आपण नोकरी,व्यवसाय अथवा वडीलोपार्जित संपत्ती सांभाळत असाल,बचत करत असाल पण त्या बचतीचा काही हिस्सा जर योग्य गुंतवणुकीवर खर्च केला नाही तर आपल्याला होणाऱ्या/येणाऱ्या महागाईचा चटका नक्की बसेल.
व्यवसाय, मासिक पगार, भाडे किंवा अजून कोणते ऊत्पन्न सुरू होणे म्हणजे आपल्याकडे वाहणारी नदीच समजा.
कधी त्या नदीला पुर येतो,
कधी ती शांत प्रवाही असते तर
ऊन्हाळ्यात फारच कमी पाणी असते कधीकधी तर ती आटतेही.
खरे पाहता नदीला जेंव्हा पुर येतो किंवा ती चांगली प्रवाही असते तेंव्हा २/७
ते पाणी योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य पद्धतीने अडविले आणि चांगले नियोजनपुर्वक धरण बांधले तर ते धरणं म्हणजेच आपली बचत.
आता ही बचत आपण कशी वापरतो / गुंतवणुक करतो यावर आपली प्रगती, भविष्य आणि आयुष्याचा आनंद अवलंबून असतो.
एकदा धरण बांधले की त्याच्यापासून वीजनिर्मिती करणे,३/७
त्यातून पुढे हमखास, शाश्वत आणि कायमस्वरूपी ऊत्पन्न सुरू होते.
त्याचबरोबर पुढे जाणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास कालवे आणि त्याच धरणाच्या पाण्यावर अत्यंत चांगली शेती होते.
मुबलक १२ महिने पाणी मिळते, त्यामुळे शेतीतूनही चांगले ऊत्पन्न येऊन सुबत्ता येते.
४/७ #शेती#मराठी#म
शेतीपुरक दुध,फळे यावर आधारीत कारखाने आणि प्रक्रिया ऊद्योगात पैसे लागतात, त्याच पाण्यामुळे आजूबाजूस अनेक चांगले ऊद्योग येतात त्यातूनही अनेक फायदे मिळतात.
ती सुनियोजित असेल तर पावसाळा, हिवाळा ऊन्हाळा आला तरी आपण डगमगत नाही. #म#मराठी ५/७
एकदा तुम्हाला हे चारही टप्पे लक्षात आले की मग सुरू होतो खरा प्रवास.
मोटार ट्रेनिंग स्कूलमधे पहिल्या दिवशी जाऊन वाहतूकीचे नियम समजून घेतो आणि मग गाडीत बसायची मानसिक तयारी करतो, खरतर आज आपला आर्थिकसाक्षरतेचा प्रवास इथपर्यंत पोहचलाय.
आपल्या स्वप्नांवर कुत्सितपणे हसणाऱ्यांना कधीही उत्तरं द्यायचं नसतं……आपल्या समाजाचा खूप मोठा हिस्सा अशा लहान लहान लोकांनीच भरलेला आहे.
हे वाक्य लहानपणापासून प्रचंड अवहेलना वाट्याला तमाशात काम करणाऱ्या वडीलांच्या मुलाचे आहे. तो एका मल्टीनॅशनल कंपनीत मलेशियात कंट्री हेड आहे.
कोण कोणाच्या पोटी जन्म घेतो. त्याचे आईवडील काय करतात? त्याची जात कोणती? धर्म कोणता? भाषा? रंग ? किंवा प्रांत यात कशातच कोणाला जन्माच्या आधी चॉइस नसतो. मग जी गोष्टीत आपले काहीच कर्तृत्व नाही त्याचा फुकाचा अभिमान बाळगून काय हशील?
आपापल्या कर्तृत्वाच्या जोरावर जो तो पुढे जातोच. एखाद्याच्या स्वप्नपुर्तीसाठी आपण हातभार लावत नसू तर निदान हे कुत्सितपणे हसणं किमान एकविसाव्या शतकात तरी थांबायला हवं.
काळ बदलला आहे. इंटरनेट आणि जगाच्या स्पर्धेत आपल्या माणसांनी आता १८ व्या, १९ व्या, २० व्या शतकातून बाहेर पडून
आपल्याकडे इंडस्ट्री आल्या, शहरीकरण वाढले,पायाभूत सोईसुविधांसाठी सरकारकडून जमिनींचे अधिग्रहन झाले.
खाजगी उद्योगासाठी,बिल्डींग्जसाठी जमिनींचे व्यवहार झाले.अनेकांकडे अचानक खूप पैसे आले.
काहींनी तो पैसा जपला परंतू बरीच मंडळी तो पचवू शकली नाहीत
#आर्थिकसाक्षरता #SaturdayThread १/१४
त्यातच इंटरनेटमुळे जागतिकीकरणास अधिक गती मिळाली.
काही मंडळी चांगली शिकली. काहींना सरकारी/खाजगी नोकऱ्या लागल्या.
चांगले पगार मिळायला लागले.
काहींनी उद्योग व्यवसायातून पैसा उभारला. बहुतांश लोकांनी आपापल्या बौद्धीक व सामुहीक परंपरेनुसार तो पैसा जसा वापरता येईल तसा वापरला,
२/१४
काहींनी तो गुंतवला.
ते करत असताना मात्र यातल्या अधिकाधिक लोकांनी तो रिअल इस्टेट, गाड्या,टोलेजंग घरं, ब्रॅंडेड वस्तू,गॅझेट्स, लग्न समारंभ, खाणपिणं, राजकारण किंवा एकमेंकांच्या द्वेष व मत्सरापोटी खर्च केला.
यातले बहुतांश फार लवकरच कफल्लक झाले किंवा पहिल्यापेक्षा अधिक गरिबीत
३/१४
बऱ्याचदा स्वतःच्याच क्षमता आपल्याला नीट उमजत नाहीत….. सहसा गरीब, निम्नमध्यम वर्गीय किंवा समाजाच्या खालच्या स्तरातल्या कुटूंबात तर कोणी यावर साधी चर्चाही करत नाही.
काय करावं, कुठे जावं काही समजत नाही!
तूला जसं जमतेय ते कर यामागे स्वातंत्र्य नसते तर - नक्की आपण काय सांगायचं हे अगतिक अज्ञान असतं.
कितीतरी जीव फक्त - आता पुढे काय करायचं या प्रश्नापुढे जातच नाहीत…. एक भयंकर न्यूनगंड (जे जवळपास प्रत्येकातच असतो) आहे त्या परिस्थितीतच ठेवतो…..
निर्लज्ज पणे करियर बद्दल प्रश्न विचारता यायला हवेत, तसं वातावरणं तयार व्हायला हवं. खर तर पुस्तकं, इंटरनेट आणि समाजमाध्यम यात फार मोठी भूमिका निभावू शकतात पण त्यात फार कोणाला इंटरेस्ट नसतो….. ट्रॅक्शन नसतं… हे जग नक्की आपल्याला कुठे घेवून चाललंय?