My Authors
Read all threads
राम मंदिर निर्माण होतंय म्हणून स्वयंघोषित पुरोगाम्यांनी खुश व्हायला हवंय खरं तर. तरी ते नाराज आहेत.

त्याचं कारण हे, की हे स्वयंघोषित पुरोगामी लबाड आहेत.

पुरोगामी समूहाने, ते खरे पुरोगामी असतील तर, राममंदिर विषय "संपला" एकदाचा, असं म्हणत आनंद व्यक्त करायला हवा!

१/n
प्रतिगामी संघाचा खुनशी हिंसक मुद्दा संपला याहून अधिक सुख ते काय?!

बरं मुस्लिमांच्या भावना दुखावल्या जातील अशी भीती असेल तर त्यावरही अतिशय सोपा उपाय आहे पुरोगाम्यांकडे.

पुरोगाम्यांना इस्लाम अमन प्यार भाईचाराका मजहब वाटतो ना? मग त्यांनी समस्त मुस्लिमांना आवाहन करायला हवं की

२/n
राम मंदिर खुल्या दिलाने अल्लाह का करम म्हणत अॅक्सेप्ट करावं. तसंही मंदिर होणारच आहे...मग कटुता ठेऊन कट्टरपणा वाढवण्यात अर्थ नाही.

आपसी मनमुटाव कायकू?

अमनच्या मजहबवाल्यांनी शांती मुकम्मल करावी. इफ्तार आणि टोपी आवडणाऱ्या पुरोगाम्यांनी मुस्लिम बांधवांना खरी इबादत शिकवावी.

३/n
काय हरकत आहे?

आपण सगळे हिंदुस्तानीयतचे वारस आहोत. पुरोगाम्यांनी ही हिंदुस्तानीयत मायनॉरिटीत रुजवावी. इस्लामी बादशहांनी भारतावर अनंत उपकार केलेत. त्याची आठवण करून द्यावी. आपल्या पूर्वजांप्रमाणे इथल्या मिट्टीत, इथल्या संस्कृतीत घुल-मील जावं.

किती गोड चित्र आहे हे!

४/n
राममंदिर हे उत्तम निमित्त आहे हे चित्र रेखाटण्यासाठी!

मुस्लिमांना असं जबरदस्त प्रबोधित करावं की संघाचा कम्युनल अजेंडाच फेल व्हावा!

जमणारे काय पुरोगाम्यांना?

जमायला हवं खरं तर.

कारण पुरोगाम्यांनी नेहेमी "घरातली स्वच्छता" हीच प्राथमिकता ठेवलेली आहे.

५/n
भारत हे आपलं घर आहे...हिंदू मुस्लिम भाऊ भाऊ आहेत...एकाच घरातले बच्चे आहेत. भावाभावांमधील भांडण पुरोगाम्यांनी सोडवावं. लहान भावाचे खूप हट्ट ऐकलेत आपण, मोठ्या भावासाठी एकदा शहाण्यासारखा वाग हे छोट्या भावाला समजावून सांगावं.

पण पुरोगामी तसं करणार नाहीत.

६/n
कारण यांचं अस्तित्वच लबाडी आणि दुटप्पी वर्तनावर उभं आहे.

आता हेच पहा ना - बाबरी पाडली गेली ६ डिसेम्बर १९९२ ला. ती घटना व त्यावरून घडलेल्या हिंसेमुळे २,००० लोकांचा मृत्यू झाला.

१९९६ ते २००४ हा ८ वर्षांचा कालावधी सोडला तर १९९२ पासून २०१४ पर्यंत लोकशाहीवादी, संविधानवादी,

७/n
पुरोगामी पक्ष सत्तेत होते. पैकी २००४ ते २०१४ सलग १० वर्षे सभ्य समूह शिरोमणी मनमोहन सिंग आणि नॅशनल अॅडव्हायजरी काउन्सिलद्वारे सभ्य समूह शिरोमणींना आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकवत सरकार हाकणाऱ्या लोकशाही शिरोमणी सोनिया गांधी सत्तास्थानी होत्या. त्याच सुमारास, महाराष्ट्रात सलग

८/n
१५ वर्षे पुरोगामी सरकार होतं.

काय झालं बाबरी डिमॉलिशन केसचं? एवढ्या वर्षात बाबरी उध्वस्त करणाऱ्याना गजाआड का केलं गेलं नाही? हे प्रश्न पु गॅंग आपल्या लाडक्या पक्षांना विचारत नाहीत.

उलट, बाबरी पाडण्यात ज्यांचा प्रमुख वाटा होता अश्या एका वयोवृद्ध व्यक्तीचं राम मंदिर भूमिपूजन

९/n
कार्यक्रमात उपस्थित नसणं पु गँगच्या डोळ्याच्या कडा ओलं करून जातं.

"बाबरी पाडण्यात शिवसैनिकांचा हात असेल तर मला त्याचा अभिमान आहे" असं म्हणणाऱ्या वाघाच्या पक्षाबरोबर गोभक्त अहिंसक गांधींची पूजा करणाऱ्या पक्षांनी सत्ता वाटून खाल्ल्याचा आनंद याच पुरोगाम्यांनी जिभल्या चाटत

१०/n
व्यक्त केला होता.

हेच लोक कालपासून सर्वोच्च न्यायालयात कित्येक वर्षे सुनावणी नंतर सुनावणी होत होत तडीस गेलेल्या प्रकरणावरून विलाप करत आहेत. आता यांना भारत कम्युनल झाल्यासारखा वाटतोय.

खुद्द मुस्लिम समूह जितका डिस्टर्ब नसेल जितके हे पिसाळल्यासारखे करत आहेत.

११/n
याना भारताच्या पंतप्रधानांनी मंदिर भूमिपूजनात सहभाग घेतल्याचं दुःख होतं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, सरकारने स्थापन केलेल्या ट्रस्टच्या देखरेखीखाली तयार होणाऱ्या, देशाच्या ७०% जनतेच्या धर्माच्या मंदिराच्या भूमिपूजनास पंतप्रधान "यजमान" म्हणून येणं यांना खटकतं.

१२/n
लोकप्रतिनिधी इफ्तार पार्ट्या देतात त्यावर यांचं काहीच म्हणणं नसतं. साधे लोकप्रतिनिधी सोडा - आजपर्यंतच्या इतिहासात किती राष्ट्रपतींनी इफ्तार पार्ट्या दिल्या होत्या माहितीये का? अब्दुल कलाम आणि वर्तमान राष्ट्रपती राम नाथ कोविंद - फक्त हे २ राष्ट्रपती वगळल्यास

१३/n
प्रत्येक राष्ट्र्पतीने - प्र त्ये क राष्ट्रपतीने राष्ट्रपतीभवनात इफ्तारची पार्टी दिली होती. (कोविंद यांनी "कोणताच धार्मिक कार्यक्रम होणार नाही" हे घोषित केलं आहे बरं का!) कुणा पुरोगामी शिरोमण्याने यावर आंदोलन केलं होतं काय?

"उर्दू भाषेतील सरकारी शाळा" अश्या थाटात

१४/n
मदरश्यांना सरकारी फंड्स दिले गेले. पण त्यांतून काय शिकवलं गेलं, कश्या पिढ्या घडल्या हे आपल्याला चहूकडे दिसत आहे. त्यावर कोणत्या धर्मनिरपेक्ष विचारवंताने आक्षेप घेतला होता काय? या उलट केंद्र सरकारने मदरश्यांच्या मॉडर्नायझेशनचे प्रयत्न सुरु केल्यावर लेखांवर लेख लिहिले गेले!

१५/n
मुस्लिमांना टार्गेट केलं जातंय म्हणून!

राममंदिर निर्माण होतंय याचा आनंद झालेल्याना कम्युनल समजणाऱ्यांनी एकदा खुद के गिरेबानमध्ये बघावंच.

दिसेल यांना की यांची धर्मनिपेक्षताच मुळात धर्मांध आहे!

१६/n
ह्याच धर्मांध धर्मनिरपेक्षतेला गाडून त्यावर हे मंदिर उभं आहे.

त्याचंच दुःख होतंय पु गॅंगला!

हे दुःख कायम राहील याची तजवीज आता भारतीय समाज करत राहील.

याद रखियो!

जय जय श्रीराम!

: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com

@threadreaderapp please unroll.
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with Omkar Dabhadkar

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!