👇हा व्हिडीओ(48 सेकंदानंतर बघा) पाहिल्यापासून भयंकर अस्वस्थ आहे,निशब्द, हतबल आहे. डोळ्यात पाणी कधी आलं कळलं नाही. राज्य अक्षरशः मरतय..😢
कोरोनाच्या भयंकर परिस्थितीवर बोलताना हुंदका देऊन रडणारा नितळ मनाचा माणूस कोण हे माहितीय का! हे आहेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे माजी+
प्रमुख ओमप्रकाशजी शेटे.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पाच वर्षात 21 लाख रुग्णांना 1500 कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देत उपचार करणारे कर्तव्यदक्ष अधिकारी.
राज्यातली कोरोनाची परिस्थिती भयंकर वाईट आहे, भयंकर वाईट!😢 लाखों लोकं उपचारासाठी+
धडपड करताहेत...घरदार विकताहेत..ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांना कोणीच उभा करत नाही. सरकार जबाबदारी घ्यायला तयार नाही. सत्ताधारी घराच्या बाहेरही पडत नाहीत, लोकांना वाली कोणीच नाही... भावांनो, आत्तापर्यंत राज्यात कोरोनामूळे तब्बल 31 हजारपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झालाय.😢+
शेटे सर राज्य सरकारच्या विरोधात उच्च न्यायालयात गेले आहेत,आता सामान्य माणसाला न्याय फक्त न्यायदेवताच देऊ शकते. आपण सगळे हतबल आहोत. अधिकारी म्हणून झोकून देऊन काम करणारे शेटे सर लोकांचे हाल बघून भावनाविवश झालेत...
खरंतर अधिकारी माणसं निगरगट्ट असतात, काही तर नियमाच्या चाकोरीत राहून+
सामान्यांच्या मरणाचा सोहळा करणारी..पण जनतेचं दुखः, भावना, यातना बघून डोळ्यात पाणी आणणारा, हळवा होणारा, ढसाढसा रडणारा असा संवेदनशील मनाचा अधिकारी विरळ असतो... व्हिडीओ पाहून कामाची तळमळ, कालवाकालव स्पष्ट दिसतेय. पण हतबल आहेत😑
जास्त काय लिहू.... सर्वांनी काळजी घ्या..बस्स!🙏
- विकास
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
महत्त्वाचा थ्रेड ..👇
एका बाजूला मराठा आरक्षणाचं आंदोलनं निर्णायक टप्प्यावर आहे अन् दुसऱ्या बाजूला एक घटक उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांना व्हिलन बनविण्याच्या प्रयत्नात आहे. कालपासून काहीजणांच्या पोस्ट पाहून थोडं वाईट वाटलं, गुणरत्न सदावर्ते हा देवेंद्र फडणवीस यांचा माणूस+
असल्याचा जाणीवपूर्वक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. सदावर्ते काय बोलतात किंवा त्यांची भूमिका काय आहे याचा आणि भाजपचा किंवा देवेंद्र फडणवीसांचा काहीच संबंध नाही, सदावर्ते हा माणूस तसा थोडा आगाऊ आहे, जेव्हा मराठा समाजाला देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं, ते+
आजपर्यंतच्या इतिहासात दिलं नव्हतं, जर त्या माणसाच्या मनात मराठा समाजाबद्दल आस्था नसती, आपुलकीची भावना नसती, संवेदना नसत्या तर कधीच आरक्षण दिलं नसतं, कारण त्यापूर्वी कितीतरी जातिवंत मराठे मुख्यमंत्री होऊन गेले मात्र त्यांनी मराठ्यांना आरक्षण कधीच दिलं नाही, ना त्याबद्दलची तळमळ+
काल उरलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी अत्यंत संतापून एक वाक्य उच्चारलं की, “देवेंद्र फडणवीस करतात तरी काय ?”
आणि त्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं की, त्यांच्या संतापाचे दुसरे काही कारण नाही, सध्या आपल्या वडिलांचा पक्ष फुटल्याचे प्रचंड+
मोठे टेन्शन ताईंना आहे, राष्ट्रीय बेरीज करण्याच्या बेतात असणाऱ्या वडिलांच्या घरातच वजाबाकी होते हे काही बरे नाही, याचे प्रचंड मोठे दुःख मनात आहे. आणि ताईंना ते जगाला दाखवायचेही नाही, देवेंद्र फडणवीस तर काहीच करत नाहीत मग करतात तरी काय असा यक्षप्रश्न ताईंना पडला आहे.
खरंतर+
देवेंद्र फडणवीस स्वतःचे कारखाने निर्माण करत नाहीत, कारखाने दिवाळखोरीत काढत नाहीत, त्याच्या आडून सरकारी अनुदान लाटत नाहीत, मग देवेंद्र फडणवीस करतात तरी काय?
देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचार करत नाहीत, बगलबच्चांच्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहनही देत नाहीत, मग देवेंद्र फडणवीस करतात तरी काय?+
थ्रेड👇
आज शरद पवार एका रात्रीत मराठा आरक्षणाच्या व्यासपीठावर जाऊन फक्त आणि फक्त देवेंद्रजी फडणवीस यांना लक्ष्य करत आहेत, मात्र स्वतः शरद पवार याच महाराष्ट्राचे एकदा, दोनदा नव्हे तर तब्बल चार वेळा मुख्यमंत्री होते, त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून म्हणा, नाहीतर मराठा मुख्यमंत्री+
म्हणा मराठा बांधवांच्या वाट्याला त्यांनी काय दिलं?
तेही सोडा, देवेंद्रजी फडणवीस यांना आज इतक्या द्वेषाने लक्ष्य करण्यात शरद पवार पुढाकार घेताहेत, त्या पवारांना मराठा बांधवांनो, एवढंच सांगा की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2018 साली मराठा आरक्षणाचा कायदा केला आणि मराठा+
समाजाला सामाजिक आर्थिक दुर्बल घटकात समाविष्ट करून आरक्षण दिले. ते धाडस फक्त फक्त देवेंद्र फडणवीस या एकाच व्यक्तीने केले, एवढेच नाही तर सारथीसारखी संस्था असो, अण्णासाहेब पाटील महामंडळ असो, प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजातील मुलांना वसतिगृह असो अशा अनेक योजनांच्या माध्यमातून मराठा+
महत्त्वाचा थ्रेड👇
मराठा आरक्षणाचा विषय आला तेव्हा तेव्हा “फडणवीस” धावून आले. शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीत कधीच मराठा बांधवांना आरक्षण दिले नाही. पण देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण चळवळीने वेग घेतला आणि त्यांच्या चाणाक्ष, अभ्यासू आणि धोरणात्मक बुद्धीने+
मराठा समाजाला आरक्षण दिले. खरंतर सुप्रीम कोर्टात आरक्षण जेव्हा स्थगित झाले तेव्हा राज्यात शरद पवारांच्या विचारातून आलेलं उद्धव ठाकरे सरकार होतं, जेव्हा सुप्रीम कोर्टात सुनावण्या होत्या तेव्हा त्या ठिकाणी मराठा आरक्षणची बाजू राज्य सरकार लढवत होते, मात्र शरद पवारांनी आजपर्यंत कधीच+
मराठ्यांना आरक्षण मिळावे अशी भूमीका घेतली नाही. आज जालन्याची एक घटना झाली आणि लगेचच रातोरात शरद पवार तिथे गेले आणि त्यांना मराठा आरक्षणाचा कधी नव्हे तो कळवळा आला. पण मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे ही पहिल्या दिवसापासूनची भूमिका देवेंद्र फडणवीसांची होती. ती त्यांनी सत्यात+
थ्रेड👇
परवा ओरिसात रेल्वे दुर्घटना घडली अन शरद पवार सवयीप्रमाणे राजकारण करायला पुढं आले, बोलता बोलता त्यांना स्व. लालबहाद्दूर शास्त्रींची आठवण आली, एकदा दुर्घटना घडली होती आणि शास्त्रींनी नैतिक जबाबदारी स्वीकारुन रेल्वे मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता, आता याही दुर्घटनेनंतर+
रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा असं पवार साहेब बोलून गेले. त्यात त्यांनी वापरलेला नैतिकता हा शब्द माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विचार करायला लावत होता.
वयाने आणि राजकारणात जेष्ठ असलेले शरद पवार आज नैतिकतेचे धडे देत आहेत, मात्र त्यांच्या इतिहास काळात थोडं जायला हवं असं सतत+
वाटत होतं. 1993 साली मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाला, हे बॉम्बस्फोट तब्बल 12 ठिकाणी झाले मात्र धडधडीत खोटं बोलत शरद पवारांनी 13 ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्याचं सांगितलं, त्या स्फोटात तब्बल 257 जणांचा बळी गेला होता, तर शेकडो लोकं जखमी झाले होते, तेव्हा शरद पवार स्वतः मुख्यमंत्री होते+
महत्वाचा थ्रेड👇
बारामतीच्या पवारांना बामणाचं पोरगं आणि तेही आपल्यापेक्षा कमी वयाचं, आपल्या डोळ्यादेखत राजकारणात आलेलं पोरगं मुख्यमंत्री झालं हेच खटकायला लागलं होतं अन त्या तरुण मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीसांच्या भोवती आंदोलन, संप आणि मोर्चाचे फास आवळायला लागले. रोज नवी+
आव्हानं आणि रोज नवी संकटं उभी केली जात होती आणि प्रत्येक आव्हानाला पेलत, सामोरे जात हा फडणवीस नावाचा बहाद्दर काटेरी खुर्ची सांभाळत होता, एकीकडं तत्कालीन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसारखा गद्दार पक्ष सोबतीला होता, रोज पाठिंबा काढण्याच्या धमक्या सुरू होत्या, एकीकडं रोज विरोधकांच्या+
काव्यांची परीक्षा द्यायला लागायची अन हे सगळं सुरू असताना महाराष्ट्राच्या समृद्धीचा रोडमॅप सुरू होता, प्रचंड वेगाने महाराष्ट्र पुढे न्यायचा हा ध्यास देवेंद्र फडणवीस यांच्या मनात होता. कितीही संकटं वाट्याला आली तरी न थकणारा, न थबकणारा आणि जराही डळमळीत न होणारा हा माणूस पवारांच्या+