My Authors
Read all threads
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज कोरोना विषाणू संदर्भात महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले.
-
-
आज मी आपल्यासमोर आलो आहे ते लॉकडाऊन हा शब्द कचऱ्याच्या टोपलीत फेकायला आलो आहे. #MissionBeginAgain ! पुन्हा एकदा आपण आपल्या आयुष्याची सुरुवात करत आहोत.
लॉकडाऊन करणे हा एक भाग झाला आणि सगळं हळुवार उघडणे हा दुसरा भाग झाला. म्हणजे लॉकडाऊन हे सायन्स असेल तर लॉकडाऊन उघडणे ही एक कला आहे.
पावसाळा तोंडावर आहे म्हटल्यावर पाऊस येतो, पडतो, अनेक ठिकाणी शेवाळ साचतं. शेवाळ समोर दिसल्यानंतर आपण आपलं पाऊल काळजीपूर्वक टाकतो. पुढच्या आयुष्यातील पावले सरकारला आणि जनतेला अशीच एकमेकांचा हात धरून मजबुतीने टाकायची आहेत.
येत्या २-३ दिवसांत आपल्या पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकण्याचा धोका आहे. मला खात्री आहे येणार नाही, माझी तशी प्रार्थना आहे, माझा आत्मविश्वास आहे. तरी देखील यंत्रणा सज्ज ठेवलेली आहे.
मी खासकरून माझ्या मच्छिमार बांधवांना सांगतोय की तुम्ही येत्या ४-५ दिवसांत समुद्रात जाऊ नका. कारण ते वादळ घोंगावत आहे. ते वादळ आपल्या दिशेने येत आहे, दिशा बदलून दुसरीकडे जाऊ शकेल आणि ते नक्की जाईल. आपण मात्र सज्ज राहायला पाहिजे.
आपण एकदा जी गोष्ट चालू करू, ती सुरूच ठेवायची. शिस्त आणि संयम गेल्या २ महिन्यात आपल्याकडे आला आहे. स्वयंशिस्त आणि जिद्द आपल्या अंगी आणली आहे. जी गोष्ट आपण सुरू करू ती पुन्हा बंद करण्यासाठी नाही.
५ तारखेपासून आपण असा निर्णय घेतोय की आजपर्यंत सगळे आपले व्यवहार ठप्प होते. सगळी दुकानं बंद ठेवली होती. आता आपण लहान मोठ्या शहरात रस्त्याच्या दुतर्फा असलेली दुकानं अल्टरनेट पद्धतीने उघडणार आहोत.
या ८ तारखेपासून आपण कार्यालये सुरू करतो आहोत. आता आपण आपली ऑफिसेस मधील कर्मचाऱ्यांची संख्या ही साधारणतः १०% उपस्थितीने सुरू करू.
आपण आता कुठेतरी सर्वोच्च बिंदू (पीक पॉइंट) म्हणतो, त्याच्या जवळ जात आहोत किंवा त्याच्यावर आलो आहोत. म्हणजे ज्या केसेस वाढत आहेत, त्या बघितल्यानंतर आपण या पीकच्या जवळ किंवा पीकवर पोहोचलो आहे.
पावसाळा आलेला आहे. सर्दी, खोकला, ताप, थकवा, तोंडाची चव जाणे ही लक्षणे आढळली तर ताबडतोब दवाखान्यात जायला पाहिजे. लक्षणे वेळेत ओळखून वेळेत उपचार केले तर बरे होणाऱ्यांची संख्या पण मोठी आहे.
आतापर्यंत महाराष्ट्रात ६५ हजार रुग्णांमधून २८ हजाराच्या आसपास रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता आपल्याकडे ३४ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यापैकी साधारणतः २४ हजार रुग्णांना कोणतेही लक्षणे नाहीत.
महाराष्ट्राची परिस्थिती हाताबाहेर गेली,मुंबईमध्ये वाताहत लागली, लष्कराला बोलवा, राष्ट्रपती राजवट लावा म्हणणाऱ्यांना म्हणा, हे आकडे बघा! हे आकडे बोलके आहेत. ६५००० पैकी २८००० घरी गेले आहे व २०० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.आतापर्यंत काहीजण व्हेंटिलेटरवरून सुद्धा बरे होऊन घरी गेले आहेत.
पुढच्या रविवारपासून आपण वृत्तपत्र घरपोच द्यायला परवानगी देत आहोत. आपली सकाळ पेपर आणि चहापासून सुरु होते. वृत्तपत्र विक्रेते मुले आहेत त्यांची आपण काळजी घेतली पाहिजे. त्यांना मास्क, सॅनिटायजरची बाटली द्यावी लागणार. त्यांनीसुद्धा वेळोवेळी हात धुतले पाहिजेत.
सार्वजनिक ठिकाणी आपण फिरायला जाऊ शकता,व्यायाम करायला जाऊ शकता. पहाटे ५ पासून संध्याकाळी ७ वाजेपर्यंत आपण मुभा ठेवली आहे. हे करताना आरोग्य कमावण्यासाठी त्याचा उपयोग करा. एकत्रित येऊन बिघडू देऊ नका.
राज्यामध्ये कोरोनाची टेस्ट करण्याची सुविधा फक्त २ ठिकाणी होती. आज आपल्या महाराष्ट्र राज्यात ७७ चाचणी केंद्र आहेत. येत्या २-४ दिवसात ते १००पर्यंत जातील. म्हणजे २ पासून ७७, ७७ पासून १०० आणि माझा प्रयत्न आहे की येत्या पावसाळ्यामध्ये टेस्टची संख्या व उपलब्धता आणखी वाढवण्याची गरज आहे.
अनेकदा अशी तक्रार येते की रुग्णाला बेड मिळत नाही. दुर्दैवाने थोड्या प्रमाणात ही तक्रार खरी आहे. ती तक्रार एक सुद्धा असता कामा नये याकडे सरकारचं लक्ष आहे. पण त्याकडे जर आपण बघितले तर आपल्या राज्यात आयसोलेशन सुविधा असतील अशी ३ हॉस्पिटल होती, आता ती जवळपास २५७६ केलेली आहेत.
आयसोलेशन बेड साधारतः ४०० होते, ते आता अडीच लाखाच्या वर झालेले आहेत. त्यात २५००० बेड ऑक्सिजनची सुविधा देऊ शकतील असे आहेत. ICU बेड सुरवातीला २५० होते ते साधारणतः ८५०० च्या आसपास आपण नेलेले आहेत. एवढी मोठी सुविधा आपण केलेली आहे.
जर मृत्युदर खाली आणायचा असेल आणि तो खाली येतोय, खाली आलेला आहे. तर डॉक्टर आपल्याकडे सज्ज आहेत. पण डॉक्टरना २ गोष्टी वेळेत मिळाल्या पाहिजेत, एक म्हणजे औषधे आणि महत्वाचे म्हणजे रुग्ण. रुग्ण वेळेत डॉक्टरांच्या हातात आला तर डॉक्टर एखाद्या योद्ध्याला साजेल असा पराक्रम करत आहेत.
परराज्यातील सुमारे १६ लाख मजुरांना रेल्वे व बसने इतर राज्यात सोडले आहे. ८००ट्रेनने ११लाखांवर मजुरांना आपण त्यांच्या राज्यात जाऊ दिल आहे. @PiyushGoyal जी, आज मी तुम्हाला धन्यवाद देतोय, गेल्यावेळी मी त्यांना बोललो तर त्यांना राग आला होता. आपण मनावर घेतले व ट्रेन उपलब्ध करून दिल्या.
१ ते ३० मे या काळात शिवभोजन थाळीच्या योजनेतून आपण ३२,७७,७७८ शिवभोजन थाळीच्या माध्यमातून ३२ लाखापेक्षा अधिक लोकांना भोजन देण्याची व्यवस्था केली आहे.
-
२२ पेक्षा फ्लाइट्सद्वारे ३००० पेक्षा जास्त नागरिक आपण महाराष्ट्रात आणले आहेत. ७ जूनपर्यंत आणखी फ्लाईटस येत आहेत.
विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेबद्दल मी बोलतो. काल मी कुलगुरूंची एक बैठक घेतली. परीक्षा घ्यायची असेल तर तातडीने परीक्षा घेण्याची परिस्थिती नाही आहे. कारण, ते कुलगुरू आणि मी मुख्यमंत्री असलो तरी आमच्यातला पालक आज ही जिवंत आहे.
अनेक पालकांची चिंता आहे, कोविड पसरत असताना आमच्या मुलांना आम्ही परीक्षेला पाठवावं का? काही लाख विद्यार्थी परीक्षेसाठी एकत्र येणार, किती अंतर ठेवणार?
म्हणून आपण सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला आहे की साधारणतः जेवढे सेमीस्टर झाले आहेत, त्यांची सरासरी काढून त्या विद्यार्थांना मार्क्स द्यायचे आणि त्या विद्यार्थ्यांना तसे पास करायचं, जेणेकरून त्यांचे आयुष्य थांबणार नाही.
लॉकडाऊन शब्द बाजूला ठेऊन #MissionBeginAgain किंवा पुन:श्च हरी ओम म्हणत आहे. शाळा कधी सुरू होणार, त्यापेक्षा शिक्षण कसं सुरू होणार हे महत्वाचे आहे. शाळा हे एक माध्यम आहे.
आजपर्यंत शिक्षण आणि आरोग्याला कदाचित प्राधान्य दिलं गेलं नसेल. पण मला असं वाटतं की पुढचं आयुष्य जगताना जर आपण जीवनावश्यक गोष्टी या संकटाच्या काळात बंद होऊ न देता चालू ठेवल्या तसच शिक्षण सुद्धा कसं सुरू ठेवता येईल त्यावर लक्ष देण्याची गरज आहे.
आपण खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो. आता खबरदारी आणि जबाबदारी दोन्ही एकत्र करण्याची वेळ आलेली आहे. जबाबदारी सरकारने घेतली आहे, खबरदारी आपण घेतली आहे.
आता एकमेकांचा हात हातात धरून जे करू ते ठामपणे करू आणि जे करू ते पुन्हा कधी बंद करणार नाही या आत्मविश्वासाने पाऊल पुढे टाकत जाऊ.
#MissionBeginAgain

जय हिंद, जय महाराष्ट्र!
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Enjoying this thread?

Keep Current with CMO Maharashtra

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!