My Authors
Read all threads
#बळीराजा

माझ्या शेतकरी नसलेल्या बांधवांनो

शेतकरी शेतीमध्ये एका दाण्याचे हजार दाणे पिकवतो
किलोभर बियाणे पेरले तर टनभर धान्य पिकवतो
तरीही त्याला शेती परवडत नाही ?
याचंच नवल वाटतं ना तुम्हाला, आम्हालाही तेच नवल वाटत हंगाम संपल्यानंतर जेव्हा वर्षभराच्या
कमाईचा खर्च आणि उत्पन्नाचा हिशोब जुळत नाही तेव्हा
कारण उत्पादन किती येणार हे निश्चित नसतं पण आशा असते चांगले उच्चांकी यावे व सर्व देणंघेणं फिटाव यासाठीच तो जीवाचे रान करून कष्टत असतो लढत असतो
बरं त्याची लढाई एकाच गोष्टीशी नसते हो
सुरुवातच शेताच्या मशागती पासून होते नांगरणी कुळवणी यासाठी पैसे नसतात कारण #बॅंक ? बॅंकां कडून वेळेवर व पुरेसा कर्जपुरवठा होत नाही वारंवार चकरा माराव्या लागतात बॅंका सरळसरळ रिझर्व्ह बॅंकेच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करतात आणि नाईलाजाने सावकाराकडून महिन्याला ३-५% दराने पैसे उचलतो
मग दुसरी लढाई असते बी बियाणे
त्याला हवे ते बियाणे वेळेवर मिळत नाही विक्रेते कृत्रिम टंचाई निर्माण करून जास्त दराने विक्री करतात काही महाभाग तर बोगस आणि भेसळयुक्त बियाणे विक्री करुन शेतकऱ्यांची फसवणूक करतात आणि हे लक्षात येते तेव्हा हंगाम संपायची वेळ आलेली असते
नंतरची लढाई असते खतांसाठी त्याठिकाणी सुद्धा बोगस खते विकून शेतकऱ्यांचा बळी घेण्याचे काम अनेक नतद्रष्ट करत असतात
यासोबतच पुन्हा दरवर्षी रासायनिक खतांच्या किमतीत होणारी वाढ ही २०-२५% तसेच दुकानदारांनी केलेली कृत्रिम टंचाई या दिव्यानंतर
पाऊस कधी पडणार यावर सर्व अवलंबून असते वेळेवर जर पाऊस पडला तर
उत्पादन चांगले येते जसं जसा उशीर होतो तसे उत्पादनात घट येते
शेतकऱ्यांना चिंताग्रस्त होऊन आभाळाकडे डोळे लावून बसण्या शिवाय दुसरा पर्यायच नसतो
पेरणीनंतर आंतरमशागत आणि पिक संरक्षण करतांना सुद्धा लढावंच लागतं
रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होतो तसेच पाने कुरतडणार्या अळ्या, बोंड अळी, आणि बुरशीजन्य, विषाणू जन्य, जीवाणू जन्य रोग ओळखून त्यांचा प्रतिबंध करणे हे सुद्धा तेव्हाच शक्य होते जेव्हा उपलब्ध असलेले औषधे भेसळयुक्त नसतील तेव्हाच नाहीतर संपूर्ण पिकच उपटून नष्ट करावे लागते
वरील सर्व अडथळे पार केल्यावर पिक काढणीस मजूर सहजासहजी उपलब्ध होत नाहीत मग मजूरीचे वाढीव दर देऊन कसंतरीच पिक घरात आणून टाकायचे आणि नेमके याच वेळी पेरणीच्या वेळी असलेले शेतमालाचे दर कोसळलेले असतात सरकार यावेळी तत्काळ दखल घेतच नाही म्हणून मिळेल त्या भावात विक्री करावीच लागते
हमीभाव हा शेतकऱ्यांच्या फायद्यापेक्षा नुकसानकारकच ठरतो कारण हमीभावाने सर्व शेतकऱ्यांचा सर्वच शेतमाल खरेदी केला जात नाही आणि हमीभाव सुद्धा उत्पादन खर्चापेक्षा कमीच जाहीर केलेला असतो ज्याप्रमाणात बी बियाणे, खते, औषधी मजूरी यांचे दर वाढलेले असतात त्या प्रमाणात हमीभावात वाढ होतच नाही
इथली व्यवस्था ही पुर्णपणे बाबुशहांच्या हातात गेली आहे
आयात निर्यात धोरणात मिळणारा #मलिदा हेच मुख्य कारण आहे शेतकऱ्यांच्या दुर्दशेला भारतीय शेतकऱ्यांच्या हिता ऐवजी परदेशी शेतकऱ्यांचे हित जपले जाते
भारतीय शेतकऱ्यांची तुर ५०₹ दराने खरेदी केली जाते पण परदेशी तुरीला मात्र १२०₹ दर
दिला जातो आणि तीच तुर खुल्या बाजारात हमीभावापेक्षा कमी दराने व्यापार्यांना विकली जाते मग अशा वेळी शेतकऱ्यांच्या तुरीला कोण खरेदी करेल ?
याचप्रमाणे सर्व शेतमालाच्या बाबतीत घडतं असते
अन्नदात्यालाच #अन्नत्याग करण्याची दुर्दैवी वेळ आपल्या देशात येते
क्रमशः
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Enjoying this thread?

Keep Current with विवेक रणदिवे

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just three indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!