SDeshmukh Profile picture
Dec 24 12 tweets 2 min read
आज २४ डिसेंबर, आजचाच तो दिवस जेव्हा ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून अखंड भारतासाठी झुंज देणाऱ्या स्वातंत्र्यवीराला जन्मठेप व काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली, व त्यांच्या संपूर्ण मिळकतीवर जप्ती घालण्यात आली.
#मृत्युंजय_दिन
#वीर_सावरकर
एका २७ वर्षीय तरुणाचा आवाज बंद करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न, संपूर्ण इंग्रज साम्राज्याला पुरून उरणारा हा २७ वर्षीय तरुण म्हणजेच क्रंतिकाऱ्यांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर..
भारतातील क्रांतिकारकांना सशस्त्र क्रांतीचा लढा पुकारण्यासाठी मार्गदर्शन, मदत आणि हत्यारे पुरवणे आणि सोबतच इंग्रज अधिकाऱ्याच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांना २५ वर्षाच्या २ काळापाण्याच्या शिक्षा सुनावण्यात आल्या, हाच तो दिवस २४ डिसेंबर, 'मृत्युंजय दीन '.
अगदी बालवयापासून सावरकरांच्या रगारगात देशप्रेम, आणि स्वातंत्र्योच्छुक रक्त सळसळत होतं, अभिनव भारताची स्थापना करून सावरकरांनी क्रांतिकारकांना जोडण्याचे सत्कार्य हाती घेतले, आणि मग शिष्यवृत्ती मिळवून लंडन येथे वकीलीचे शिक्षण घेण्यासाठी सावरकर गेले पण
तेथे असताना ही सावरकरांनी क्रांतिकार्य सोडले नाही तर अधिक जोमाने सुरू केले..भारतातील क्रांतिकारकांना शस्त्र पुरविणे, सोबतच परदेशातही सावरकरांनी क्रांतिकारक जोडले.
एवढेच नाही तर १८५७ साली भारतीयांनी इंग्रजांविरुध्द उभारलेल्या सशस्त्र क्रांतीचा साधार इतिहास सावरकरांनी १८५७ चे स्वातंत्र्यसमर' या ग्रंथात याच काळात लिहून काढला..
ज्याला इंग्रजांनी प्रकाशन पूर्व बंदीही घातली पण त्याचा काही फरक पडला नाही, व्हायचे ते झालेच. आणि पुढे जाऊन हा ग्रंथ अनेक क्रांतिकारकांसाठी प्रेरणादायी ठरला... अशा अनेक गुन्ह्यांखाली सावरकरांना २४ डिसेंबर १९१० रोजी ५० वर्षाची काळापाण्याची शिक्षा सुनावण्यात आली.
आणि लंडन वरून अंदमान येथे सावरकरांना आणले गेले..शिक्षा सुनावल्यानंतर जेव्हा एक ब्रिटिश अधिकारी सावरकरांना या शिक्षेबद्दल सूचित करण्यासाठी आला," सावरकर, तुम्हाला ५० वर्षांची जन्मठेपेची शिक्षा झाली आहे" हे ऐकून कोणीही सर्वसामान्य माणूस खचून गेला असता,
पण तात्याराव धीटपणे त्या इंग्रज अधिकाऱ्याला म्हणाले, " ५० वर्षांची शिक्षा भोगून मी परत येईल पण ५० वर्ष तुम्ही तरी इथे टिकणार आहात का ", आणि तेच घडले, सावकारांच्या शिक्षेचे ५० वर्ष होण्याआधीच इंग्रजांना देश सोडावा लागला..
अशा मृत्युंजय वीर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हिन्दुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्यात सिंहाचा वाटा होता. भारतमातेचे वकीलपत्र घेऊन त्यांनी ब्रिटिश सरकारला जेरीस आणले.आपल्या आशिलासाठी जन्मठेपेच्या शिक्षेवर जाणारा जगातला एकमेव अधिवक्ता म्हणून सावरकरांचा गौरव करण्यात येतो
सावरकरांच्या राष्ट्रनिष्ठेला, राष्ट्रकार्याला, दुर्दम्य आशावादाला, द्रष्टेपणाला, अपराजित लढाऊ वृत्तीला, तेजस्वी बुद्धिमत्तेला, अखंड धगधगत राहणाऱ्या विचारांना, असामान्य कवित्व शक्तीला कोटी कोटी प्रणाम !🙏🙏
“मृत्युंजय दिन”

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with SDeshmukh

SDeshmukh Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @SDesh01

Dec 24
कॉंग्रेसचे नेते सावरकरांच्या मागे एवढे हात धुऊन का लागलेले असतात? सर्वसामान्य नागरिकांना पडलेला हा प्रश्न असतो. सावरकर तर हयात नाहीत, ते ज्या हिंदुमहासभेचे अध्यक्ष होते, त्या हिंदुमहासभेची राजकीय शक्ती नगण्य आहे.
#वीर_सावरकर
तरीसुद्धा सावरकरांविषयी अनुदार उद्गार काढण्याचे राहुल गांधी आणि त्यांचे साथीदार काही सोडत नाहीत. ‘माफी मागायला मी काही राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे,’ असे राहुल गांधी म्हणतात. असे म्हणणारे राहुल गांधी एक तर महामूर्ख असले पाहिजेत किंवा खूप धोरणी असले पाहिजेत.
सावरकरांविषयी अनुदार उद्गार काढून मतदानाच्या टक्केवारीत काहीही वाढ होत नाही, हे राहुल गांधी यांना समजत नाही, असे समजण्याचे कारण नाही.‘‘मी राहुल सावरकर नाही, मी राहुल गांधी आहे.’’ हे वाक्य दोन भारताचे दर्शन घडवते. एक भारत नेहरू-गांधींचा भारत आहे आणि दुसरा भारत सावरकरांचा भारत आहे.
Read 28 tweets
Dec 23
Know the 7 Indian Santa Clauses

1. MK Gandhi: Gifted Pakistan to Indian Muslims. Ambedkar wanted total exchange of Hindu-Muslim population, which was fair. After all, why should India keep the Muslims who created Pakistan.
#SantaClaus
@INCIndia
But Gandhi let them stay. Plus, he gifted Rs 50 crore allowing Pakis to invade Kashmir..

2. Nehru: Gifted Tibet and Aksai Chin to China; half of Kashmir to Pakistan; Coco Islands to Myanmar. China now uses the islands to spy on India.
Nehruddin also gifted 88% of the Indus river waters to Pakistan and yes, he gifted the Bharat Ratna to himself.
Read 12 tweets
Dec 22
याकूतबाबा गुरू केला अन
समर्थ रामदास स्वामी आदिलशाहीचे हेर ठरवले
*******
उत्तरप्रदेशातील असलेले स्व.अटलबिहारी वाजपेयी रायगडावर येऊन छत्रपतींना वंदन करतात.

गुजरातहुन येऊन मा.नरेंद्र मोदी रायगडावर छत्रपतींच्या चरणी नतमस्तक होतात.
बिहारचे असलेले मा.राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती झाल्यानंतर छत्रपतींच्या दर्शनाची ओढ लागते.

देवेंद्र फडणवीस यांनी तर कित्येक वेळा रायगडावर जाऊन छत्रपतींच्या चरणी माथा टेकवलाय.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यांच्या नावाने सध्या गदारोळ सुरू आहे त्या उत्तराखंडराज्यातील नागरिक असलेल्या 83 वर्षीय भगतसिंह कोषारी यांना चालत जाऊन छत्रपतींच्या स्पर्शाने पावन झालेली रायगडावरची शिवनेरीवरची माती कपाळावर लावावी वाटते.
Read 11 tweets
Dec 20
चीन द्वारा सीमा का उल्लंघन..

आपने कभी ध्यान दिया कि चीन भारत में सीमा उल्लंघन संसद के सत्र काल में ही क्यों करता है.??
दरअसल यह संयोग नहीं...बल्कि सहयोग है,ऐसा इसलिए ताकि भारत में उसके साथियों को संसद में यह मामला उठाने का मौका मिल जाए..
#IndiaChina
यह मोदी सरकार की छवि धूमिल करने का प्रयास है,गौर करिए,पिछले नौ सालो में यह पहली बार नहीं है कि जब संसद का सत्र चल रहा हो और चीन कोई हरकत ना करे ,जब भी महत्वपूर्ण बिल पारित होने होते हैं, तब ही अचानक चीन हरकत करता है और पूरा विपक्ष संसद सत्र स्थगित करने की मांग कर देता है।
देश के दुश्मनों सीमापार से व देश में छिपे गद्दार नहीं चाहते की संसद का सत्र चले व नये नये विधेयक व कानून देश हित में तेजी से बनाए जाएं ये अव्यवस्था फैलाकर देश को पीछे ले जाने का काम कर रहे हैं और इस सबके लाए विदेशों से भारी मात्रा में अलग अलग ढंग से इन लोगों और
Read 5 tweets
Dec 17
२०१४ मध्ये मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी रायगडावर गेले होते तेव्हा त्यांनी काही काळ "भरत मुद्रा" मध्ये ध्यान केले होते. गुरुशिष्य परंपरेत गुरु देशाटनासाठी निघताना प्रमुख शिष्य भरत मुद्रेत बसून गुरूंच्या संकल्पानुसार गुरुकुलाचे व्यवस्थापन करण्याचे वचन देत असत.
#जय_शिवराय 🙏🚩🙏
महाराजांच्या मान अपमानाच्या नाट्यात स्वतःची राजकीय पोळी भाजणाऱ्यांची जुनी प्रकरणं उकरून काढली तर कुणाला तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाहीत. महाराजांचा मान वागण्यातून असावा तोंडपाटीलकी करून नाही आणि हे सर्वच राजकीय पक्षांना लागू होतं...
छत्रपती शिवाजी महाराजांचे शेवटचे शब्द...
आम्ही जातो, आमचा काळ झाला,
तुम्ही सप्तसिंधू, सप्तगंगा मुक्त करा,
काशीचा श्री विश्वेश्वर सोडवा,
बारा ज्योतिर्लिंग या यवनांच्या हातून मुक्त करा,
हिंदवी स्वराज्यात आणा, चुकुर होऊ नका...!!!
Read 4 tweets
Dec 17
उद्धवाच्या_घरावर_तुळशीपत्र

सुषमा अंधारेच्या आयुष्यभराच्या कमाईचं गाठोडं काकांनी बेमालूमपणे उद्धवरावांच्या गळ्यात बांधलं !
तेही मविआ सरकार पडल्यावर !
म्हणजे बुडत्याच्या हातात शिशाने भरलेली काठी दिली !
बाकी यातलं गमक उमगण्याची अपेक्षा उद्धवरावांकडून नव्हतीच ! त्यामुळे काकांच्या त्या गाठोड्याला डबोलं समजून त्याचं प्रदर्शन मांडण्याची हुकमी चूक त्यांनी केलीच !
या खेळीत काकांनी दोन पक्षी मारले. पहिला सर्वांना माहितीच आहे. पण सुषमाताई ज्या समाजाचं वा वर्गाचं प्रतिनिधित्व करतात, त्या सकल वर्गाविषयी बहुसंख्य हिंदू समाजाच्या मनात जो आकस होता, तोही द्विगुणित झाला. म्हणजे जातीय तेढ वाढवण्याचा नेहमीचा उद्देशही सफल !
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(