мιℓιи∂....❤️ Profile picture
⚽🏀🏈⚾sport's, Agricos 🌾🎋,Cycling 🚴🏻‍♂️,
Dec 22 4 tweets 1 min read
डॉलरचा रेट जवळजवळ ९१ रुपयांपर्यंत पोहोचलाय.

काही लोक याची थट्टा करतायत, पण त्यांना आतली गोष्ट माहीत नाही. यात आपल्या सरकारचा फार मोठा मास्टरस्ट्रोक आहे.

डॉलर जेव्हा ८६ रुपयांवर होता, तेव्हा सरकारला पेमेंट करताना अडचण यायची.

उदाहरण देऊन सांगतो. समजा सरकारला १ डॉलरचं सामान घ्यायचं आहे, आणि त्याबदल्यात १०० रुपयांची नोट अमेरिकेला दिली. तर अमेरिकन म्हणायचे, “सुट्टे नाहीत.”

मग ताई अमेरिका वाल्यांना म्हणायची, “कीप द चेंज” म्हणजे १४ रुपये तुम्हीच ठेवा.

मुद्दा खरंतर मोदीजी आणि ट्रम्प यांच्या मैत्रीचा आहे. एवढ्या घट्ट
Dec 22 14 tweets 2 min read
१८, १८ तास काम म्हणतात... पण ते कोणासाठी ?
काही उदाहरणं बघा.
२०१४ पासून अदानी समूहाची एकूण वाढ: १७००%
(मार्केट कॅप २०१४ मध्ये सुमारे ०.८५ ट्रिलियन वरून २०२४ मध्ये सुमारे ₹१३.३१ ट्रिलियन).
* पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर मोदी बांग्लादेश दौऱ्यावर जातात आणि 'योगायोगाने' तिथे वीज पुरवठा करण्याचे कंत्राट अदानीला मिळते.
* पारदर्शकतेबाबत आक्षेप असूनही जुन्या माइन डेव्हलपर अँड ऑपरेटर (MDO) करारांना पुन्हा मान्यता देण्यात आली. त्यामुळे २०१४ पूर्वीचे अब्जावधी रुपयांचे पाच करार अदानींकडे कायम राहिले.
* SEZ नियमांतील दुरुस्ती : अदानींच्या मुंद्रा SEZ वीज
Dec 22 6 tweets 1 min read
‘ सेव्ह अरवली ‘ म्हणून इमोशनल क्लिप, स्टेट्स , पोस्ट लोक लिहून राहिलेले आहेत.

या लोकांसाठी ,

तुम्ही कितीही कालवा केला तरीही तुम्ही धर्मासाठी बोकांडी घेतलेलं सरकार तुमच्या पर्वतरांगा , जंगल आणि झाड , वनसंपदा विकून केव्हाच मोकळ झालेलं आहे.

कोर्ट शेवटचा आसरा वगैरे असत ते कधी जेव्हा दोन सामान्य माणसांत वाद असतील तेव्हा.

जेव्हा मालकांच्या मालकांच्या ओटीत देश घालायचा आहे तेव्हा सगळ बासनात बांधून ठेवल जात.

त्यामुळे उर्वरित राजस्थानचे आणि उत्तर भारताचे वाळवंट होण्यापासून कुणीही वाचवू शकणार नाही हे स्पष्ट आहे.

हे भस्म्या रोग झालेले राक्षस आहेत
Dec 15 5 tweets 1 min read
काल वानखेडेवर मेस्सी आला होता.
मुख्यमंत्र्यांनी हातात माईक घेतला.
नमस्कार मुंबई बोलले आणि जमलेल्या प्रेक्षकांनी बूsssss सुरू केला.
बूsssss म्हणजे एकप्रकारे विरोध दर्शवण्यासाठी वापरला जाणार आवाज!

प्रेक्षकांनी हे का केलं असावं?
हे तर जनतेच्या मनातले मुख्यमंत्री आहेत. इतकं प्रचंड बहूमत आहे की तेवढं मेसीही कधी आयुष्यात मिळवू शकणार नाही.
तर याचं उत्तर आपण सगळेच जाणतो.
खुद्द मुख्यमंत्रीही जाणतात.

पण प्रेक्षकांनी एकवेळा नाही, तर अनेकवेळा बूsssss केलं.
तोवर फडणवीसांनी शक्कल लढवली.
परत बूsssss आला तर काय करायचं ठरवून ठेवलं.
Dec 11 6 tweets 1 min read
कोणत्याही मार्गाने असो, 'धंदो' आणि 'नफो' महत्वाचा मानणाऱ्या गुजरात मॉडेल मधील एक 'धंदोवालो'
नाव निलेश पुरोहित उर्फ द घोस्ट.
या गुजराती व्यक्तीने ५०० भारतीयांना अक्षरशः गुलामगिरीत विकले. पुरोहितने अनेकांना नोकऱ्यांचे आश्वासन दिले. महिना जवळपास चार लाख पगार..... देशावर सत्ता असणाऱ्या गुजरात लॉबीने अर्थव्यवस्थेची हालत अशी केली आहे की बेरोजगारीमुळे करोडो लोकं अक्षरशः वाट्टेल ते करायला तयार आहेत.
अगदी युद्धग्रस्त इज्राएल आणि युक्रेन रशियात जायला देखील.
मग काय.... आपदा में अवसर शोधायला तर सांगितले आहेच.
May 22 10 tweets 2 min read
इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे केलेले दोन तुकडे आणि उघड उघड अमेरिकेशी घेतलेला पंगा या गोष्टी जगाला तर माहिती आहेतच. त्यानंतर राजीव गांधी यांनी अमेरिकेत राहणाऱ्या आणि तिकडे तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय इंजिनीअर्सला आवाहन केलं होतं की 'तुम्ही आपल्या देशात परत या कदाचित तुम्हाला तेवढा पगार नाही देऊ शकणार परंतु सन्माननीय आयुष्य तुम्हाला या देशात मिळेल याची मी हमी देतो.' त्यांच्या या आवाहनामुळे बरेच इंजिनियर मायदेशी परत आले. सॅम पिट्रोडा पण त्यांच्यापैकी एक. परिणामी पुढच्या काही वर्षातच भारतामध्ये संगणक आले, मोठी टेलिकॉम क्रांती झाली.
May 13 4 tweets 1 min read
*खुळ्या खुळ्या मैफिलीत माझ्या*

कॅनडाचा निषेध करायला आपलं पब्लिक कॅनरा बँकसमोर घोषणा देतं

एटीएम समजून चोरटे पासबुक प्रिंटिंग मशीन चोरून नेतात.

औरंगजेब समजून बिनडोक मंडळी,
बहादूर शाह जफरचं चित्र जाळतात.

पाकिस्तानची कराची समजून,
हैदराबाद मधल्या कराची बेकरीची तोडफोड होते !! भलत्याच हातात वाईनचा ग्लास पकडून,
वर दात काढणारे आपले परमपूज्य
आणि
तमिळनाडू कैसा पहूचेंगा भाई ??
असा निरागस प्रश्न विचारणारे आपलेच पन्टर !!

मी म्हणतो,
या खुळचटांना
युद्धाचं फुटेज म्हणून
व्हिडिओ गेम दाखवले तर काय बिघडलं ??

आकाशातील चंद्र म्हणून हातात आरसा दिला होताच की !!
May 12 6 tweets 1 min read
भक्तुल्ल्यांच्या अंगाची आजच्या तारखेला सगळ्यात कुणाच्या नावानं 🔥-🔥 होत असेल तर ती नेहरू गांधी नावानं जितकी होत नाही तितका त्यांचा जळफळाट होतो तो संजय राऊतांच्या बेबाक निडर वाणीमुळे ! संजय राऊत ह्यास भक्तुल्ल्यांच्या शिव्या फुलासमान वाटतात. संजयच्या खिजगणतीतही भक्तुल्ल्यांचे शिव्याशाप नसतात. त्याचं विश्लेषण हे परखड व नेमकं असतं. आता हेच पहा ना ! "ऑपरेशन सिंदूर" हे सुरू होताच भक्तुल्ले हे टणाटणा उड्या मारत शेख चिली स्वप्नं पाहण्यात दंग झाले होते. मात्र ते ऑपरेशन अंतिम निर्णयाप्रत न नेता मध्येच कच खाल्ल्याबद्दल व
Apr 30 9 tweets 2 min read
महात्वाची पोस्ट-

पहलगाम प्रकरणावरून काही जणांची मजाल मला देशद्रोही ठरवण्यापर्यंत गेलेली आहे.

मला काही फरक पडत नाही किंवा वाईट पण वाटत नाही पण या भुरट्यांचा पर्दाफाश करायलाच हवा.

आता पुढचं वाचा-

भारत माझा देश आहे. जे सरकार ईथे काम करत आहे ते माझ्या देशाचं सरकार असून सनातन्यांच्या बापाची जागीर नाही.

काॅन्ग्रेस ने पाच सहा दशकं ईथे राज्य केलं पण त्या पक्षाच्या वरीष्ठ लोकांनी सोडाच काॅन्ग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांनी देखील विरोधकांना देशद्रोही ठरवलं नव्हतं.
Apr 7 8 tweets 2 min read
मला मुसलमानांची चिंता नाही, माझी चिंता हिंदू आहे !
आश्चर्यचकित होऊ नका, तुम्ही बरोबर वाचले !
माझी चिंता आहे तो कट्टर हिंदू…
जो तिन्ही वेळा यांनाच मतदान करतोय,
जो सोशल मीडियावर दिवस-रात्र प्रचार करतोय,
जो भस्म लावून "हिंदू हृदय सम्राट" च्या जयघोषात गुंग आहे… पण त्याला मिळाले काय ?
प्रचंड महागाई...!
बेरोजगारी.....!
भरमसाठ कर....!
आणि हो….द्वेषाची नशा...!
ज्यात तो इतका बुडून गेलाआहे की त्याला दुसरं काहीच आठवत नाही...!

2014 पासून मुसलमानांना "टाईट" करण्यात मग्न असलेला हा कट्टर हिंदू इतकंही समजू शकला नाही की…
Mar 18 22 tweets 4 min read
मिसिंग लिंक

छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर महाराणी येसूबाई आणि छत्रपती संभाजीपुत्र शाहूराजे कैद झाले. पुढची अनेक वर्षे ते औरंगजेबाच्या कैदेत होते.

कैदेत होते म्हणजे अगदीच कैदेत होते असे नाही.

शाहूंना औरंगजेबाने प्रतिष्ठित आणि मोठी म्हणजे 7 हजाराची मनसबदारी दिली होती, त्यांना आणि येसूबाईंना दक्षिण गुजरात, सुपा, नेवासा, खरगोन, खानदेश, अक्कलकोट आणि बारामतीची सुभेदारी किंवा देशमुखी दिली. (या सगळ्या त्याकाळात मोठ्या सोन्याच्या पेठा होत्या म्हणजेच भक्कम महसूल देणाऱ्या जागीरी होत्या)

त्यांचा स्वतःचा छोटेखानी दरबार होता, अनेक पंत सरदार मंडळी
Mar 15 7 tweets 1 min read
कॅनडाने अमेरिकेवर रिव्हर्स टेरिफ लावून टाकले. कॅनडाच्या उर्जेच्या गरजेसाठी तेथील सरकारने युरोपियन युनियनशी वाटाघाटी सुरू करून टाकल्या.

स्वदेशी म्हणजे कॅनडात निर्मित वस्तूच खरेदी करा, अशी राष्ट्रवादी लाट तिथे फोफावतेय.

चीनने अमेरिकेला सांगून टाकले की ते कोणत्याही युध्दास तयार आहेत.

तिकडे युरोपमधे फ्रान्सने नाटो देशांना सांगून टाकले की फ्रान्स न्युक्लिअर अम्ब्रेला द्यायला म्हणजे अणू हल्ल्यापासून संरक्षण द्यायला तयार आहे.

युरोपियन युनियन अमेरिकेच्या डॉलरला जबरदस्त टक्कर द्यायची योजना बनवत आहे.

तिकडे इराणने अमेरिकेला ठणकावून सांगून टाकले की
Mar 13 4 tweets 1 min read
कायद्याची विटंबना बघा....

प्रशांत कोरटकर यांनी 4 प्रकारे गंभीर गुन्हे केलेत...
1.शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा अपमान केला.
2. इतिहास तज्ञ इंद्रजित सावंत यांना मारण्याची धमकी दिली.
3. ब्राह्मणांचं सरकार आलंय म्हणून धमकी दिली. जातीचा गैरवापर करून घटनेचा अपमान केला. ( सरकार कोणत्याही जात - धर्माचे नसते असे बाबासाहेबांची म्हणजे देशाची घटना सांगते .)
4. स्वतःच्या घराबाहेर पोलीस बंदबस्त असताना देखील त्यांना गुंगारा देऊन फरार झाला..!

आता ह्याच प्रशांत कोरटकराला अटक करण्यासाठी कायद्या मार्फत टाळाटाळ केली जाते...!
Mar 12 7 tweets 2 min read
महसुली तुटीमुळे राज्य सरकारला २०२५-२६ या वर्षात १ लाख ३५ हजार ७८३ कोटींचे कर्ज घ्यावे लागणार आहे. त्यामुळे सध्या चालू असलेले आर्थिक वर्ष संपताना राज्यावर असलेले ८ लाख १९ हजार ८५३ कोटींचे कर्ज आगामी आर्थिक वर्षात ९ लाख ३२ हजार २४२ Image कोटींवर पोहोचेल, असा अंदाज या अर्थसंकल्पात वर्तविण्यात आला आहे. राज्याला आगामी आर्थिक वर्षात घ्याव्या लागणार असलेल्या कर्जातून राज्याची आगामी आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय शिल्लक वजा केल्यानंतर येणाऱ्या रकमेस अर्थसंकल्पीय भाषेत राजकोषीय तूट म्हटले जाते. २०२५-२६ मध्ये
Mar 8 4 tweets 1 min read
नरेंद्र मोदींना डोनाल्ड ट्रम्पने 'टफ निगोशिएटर' का म्हटल?

Dassault वाले राफेल साठी ३०० ऐवजी ३५० मागत होते. मग गुजरात्याला राग आला.. आपली बार्गेनिंग स्किल दाखवण्यासाठी त्यांनी डायरेक्ट १६०० ने सुरुवात केली.आपल्याकडे बार्गेनिंगचा पहिला धडा आहे, एखादी वस्तु १००० रुपये किंमतीची सांगितली असेल आणि तुम्हाला ५०० ला पाहीजे असेल तर तुम्ही २५० पासून बार्गेनिंगला सुरुवात करायची असते. (त्यांना १६०० करोड मोठे की ३०० करोड ; हे पॉलिटिकल सायन्स मध्ये शिकवले नव्हते तो भाग वेगळा, पण बार्गेनिंग स्कील्स मध्ये ते वस्ताद होते. आणि हे दाखवायची हिच वेळ आहे अस
Mar 6 4 tweets 1 min read
FMCG फास्ट मुविंग कन्झ्युमर गुड्स, म्हणजे दैनंदिन लागणाऱ्या वस्तू व अन्नपदार्थ.
लोकसंख्या वाढते, दळणवळण सुधारते.... त्यामुळॆ या उत्पादनांमध्ये मागणी कायम वाढतच असते.
भारतात २० वर्षात पहिल्यांदाच या क्षेत्रातील शेअर्स घसरत आहेत. सप्टेंबर २०२४ पासून या क्षेत्रातील शेअर्स २०% ने घसरले आहेत. कारण या कंपन्यांचा नफा कमी झाला आहे किंवा तोटा होत आहे,
कारण या वस्तूंची खरेदी करण्याची लोकांची ऐपत दिवसेंदिवस कमी होत आहे.
खरे चित्र या आकडेवारीपेक्षा खूप जास्त गंभीर आहे.
आणि म्हणूनच लक्ष भटकवण्यासाठी वादग्रस्त विधाने, दंगली, द्वेष, धर्म याचा वापर केला जातो.
Mar 1 6 tweets 1 min read
26 Oct 2024 ला शेअर्स बाजारमध्ये होणार्‍या नुकसानबाबत केलेली राहूल गांधी यांची भविष्यवाणी खरी ठरली....ह्या अगोदर चीनने केलेले अरुणाचल प्रदेशातील अतिक्रमण असो,करोना महामारी च्या वेळी आलेले संकट असो,नोटबंदी असो,जीएसटी असो,आरएसएस आणि भाजप चे माणसे संवैधानिक संस्था बळकावतं असताना देशाला सावध केलेले असो,निवडणूक आयोगाची भूमिका असो किंवा देशामध्ये वाढती बेरोजगारी असो या प्रत्येक विषयावर राहूल गांधी यांनी देशाला आधीचं सावध केले होते....पुर्व जात असलेला गांधीचा व्देष,गांधी घराण्याची बदनामी,देशासाठी दिलेले योगदान न लक्षात घेता...वैयक्तिक टिका,आज्जी व वडिलांची
Mar 1 7 tweets 2 min read
शेअर बाजार कोसळला. पण त्या आधी गावच्या गावं लुटली गेली.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यावर लै व्याज मिळतंय. तुमचा पैसा आम्ही चांगल्या रिटर्न्स देणाऱ्या कंपनीत गुंतवणार आणि तुम्हाला महिन्याला भरमसाठ व्याज देणार.

असा प्रचार गावोगावी केला गेला. आणि लोकं हुरळले. गावातील एकदोन लोकांनी चारचाकी काढल्यावर गावातील अनेकांचा विश्वास बसला.

अडाणी लोकांचे समजू शकतो. पण मास्तर, वकील आणि डॉक्टर अशा पेशातले लोकंही अशा गोष्टींना बळी पडले. गावागावांतील कोट्यावधी रुपये लुटले गेलेत.

आणि ज्यांना लुटलं ते बोंबही मारू शकत नाहीत आणि काहीच करू शकत नाहीत.
Feb 28 10 tweets 2 min read
मुख्य मुद्द्यावरुन जनतेचे लक्ष हटविण्यासाठी जनतेला टिव्हीवरील न्यूज चॅनेल समोर खिळवून ठेवणे आवश्यक असते. असा जगभरातील फॅसिस्टांचा मूलभूत सिध्दांत आहे.

आपल्या राज्यातही असंच काहीतरी बिनबोभाट सुरु आहे असा माझा अंदाज आहे. उदाहरणादाखल स्वारगेट बलात्कार प्रकरण घ्या. पिडीत मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यापासून टिव्ही आणि पोर्टल्सवर जे काही सुरु आहे. ते कोणत्याही विचारी व्यक्तीला पटणारे नाही. पण या प्रकरणाच्या आड रायगड मधील अल्पवयीन मुलीचा बलात्कार आणि अत्याचार लपवला जातोय. कारण आरोपी भाजपा या राजकीय पक्षाशी संबंधित आहे.
Feb 25 11 tweets 2 min read
ओळखा पाहू हा नमूना कोण?

1. भावाच्या मुलासाठी लिहीलेल्या गाण्याला देशभक्ती गीत म्हणून सांगणारा खोटा देशभक्त...
2. धिंग्रा यांनी कर्झन वायली ला मारले. त्यांना ओळख न दाखवणारा पळपुटा...
3. ब्रिटनमध्ये असताना बलात्काराच्या आरोपा खाली 6 महिन्याची शिक्षा भोगणारा गुन्हेगार... 4. पहिली बायको पळून गेल्यावर लोकांना सांगू नका म्हणणारा षंढ...
5. स्वतःच्या भावाची जबाबदारी न घेणारा भेकड...
6. किनाऱ्यापासून 10 फुटावर थांबलेल्या बोटीच्या 18 फूट उंचीवर असलेल्या पोर्टहोल मधून उडी मारून 5 मिनिटात पकडला गेलेला काडी पैलवान...
Feb 20 5 tweets 1 min read
छत्रपती शिवाजी महाराज आजकाल चलनी नाण झालेलं आहे अस म्हटल्यावर अनेकांना मिरच्या लागल्या.

अरबी समुद्रात महाराजांचे स्मारक काही हजार कोटी खर्चून उभारण्याची घोषणा सरकारने केली.

प्रधानमंत्री आले. भूमिपूजन झाल २४ डिसेंबर २०१६ ला.

मुंबईत डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याची घोषणा झाली.

प्रधानमंत्री आले.भूमिपूजन झाल ११ ऑक्टोबर २०१५ ला.

दोन्ही स्मारक पूर्ण झालेली आहेत का ?

मुळात भारतीयांच्या मनात दोन्ही महापुरुष कायमस्वरूपी असताना स्मारकांची गरज केवळ मतांच्या जुळणीसाठी होती हे उघड आहे.

मग सगळीच स्मारक बांधकाम बंद पडलेली आहेत का ?