My Authors
Read all threads
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज कोरोना विषाणू संदर्भात महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुढील मुद्दे मांडले:
आज मी आमदारकीची शपथ घेतली. मुख्यमंत्री पदाला या महिन्याअखेरीस ६ महिने होत आहेत. आज आमदार झालो, हे सगळे काही मी करू शकतो आहे हे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाच्या आणि शुभेच्छांच्या जोरावरती!
मला सर्व राजकीय पक्षांचे, महाविकास आघाडीमधील सर्व नेत्यांचे, आमदारांचे आभार मानायचे आहेत कारण अत्यंत कठीण परिस्थितीत म्हणजेच कोरोना बरोबर चाललेल्या युद्धाच्या परिस्थितीत निवडणूक होऊ न देता हे सगळे काही बिनविरोध पार पाडायला सर्वांनी मदत केली त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतोय.
१७ तारखेला पंतप्रधानांनी जो लॉकडाऊन जाहीर केला होता, त्यांची मुदत संपली आणि परत पुढचे १५ दिवस म्हणजे ३१ मे पर्यंत संपूर्ण देश आणि साहजिकच आपला महाराष्ट्र सुद्धा लॉकडाऊन मध्ये आहे.
लॉकडाऊन वाढवला हे बरोबर आहे. आजही देशात विशेषतः महाराष्ट्रामध्ये रुग्णांची संख्या वाढते आहे. मुंबई, ठाणे,पुणे, संभाजीनगर, मालेगाव परिसरात रुग्णांची संख्या वाढते आहे.अजूनही ही शृंखला आपण तोडली जरी नसली तरी एक गोष्ट नक्की की त्याच्या वाढीवर, गुणाकारावर नियंत्रण आपण नक्की ठेवलं आहे.
ग्रीन झोनमध्ये आपण हळूवारपणे जवळपास सगळं काही उघडायला परवानगी दिली आहे, अजूनही देत आहोत. तिथले निर्बंध येत्या काही काळात शिथिल करतो आहोत. ऑरेंज झोनमध्ये सुद्धा शिथिलता आणली आहे.
रेड झोनमध्ये विशेषत: कंटेनमेंट झोन मध्ये मात्र अजूनही शिथिलीकरण करणे परवडणारे नाही. उद्योगधंद्याच्या बाबतीत आजपर्यंत राज्यात ५०,००० उद्योग सुरू करायला आपण परवानगी दिलेली आहे. या ५०,००० उद्योगांमध्ये जवळपास ५ लाख मजूर काम करायला लागले आहेत.
आपल्या सरकारला ६ महिने होत आहेत. नवीन सरकार असताना नवीन स्वप्ने आहेत. अर्थसंकल्प जाहीर केला, त्यात नवीन गोष्टी जाहीर केल्या आणि अंमलबजावणीला सुरुवात करण्याच्या आधीच आपल्याला या संकटाला सामोरे जावे लागते. आपल्या सगळ्या योजना आहेत, त्या आपण कोणत्याही परिस्थितीत अंमलात आणणारच!
आपण महाराष्ट्रामध्ये जवळपास ४०,००० एकर पेक्षा जास्त जमीन नवीन उद्योगधंद्यासाठी राखून ठेवत आहोत. त्याचप्रमाणे नवीन उद्योजक जे येतील, ग्रीन इंडस्ट्री ज्याला आपण म्हणतो, त्यांच्यासाठी कोणत्याही अतीतटी आपण ठेवणार नाही, परवानगी शिवाय तुम्ही उद्योग सुरू करा. फक्त १ अट, प्रदूषण करू नका.
कोरोनानंतर जग बदलले जाणार आहे. कदाचित नवीन उद्योजक म्हणतील की आम्ही येऊ इच्छितो पण आम्हाला जमीन विकत घ्यायला परवडणार नाही. ठीक आहे तुम्ही या, भाडे तत्वावर तुम्हाला जमीन देतो, तुम्हाला मूलभूत सुविधा देतो. या राज्यामध्ये नवीन उद्योग पर्व आपण सुरू करू!
जिथे कोरोनाचा प्रादुर्भाव नाही असा ग्रीन झोन हा आपल्याला कोरोना विरहित ठेवायचा आहे, हे एक आव्हान आहे. ग्रीन झोनमध्ये एक सुद्धा रुग्ण आपल्याला येऊ द्यायचा नाही. ग्रीन झोन हा ग्रीन झोन म्हणून मेन्टेन करणे आणि रेड झोन हा लवकरात लवकर त्याचे ग्रीन झोनमध्ये रूपांतर करायचे आहे.
परराज्यातील कामगार निघून गेले आहेत. मला माझ्या महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांना सांगायचं आहे जसं आजपर्यंत तुम्ही महाराष्ट्रासाठी सरकारचं ऐकलंत, घरी बसून महाराष्ट्र वाचवला. आता जिथे ग्रीन झोन आहे तिथे तुम्ही एका आत्मनिश्चयाने बाहेर पडला पाहिजे की मी माझा महाराष्ट्र पुन्हा उभा करणार!
ग्रीन झोनमध्ये जे उद्योग सुरू झाले आहेत,त्या उद्योगांना मनुष्यबळ कमी पडत असेल तर माझा महाराष्ट्र हा मोदीजी यांच्या भाषेत 'आत्मनिर्भर' करण्यासाठी स्वतःहुन पुढे या! महाराष्ट्र लढवय्यांचा आहे.हा संकटाला भित नाही, संकटामध्ये सुद्धा मर्दासारखा सामोरे जातो,हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे!
मुंबईमध्ये ठिकठिकाणी म्हणजे बीकेसी मध्ये १००० बेड वाढवतो आहोत, गोरेगाव एक्झिबीशन ग्राउंड, रेसकोर्स पार्किंग, वरळीला डोम, मुलुंड चेक नाका, ठाणे आहे हे नुसते कोविड केअर सेंटर म्हणून नाही राहणार, जंबो फॅसिलिटी ज्याला म्हणतो, इथे जे जे आवश्यक आहे ते ते आपण करणार आहोत.
ही जी रुग्णसेवा किंवा जे सेंटर आपण उभारतो आहोत त्यामध्ये सुद्धा ICU बेडची सोय आपण करतो आहोत. ही अभिमानाची गोष्ट नाही पण समाधानाची नक्की आहे की इतरत्र कुठेही नसेल अशी आरोग्य सुविधा आपण इथे निर्माण केली आहे आणि ही आरोग्य सुविधा आपण पुढे वाढवत नेत आहोत.
महाराष्ट्रात १४८४ कोविड केअर सेंटर आहेत. साधारणत: २,५०,००० रुग्णशय्या ऑक्सिजनसह महाराष्ट्रात आपण उपलब्ध करत आहोत.
-
ज्यांची ज्यांची रुग्णसेवा करण्याची इच्छा असेल, तयारी असेल त्यांनी सगळ्यांनी या युद्धामध्ये स्वतःहून पुढे आले पाहिजे.
मुंबईमध्ये आज १९,९६७ रुग्ण पॉझिटीव्ह आहेत, पण हा जो आकडा आहे त्याच्यामधले ५००० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. लवकर जर का आले आणि व्यवस्थित उपचार झाले तर बरे होऊन घरी जाणारे रुग्ण सुद्धा आहेत.
मी टीकेचा धनी होईन. महाराष्ट्रासाठी वाईटपणा घ्यायला माझी तयारी आहे. पण जे जे मला पटत ते महाराष्ट्राच्या हिताचं मी करणार म्हणजे करणारच.
-
आज पर्यंत जवळपास ५ लाख मजुरांना आपण ट्रेनने आणि बसेसने इतर राज्यांत अत्यंत नियंत्रित पद्धतीने पाठवले आहे.
आजदेखील इतर राज्यातील मजूर रस्त्यावरून चालत आहेत. क्यों चल रहे है? आपके लिए शुरुआत हुई है, ट्रेन, बस से आप घर जा रहे है। ऐसे रस्ते पे मत चलो। आपके लिए ट्रेन, बस की सुविधा शुरू हो गई है।
मुंबईमध्ये कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र इथे राहणारी लोकं खूप आहेत. ते ही मागे लागले आहेत. हे काय तुम्ही त्या राज्यातल्या लोकांना पाठवता, आम्हाला कधी पाठवणार? तुम्ही तर आपले आहात. आजपर्यंत तुम्ही सहकार्य केलं आहे. तुम्हालाही हळूहळू घरी पाठवण्यात येईल. पण अस्वस्थ नका होऊ!
जर आपल्याला लवकरात लवकर या लॉकडाऊन मधून बाहेर यायचं असेल तर पहिले जे आपले ग्रीन झोन आहेत, जिथे कोरोनाचा प्रादुर्भाव नाही हे जिल्हे व विभाग आपल्याला ग्रीन झोन म्हणूनच ठेवावे लागतील.
मला माझ्या कोकणातील व पश्चिम महाराष्ट्रातील बांधवांना, माताभगिनींना सांगायचं आहे की घाईगडबड करू नका,अस्वस्थ होऊ नका.ही थोड्या काळापुरती परिस्थिती आहे, आपण त्यावर मात करतो आहे. आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी आपले जाणे थोडं थांबवलं तर महाराष्ट्रावर,तुमच्या कुटुंबावर उपकार होतील.
अनेक जण आता म्हणत आहेत की कोरोना सोबत जगायला शिका. म्हणजे काय करायचं? आजपर्यंत घरात रहा, सुरक्षित रहा असं आपण म्हणतो. आता नवीन वाक्य घ्यावं लागेल, घराबाहेर जाताना सावध रहा. नेहमी सावधानता बाळगायला पाहिजे.
जून महिना म्हणजे शैक्षणिक वर्ष सुरू होणार. अजूनही काही जणांच्या परीक्षा राहिल्या आहेत. शाळा कशा सुरू करणार? हे सगळे मोठे विषय आहेत. कोणत्याही परिस्थितीत शैक्षणिक वर्ष आपल्याला वाया जाऊ द्यायचं नाही.
जोपर्यंत तुमचा आणि माझा विश्वासाचा धागा हा मजबूत आहे, तोपर्यंत मला खात्री आहे, मला आत्मविश्वास आहे की हे संकट आपण दूरच नाही तर परतवून लावल्याशिवाय राहणार नाही.
जेवढी स्वयंशिस्त आपण अधिक पाळू, तेवढे लवकर आपण ह्या बंधनातून मुक्त होऊ. जेवढे लवकर आपण कोरोनाची साखळी तोडण्यात यशस्वी होऊ तेवढे लवकर आपण सगळे बंधनमुक्त होऊ.
जे काही महाराष्ट्र सरकार करत आहे ते केवळ आपल्या सर्वांच्या हितासाठी करत आहे. आजपर्यंत जसं तुम्ही सरकारला सहकार्य केलं तसचं सहकार्य तुम्ही यापुढील काळात कराल अशी खात्री बाळगतो आणि लवकरात लवकर ही साखळी तोडून आपण बंधनमुक्त होऊ ही आशा बाळगतो.

जय हिंद, जय महाराष्ट्र!
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Enjoying this thread?

Keep Current with CMO Maharashtra

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!