गेले १५ दिवस झाले महाराष्ट्रात #राष्ट्रपती_राजवट लागु करा अशी काही लोक मागणी करत आहेत.आजच्या थ्रेडमध्ये राष्ट्रपती राजवटीबद्दल माहिती जाणून घेऊ.सोप्या शब्दात कलम,घोषणेचा आधार व देशात कितीवेळा,कुठे जास्त कुठे कमी लागु केली इ #म#मराठी#धागा#महाराष्ट्र#PresidentRuleInMaharashtra
एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायची असल्यास 'कलम ३५६' चा वापर केला जातो.राज्यशासन घटनात्मक तरतूदींनुसार चालत नाही याची खात्री झाल्यास राष्ट्रपती राज्यशासन आपल्या हातात घेते यालाच 'राष्ट्रपती राजवट' किंवा 'राज्य आणीबाणी' किंवा 'घटनात्मक आणीबाणी' असे म्हटले जाते. #म#रिम
*कलम ३५६ लागु करण्यासाठी दोन आधार घेतले जातात.
१)कलम ३५६:-
जर राष्ट्रपतींना एखाद्या राज्याचे शासन घटनात्मक तरतुदींना धरून चालत नाही अस जाणवलं तर ते राजवटीची घोषणा करतात.अशी घोषणा ते संबंधित राज्याच्या राज्यपालांकडुन तसा अहवाल प्राप्त झाला किंवा नाही झाला तरी करू शकतात. #कोशियारी
२)कलम ३६५:-
जर केंद्राने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यास किंवा त्यांची अंमलबजावणी करण्यात राज्याने कसुर केला तर, राष्ट्रपती अस गृहीत धरतात की ते राज्यशासन घटनात्मक तरतूदींनुसार चालत नाही.
*राष्ट्रपतींच्या घोषणेला संसदेची संमती असावी लागते.
*संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता दिली की राष्ट्रपती राजवट दुसरा ठराव पारित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांपर्यंत राहते.त्यानंतर ती संसदीय ठरावाद्वारे पुढे एका वेळी सहा महिन्यांसाठी वाढविता येते.पण,अशी ती जास्तीत जास्त ३ वर्षांसाठीच वाढवता येते.
*राष्ट्रपती राजवट समाप्त करणे-(revocation of President's rule)
राष्ट्रपती केव्हाही राष्ट्रपती राजवटीची उद्घोषणा दुसर्या उद्घोषणेद्वारे करू शकतात.अशी समाप्तीची उद्घोषणा करण्यासाठी संसदेच्या संमतीची आवश्यकता नसते.
कलम ३५६ चा वापर:-
संविधान सभेत जेव्हा कलम ३५६ वर टिका झाली तेव्हा डॉ.आंबेडकरांनी अशी आशा व्यक्त केली होती की, कलम ३५६ हे घटनेतील एक 'मृत-पत्रा'(dead letter) प्रमाणे राहील व त्याचा वापर केवळ शेवटचा पर्याय म्हणुनच केला जाईल.पण जेव्हा घटना लागू झाली त्यानंतर कलम ३५६ 'मृत पत्र'
ठरण्याऐवजी कित्येक राज्य आणि विधानसभांसाठी 'घातक-शस्त्र' म्हणुन वापरले गेले.म्हणुन एच.व्ही.कामथ १९९० ला म्हणतात,"डॉ.आंबेडकर तर आता जीवित नाहीत,मात्र हे कलम आजही मोठ्या प्रमाणात जिवंत आहे."
१९५० नंतर आजपर्यंत '१२०'पेक्षा अधिकवेळा राजवट लागू झालीय.
खालील १९५०-२०१६ चा तक्ता पाहा.
*घटना लागु झाल्यावर सगळ्यात सुरूवातीला १९५१ ला पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली.
*सर्वात जास्त वेळा:-उत्तरप्रदेश(९)
*सर्वात जास्त दिवस:-J&K(२४५५ दिवस)
*महाराष्ट्रात आत्तापर्यंत ३ वेळा:-
१)१७ फेब्रु ते ८ जुन १९८०
२)२८ सप्टे ते ३१ ऑक्टो २०१४
३)१२ नोव्हे ते २३ नोव्हे २०१९
*छत्तीसगड व तेलंगणा असे दोनच राज्य आहेत जिथे एकदाही राष्ट्रपती राजवट लागू झाली नाही.
*आत्तापर्यंत इंदिरा गांधींच्या काळात सर्वात जास्तवेळा राजवट लागु करण्यात आली आहे.त्यांच्या पंतप्रधानपद कालावधीत(१९६६-७७ व १९८०-८४) एकुण ५० वेळा राजवट लागु करण्यात आली आहे.
*तर मोरारजी देसाई यांच्या फक्त २ वर्ष पंतप्रधानपद कालावधीत एकुण १६ वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
*सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक 'बोम्मई खटल्या'मुळे(१९९४) राष्ट्रपती राजवटीचा अवाजावी वापर मोठ्या प्रमाणात कमी झाला.त्या खटल्यात कोर्टने राजवट लादायचे निकष सांगितले.#म
अवाजावी वापराचे काही उदाहरणे:-
१)१९७७ मोरारजी सरकारने काॅंग्रेसशासित ९ राज्यांत राष्ट्रपती राजवट लागू केली.या राज्यात विधानसभा आता लोकांची मते प्रदर्शित करत नाही अस कारण दिलं.
२)१९८० काॅंग्रेस सत्तेत आल्यावर त्यांनीही त्याच आधारावर ९ राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागु केली.
Electoral bond बद्दल तत्कालिन अर्थमंत्री स्व.अरूण जेटली नी 2017 च्या अर्थसंकल्पात प्रथम उल्लेख केला.ज्यावेळी वेंकटेश नायक या RTI कार्यकर्त्याने(Right To Information, 2005)याबद्दल विचारणा केली होती तेव्हा अर्थ मंत्रालय,निवडणूक आयोग व रिझर्व बँक ऑफ इंडिया ने आम्हाला
#ElectoralBond
Electoral Bond बद्दल कोणतीही कल्पना नव्हती अस सांगितलं.
Electoral bond आणण्याच्या आधी सरकारने निवडणूक संदर्भातील, उत्पन्न कर संदर्भातील आणि RBI संबंधित असणार्या कायद्यामधी बदल केला आणि मग electoral bond आणला. सुरुवातीला सरकारने मोठ मोठ्या बाता मारत देशाला सांगितले होते की
आम्ही electoral bond आणण्यापूर्वी सगळ्या समभागधारकांशी, निवडणूक आयोगाशी तसेच रिझर्व्ह बँकेसोबत चर्चा करू आणि मगच आणु परंतु आपल्या नेहमीच्या हेकेखोर स्वभावाला जागुन सरकार कोणाशीही कसलीच चर्चा न करता electoral bond घेऊन आले.
बर..या विषयाच्या खोलात जाण्यासाठी RTI कार्यकर्ते नायक
'घरातल्या आणि घरी आणून पूजलेल्या गणपतीला कमी लेखून दुसरे "राजे" पुजायला जाऊ नका.
वाचा आणि सहमत असाल तर अंमलात आणा.
घरात गणपतीची मूर्ती किंवा फोटो नाही असं आस्तिकाचं एकही घर सापडायचं नाही. पण गणपती जवळ आले की त्या घरातल्या मूर्तीवरचा
विश्वास उडतो का काय होतं माहित नाही. पण घरातली मंडळी पहाटे उठून, वशिले लावून, व्हीआयपी दर्शनासाठी पैसे मोजून वगैरे xxxचा राजा, तमुक बादशहा, अमुक सम्राट गणपतीच्या दर्शनाला जातात. का तर म्हणे तो जागरूक आहे.
घरातला गणपती जागरूक नाही.....???
अहो, गणपती म्हणजे देव एकच असतो.
जागरूक, निद्रिस्त वगैरे प्रकार का मानता तुम्ही......???
तो एकच आहे. तुमची श्रद्धाही एक असू द्या. जागरूक म्हणून स्पेशल श्रद्धा, घरातला निद्रिस्त म्हणून त्यावरची श्रद्धा गुंडाळायची असं करू नका.
बहुसंख्य मंडळी घरात चांगली मूर्ती आणतात, मनोभावे पूजाअर्चा, आरत्या, नैवेद्य
म्हातारीचा चौदावा झाला आणि पोरानं घराला मोठा टाळा लावून म्हाताऱ्याला एस.टीत घालून कायमचा शहराकडे आणला. पण उभं आयुष्य रानामाळात गेल्यानं त्याच मन काही इथे रमत नाही. तो खुर्चीत बसून गरगर फिरणाऱ्या पंख्याकडं नुसता एकटक बघत राहतो. जगून झालेल्या आयुष्यावर विचार करत
सकाळी पाच वाजता
उठून अंथरुणात बसून राहतो. आतील नळाला पाण्याचा आवाज आला की बादलीभर थंड पाणी रापलेल्या देहावर मारून घेतो. तसा तो सहा पासूनच चहाची वाट पाहत बाहेरच्या हॉल मधे टांगलेल्या घड्याळाकडे बघत बसून असतो, आतल्या बेडरुमचा दरवाचा उघडण्याची वाट बघत कित्येक वेळा तो हलणाऱ्या
मानेने आत डोकावूनही
बघतो. मग एके काळी भल्या पहाटे बाहेरच्या चुलीवर म्हातारीने चहासाठी ठेवलेलं जर्मनचं पातेलं त्याच्या डोळ्यासमोर दिसू लागतं दहा वाजता सुनेनं कपातून दिलेला चहा थरथरत्या हाताने घश्यात ओतून तो धोतर सावरत जिन्याच्या पायऱ्या उतरुन सोसायटीच्या गार्डन मध्ये थकलेल्या
येणार्या दोन दिवसात अदाणी ग्रुपला एकतर अप्पर किंवा लोवर सर्कीट लागेल कारण २९ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाचा अदाणी संदर्भात निर्णय येणार आहे.
या थ्रेडमध्ये आपण
जाॅर्ज सोरोस कोण आहेत?
OCCRP म्हणजे काय?
SEBI ने सर्वोच्च न्यायालयात जमा केलेला अदाणी रिपोर्ट काय आहे?
'हिंडनबर्ग 2.0'?
ज्यावेळी 24 जानेवारीला 'हिंडनबर्ग'ने अदाणी ग्रुपचा रिपोर्ट बाहेर काढला होता तेव्हा अदाणी ग्रुपमध्ये काय धुर्रळा झाला ते सगळ्या जगाने पाहिले होते. कंपनी एव्हढी कोसळली की आजतागायत अदाणी ग्रुपला उभारी घेता आलेली नाहीय..
तर ज्यावेळी हिंडनबर्गने रिपोर्ट बाहेर काढला त्यावेळी 'जाॅर्ज
सोरोस' ही ९३ वर्षीय व्यक्ती पुन्हा प्रकाशात आली.
सोरोस यांच्याबद्दल सांगायचच तर मार्केटमध्ये ते Short seller म्हणुन प्रचलीत आहेत आणि त्यांना 'The man who broke the Bank Of England' म्हणुन ओळखले जाते. 16 सप्टेंबर, 1992 साली युनायटेड किंग्डमचे चलन(पाऊंड स्टर्लिंग) कोसळत असताना
आयुष्याच्या एका वळणावर आपल्यालाच जाणवायला चालु होत की "माझा मार्ग चुकलाय का? नेमकं काय चुकतय माझ्याकडुन? मलाच का वेळ लागतोय? मला हवय ते मिळेल का नाही??"
या विचारांनी तुम्ही एव्हढे त्रस्त होता की तुम्हाला झोप लागत नाही. रात्रभर विचार करत निपचित पडुन राहण्याची इच्छा होते तर पहाटे
आवर्जून जाग येते, आणि जेव्हा भल्या पहाटे जाग येते तेव्हा या नकारात्मक विचारांचे चक्र पुन्हा फिरायला चालु होते. अस वाटत की 'राव, आपल्याला आपल शरीर हे विचार येण्यासाठी मुद्दाम झोपेतुन उठवतय, रातभरपण झोपुन देत नाही..'
शेवटी आपल्या मनाची घालमेल व्हायला चालु होते, आपलं कशातच मन लागत
नाही. शांत शांत बसुन राहायला आवडत, संवाद साधण्याची इच्छा मरायला चालु होते, आपल्या लोकांसोबतही बोलणं जीवावर येत आपल्या..
अस वाटत सगळ सोडुन निघुन जावं कुठतरी शांत ठिकाणी..डोकं जड होत, मन गहिवरून येत..डोळे पाणावतात. असह्य व्हायला चालु होत सगळं..त्यात मनाच्या जखमेवरची खपली खपकन
छपरी हार्पिक दांड्याने तिलकचा फोकस हालवायचा प्रयत्न केला. तिलक 44 वर असताना बिनाकामाचं 'तुला नाॅट आऊट राहायच आहे' असली बडबड करून पांड्यानं त्याचा बॅट फ्लो थांबवला.
पांड्या स्वतः स्ट्राईकवर आल्यावर हागरा शाॅट मारून हिरो बनण्याचा प्रयत्न करायला गेला पण त्याचं नशीब चांगलं त्याचा
कॅच सुटला.
पुन्हा तिलक स्ट्राईकवर आल्यावर त्याने १ रन काढुन हार्पिकला स्ट्राईकवर आणलं आणि पुन्हा एकदा हार्पिकने हागरा शाॅट मारून हिरो बनण्याचा असफल प्रयत्न केला. स्वताला स्ट्राईक पाहिजे म्हणुन हातात असणार्या बाॅलवर तिलकला २ धावा काढण्यासाठी बोंबलायला लागला. तो हाच पांड्या होता जो
२ बाॅलपुर्वी तिलकला नाॅट आऊट राहण्याबद्दल ज्ञान पाजळत होता.
शेवटी तिलकने लायकी नसलेल्या हार्पिक दांड्याला विचारलं की "मी काय करू?? एक काढू का मोठा शाॅट मारु?" यावर निर्लज्ज हार्पिक त्याला म्हणतोय "तुला काय करायचं ते कर"..
शेवटी २० वर्षीय तिलकने वयापेक्षा जास्त प्रगल्भता दाखवुन