौतुक होत आहे.

हार्दिक अभिनंदन (३/३)

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with पांडुरंग सांगवीकर™ (नेमाडेंचे मानसपुत्र)

पांडुरंग सांगवीकर™ (नेमाडेंचे मानसपुत्र) Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @GangadharSoot

Nov 28
एका गावात एक आजीबाई राहत होती. झोपडी बांधून एकटीच राहत होती. तरुणपणी केलेल्या कामाचा पैसा तिच्याकडे होता. त्यावर तिची गुजरण सुरू होती. तिच्याकडे काही पैसा शिल्लक होता. तिला दागिन्यांची हौस होती. त्यामुळे तिने सोन्याची अंगठी खरेदी केली. ती बोटात घालून फिरत होती. (१/६)
आपल्या या अंगठीचे कोणी तरी कौतूक करावे, महिलांच्या ती पाहण्यात यावी, असे तिला वाटत होते. ती महिलांना भेटायची, उगीचच अंगठीचा हात पुढे करून बोलायची. मात्र, तिच्याकडे कोणाचेच लक्ष जात नव्हते.
बरेच दिवस झाले तरी तिच्या अंगठीची कोणीच दखल घेतली नाही. नंतर तिला एक युक्ती सूचली. (२/६)
एके दिवशी तिने आपल्या झोपडीला आग लावली. आग भडकू लागताच, तिने जोरजोरात मदतीचा धावा केला. आग लागल्याचे पाहून गावकरी मदतीला धावून आले. जमेल ती साधणे घेऊन आगीवर पाणी टाकू लागले. गावातील महिलाही धावून आल्या. त्यावेळी आजीबाई आपल्या नवीन अंगठीचा हात पुढे करून महिलांना पाणी (३/६)
Read 6 tweets
Nov 27
सातारा येथील ग्रंथमित्र डॉ शिवाजीराव चव्हाण ग्रंथालया तर्फे दरवर्षी प्रमाणेच चालू वर्षात (1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022)या काळात प्रसिद्ध झालेल्या ग्रंथातील दोन ग्रंथाना 'ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण'
आणि ' सौ सुमन चव्हाण' उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार दिले जाणार आहेत. (१/४)
महाराष्ट्रातील व महाराष्ट्रा बाहेरील इच्छुक लेखकांनी सन 2022 मध्ये प्रकाशित झालेल्या आपल्या ग्रंथांच्या दोन प्रती
दि. 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत खालील पत्त्यावर पाठवाव्यात.
दोन उत्कृष्ट ग्रंथाना प्रत्येकी 2500/-रोख बक्षीस दिले जाईल.
कोणत्याही साहित्य प्रकारातील स्वलिखित (२/४)
अथवा अनुवादित पुस्तके पुरस्कारासाठी पाठवू शकता.
स्वतः लेखक वा प्रकाशकही पुस्तके पाठवू शकतात.
दरवर्षी हा पुरस्कार सोहळा मान्यवरांच्या हस्ते सातारा येथे संपन्न होतो .

अधिक माहिती व सम्पर्कासाठी फोन ......
1: सुनिता कदम 9822112155
2:डॉ.राजेंद्र माने 8975981321

(३/४)
Read 4 tweets
Oct 10
…प्रमोदजीनी सांगितलेली नेपोलियन ची गोष्ट!
नेपोलियनने पॅरिस जिंकण्यासाठी ज्यावेळी पहिल्यांदा आक्रमण केले त्यावेळी त्याला तयारीतील त्रूटीमुळे सीन नदीवरूनच माघार घ्यावी लागली होती, त्यावेळी पॅरिस मधील प्रसिद्ध वृत्तपत्राने बातमी छापली होती,
"पळपुटा, नेपोलियन पळून गेला" (1/5)
या बातमीकडे नेपोलियन फक्त एकदाच पाहिले अन तो कामाला लागला, पुढील तीनच महिन्यात त्याने पुरेशा तयारीने सामर्थ्याने पॅरिसवर चढाई केली अन ते महानगर ताब्यात घेतले.दुसऱ्या दिवशी पहाटे एक मुलगा वृत्तपत्र विकत होता. नेपोलियनच्या मनात आता कुतूहल जागवले होते,की आपल्याला भित्रा, पळपुटा(२/५)
लिहणाऱ्या त्या वृत्तपत्राने आज आपल्या विषयी काय छापले असेल…घोड्यावर बसलेल्या नेपोलियनने त्या मुलाच्या समोरील वृत्तपत्र तलवारने उचलून हाती घेतले. त्याच वृत्तपत्राच्या पहील्या पानांवर हेडलाईन होती
'या युगातील महान योद्धे 'सम्राट नेपोलियन' पॅरिस महानगर आपले स्वागत करत आहे…(३/५)
Read 5 tweets
Oct 10
#World_Mental_Health_Day
एखादयाला आयुष्य वर्थ लिव्हिंग न वाटनं यात काही आश्चर्यकारक नाही. वाटू शकतं. त्याला फूटपाथवर झोपणाऱ्या भिकाऱ्यांचे दाखले देऊन आपण किती प्रिव्हिलेज आहो हे सांगण्यातही काही अर्थ नाही. ठराविक टप्प्यानंतर असल्या मोटिव्हेशनचा फोलपणा लक्षात आलेला असतो. (1/7)
खरंतर दिवसातले 24 तास आणि हप्त्यातले 7 दिवस आयुष्य कुणालाच वर्थ लिव्हींग वाटत नसतं. आपण ही काय झाट उपट करतोय ही फिलिंग एखादया ऑफिस क्लर्क पासून वाईल्ड लाईफ फोटोग्राफर पर्यंत कुणालाही कुठेही गाठू शकते. Existential crisisपासून कुणाचीच सुटका नाही.(2/7)
@hoil_sagal_thik @swarjyaniti
एवढं सगळं असूनही लोकं आत्महत्या करत नाही.
अगदी टोकाला जाऊन मागं फिरतात. कारण त्यांच्या आयुष्यात मागे खेचनारं काहीतरी शिल्लक असतं. भलेही त्यांनी ते कबूल करो वा ना करो. वरकरणी कितीही कोरडं भासलं तरी आपल्या आयुष्यात कुठेतरी ओल शिल्लक आहे हे नेणिवेच्या पातळीवर की असेना (3/7)
Read 7 tweets
Oct 10
खरं तर तरस, सिंहांची ही खूप जुनी रणनीती आहे... हूल देऊन एखादे जनावर कळपातून बाजूला काढायचं.. आधीच लावलेल्या घेराबंदीत आले की, सगळीकडून हल्ला करून जीवंतपणीच लचके तोडायला लागायचे. या शिकारी प्राण्यांचे स्वाभिमान वगैरे काहीही नखरे नसतात. प्रसंगी दुसऱ्याने कष्टाने केलेली शिकार, (1/6)
त्यालाच हुसकावून ताब्यात घेणे त्यांच्या श्वापद धर्मात रीतसर बसते. अगदी सडलेली शिकार खाण्यात देखील ते कमीपणा मानत नाही.

वाघाची रणनीती जरा वेगळी असते.. तो गट तट युती या पैकी कशावरच विश्वास ठेवत नाही. तो एकटाच घात लावून, लपून छपून शिकार टप्प्यात आणतो. मग झडप घालून क्षणार्धात (2/6)
नरडे पकडतो. श्वास घुसमटून शिकार गतप्राण झाली की, आरामात न्याहारी सुरू करतो.

वाघाने सिंह किंवा तरसाशी युती केली तर ती अनैसर्गिक असते.. त्याचा अर्थ वाघ म्हातारा झाला.. आजारी किंवा जबर जखमी झाला असा निघतो.

नुसती चिन्ह, मुखवटे धारण करून कोणी वाघ होत नाही. तशीही वाघ ही फक्त (3/6)
Read 6 tweets
Oct 7
माझ्या वडिलांना वाचवा. मुलीचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन

समाजमाध्यमांवर असंख्य व्हिडीओ बघायला मिळतात. मी फार बघत नाही पण हा व्हिडीओ नजरेस पडला आणि शीर्षक वाचून प्ले केला. एक मुलगी रडत रडत मुख्यमंत्र्यांशी फोनवरून बोलतेय. (१/६)
#म #रीम #समाजमाध्यम #लग्नव्यवथा #समाजभान #आत्मभान
विषय काय तर तिच्या लग्नासाठी वडिलांनी एका सावकाराकडून १०लाख रुपये घेतले होते.
साहजिकच सावकाराने या मुलीच्या वडिलांकडून २एकर शेत लिहून घेतलं. आता ती मुलगी म्हणतेय की माझ्या वडिलांनी दहा लाख परत दिलेत पण तो सावकार शेत परत वडिलांच्या नावावर करायला तयार नाही. आता पुढे वाचा. (२/६)
तिचं लग्न झालं १०लाख रुपये खर्चून आणि तिच्या नवऱ्याने तिला परत माहेरी आणून सोडलंय.आता ती मुलगी म्हणतेय की मी शिकलेली आहे.मी काय करू? माझे वडील आत्महत्या करतील वगैरे वगैरे.ओके.

तर बाई तुझे वडील थोडी थोडकी नाही तर १०लाखाची रक्कम कर्जाऊ घेत होते तेही आपलं शेत त्या सावकाराच्या (३/६)
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(