डेडपूल... Profile picture
Sep 17, 2020 11 tweets 3 min read Read on X
यंदाच्या जून महिन्यात कृषी क्षेत्राशी निगडित अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांवर केंद्र सरकारने अध्यादेश बजावले होते.. सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात ते अध्यादेश कायद्यात रूपांतर करण्याची घाई सरकारला आहे. काय आहेत ते तीन होणारे कायदे? शेतकरी का संतप्त झालेत त्यावर? #म #धागा 👇
त्यातील एक प्रस्तावित कायदा लोकसभेत पारित करून घेतला गेला आहे. त्यानुसार या कायद्यांनी किमान आधारभूत किंमत (MSP) ही व्यवस्था मोडीत निघेल अशी रास्त भीती बळीराजास आहे..ती अनाठायी म्हणता येणार नाही.👇
★Farmers Produce Trade and Commerce (Promotion and Facilitation) Bill

हे कायदे निर्माण झाल्यास काही महत्वाचे बदल संभवतात..

◆ सर्वात अगोदर आत्ताची नोटिफाईड मंडई व्यवस्था मोडीत निघेल.. म्हणजे शेतमाल कुठूनही विकता येऊ शकेल.ज्या मंडई खाजगी व्यापारी सुद्धा बनवू शकतील. 👇
त्यांच्यावर सरकारचं MSP किंवा शेतमालाच्या खरेदी विक्रीच्या रुपात कुठल्याही कायद्याचे नियंत्रण नसेल. एकदा का सरकारी कायद्याने नियंत्रित असलेल्या मंडई बाहेर दुसरी मंडई तयार झाली त्यावर कोणाचे नियंत्रण नसेल.. साहजिकच MSP ची आशाही करू शकत नाही. असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.👇
★Agriculture Service Bill

पुढे जो प्रस्तावित कायदा आहे त्यानुसार
◆ Cereals, Pulses, Oilseeds, Onion, Potato. यांना अत्यावश्यक कमोडिटी मधून वेगळं केलं जाईल.. त्याने त्यांच्या खरेदी-विक्री, आणि साठवणूक यावर कसलेही नियंत्रण नसेल.
लहान आणि मार्जिनल शेतकरी हे आपला माल साठवून 👇
ठेवण्याच्या नादास लागत नाहीत.. कारण तेवढं उत्पादन ही नसतं आणि त्यासाठीचा खर्च आवाक्याबाहेर असतो.. कारण शेतमाल नाशवंत असतो.. अशावेळी व्यापारी वर्ग बरोबर हार्वेस्टिंग च्या काळात सदर मालाचे दर पाडतात आणि खरेदी करून साठवण करतात.. पुढे बाजारात तेजी आली की तोच माल दुपटीने विकतात.. 👇
हा अनुभव आहे. म्हणून व्यापारीवर्ग आणि सरकार यांचा इतिहास पाहता यातून फक्त मिडलमन आणि व्यापारी हेच मालाची साठवणूक करून शेतकऱ्यांची पिळवणूक करतील ही रास्त भीती शेतकऱ्यांना आहे.

★The Farmers (Empowerment and Protection) Agreement On Price Assurance and Farm Services Bill👇
तिसऱ्या कायद्याने कंत्राटी शेतीला मुक्त रान मिळेल.. ज्यात वेगवेगळ्या कंपन्या शेतकऱ्यांची पिळवणूक करून कमी दरात माल पिकवून जास्ती दरात तो ग्राहकांना विकतील अशी रास्त भीती शेतकऱ्यांना आहे.

वरवर पाहिल्यास हे सर्व कायदे शेतकऱ्यांच्या अतीव फायद्याचे वाटू शकतात.. 👇
ते फायद्याचे असतील ही पण केंव्हा? ज्यावेळेस या कायद्यांना पूरक अशी पारदर्शक आणि सुरक्षित व्यवस्था उभी केली तर..

MSP ची हमी सरकारने द्यायला हवी. शेतकऱ्यांना साठवण आणि प्रक्रिया याविषयी इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून द्यायला हवं.. 👇
सध्या पश्चिम UP, हरियाणा, पंजाब या राज्यातील शेतकरी पेटून उठलेत या कायद्यांविरोधात.. त्यांची भीती मान्य करून योग्य ती खबरदारी आत्ताच घ्यायला हवी.

समजा ते न करता आता आपण जर बळीराजाचे हे बंड बळाचा वापर करून मोडून काढण्यात यशस्वी झालो..तर ते सुख क्षणिक असेल. 👇
कारण, त्या नंतरची येणारी अवस्था करूण असेल. हा इतिहास आहे.🙏

संदर्भ -द हिंदू

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with डेडपूल...

डेडपूल... Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @MarathiDeadpool

Mar 17
ठाणे-बोरिवली बोगद्याची १४४०० कोटींची निविदा.. तांत्रिकदृष्ट्या एकच निविदाकार पात्र ठरतो.. दुसरा त्याविरोधात लवादाकडे जातो..पण तिथून त्यास पिटाळले जाते..तो पात्र निविदाकार मेघा इंजि. आणि पिटाळलेला L&T..ही घटना मे-२०२३ ची.
महिनाभरापूर्वी मेघा ने १४० कोटींचे रोखे घेतलेले असतात.
१/न
ते रोखे कोणत्या पक्षाला गेले हे उद्या स्पष्ट होईलच..पण आज आत्ताही शेंबड्या पोरानेही योग्य उत्तर द्यावं..असाच हा प्रश्न आहे..याच मेघाला समृद्धी महामार्गाचे काही काम वर्धा जिल्ह्यात मिळालेलं..त्यात वन्यजीवांसाठी ये-जा करणारा उन्नत मार्ग कोसळला होता.. पण काहीच कारवाई झालीच नाही.
२/न
मेघाने आपल्या गत ४ वर्षीच्या एकूण निव्वळ नफ्याच्या तब्बल १५% इतकी रक्कम रोखे खरेदीसाठी वापरली आहे..बिनदिक्कत कंत्राट मिळणे, अक्षम्य त्रुटीवर क्षमा मिळणे..ही त्या १५% चीच कृपा म्हणायची..गेल्या पाच वर्षात ९६६कोटींचे रोखे मेघाने घेतलेत.
३/न
Read 17 tweets
Apr 24, 2023
अखंड एक पिढी तुझा खेळ बघत लहानाची थोर झाली.. एखाद्या खेळाशी भावना जुळण्याची ती त्या पिढीची पहिलीच वेळ.. तुझा खेळ पाहतानाचे 'नेल-बाईटिंगचे' अनेक प्रसंग आजही जशाच तसे आठवतात.. तत्कालीन जाहिरातीमधील पेप्सीसारखा थंडावा सापडणारी.. तुझी प्रत्येक नजाकत रसिकांची मनं शांत करत गेली..❤️
अजून मिसरुटही न फुटलेला 'सच्या' ते पोक्त 'मास्टर ब्लास्टर सचिन' या प्रवासाचे यथासांग सहप्रवासी होण्याचे भाग्य आमच्या पिढीने अनुभवले..तो बावनकशी अनुभव पारिजातकाच्या सड्याप्रमाणे सदैव आमच्या आयुष्यात सुगंधी पिंगा घालत राहील..पण त्या समृद्ध अनुभवाच्या भरजरी पदराला एक मात्र डाग आहे..
तो डाग म्हणजे..मूकसंमतीचा.
क्रिकेट माणसांनीच बनवलेला खेळ आहे.. माणूस म्हणून जे अवगुण असतात ते त्या खेळातही येणारच.. एक क्रिकेट रसिक म्हणून क्रिकेटच्या त्या अवगुणी वृत्तीविरोधात सचिनने काही बोलावं..ही एकमात्र आशा तेंव्हा अपूर्ण राहिली..तुझी ती मुकसंमती तेंव्हाही वेदनादायक होती.
Read 7 tweets
Oct 2, 2022
तिन्हीसांजेची लगबग रस्त्यावर दिसत होती.. रस्ता फार काही वर्दळीचा न्हवता.. हार-फुलांची दोनचार दुकानं आणि शांत चहापानासाठी कौलारू एकदोन हॉटेलं.. अधूनमधून कुंपणाच्या आतील घरं..तुरळक एखादं किराणा मालाचं दुकानं..आणि रस्त्याच्या टोकाला छोटेखानी कसलं तरी मंदिर.. बस् संपला रस्ता..
#Love
परिसर तुलनेत शांत होता.. कुठंतरी लांब चंदन अगरबत्ती धुराची काडी हवेत सोडत होती..ती काडी संपता संपता सायलेंट सुगंध त्याच्यापर्यंत पोहचवत होती..त्या सुगंधाने दिवसभराची ओढाताण हलकी होत होती..दिवेलागणीला असतो तो आभाळातला भडक तांबूसपणा आता विझत आला होता..त्यातच थंडीची धांदल सुरू होती.
नगराच्या मध्यवर्तीत असूनही हा तळ मनाला भुरळ पडणारा होता..वाहतूक अगदी शिस्तीत जात होती.. मंदिराकडे जाणारी माणसं दुर्मिळ असणाऱ्या शांत चेहऱ्याने लगेच ओळखू येत होती.
फुलांच्या दुकानात 'मेरे दिल में आज क्या है.. तू कहे तो मैं बता दूँ।' वाजणारं गाणं फुलांना अजूनच खुलवत होतं..
Read 7 tweets
Oct 1, 2022
दिवसाच्या पहिल्या प्रहराची सुरवात..रात्री बाराला गडगडाटी पाऊस पडून गेला होता..घरी सगळे साखर म्हणावी अशा झोपेत..रातकिड्यांची किरकिर शांत वातावरणाची शांतता भयाण रातीत परावर्तित करत होती.. मधूनच एखादं कुत्रं रडायचं..पण ते कोणीतरी तोंड दाबून धरल्यागत लगेच शांत पण व्हायचं.
#Annabelle
मला जाग आली तेंव्हा घरात सगळे आपापल्या रूममध्ये झोपले होते..फॅनची घरघर सोडता कसलाच आवाज न्हवता..अजून थोडा वेळ आहे, पडावं..या हिशोबाने मी कलंडलो..इतक्यात लहान मुलांच्या सायकलचं ते इंग्लिश संगीत वाजायला सुरवात झाली..पहिल्यांदा मला बाहेरून आवाज येतोय वाटलं..पण ते फक्त पाचच मिनिट.
कारण आवाजाची दिशा ही आपल्याच घरातून होती..आणि इतक्या उशीर आमच्या घरात एकसारखं ते संगीत वाजायची ही पहिलीच वेळ..आणि एवढं घाबरायचीही ही पहिलीच वेळ.. अगदी The Conjuring, Annabelle एका दणक्यात आठवावी इतकी.
काय करावं कळत न्हवतं..आणि खोलीचं दार उघडलं आणि काही दिसलंच तर करायचं काय?
Read 9 tweets
May 11, 2022
उघड्या माळावर कुसळं उगवून वाळून जायची..ती खायला जनावरं सुद्धा नसायची..नजर जाईल तिथवर चिटपाखरूही न्हवतं..उघडे डोंगर-माळ ज्यांच्या मालकीचे..ते ही काही करू शकत नव्हते..अशात त्यावर नजर पडली एका बड्या पवनचक्की कंपनीची..आणि एका रातीत लोकांना पैशे ठेवायला नव्या ट्रंका घ्याव्या लागल्या.
जमिनीचे सौदे ठरतील तसं एका एका घराचे वासे फिरू लागले.. लाकडी तुळई जळणात गेल्या..त्या जागी RCC पिलर आले.. सायकलची चैन पडायची त्याच जागेवर धूळ आत येऊ नये म्हणून चारचाकी काचा वर करू लागल्या.. ३ डोकी घरात असूनही दारात ४-४ दुचाकी आणि २-२ चारचाक्या सर्रास दिसू लागल्या.
मळलेल्या कॉलर गेल्या..व्हाइट कॉलर आता ड्रायक्लीन होऊन येऊ लागल्या..पाण्याच्या घोटासाठी वाट बघणारे.. आता बार मालकाला खिशात ठेऊ लागले..सो कॉल्ड बरकतीने गाव सारा फुलून उठला..भावंडात हिश्श्यावरून धराधरीही झाली..हा सगळा गोंधळ चांगला दशकभर सुरू राहिला..खर्चापेक्षा जमा जास्त होती.
Read 11 tweets
Mar 8, 2022
रशिया-युक्रेन कुस्ती फक्त ५६" किंवा इंधन महागाई एवढ्यापुरती मर्यादित नाही..युक्रेन पट्टीचा गहूनिर्यातदार देश आहे..सूर्यफूल,सोयाबीन इ. तेल ही तो पिकवतो.. सांगायचा मुद्दा आहे..युक्रेन युद्ध धांदलीत अडकल्याने.. आंतरराष्ट्रीय बाजारात त्या जिन्नसांचा तुटवडा आहे..❤️
#farm
आपल्याकडे आत्तापासूनच खाद्यतेल महागाई जाणवत आहे ती त्यामुळेच..खाद्यतेलाच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण नाही..त्यास पर्याय नाही..पण, गव्हाचे तसे नाही.. सद्यस्थितीत भारत गव्हाचे चार दाणे बाळगून आहे.. शिवाय यंदाचे रब्बी उत्पादन ही येईल..तेंव्हा केंद्राने निर्यातबंदी न करता हा योग साधावा.
शेतकऱ्यांना चार पै ज्यादाचे मिळतील त्याने.. पण, केंद्राची शेतकऱ्यांप्रति असलेली भावना यापूर्वी कांदा आणि साखर निर्यातबंदीत दिसलीच आहे..अन्नसुरक्षा या सदराखाली शेतकऱ्यांचा जीव घेऊनच स्वस्त धान्य दुकानांची शृंखला चालवण्याची परंपरा यंदा तरी खंडित व्हायला हवी.
Read 8 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us!

:(