अज्ञातवासी Profile picture
संतोष काकडे, एक सामान्य नागरिक🤗🙏❤❤Gandhi 🤝🏾 Nehru❤❤
2 subscribers
Dec 21, 2023 8 tweets 2 min read
नवीन दूरसंचार कायदा येऊ घातलेला आहे.
जुने ब्रिटीशकाळातील तीन कायदे रद्द करून एकच नवीन कायदा होणार आहे.

१.
ट्राय हि दूरसंचार विभागाची नियामक संस्था आहे , या संस्थेचे अस्तित्व आणि कामकाज कायम राहील पण या संस्थेच्या प्रमुखपदी खाजगी क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती असेल. Image सेबी. डीजीसीए,आरबीआय,निवडणूक आयोग, आयआरडीए या सगळ्या नियामक संस्थाच्या प्रमुखपदी सरकारी अधिकारी असतील तर ट्रायमधेच खाजगी व्यक्ती कशासाठी ?

२.
राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव दूरसंचार कंपनीचे संपूर्ण नियंत्रण सरकार आपल्या ताब्यात घेऊ शकते आणि इंटरनेट बंदी सारख्या गोष्टी करू शकते.
Nov 15, 2023 8 tweets 2 min read
#थ्रेड
नेहरूंची गंम्मत🤗

नेहरूंचा तोंडात सिगार धरलेला फोटो प्रसिद्ध आहे, वर्षानुवर्षे लोक तो फोटो कुठे ना कुठे वापरतात
मात्र सदर फोटो ना कुणी गायब केला ना फोटोग्राफर कोठडीत खितपत पडला. खुद्द नेहरूंनी "माझा फोटो चुकून काढलाय किंवा तो मी नव्हेच" अस सांगितलं नाही. Image नेहरूंनी कधीही फोटोग्राफर कुठे आहे याकडे लक्ष दिलेलं नाही.

नेहरू गर्भश्रीमंत होते मात्र तरीही अहमदनगर किल्ल्यात कैदेत असताना इतर कैद्यांच्या बरोबरीने त्यांच्या सारखेच राहिले, नेहरू ,पटेल आणि इतर मंडळी राजकीय कैदी होती आणि सगळेच समान पातळीवर होते.
Sep 9, 2023 7 tweets 2 min read
शिवछत्रपतींनी स्थापन केलेले स्वराज्य हे कष्टकरी शेतकरी रयतेच्या कल्याणासाठी होते, रयतेची कोणाकडूनही हेळसांड होता कामा नये याविषयी शिवछत्रपती अत्यंत दक्ष असत, यासंदर्भात चिंचवडच्या मोरया गोसावींच्या देवस्थानचे उदाहरण पाहण्यासारखे आहे. 👇 Image मावळातील गावांतून ठराविक दरानेच धान्य खरेदी करण्याचा हक्क चिंचवडच्या देवस्थानास होता. त्याकाळीही धान्याचे दर दरवर्षी वाढत असत पण देवस्थान मात्र सनदेत नमूद केल्यानुसार पूर्वीचाच दर रयतेस देऊन धान्य खरेदी करीत असे. देवस्थानाचा हक्कच असल्याने रयतचे याबाबत नुकसान होत असे. 👇
Sep 9, 2023 5 tweets 2 min read
ईसा से तीन सदी पहले मेगस्थनीज ने क़िताब लिखी थी, नाम था- #इंडिका (India)

"तब अंग्रेज न हमें जानते थे और न हम अंग्रेजों को"
इसलिए कोरी भावुकता से मुक्त होकर INDIA That is "भारत" का वास्तविक इतिहास जानने की जरूरत है।.... Image अगर भूले भटके इतिहास का 'इ' भी पढ़ा है तो आपने यूनानी राजदूत मेगस्थनीज का नाम सुना ही होगा। ईसा मसीह से तीन सदी पहले यूनान में पैदा हुए मेगस्थनीज ने एक क़िताब लिखी थी जिसका नाम 'इंडिका' है।

वह यूनानी शासक सेल्युकस निकेटर का सहयोगी था। सिकंदर की मृत्यु के बाद
Aug 24, 2023 7 tweets 1 min read
भाजपाला समर्थन देणाऱ्या शेतकरी बांधवांनी आता तरी शुद्धीवर यावे. 2022 पर्यंत शेतकऱ्यांना दुप्पट उत्पन्नाचे गाजर मोदीने दाखवलं होत. दुप्पट तर जाऊ द्या पण शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दिवसेंदिवस घट येत आहे ही टाइम्स ऑफ इंडियाची आकडेवारी सांगते.👇 नुकतेच मोदी प्रशासनाने कांद्यावर निर्यात शुल्क वाढवले. त्यामुळे कांद्याचे भाव एका दिवसात 1000 रुपयांनी कोसळले.
शेतकरी विरोधी व अडानी सारख्या भांडवलदारांना धर्जिणे कायदे शेतकऱ्यांशी चर्चा न करता अध्यादेश काढून चोरमार्गाने आणण्यात आले.👇
Aug 23, 2023 8 tweets 2 min read
२२ ऑगस्ट २०२० ला ‘ कैलास ‘ नावाच्या देशाची मध्यवर्ती बँक सुरु झाली.

बातमी सगळ्यांनी वाचली असेल, अनेकांनी मिम्स बनवले असतील, हसलेही असतील.
बातमीमागची बातमी जास्त मोठी आणि गंभीर आहे. 👇 Image नित्यानंद नावाचा भारतातून पळून गेलेला इसम ज्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत त्याने एक बेट विकत घेऊन तिथे ‘ कैलास ‘ नावाचा देश स्थापन केलाय जो जगातला शुद्ध हिंदू देश असल्याचा दावा करतोय.या इसमावर अहमदाबादमध्ये गुन्हे दाखल आहेत. तिथलेच काही गर्भश्रीमंत भक्त कैलासची नागरिकता घेणारेत. 👇
Aug 15, 2023 9 tweets 2 min read
*एकदा वाचा..नक्की सहमत व्हाल*

"नेहरूंचा द्वेष का?"

१९४७ साली भारत-पाकीस्तान या दोन्ही देशांचा जन्म झाला.

भारतात नेहरूंनी सगळ्यांना सोबत घेऊन धर्मनिरपेक्ष राज्यघटना आणली आणि देशाला त्या मार्गावर नेल.
अलिप्त राष्ट्र परिषद असो कि विज्ञान तंत्रज्ञान ह्याला...
(१/९) Image ..प्राधान्य असो कि 'देशाची नवी तीर्थक्षेत्र म्हणजे कारखाने आहेत' अस म्हणनं हे सगळ करताना नेहरूंनी देशाला दिशा दिली.
अन्नधान्य, तंत्रज्ञान, ऊर्जा, दळणवळण सगळ्याच बाबतीत अतिशय मागास असलेल्या देशाला नेहरूंनी सहकाऱ्यांच्या मदतीने पायावर उभे केले आणि चालायला लावले.
(२/९)
Jul 26, 2023 14 tweets 3 min read
अदानीसाठी मणिपूर घडत आहे☀️

एखादा सत्ताधारी पक्ष आणि देशाचा प्रधानमंत्री सत्तेचा दुरुपयोग करून त्याच्या कारखानदार मित्राला फायदा पोचवण्यासाठी काय काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे मणिपूर.....
काही महत्वाचे मुद्दे आणि त्यांचा सहसंबंध समजून घेऊया... Image १. किरण रिजिजू जे आधी कायदेमंत्री होते त्यांना भूविज्ञान मंत्रालय देण्यात आले, हे मूळचे अरुणाचल प्रदेशचे म्हणजे नॉर्थ ईस्टचे.
२. २०१५ मध्ये नॉर्थ इस्टच्या डोंगराखाली अमूल्य खनिजे असल्याचा सर्वे समोर आला होता.
Jul 22, 2023 5 tweets 1 min read
लोकहो ,
तुम्ही मूर्ख आणि बावळट आहात.

" मेरा देश बदल रहा है, ये नया भारत है " हे तुम्हाला ठाऊक नाही ?
देशात अमृतकाळ आहे हे ठाऊक नाही ?

अमृतकाळात,
युनायटेड स्टेट्स ऑफ गुजरातमध्ये सामुहिक बलात्काराचे आरोपी जेलमधून सोडण्याचा निर्णय सरकारने घेतला, त्यांचा सत्कारसमाजाने केला. Image तिथल्या हिंसाचारावर आवाज उठवणारी जामीन मिळवायला झगडत आहे.

दोन दोन वर्षे पत्रकार तुरुंगात डांबले जातात, गोरखपूर मधला डॉक्टर काफीलखान तुरुंगात जातो, प्रश्न विचारणारे आधी अटकेत जातात,

कठुआमध्ये त्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्यांना वाचवायला मोर्चे निघाले.
Jul 1, 2023 6 tweets 1 min read
#थ्रेड
डांबरी रस्ता आणि सिमेंट रस्ता यामध्ये बेसिक फरक असतो.

डांबरी रस्त्यावर गाडीचे वजन पडल्यावर रस्ता किंचित दबला जातो आणि टायरची रस्त्यावर ग्रीप नीट बसते, त्यामुळे गाडी रस्त्याला धरून चालते आणि टायर जास्त गरम होत नाहीत.
(1/6) सिमेंट रस्त्यावर गाडीचे वजन पडल्यावर रस्ता दबत नाही ,त्यामुळे गाडी पुढे जाण्यासाठी जास्त घर्षण लागते म्हणून टायर जास्त गरम होतात , शिवाय ब्रेकिंगसाठी डांबरी रस्त्याच्या तुलनेत जास्त वेळ आणि अंतर लागते.
(2/6)
May 23, 2023 5 tweets 1 min read
संघ समर्थक नि त्यातही बहुसंख्य ब्राह्मण (सर्वच ब्राह्मण नव्हे) समाजाएवढे दांभिक, स्वार्थी ,नाटकी लोक माझ्या तरी पाहण्यात नाहीत.
हिंदु संस्कृतीचे गोडवे गाणार आणि स्वत: मात्र एकत्रित हिंदु कुटूंबात न राहता विभक्त राहणार,मुलीला विभक्त राहण्यास सांगणार. मोदीं त्यांच्या आईच्या पायाशी बसले म्हणून कौतुकाने हुरळून जाणार आणि गावाकडून आईवडिल आजारी म्हणून रहायला आले तर भावाभावांत भांडणे ,तु ठेऊन घे माझ्याकडे अडचण आहे ,मी माग च्या वेळी आईवडिलाला पंधरा दिवस संभाळले होते म्हणून आता तु संभाळ ,असली यांची भिक्कार वृत्ती!
May 23, 2023 6 tweets 2 min read
Thread 🧵 Image Image
May 12, 2023 4 tweets 1 min read
ते पूर्वीही देशभक्त नव्हते,आताही नाही आणि भविष्यातही राहणार नाही.
ते फक्त देशभक्तीचा आव आणतात आणि दुसऱ्यांना देशद्रोही ठरविण्याचे षडयंत्र रचतात.
देशभक्तीचे नाटक करुन ते पूर्वीही इंग्रजांना आपल्या क्रांतीकारकांचे पत्ते देत होते. Image आता भारताचा कट्टर शत्रू असलेल्या पाकिस्तानला आपल्या देशाच्या सैन्य दलाची गुप्त माहिती पुरवितात.
त्यांचा हा पिढ्यानपिढ्या चालत आलेला धंदा आहे.
त्यांचा धंदा अजूनही बदललेला नाही व भविष्यात बदलणारही नाही.
कारण गद्दारी व धोकेबाजी त्यांच्या नसानसात भरलेली आहे.
May 12, 2023 6 tweets 1 min read
" सुप्रीम कोर्ट हरले! ठाकरे जिंकले !!
माझ्या आकलनानुसार जगात सत्ता मिळवण्याचे दोनच मार्ग आहेत. पहिला 'मॅकिंव्हेलियन मार्ग'. सत्ता मिळविणे महत्त्वाचे. मार्ग कसलाही असला तरी चालेल. पंधराव्या शतकात या राजकीय विचारवंताने द प्रिन्स या छोटेखानी पुस्तकात त्याकाळच्या राजपुत्रांनी राज्य कसे मिळवावे व टिकवावे याचे मार्गदर्शन केलेले आहे. जगभरातील राजपुत्र याच पद्धतीने सत्ता मिळवितात. एकनाथ देवेंद्र यांनी याच पद्धतीने सत्ता मिळवली.
Apr 26, 2023 53 tweets 7 min read
रिफायनरीचे ‘ग्रीन’ संकट ….!
लेखक : अनुपम कांबळी

राजापुर तालुक्यातील नाणार, बारसू परिसरात १४ गावांमध्ये जगातील सर्वात मोठी सहा कोटी टनांची रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्याचा घाट घातला जातोय. ‘रिफायनरी’ म्हणजे शुद्ध मराठी भाषेत सांगायचे तर.... ‘खनिज तेल शुद्धीकरण प्रकल्प’…! एकवेळ ‘स्वीट चिली’ म्हणजे ‘गोड मिरची’ सापडू शकेल पण ‘प्रदुषणविरहित रिफायनरी’ कशी काय सापडणार…? ‘रिफायनरी म्हणजे प्रदूषण आणि प्रदूषण म्हणजे रिफायनरी’ हे साधे सरळ समीकरण आहे.