мιℓιи∂....❤️ Profile picture
⚽🏀🏈⚾sport's, Agricos 🌾🎋,Cycling 🚴🏻‍♂️,
May 12 4 tweets 1 min read
लोकप्रिय आणि सिलेक्टेड 😂 कसे ते बघा.
बीजेपार्टीने सुवेंदू अधिकारी चे लाच घेतानाचे स्टिंग ऑपरेशन चे व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया पेज वर रिलीज केले होते.
आता गुपचूप डिलीट केले मुख्यमंत्री ना 😂
निवडणूक आयोगाने ज्या मनोज अगरवाल ला बंगाल निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक आयुक्त बनवले होते. काम तडीस नेल्यावर त्याला बंगाल चा चीफ (की चीप?) सेक्रेटरी बनवतायत 😂
* निवडणूक आयोगाच्या स्पेशल निरीक्षक म्हणून काम केलेल्या गुप्ता ला बंगाल मुख्यमंत्री चा मुख्य सल्लागार बनवले 😂
*कर्नाटक मधल्या श्रींगेरी मतदार संघात काँग्रेस चे राजेगौडा फक्त २०१ मतांनी जिंकले.
May 9 21 tweets 4 min read
१२ वर्षात देशाला काय मिळाले ?
* देशाला वर्षभर जळणारे राज्य मिळाले. पण जगभर भटकणारे तिथे फिरकत नाहीत ना मीडिया तिथलं सत्य मांडत... जिथे पोलिसांची शस्त्रागारे लुटली गेली, स्त्रियांच्या नग्न धिंड काढल्या.
* स्त्रियांना अत्याचार मिळाले. स्त्रियांवरील अत्याचाराच्या आकड्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. बलात्काराचे प्रमाण वाढले. अनेक बलात्कारी आणि अत्याचारी तर पार्टीत भरले आहेत.
* भारतात दररोज ३० शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागतेय. शेतकऱ्यांचे कर्ज २०१४ च्या तुलनेत ६०% वाढले आहे. आणि या कालावधीत काही निवडक उद्योगपतींचे १० लाख कोटींचे कर्ज माफ किंवा राईट
May 5 8 tweets 2 min read
रक्कम राउंड ऑफ केली आहे. डॉलर्स मध्ये आहे.
२०१२/१३: ३९ बिलियन , १३/१४: ३७ बिलियन, १४/१५: ४८ बिलियन, १७/१८ : ६० बिलियन, २०/२१ (कोविड) :४४ बिलियन, २२/२३: ८२ बिलियन, २४/२५ : १०० बिलियन, २५/२६ : ११२ बिलियन.
हा चढता ग्राफ बघून आनंदी होण्याचे कारण नाही. हे आकडे आहेत भारताच्या चीन सोबत असलेल्या ट्रेड डेफिसिट चे. म्हणजे चीनकडून होणारी आयात - चीन ला होणारी निर्यात = ट्रेड डेफिसिट. याला चीन ला लाल दाखवणे म्हणायचं का ?
११२ बिलियन डॉलर्स चा ट्रेड डेफिसिट हा आकडा किती प्रचंड आहे हे समजण्यासाठी.... भारताचा संरक्षणावर होत असलेला एकूण
May 5 9 tweets 2 min read
भाजपाने भारतावर विजय मिळवला नाही. प्रादेशिक पक्षांनी तो त्यांच्या ताटात वाढून दिला आहे.

२०२१ मध्ये तृणमूल काँग्रेस (TMC) म्हणाली, "काँग्रेस आता अप्रासंगिक झाली आहे", आज भाजपा बंगाल जिंकत आहे.

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने (SP) म्हटले की "काँग्रेस हे एक ओझे आहे", तिथे भाजपाने सलग दोनदा सत्ता मिळवली.

आम आदमी पार्टी (AAP) म्हणाली, "आम्ही पर्याय आहोत", पण ते दिल्ली टिकवू शकले नाहीत, पंजाबची सत्ता, कथानक सांभाळू शकले नाहीत आणि भाजपा जेव्हा खऱ्या अर्थाने मैदानात उतरली, तेव्हा 'आप' पत्त्यासारखी कोसळली.
May 3 8 tweets 2 min read
गडकरी बोलले ..... पुन्हा एकदा.
स्वतः बातमी शोधून वाचा. गडकरी म्हणाले, "भारताने भविष्यात इंधनात १००% इथेनॉल मिश्रण/ इथेनॉल ब्लेंडींग (E100)चे लक्ष्य ठेवावे, ज्यामुळे कच्च्या तेलावरील आयात अवलंबित्व कमी होईल आणि ऊर्जा स्वावलंबन वाढेल"
काय ती घोषणा. २ तासात बेंगलोर, अर्ध्या तासात पुणे आणि ३ सेकंदात एअरपोर्ट वगैरे घोषणा सुद्धा शुल्लक वाटतील अशी घोषणा.
ब्लेंडिंग किंवा मिश्रण चा अर्थ असतो .... दोन पदार्थ मिसळणे.
आणि १००% चा अर्थ असतो पूर्णच्या पूर्ण एकच पदार्थ 😂
तुम्ही असं म्हणू शकत का ....'दुधात १००% पाणी आहे आणि दूध ब्लेंड केलेले आहे"
Apr 30 7 tweets 2 min read
विरोधी पक्षनेता राहुल गांधी याने निकोबार बेटाला भेट दिल्यावर अंदमान-निकोबारच्या बंदर प्रकल्पाबद्दल कळले आणि थोडा अभ्यास केला.

थोडक्यात हे कळाले की:

• अंदमान आणि निकोबार बेटांच्या अतिसंवेदनशील परिसरात सुमारे ७२,००० कोटी रुपयांचा हा अजस्र प्रकल्प राबवला जात असून, यात आंतरराष्ट्रीय ट्रान्सशिपमेंट टर्मिनल आणि विमानतळाचा समावेश आहे.

• या विकासकामांमुळे निकोबारमधील १३० चौरस किलोमीटरचे अतिशय घनदाट सदाहरित अरण्य कायमचे नष्ट होणार असून, जवळपास १० लाख झाडे तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

• सर्वोच्च न्यायालयाच्या तज्ज्ञ समितीनुसार,
Apr 28 8 tweets 2 min read
लोकशाहीची माय.
Model Code of Conduct / आचारसंहिता म्हणजे निवडणुकांदरम्यान निष्पक्षता राखण्यासाठी असलेले नियम
पण निवडणूक आयोगाने घेतलेले निर्णय आणि त्यांची निष्पक्षता बघितली आहे का ?
पश्चिम बंगालमध्ये:
राष्ट्रपती राजवट लागू केल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर अधिकाऱ्यांच्या बदली केली मतदानाआधी पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी.
मोटारसायकल वापरावर निर्बंध (नंतर न्यायालयाने रद्द केले).
मतदान केंद्र म्हणून वापरल्या जाणाऱ्या सोसायटीतील घरांमध्ये पाहुणे सुद्धा येण्यावर बंदी.....वगैरे.
अशा प्रकारे सर्वसामान्याना वेठीस धरत असताना सोयीस्कर दुर्लक्ष कुठे ?
Apr 27 6 tweets 1 min read
देशात सध्या जाणीवपूर्वक टाळला जाणारा विषय आहे....
शेवटच्या मतदानानंतर वाढू शकणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किमती.
माझ्या मते निवडणूक निकालापर्यंत देखील वाट बघणार नाहीत. २९ तारखेलाच बहुदा पेट्रोल डिझेलच्या किमती वाढतील.
वेगवेगळ्या तज्ज्ञाकडून जे अंदाज वर्तवले जात आहेत त्यानुसार एकत्र किंवा टप्प्याटप्प्यात इंधनाच्या किमतीत १८ ते २५ रुपये प्रति लिटर इतकी वाढ होऊ शकते.
म्हणजे अंदाजे २५% वाढ.
आणि या वाढीमुळे उघड आणि छुपी महागाई किती वाढू शकते याचा अनेकांना अंदाज देखील नाही. उघड म्हणजे सरकारी आकडेवारीत आणि छुपी म्हणजे त्या आकड्या पलीकडची.
Apr 22 14 tweets 3 min read
आज पेहेलगाम हल्ल्याला एक वर्ष झालं.
बंगाल निवडणुकीमध्ये जो प्रचाराला जातोय तो पेहेलगाम हल्ल्यानंतर भेट द्यायला गेलेला का ?
बंगाल निवडणुकीत जितके हेलिकॉप्टर, विमाने, रणगाडे वगैरे वापरतायत त्याच्या काही टक्के जरी वापरले असते तर पुलवामा मध्ये जवानांचे जीव वाचवता आले नसते का ? प्राथमिकता.....
सत्तेसाठी वाट्टेल ते हा मुलमंत्र असताना स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुकीच्या बातम्या आणि बाता ...
*दोन भाषणं आणि वेगवेगळे रंग.
देशाला संबोधित करताना गोऱ्या रंगाचे लाल ओठांचे मोदी.. तामिळनाडू मध्ये जाऊन भाषण करतात तेव्हा त्यांचा रंग बदललेला दिसतो.
Apr 21 4 tweets 1 min read
ज्या जॉर्ज सोरोस च्या नावाने फेकूसेना सतत उर बडवत असते, रडत असते.... त्या सोरोस बद्दल एक नवीन माहिती समोर आली.
माहिती जॉर्ज सोरोस च्या फंड बद्दल आहे.
अमेरिकेतील आणि केमन आयलंड्समधील नोंदींवर आधारित अहवालात असे आढळते की केंद्रीय मंत्री हरदीप पुरीच्या मुलीने सह-स्थापना केलेल्या हेज फंडची निवड सोरोस फंड मॅनेजमेंट ने केली होती.या फंडकडे सोरोस च्या २०० मिलियन डॉलर व्यवस्थापनाचे काम होते.
मग फेकूसेना आता हरदीप पुरी विरोधात करणार का आंदोलन ?
खरं तर हरदीप पुरी च्या विरोधात आधीच आंदोलन व्हायला पाहिजे होते. पण जेफ्री एप्सटिन फाईल्समध्ये वारंवार नाव आलेला
Apr 19 5 tweets 1 min read
काल ८.३० वाजता देशाला जे संबोधन करण्यात आले त्यातील बाकी सगळे मुद्दे सोडून द्या
पण देशाचा राष्ट्रध्वज मागे लावून,त्या पार्श्वभूमीवर,काय भाषण झाले? तर तो निव्वळ निवडणुकीचा प्रचार होता. देशातील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे नाव जवळपास प्रत्येक वाक्यात घेऊन त्याला शिव्याशाप देणे, तुम्हाला याची किंमत चुकवली लागेल (तुमचे तळपट होईल एवढेच म्हणणे बाकी राहिले) असे म्हणणे, हे देशाला संबोधन होते? राष्ट्राचा मुख्य नेत्याने देशाला संबोधित कशावर करावे याला काही नियम नाहीत. असूही शकत नाहीत. या गोष्टी संकेत आणि शिष्टाचारावर चालत असतात.

पण आता लोकशाही संकेत,
Apr 18 4 tweets 1 min read
चीन ला लाल डोळे दाखवणार, आत्मनिर्भर भारत बनवणार, भारताला विश्व्गुरु बनवणार, जगात मानाचे स्थान असणार, रुपयाची किंमत आणि पत वाढवणार..... वगैरे.
या सगळ्या फेकूगिरी घोषणांच्या चित्रावर एका बातमीने बदाबदा पाणी ओतले. जगभरातील अनेक वर्तमानतपत्रात व मीडियात आज आलेली बातमी, भारतीय पेट्रोलियम रिफायनिंग कंपन्यांनी इराण कडून तेल घेण्यासाठी चिनी युआन या चलनात पेमेंट केले.
१२ वर्षांपूर्वी मोदी रुपयाला या भागातील रिजर्व करन्सी बनवणार वगैरे म्हणत होते...चीन ला बनवले.
अजून एक बातमी आहे.
अमेरिकेच्या ट्रेजरी डिपार्टमेंट ने ३० दिवसांचं एक
Apr 16 6 tweets 1 min read
नोएडा मध्ये कामगारांच्या आंदोलनाला हिंसक स्वरूप मिळाले....
चरणचुंबक मीडिया आणि फेकूसेना म्हणते त्यामागे पाकिस्तानचा हात आहे.
आतापर्यंत परदेशातील आंदोलनांच्या मागे अमेरिका आहे असे म्हटले जायचे कारण अमेरिका एक सुपरपॉवर आहे, आर्थिक क्षमता आहे.... पण भारतामध्ये जर पाकिस्तान सारखा देश ज्याची अर्थव्यवस्था भारतापेक्षा खुप लहान असतानाही अशा घटना घडवून आणू शकत असेल,
तर ही बाब लाजिरवाणी कोणासाठी आहे ?
मग देश ज्या हातात आहे ते हात कमकुवत, कुचकामी आहेत असेच म्हणायला हवे ना ?
मणिपूर मध्ये ज्या दंगली सुरु आहेत त्यामागे सुद्धा
Apr 15 7 tweets 1 min read
कल्पना करा तुम्ही एकत्र कुटुंबामध्ये राहता.
तुम्ही कामधंदा करता, पैसे घरात आणता आणि तुमचा एक भाऊ शिक्षण सोडून फक्त टवाळक्या करतो. पण आपला भाऊ म्हणून तुम्ही त्याच्या जगण्याचा खर्च सुद्धा उचलता, हातभार लावता.
पण घरातले सर्व महत्वाचे निर्णय ....
फ्रिज कोणता घ्यायचा, एसी कोणता घ्यायचा, कुठून घ्यायचा, कधी घ्यायचा, खर्च कुठे करायचा... वगैरे सगळे.
जर कामधंदा न करणारा तो भाऊ घेत असेल तर चालेल का तुम्हाला ?
बीजेपार्टीला जे डिलिमिटेशन घडवून आणायचे आहे ... हा त्यातलाच प्रकार. कमावत्या, सुधारणा करणाऱ्या राज्यांनी कमावून आणायचे आणि निर्णय प्रक्रियेत
Apr 9 4 tweets 1 min read
एप्सटिन ची कर्मभूमी...इज्राएल.
इज्राएलमधला सुरक्षा मंत्री बेन ग्विर.
इजर्रल मधल्या एका लग्नसमारंभात सामील झाला होता,
ज्यात नाच गाणे सुरु होते आणि नाचताना बंदुका, कॉकटेल्स वगैरेंसोबत ते एक फोटो घेऊन नाचत होते.
फोटो होता अली दवाबशा नावाच्या १८ महिन्याच्या बाळाचा. या फोटोला ते अधूनमधून सुरीने भोसकत होते.
हे पॅलेस्टिनी मूल त्यांच्या मित्रांनी जिवंत जाळले होते.
(व्हिडीओ 👇)
इब्राहिमी मॉस्क मासाकर गूगल करून बघा.
२९ पॅलेस्टिनी मशिदीत मारले होते.
त्यांना मारणारा इज्राएली टेररिस्ट
त्याचा फोटो स्वतःच्या ऑफिस मध्ये लावणारा बेन ग्विर.
Apr 5 7 tweets 1 min read
इजरायल च्या सैन्याने घोषणा केली की ते इराण वर होणाऱ्या हल्ल्यामध्ये सहभागी नसणार आहेत. यावर विनोदी स्वरूपात पण अनेकांकडून वस्तुस्थिती दर्शवणारी प्रतिक्रिया आली की,
"सहाजिकच आहे, तिथे समोर लढणारे सैनिक असणार आहेत. लहान मुलं मारायची असती तर सहभागी झाले असते". युद्धाच्या कारणास्तव सर्वाधिक लहान मुले मारण्याचे प्रचंड शौर्य इज्राएली सैनिक दाखवतात.
इज्राएली आणि त्यांचे इथले समर्थक यांच्यात मुस्लिम द्वेषाच्या पलीकडे सुद्धा अनेक बाबतीत साम्य दिसून येते.
*निशस्त्र, आपल्याहून कमजोर किंवा संख्येने अथवा सामर्थ्याने कमी अशा लोकांसोबतच
Apr 3 8 tweets 2 min read
ट्रम्प ची 'मन की बात' ऐकली... तसंच,
मोदी केरळमध्ये जाऊन म्हणतात की....
युपी केरळ पेक्षा चांगले राज्य आहे.
आता "चांगले"... याची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असू शकते.
पण सर्वसाधारण बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तीला हे समजते की,
जगात स्थलांतर हे नेहेमी आहोत त्याहून अधिक चांगल्या ठिकाणी होत असते.
जर युपीमध्ये रस्त्यारस्त्यावर केरळी लोकं ठेले लावलेले दिसत असतील किंवा यूपीतल्या शेतांमध्ये अथवा बांधकामांमध्ये सरसकट मजूर म्हणून दिसत असतील तर मोदी म्हणतात ते खरं म्हणायला हरकत नाही.
(मोदी आणि खरं 😂असो)
आता कोणी म्हणेल की केरळी लोकं आखाती प्रदेशात जातात.
Apr 2 5 tweets 1 min read
सरकार कसे वागते ?
दोन उदाहरणं बघा.
*संसदीय समिती ला दिसून आले आहे की,
Indian Space Research Organisation (ISRO) च्या प्रयत्नाने बनलेले तंत्रज्ञान खाजगी कंपन्यांना, कॉर्पोरेट्स ना खूप कमी किमतीत, स्वस्तात दिली जात आहेत.
समितीच्या म्हणण्यानुसार या तंत्रज्ञानाचे व्हॅल्युएशन जाणूनबुजून कमी दाखवले जाते आणि खाजगी कंपन्यांना जास्त नफा मिळेल याकडे लक्ष दिले जाते ज्यामुळे सरकारला अर्थातच तोटा होतो.
सुमारे १०० तंत्रज्ञान हस्तांतरण / टेकनॉलॉजी ट्रान्स्फर पैकी, जवळपास ७० करार १० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत केले.
Mar 31 10 tweets 2 min read
देशद्रोही हा शब्द स्वस्त झालाय.

भाजपानं या देशातलं वातावरण नीच पातळीवर नेलंय. सत्ताधारी पक्षानं हिटलरसारखा प्रपोगंडा देशभर गेली तब्बल बारा वर्ष चालवला आहे. देशद्रोहाची व्याख्या म्हणजे मोदी आणि भाजपा विरोध इथपर्यंत या लोकांनी अगदी उच्चशिक्षित लोकांना आणून ठेवलंय. भारत म्हणजे भाजप. भारत म्हणजे मोदी. इथपर्यंत या लोकांनी उच्चशिक्षित लोकांना आणून ठेवलंय. ही परिस्थिती भयावह आहे.

भाजपाची गलिच्छ चाल लक्षात घ्या. मोदी आणि भाजपा विरोधकाला देशद्रोही ठरवायचं पण तसं थेट करणं शक्य नाही म्हणून आधी त्याला हिंदू विरोधक ठरवायचं.
Mar 29 6 tweets 1 min read
स्वतः गूगल किंवा AI करून बघा....
युद्ध सुरु असलेल्या तेहरान मधील AQI / हवेची गुणवत्ता आणि आपल्या देशाच्या अथवा राज्याची राजधानी किंवा महत्वाच्या अशा शहराचे AQI. तपासून बघा. निकष तोच ठेवून तुलना केली तेव्हा दिसले, दिल्ली २११, मुंबई १५०, ठाणे १६० आणि तेहरान मधील AQI ६० होता. दुसरा युद्धग्रस्त देश युक्रेन मधील कीव्ह मध्ये AQI २५ होता.
म्हणजे जिथे बॉम्ब, क्षेपणास्त्र पडतायत तिथली हवा आपल्या शहरांच्या तुलनेत अधिक स्वच्छ आहे.असे का ?
सरकारसमर्थक सरसावत पुढे युन म्हणतील की इथे बांधकाम सुरु आहे म्हणून. मग जगात ज्या ज्या शहरांत बांधकाम किंवा विकास सुरु
Mar 25 10 tweets 2 min read
इराणच्या राजदूताने घोषणा केली की, श्रीलंकेला जर तेल अथवा अन्य गरजेच्या वस्तूंची गरज लागली तर इराण ती पोचवण्यात मदत करेल. का केली ही घोषणा?
कारण भारतात आयोजित नौदल कवायतीसाठी आलेल्या इराणी जहाजावर परत जात असताना जेव्हा अमेरिकेने हल्ला केला तेव्हा श्रीलंकेने त्या सैनिकांच्या बचावासाठी प्रयत्न केले, शिवाय अमेरिकेला आपल्या देशात युद्धासाठी जागा मिळणार नाही अशी घोषणा केली. या खंबीर व न्याय्य भूमिकेमुळे.
भारताचा कित्येक वर्षापासून मित्रदेश असलेल्या इराणकडून भारताला मदत मिळणे किंवा कच्चे तेल वा गॅस चा अखंड पुरवठा होणे सहज शक्य होते. आणि त्यासाठी भारताला