तंत्रज्ञानाचा अभ्यास करताना हे मुद्दे लक्षात घेण्यायोग्य वाटले ते असे.
१. आपल्याकडे सर्वाधिक वीज ऊत्पादन #औष्णिक ऊर्जेवर-कोळश्यावरच होते त्यामुळे आपण मुंबई/पुण्याचे शहरांचे #प्रदुषण चंद्रपुर किंवा इतर ठिकाणी पाठवतो.
(आपल्या घरातील घाण शेजाऱ्याच्या घरात टाकण्यासारखे) #म २/६ 👇
२. ऊच्च प्रतिच्या बॅटरी निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालासाठी (लिथियम) आपण अमेरिका आणि इतर देशांवरच अवलंबुन आहोत.(ते ही अतिशय महाग दर देऊन)
३. भारतातील प्रत्येक इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपनी ही बाल्यावस्थेत असल्याकारणाने तंत्रज्ञान आणि सुरक्षितता यांवर फार न बोलणेच बरे.३/६ 👇
४. पाश्चिमात्यांना फाॅलो करण्याच्या नादात आपण संपुर्ण गृहपाठ न करताच खुप घाई करतोय असे माझे प्रामाणिक मत आहे.
५. पुरेशा चार्जिंग स्टेशन्सची कमतरता, स्वच्छ वीजनिर्मिती,कच्चामाल किंवा भारतीय तंत्रज्ञान विकसित करण्याचा मंद वेग आणि मुळातच फक्त काॅपीपेस्ट करण्याची वाईट वृत्ती #म ४/६
यामुळे लगेच काही हाती लागेल याबद्दल मला शंका वाटते.
६. वेळोवेळी सरकारी धोरणात बदल करण्याची पद्धत यामुळे जागतिक स्तरावर भारतातील ऊद्योगक्षेत्रातील विश्वासाहर्तेबद्दल प्रश्नचिन्ह.
सरकार बदलले कि आपल्याकडे पाॅलिसी सहज बदली होतात ही अत्यंत वाईट बाब आपण सोडली पाहिजे. ५/६ #म#मराठी
आपण सर्वप्रथम खरे तर #जलविद्युत प्रकल्प, #अणुऊर्जा, वायूऊर्जा आणि अपारंपारिक क्षेत्रातुन स्वच्छ #वीज निर्मितीला प्राधान्य दिले पाहिजे.
वर सांगितल्याप्रमाणे पायभूत सुविधा, कच्चा माल आणि सरकारी ठाम विश्वास गरजेचा.
आपल्या स्वप्नांवर कुत्सितपणे हसणाऱ्यांना कधीही उत्तरं द्यायचं नसतं……आपल्या समाजाचा खूप मोठा हिस्सा अशा लहान लहान लोकांनीच भरलेला आहे.
हे वाक्य लहानपणापासून प्रचंड अवहेलना वाट्याला तमाशात काम करणाऱ्या वडीलांच्या मुलाचे आहे. तो एका मल्टीनॅशनल कंपनीत मलेशियात कंट्री हेड आहे.
कोण कोणाच्या पोटी जन्म घेतो. त्याचे आईवडील काय करतात? त्याची जात कोणती? धर्म कोणता? भाषा? रंग ? किंवा प्रांत यात कशातच कोणाला जन्माच्या आधी चॉइस नसतो. मग जी गोष्टीत आपले काहीच कर्तृत्व नाही त्याचा फुकाचा अभिमान बाळगून काय हशील?
आपापल्या कर्तृत्वाच्या जोरावर जो तो पुढे जातोच. एखाद्याच्या स्वप्नपुर्तीसाठी आपण हातभार लावत नसू तर निदान हे कुत्सितपणे हसणं किमान एकविसाव्या शतकात तरी थांबायला हवं.
काळ बदलला आहे. इंटरनेट आणि जगाच्या स्पर्धेत आपल्या माणसांनी आता १८ व्या, १९ व्या, २० व्या शतकातून बाहेर पडून
आपल्याकडे इंडस्ट्री आल्या, शहरीकरण वाढले,पायाभूत सोईसुविधांसाठी सरकारकडून जमिनींचे अधिग्रहन झाले.
खाजगी उद्योगासाठी,बिल्डींग्जसाठी जमिनींचे व्यवहार झाले.अनेकांकडे अचानक खूप पैसे आले.
काहींनी तो पैसा जपला परंतू बरीच मंडळी तो पचवू शकली नाहीत
#आर्थिकसाक्षरता #SaturdayThread १/१४
त्यातच इंटरनेटमुळे जागतिकीकरणास अधिक गती मिळाली.
काही मंडळी चांगली शिकली. काहींना सरकारी/खाजगी नोकऱ्या लागल्या.
चांगले पगार मिळायला लागले.
काहींनी उद्योग व्यवसायातून पैसा उभारला. बहुतांश लोकांनी आपापल्या बौद्धीक व सामुहीक परंपरेनुसार तो पैसा जसा वापरता येईल तसा वापरला,
२/१४
काहींनी तो गुंतवला.
ते करत असताना मात्र यातल्या अधिकाधिक लोकांनी तो रिअल इस्टेट, गाड्या,टोलेजंग घरं, ब्रॅंडेड वस्तू,गॅझेट्स, लग्न समारंभ, खाणपिणं, राजकारण किंवा एकमेंकांच्या द्वेष व मत्सरापोटी खर्च केला.
यातले बहुतांश फार लवकरच कफल्लक झाले किंवा पहिल्यापेक्षा अधिक गरिबीत
३/१४
बऱ्याचदा स्वतःच्याच क्षमता आपल्याला नीट उमजत नाहीत….. सहसा गरीब, निम्नमध्यम वर्गीय किंवा समाजाच्या खालच्या स्तरातल्या कुटूंबात तर कोणी यावर साधी चर्चाही करत नाही.
काय करावं, कुठे जावं काही समजत नाही!
तूला जसं जमतेय ते कर यामागे स्वातंत्र्य नसते तर - नक्की आपण काय सांगायचं हे अगतिक अज्ञान असतं.
कितीतरी जीव फक्त - आता पुढे काय करायचं या प्रश्नापुढे जातच नाहीत…. एक भयंकर न्यूनगंड (जे जवळपास प्रत्येकातच असतो) आहे त्या परिस्थितीतच ठेवतो…..
निर्लज्ज पणे करियर बद्दल प्रश्न विचारता यायला हवेत, तसं वातावरणं तयार व्हायला हवं. खर तर पुस्तकं, इंटरनेट आणि समाजमाध्यम यात फार मोठी भूमिका निभावू शकतात पण त्यात फार कोणाला इंटरेस्ट नसतो….. ट्रॅक्शन नसतं… हे जग नक्की आपल्याला कुठे घेवून चाललंय?