या देशात किंवा जगातच उघडपणे भांडवलदारांची तळी उचलता येत नाही. तसे झाल्यास समाजाच्या सर्वच थरातून त्याला विरोध होतो. याचे कारण काय तर - बव्हंशी भांडवलशाही ही शोषणावर आधारित व्यवस्था आहे. अशा उद्योगधंद्यांना मानवी आयुष्याच्या सर्वच क्षेत्रांमध्ये आणि (१)
भौगोलिक साधनसंपत्तीवर एकहाती वर्चस्व गाजवायचे असते. या भावनेतूनच Monopoly-मोनोपॉली ह्या संकल्पनेचा उदय झाला असावा. मोनोपॉली आली म्हटलं की कामगार, नोकरदार आणि ग्राहकांचे शोषण आलेच. सामान्य जनतेला ह्या व्याख्या माहिती नसल्या तरी अशा संकल्पना त्यांच्या मनात कुठेतरी खोलवर (२)
रुजलेल्या असतात. स्वाभाविकपणे कोणत्याही मानवी मनाला अन्यायाविरुद्ध चीड असतेच. आणि म्हणूनच उघडपणे उद्योगपतींना अशा गोष्टी करता येत नाहीत. या गरजेतूनच देशाच्या एकूणच साधन संपत्तीवर वर्चस्व ठेवण्यासाठी छुप्या मार्गांचा अवलंब केला जातो. (३)
आजचा योगायोग बघा ना.. देशातल्या सर्वच विरोधी पक्षांनी पेगॅससवरुन टीकेची झोड उठवली आहे आणि गांधींची पुण्यतिथीपण आजच.... आजघडीला कोणत्याही शहाण्या राजकारण्याला हे माहितीच असेल की पंतप्रधान, गृहमंत्री आणि त्यांची mother organization यांच्याकडे अमर्याद सत्ता आहे.
त्या सत्तेचा (१ )
दुरुपयोग करून ते प्रत्येक क्षेत्रातल्या महत्त्वाच्या व्यक्तींवर आज ना उद्या पाळत ठेवतीलच, हेसुद्धा त्यांनी आधीच गृहीत धरले असणार.पेगॅससच्या निमित्ताने ते प्रकरण वर आले एवढेच. सत्ताधारी पक्षाच्या way of working ला ते साजेसेच आहे.
(२)
मग आता तुम्ही म्हणाल ह्याचा आणि गांधींचा काय संबंध ??
तो असा की...
पुरोहितशाही आणि वैदिक सत्तेला जनतेच्या सर्व आर्थिक-सामाजिक-राजकीय नाड्या स्वत:च्या हातात ठेवायच्या असतात. पेगॅसस असो वा धर्मग्रंथ- त्या माध्यमातून निरंकुश सत्ता ठेवणे, हे एकाच वैदिक मानसिकतेतून आलेले आहेत.
(३)
साखरेचा इतिहास फार जुना आहे. अथर्व वेदातही तिचा उल्लेख आहे असं वाचलेलं एका पुस्तकात. ऊस आणि साखरेचा जन्म भारतातलाच असे मानले जाते. संस्कृत मध्ये साखरेच्या एका भागाला "खंड" असे संबोधण्यात आले होते. मुस्लिम राज्यकर्ते ते ख्रिश्चन राज्यकर्ते असा प्रवास करत अमेरिकेत त्या शब्दाचा (१)
इंग्रजी शब्द "Candy" असा झाला.
साखरेच्या नादात मानवी इतिहासाला आणखी एक दुर्दैवी वळण लागले. साखरेच्या अतिशय फायदेशीर व्यापारात लागवडीसाठी नवे नवे भाग शोधत पोर्तुगीज खलाशी - Henry the Navigator हा आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर येऊन धडकला. याचे कारण अरबस्तान सोडून (२)
ऊस लागवड करायला नवीन जमिनी शोधायच्या होत्या. हेन्रीला योग्य जमीन काही सापडली नाही मात्र इथे त्याला उष्णकटिबंधीय वातावरणात काम करण्यास योग्य असे कृष्णवर्णीय लोक दिसले. अशाप्रकारे १४४४ साली हेन्रीने त्याच्यासोबत २३५ कृष्णवर्णीय आफ्रिकन लोक स्वतः सोबत लागोसवरून- सध्याचा नायजेरिया(३)
एरव्ही छत्रपतींच्या नावाने मतं मागणारे बहुजनांचे नेते हे गिरीश कुबेरांनी शिवशाहीच्या इतिहासाचा विपर्यास करूनही आणि राज्यात सत्तेत असूनही शांत आहेत, त्यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही. भाजपचे स्थानिक व राष्ट्रीय नेते राजरोसपणे खोट्या बातम्या समाजमाध्यमांमध्ये (१)
पेरत आहेत. छ. शिवाजी, छ. संभाजी, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर इ. अशी लोकं की ज्यांनी सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी, बहुजनांना न्याय मिळवून देण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं अशा लोकांची बदनामी जातीय समाजशक्तींकडून आज उघडपणे सुरू आहे. आता एक नवीन ट्रेंड आलाय तो असा की (२)
लोकशाहीच्या संदर्भात शिवशाहीचे नवे अर्थ लावणे, हे उपद्व्याव सुरू आहेत; आज ते छुपे आहेत उद्या उघडपणे होतील. बहुजनांच्या महापुरुषांचे चारित्र्यहनन सुरू झालेले आहे मित्रांनो. परवाच छ. शिवरायांच्या आग्र्याहून झालेल्या सुटकेची तुलना सावरकरांशी केली, उद्या आणखी काही ऐकायला मिळेल. (३)
आज रमजान ईद..! प्रत्येक सणाशी संबंधित अशी एक आख्यायिका किंवा घटना असतेच.
इस्लामी कालगणनेनुसार रमजान हा नववा महिना. या महिन्याच्या सत्ताविसाव्या रात्री मक्केजवळच्या हिरानामक गुहेत इस्लामचे संस्थापक हजरत महंमद पैगंबर यांना पहिला साक्षात्कार झाला आणि (१)
त्यांच्या मुखातून कुराणाचा पहिला संदेश प्रकटला. हा संदेश ज्ञानसाधनेचा व त्याच्या प्रसाराचा होता. आज किंवा शतकानुशतके मुख्य प्रवाहात मध्ययुगीन इतिहास सांगताना Islamophobia कसा पेरता येईल याची काळजी घेतली जात आहे. मध्ययुगातल्या सरंजामशाहीच्या काळात आक्रमक राज्यसंघर्षाकडे आणि (२)
त्यात झालेल्या हिंसेकडे कसं बघायचं ह्यालापण एक विशिष्ट दृष्टिकोन असावा लागतो. अमानवी हिंसा ही फक्त मध्ययुगातच होती असं नाहीये त्या आधीसुद्धा होतीच की. मित्रांनो हिंसा हे इतिहासाचे अविभाज्य अंग आहे हे समजून घ्या. किमान आधुनिक इतिहासाच्या आधी तरी सत्ता काबीज करायची तर हिंसा आलीच(३)
'आम्हाला दाभाडकरांचे संस्कार हवेत दाभोळकरांचे नकोत' अशा आशयाचे ट्विट भाजपाचे अधिकृत पदाधिकारी अवधूत वाघ यांनी केले आहे. आता ह्या पक्षाचा पॅटर्न सांगतो तुम्हाला. समाज जेवढा जाती धर्मात दुभंगलेला असेल तेवढा भाजपला राजकीय फायदा जास्त होतो. पण त्यांच्या दुर्दैवाने आणि बहुजनांच्या (१)
सुदैवाने गांधी, आंबेडकर, नेहरू अशा असंख्य विचारी नेत्यांमुळे भारताचे संविधान अजूनतरी ह्यांच्या डोक्यावर आहे. संविधानाची चौकट उघडपणे मोडणे अजूनतरी संघ किंवा भाजपला शक्य नाही. मग असे आश्रित आणि उपकृत लोक शोधायचे की ज्यांना फुटकळ पदं दिल्यावर ते समाजात त्यांच्या पक्षाचे धार्मिक,(२)
जातीयवादी, सांस्कृतिक अतिरेकी असे विषारी विचार समाजात पेरत राहतात. बऱ्याचदा आपल्याला असा प्रश्न पडतो की एवढा शिकलेला माणूस असं अतार्किक कसं काय बोलू शकतो? अवधूत वाघ ह्यांचा bio तुम्ही चेक केला तर तुम्हाला समजेल की VJTI, JBIMS अशा नामांकित संस्थामध्ये ते शिकलेत, मग तरीही असे(३)