गांव... ✊️❤️
गांव आपल्या प्रत्येकाच असं हक्काचं ठिकाण. जिथं आपल्या जन्मापासून सुरु झालेला जीवन प्रवास मृत्युच्या सरणावर चढू पर्यंत साथ देणार एक अविस्मरणीय ठिकाण असत.बदलत्या काळानुसार गांव पण बदलत गेलं.पंचवीस तीस वर्षांपूर्वीच अनुभवलेलं गांव आता बदलेलं दिसत.सकाळी हफश्याच्या..👇
खडकड आवाजानी तर कधी गाय,म्हशी, चिमण्याच्या आवाजाने जागं होणार गांव आता मोबाईल अलार्मने जागं होतं.सकाळी किटलीत पावशेरच्या मापाने दूध टाकणारा गवळी आता पिशवी घेऊन येतो.चपातीचा वास,चटणीचा ठसका, अंड्याच्या पोळीचा घमघमाट आता नाहीसा झालाय, त्याची जागा ब्रेड, मॅगी सॅन्डविच ने.. 👇
घेतलीये. दुपारी जेवताना प्रत्येकाच्या घरातून ताटात काहीतरी आणलं जायचं न विचारता एकमेकांना घास भरवत असलेले मित्र आज मी जेवण करून घेतो तु ऐ नंतर असं बोलायला लागलेत.गावातलं सुख - दुःखातलं कुठलंही कार्य असलं तर पडेल ते काम करायला धजनारी तरुण मुलं -मुली आज इव्हेंट मॅनेजमेंट.. 👇
आलाय का नाही ते बघताय.खरंच आपल्या समाज रचणेत एव्हडा अमूलाग्र बदल घडलाय की,आपण वेळेनुसार तो बदल घडवून आणलाय हा एक मोठा पेच आहे.आपलं गांव हे आपलं खरंच हक्काचं ठिकाण असतं.. त्यातील आपण विसरत चालेले नाते आपण जपायला पाहिजे..गावचं आपली ओळख असते ती न डगमगता न लाजता न घाबरता.. 👇
बाप..✊️❤️
दहावीला असताना शाळेत लागणाऱ्या वह्या, पुस्तकांसाठी बापाला निरोप पाठवला होता.तालुक्याच्या बाजाराचा दिवस पकडून दादा आले.नायलॉनची भली मोठी लिंबाने भरलेली पिशवी सायकलच्या हँडल ला अडकवून उन्हा तान्हात ते आले होते.थोडा वेळ मी राहत असलेल्या वसतिगृहात विश्रांती करून मी.. 👇
एवढे लिंब विकून येतो असं बोलून गेले.मी शाळेत नं जाता त्यांची जवळ पास तीन-चार तास वाट पाहत बसलो.ते आले.चेहरा थोडा पडलेला होता,लिंबाची पिशवी खाली होती,अंगावरचे कपडे घामाने भिजलेले होते.पाच दहा मिनटं बसल्यावर वसतिगृहाच्या मुलांचा आणि शिक्षकांचा अंदाज घेऊन जरा डबक्या आवाजात.. 👇
"तुमचे जेवणं झाले का,?सर बाहेर आहे वाटतं, आता पोर किती आहेत आत, असं सगळं बोलत असतानाच मी लगेच मध्येच बोललो दादा तुम्हाला जेवण आणू का उरलेलं कालवण आणि भाकरी आहेत.ते लगेच बर आन मला पण भूक लागलीये.. पण तुला तुझे सर काही बोलणार तर नाही ना?नाही बोलणार असं बोलून मी चार पळी कालवण.. 👇